समाज

कोल्हापूरकर आहेत का कुणी?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
31 Oct 2016 - 10:07 pm

प्रिय मिपाकरांनो,

मिरचीच्या लागवडीच्या निमित्ताने, येत्या २-३ दिवसांत, कोल्हापूरला जाण्याचा विचार आहे.

ह्या वेळी आमची सौ. पण आमच्या बरोबर असेलच.

ह्या निमित्ताने कोल्हापूरकरांना भेटता येईल म्हणून हा धागा प्रपंच.

कळावे,

लोभ आहेच, तो वाढेल ही खात्री पण आहे.

आपलाच,

मुवि.

समाजचौकशी

दिवाळी अंक २०१६

यशोधरा's picture
यशोधरा in जनातलं, मनातलं
28 Oct 2016 - 9:57 pm

फटाके, फराळ, रांगोळ्या, आका़शकंदील, गोडधोड इत्यादिंबरोबरच मराठी घरांमधून दिवाळीचा अजून एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. कमीत कमी ३-४ दिवाळी अंक घरात आल्याशिवाय दिवाळी पूर्णपणे साजरी झाल्यासारखी वाटत नाही! परदेशात राहणारी मराठी मंडळीही ह्याला अपवाद नाहीत.

आता तर नेहमीच्या पारंपारिक दिवाळी अंकांसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही निघत आहेत. वेगवेगळ्या मराठी संस्थळेही दिवाळी अंक काढतात. उद्या पहाटे ५ (भाप्रवे बहुधा) नंतर मिपाचा दिवाळी अंकही दणक्यात प्रकाशित होईल आणि तो वाचायचीही उत्सुकता आहे.

साहित्यिकसमाजआस्वादमाध्यमवेधमतमाहितीसंदर्भ

शेती कामासाठी मजूर हवे आहेत....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
28 Oct 2016 - 11:44 am

प्रिय मिपाकरांनो,

होणार, होणार म्हणता-म्हणता आम्ही शेतकरी झालो.

पण सध्या आम्हाला शेती कामासाठी मजूर हवे आहेत.

सध्या आम्ही मिरचीची लागवड करत असल्याने आणि येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवड (आवळा, रिठा , शेवगा इ.) करणार असल्याने. ज्यांना ह्या शेतीविषयी ज्ञान असेल त्यांना प्राधान्य.

१. वेळच्या वेळी पगार दिल्या जाईल.

२. राहण्याची सोय केल्या जाईल.

३. २-३ गुंठे जागा त्यांच्या भाजी-पाल्यासाठी दिल्या जाईल.

४. दरवर्षी एका महिन्याच्या पगारा इतपत बोनस दिल्या जाईल.

समाजजीवनमानतंत्रराहणीमाहितीचौकशीमदत

शिक्रेट (शतशब्दकथा)

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
27 Oct 2016 - 6:05 pm

म्हराटी शाळंची घंटी वाजली. . . . मजी येक वाजला!
लगी म्या भांडं घिउन काकुंच्या घरला जाते.
''काकू जरा मुरवण देता का?''
''बस बाळा दोन मिन्ट, होतंय.'' काकू.

मलाबी बरं वाटतं जरा- रेडिवो आयकायला भेटतो. लई छान मराठी गाणी लावत्यात काकू.

काकू चांगल्या हायत. रोज मुर्वान मागितलं तरी नाय म्हणीत नैत.
पन तेंची तायडी?. ती घरात नसल्यालीच बरी.
नायतर मग चवकशा सुरूच-
''सुमी रोज कशाला येती?''
''आन मुरवान यवड्या मोट्ट्या भांड्यात कशाला?''

उरलं तर काकू कालवनच देत्यात. मग काय दिपवाळीच!

कथासमाजजीवनमानविचारअनुभव

'संघ' टन - एक प्रवास

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
27 Oct 2016 - 2:04 pm

मनुष्य संघटना का स्थापन करतो याचे कारण साधे आहे. त्याला त्याच्या किंवा आपल्या समाजाच्या कमकुवतपणाची जाणीव होते म्हणून. चार लोक जोडल्यानंतर एक शक्ती निर्माण होइल अशी त्याची अपेक्षा असते. हे संघटन समाज लगेच स्वीकारेल अशी स्थिती नसते. त्याला स्वतःसाठी लोकांच्या हृदयात जागा निर्माण करावी लागते. प्रसंगी इतरांना "थोडे सरकून घ्या" असे सांगावे लागते. तरच जागा निर्माण होते.

समाजसमीक्षा

शेतकरी राया..

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
21 Oct 2016 - 7:38 pm

शेतकरी राया...

अपुला शेतकरी राया, शेती प्रेमाची करतो..
अवघ्या भुकेल्या जनांची, ओंजळ प्रितीने भरतो..

