कान्हा

लेखनविषय:
पैलतीरावर तुझी बासरी घुमते ..कान्हा, वेड लावते निळे मोरपीस ,श्यामल अंगी खुलते आणिक हळू खुणवते अस्तित्वाच्या हिंदोळ्यावर मी ही होते राधा , मीरा घनश्याम ,मनमोहन ओठी निळाईत ही विरे दिठी. निळा जलाशय निळ्या नभाशी करीतो हितगुज हळवे,कोमल सारे होई एकरूप अन् व्यापून उरतो केवळ कृष्ण

आज्जी गेलीय सोडून

लेखनविषय:
उशीराने आले ध्यानी एकटे गर्दीत बसून मला अनोळख्या देशी आज्जी गेलीय सोडून घरातून निघताना का बोलली ती नाही? तुला लेकरा घरात जागा उरलीच नाही आई बाबा गेल्यावर आज्जी तूच उरलेली कुणाकुणा पोसशील तूही आता थकलेली माझ्या इवल्या बहिणी आणि भाऊ लहानगे तुला आज्जी, म्हणतील कुठे दादा आमुचा गे? काय सांगशील त्यांना मला सांगशील का ग? आज्जी एवढ्याचसाठी पुन्हा भेटशील का ग? - संदीप चांदणे

आत

लेखनविषय:
आत मी, बाहेर कोण? जगण्याच्या अवस्था किमान दोन. कधी पाखरू, कधी मुंगी, तरी उतरत नाही जगण्याची धुंदी. वाटेने तुडवले, लाटांनी बुडवले, पावसाने झोडपले, थंडीने थिजवले.‌ संकटांचा उन्हाळा दरवर्षी आला निजलेलं माणूसपण जागवून गेला. ध्यानाच्या समाधीतही चाचपडतो, अंगावरून हात फिरवत स्वतःला शोधतो. भर दुपारी सूर्य डोक्यावर घेतला आतला अंधःकार तरी नाही मिटला. माणसाचं अंतःकरण म्हणजे सिंहाची गुहा स्वतःला जिंकलं तरच बाहेर यायची मुभा. अंतरंगातला देव जसा चंदनाचा गाभा ज्याला गवसला तो विटेवरी उभा.

कोण?

लेखनविषय:
काव्यरस
मोकळ्या अवकाशाचे अंगण हाक कोणाची? मधाळ चांदण उरात धडधड अनवट वाटा धाडतो कोण?निमीष लाटा मेघांनी बांधले स्वप्नांचे झुले कोण?उधळतो ढगांची फुले धारा ..वारा..स्वैर पसारा देह कोणाचा?संचित पहारा ज्योत दिव्याची अधीर नाही ओह?पाकोळीची तिज तिलांजली मेंदीचा गंध वेचला भाव विभोरी उमलली संध्या मिटण्या भु-वरी?

चक्रव्युह

लेखनविषय:
काव्यरस
पेरणा :- तेच तेच पुन्हा पुन्हा http://misalpav.com/node/50115 शशक २०२२ मधली ही गोष्ट वाचली आणि पुन्हा एकदा विचार करू लागलो. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला ठाऊक असूनही त्या मार्गाकडे पावले का बरे वळत नाहीत? पुन्हा पुन्हा फिरून याच पिंजर्यात अडकावेसे का बरे वाटते?

किती काळ झुलवायचे

खरे सांग आता तुझ्या बंद ओठी कितीदा नाव माझे उमटायचे किती यायच्या सरी या उरी अन किती अश्रू पाण्यात सिमटायचे तुझी नक्षत्रे बिलगली घराला पुढे चांदण्यांना कसे रेटायचे मळभ ढगांचे पुन्हा पांघरोनी माझ्या नभाने किती दाटायचे उरे प्राक्तनाचे असे काय देणे तुजभोवती पिसारे फूलवायचे भेटीतही तू भेटसी मुक्याने उत्तराला किती काळ झुलवायचे गज-यात अजूनी गंध मोग-याला राहिले तुला तरी हसवायचे कितीदा करावे रफू मी मनाला कितीदा पुन्हा तूच उसवायचे आता उसासे मी आठवांचे घ्यावे मोर पिसाचे पान उलटायचे पुन्हा खा तू शपथा माझ्याच आणि पुन्हा वेळ येताच पलटायचे जत्रा आसवांची भरताच मन

कातरवेळ

लेखनविषय:
*कातरवेळा* सांजरंग केशराचे पसरले आकाशात पाखरांची लगबग परतण्या घरट्यात ! चिवचिवाट त्यांचा मधुर, सुखवि कानाला, संधिकाल चा धुंद गारवा, मोहवि मनाला !! मावळतीला रविबिंब, क्षितीजावरती झुकले, लाल केशरी रंग नभाचे, लाटांवरी उमटले! सागरा पल्याड बुडता, सुर्याचा तांबूस तो गोळा, नीशा हळूच दाटताना, हुरहुर लावती कातरवेळा !! हळुहळू अंधारताना, लाटाही मग होती धूसर, निरवता तीरावरली, मनात झिरपे खोलवर ! तुझे भास दाटून येता, दिशा भोवती अंधारल्या, कातरवेळी झाडांच्याही सावल्या बघ थरथरल्या !! - वृंदा मोघे

ओल्या खुणा

लेखनविषय:
काव्यरस
हळव्या झाल्या काळजातल्या ओल्या खुणा हृदयातला रेशमी घाव दाखवू कुणा फुले शोधता लागला जिव्हारी काटा डोळ्यातल्या दर्यात उसळती अश्रूंच्या लाटा नभाच्या वेशीवर उदास रंग उतरे उरी लागलेला बाण घेऊन रावा फिरे हरवून दूर गेली ओळखीची वाट मोरपीशी स्वप्नांचा कोसळू लागे तट मावळतीच्या वणव्यात सूर्यबिंब जळून गेले प्राणाच्या शेजेवर निखारे उधळून गेले

वैशाखाची ऊन्हं ..

लेखनविषय:
वैशाखाची ऊन्हं जेव्हा नको नको झाली, वळीवाची आठवण उमलून आली. बहाव्याने केली रिती फुलांची पखाल, पंगा-याच्या अंगावर खुळावली लाली.. सावरीच्या म्हातारीला पंख पंख फुटे, वयासंगे उडुनिया गेले तिचे काटे. चाफ्याचा बहर जणू बैराग्याची झोळी, धरू धरू म्हणताना काहीतरी सुटे. सुकलेले पात्र, मधे खोल खोल डोह, सुटता सुटेना कसा जीवनाचा मोह. काठावर कुणी वेडा सूर तोलणारा, कंठी त्याच्या मल्हाराचा ओला अवरोह. ऐकुनिया बकुळी ती लाजली जराशी, चित्त तिचे उडुनिया गेले कुणापाशी? नादावले मन तिचे उतू उतू जाई पायापाशी म्हणूनच नव्हाळीची राशी. वैशाखाची उन्हं मग गंधमय झाली वळीवाची आठवण दूरदूर गेली...

तू

काव्यरस
तू चालते अशी झाडावरची वेल ग अंगावरती पानं फुलं ल्यायते ग तू हसते अशी झरा वाहतो ग खळखळाटानं हासणं पिकतं ग तुझ्या येण्यानं वारा वाहतो ग येता येता सुगंघ आणतो ग तू बघते तेव्हा अंगावर रोमांच येतो ग बघून तुला मीच लाजल्यागत होतो ग तू चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता ग तुझ्या ठाई प्रगती हर्ष आनंद वसतो ग - पाषाणभेद २९/०४/२०२२
Subscribe to कविता