इतिहास
मराठेशाहीचे अखेरचे सेनापती - बापू गोखले
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नजीक तळेखाजण येथे पिरंदवणे (तळेखाजण वाडी) येथे गोखले घराणे वसले होते. लष्करी पेश्याची कोणतीही परंपरा असण्याची शक्यता नसलेल्या या घराण्यात १७७१ मधे नरहर उर्फ बापू गोखले याचा जन्म झाला. बापुंचे वडील गणेशपंत, चुलते मोरोपंत व लक्ष्मणपंत हे शेतकरीच असावेत. बापूंच्या आई विषयी माहिती मिळत नाही.पितृसहवास बापुना किती लाभला हे ही समजत नाही. मात्र चुलते धोंडोपंत आणि काकू लक्ष्मीबाई यानीच बापुना सांभाळले असावे. बापूंना महादेव (आप्पा) नावाचा एक मोठा भाऊही होता. धोंडोपंत हे विजयदुर्ग सुभ्यास गंगाधर पंत भानू याच्या कडे कामास होते. त्यावेळी विजयदुर्ग परिसरात रामोशी टोळ्या लुटा
आज काय घडले.... माघ शु. ४ श्रीगणपतीचा जन्मदिवस :
आज काय घडले....
माघ शु. ४
श्रीगणपतीचा जन्मदिवस :
माघ शु. ४ हा दिवस श्रीगणपतीचा जन्मदिन म्हणून मानला जातो.
आज काय घडले... माघ शु.३ शनिवारवाड्याचे वैभव !
शके १६५१ च्या माध शु. ३ रोजी पुणे येथे पहिल्या बाजीरावाच्या कारकीर्दीत प्रसिद्ध अशा शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.
आज काय घडले... माघ शु. २ उमाजी नाईक फांसावर !
शके १७५३ च्या माघ शु. २ रोजी जेजुरीच्या खंडोबाचा प्रसिद्ध भक्त आणि विख्यात क्रांतिकारक रामोशी उमाजी नाईक यांस फाशी दिली गेली
आज काय घडले... माघ शु. १ " अधर्माने राज्य टिकत नसते !"
माघ शु. १ या दिवशी श्रीरामचंद्रांनी राजधर्मास अनुसरून व बिभीषणाची संमति घेऊन सामोपचाराचे शेवटचे बोलणे करण्यासाठी अंगदास रावणाकडे पाठविलें.
आज काय घडले.... पौष व. ३० दोन जन्मठेपींची शिक्षा!
शके १८३२ च्या पौष व. ३० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दुसऱ्या खटल्याचा निकाल लागून त्यांना दुसरी जन्मठेप-काळ्या पाण्याची शिक्षा झाली.
आज काय घडले... पौष व. १४ सुभाष 'चंद्रा'स ग्रहण?
शके १८६२ च्या पौष व. १४ रोजी वंगभूमीचे सुपुत्र सुभाषचंद्र हे आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याचा पुकारा सर्व देशभर झाला.
आज काय घडले... पौष व. १३ शहाजहान बादशहाचे निधन !
शके १५८७ च्या पौष व. १३ रोजी मोगलांचा पांचवा बादशहा शहाजहान याचे निधन झाले.
आज काय घडले... पौष व. १२ वडगांव येथे इंग्रजांचा पराभव !
आज काय घडले...
पौष व. १२
वडगांव येथे इंग्रजांचा पराभव !
शके १७०० च्या पौष व. १२ रोजी वडगांव येथे इंग्रज व मराठे यांचे युद्ध होऊन इंग्रजांचा पराभव झाला; आणि त्यांना मराठ्यांशी तह करावा लागला.