अपुला शेतकरी राया, नांगर ओढतो जोमानं..
पिक हलते डुलते, शेती खुलते प्रेमानं..

अपुला शेतकरी राया, धनधान्य खुलवितो..
सार्या जगाचा तो बाप, जगी प्रेम फुलवितो..

अपुला शेतकरी राया, कर्जाखालीच राबतो..
पर्जन्याच्या वाटेवर, तोच एकला थांबतो..

अपुला शेतकरी राया, रोज जगतो मरतो..
जगा धान्य पुरवूनी, पोटी भाकरी भरतो..

अपुला शेतकरी राया, संसाराचे सोने करतो..
जगा सुखी करवूनी, स्वत: गरिबीमधे झुरतो..

समाज

कामाची टाळाटाळ, उत्पादकता, व्यवस्थापन आणि कानबान

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
21 Oct 2016 - 6:23 am

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

डिस्क्लेमरः या लेखात बरेच मुद्दे आहेत ज्यावर एक एक कादंबरी होईल, पण थोडक्यात मांडायचा प्रयत्न केला आहे. गोड मानून घ्यावा. प्रतिसादांमधे चर्चा/प्रश्न उत्तरे यातून आणखी उपयुक्त होईल अशी आशा. धन्यवाद.

समाजजीवनमानतंत्रसद्भावनाअनुभवमाहिती

पहिलं पाऊल

विनायकपाटील८९'s picture
विनायकपाटील८९ in जे न देखे रवी...
20 Oct 2016 - 6:01 am

क्षणात क्षण विरत गेला
काळ ही पुढे चालत गेला
अबाल राहिलो आजही तसेच
कर्तव्य ना दिसले कुठेच

उद्या करीन म्हणता म्हणता
उद्या कधी आलाच नाही
दाभोळकर, कुलबूर्गी गेले
तरी आम्हाला जाण नाही

हो, मस्त चाललंय आमचं
पण पोट मात्र भरत नाही
शोधून शोधून थकलो, पण
समाधान कुठे मिळत नाही

इराक, सिरीया साक्ष आहे
भविष्य फार स्पष्ट आहे
सावरा लवकर स्वतःला
ऐका तळमळीच्या साद ला

कुठून येतात कन्हैया, उमर
पुरे आता यांचा कहर
का नाही पुरस्कारांचा मान
हेच का सामाजिक भान

समाज

अजय-अतुल लाईव्ह वगैरे...!

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
18 Oct 2016 - 12:04 pm

नुकताच अजिंठा महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी, अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात गाणे सुरु असताना मधेच ट्रॅक बंद झाल्याने गाणे थांबले आणि ही जोडी फक्त ओठ हलवत गाण्याचा अभिनय करत असल्याचे प्रेक्षकांना पहायला मिळाले. प्रेक्षकांना हा धक्का होताच, पण मोठ्ठ्या रकमेचे तिकीट घेऊन असे झाल्याने फसवणुकीची भावना झाली, आणि बरेच प्रेक्षक उठून गेले असे बातम्यांवरून समजते. कांही वृत्तवाहिन्यांच्या बातमीप्रमाणे ट्रॅक बंद पडल्यावर गायक आणि वादकांनी खरेच गायला-वाजवायला सुरुवात केली तेव्हा एनर्जी लेव्हल मधे कमालीचा फरक पडून गाणे नीरस झाले.

संगीतसमाजजीवनमानप्रकटनप्रतिसादमाध्यमवेधबातमी

मुलगी आता इकड़चि झालेली आहे

वैभव.पुणे's picture
वैभव.पुणे in जनातलं, मनातलं
17 Oct 2016 - 7:35 pm

मुलगी आता एकड़चि झालेली आहे, आणि तीच चांगल व्हावे म्हणूनच एकड़ आणली आहे. पुढील सर्व सुखी दुक्खि आयुष्य याच घरातच आहे तीच!

लग्न झालेल्या मुलीने प्रायोरिटी सासरी दिलेली उत्तम!

नवरयाची सध्या इतकी परिस्थिति नसेल की फ़क्त नवरा-बायको वेगळ घर घेऊन राहतील. पुढच सांगत येत नाही, पण सध्या नवरा 0 असल्यासारखा आहे! पण येणाऱ्या काळात 100 असेल!

नवरा नीट वागत ही नसेल, कारण असेल त्याला पण! कोण मुद्दाम मुर्ख पणा करेल!

आशे संस्कार ही नाहीत की सकख्या आई बापाचं बेधड़क अपमान होईल!

आई बापन कोणत्या कष्टानिे आयुष्य बनवले, त्यामुळे त्यांचे पन देने आहे!

मांडणीमुक्तकसमाजजीवनमानराहणीमौजमजा