मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वीररस

प्रार्थना प्रिमियर लीग विजयाची

वेल्लाभट ·

पैसा 01/09/2014 - 16:23
:D नव्या युगातली नवी प्रार्थना!

पैसा 01/09/2014 - 16:23
:D नव्या युगातली नवी प्रार्थना!
पुन्हा एकवार, मॅन्चेस्टर युनायटेड फॅन या नात्याने गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतोय, ही ईपीएल जिंकण्यासाठी. गणपती बाप्पा काय काय सांगू आलोय आम्ही मागायला ते ते सगळं, जे जे लागतं, प्रिमियर लीग मारायला ||धॄ|| कोच आहे विद्वान खरा आहे जरा निराळी त-हा मात्र सगळ्या प्लेयर्सना शिकवा त्याचं ऐकायला ||१|| संघ टाकतोय कात जरी नेहमीचीच ही बात जरी नव्या जुन्याची सांगड तेवढी मदत करा घालायला ||२|| बुद्धी पास द्यायला आणि ताकद किक मारायला जोर थोडा पायांमध्ये बॉक्स टू बॉक्स धावायला ||३|| संघ जरासा गळपटलाय विश्वास थोडा डळमळलाय एकच तगडा विजय हवाय ती आग पुन्हा लागायला ||४|| हार जीत होतेच नेहमी जाणतो जरी सारे आ

एकलव्य..

vaibhav deshmukh ·

एस 07/07/2014 - 10:32
छान केलीय कविता. काही व्याकरण-शुद्धलेखनाच्या चुका टाळा. उदा: माञ -> मात्र निश्चिल -> निश्चल धर्नुधर -> धनुर्धर नजरात -> नजरांत

आयुर्हित 07/07/2014 - 10:40
कोणी नाकारले म्हणूनच शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले मी धर्नुधर झालो अभिनंदन, खुप चांगला संदेश दिला आहे.

एस 07/07/2014 - 10:32
छान केलीय कविता. काही व्याकरण-शुद्धलेखनाच्या चुका टाळा. उदा: माञ -> मात्र निश्चिल -> निश्चल धर्नुधर -> धनुर्धर नजरात -> नजरांत

आयुर्हित 07/07/2014 - 10:40
कोणी नाकारले म्हणूनच शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले मी धर्नुधर झालो अभिनंदन, खुप चांगला संदेश दिला आहे.
एकलव्य.... कित्येक शतके उलटली युगांतरे झाली सत्तांतर घडले मी माञ स्थिर आहे त्याच सहानुभूतींच्या बंदिस्त नजरेत.. कोणी नाकारले म्हणूनच शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले मी धर्नुधर झालो रक्ताळलेल्या चार बोटांचा श्रेष्ठ शिष्यही झालो तेव्हाच; त्या हाताकडे पाहताना दु: खाचा लवलेशही नव्हता मुद्रेवर पण; मी डगमगलो ढासळलो तुमच्या अनुत्तरीत प्रश्नात? तुमच्या सहानुभूतीच्या नजरात? तुमच्या पाणावलेल्या इतिहासात? तुमच्या या पराजित युगात...!

श्रद्धा म्हणजे...

अत्रुप्त आत्मा ·

चौकटराजा 22/06/2014 - 10:45
कविराय ब्वॉ , फारच अर्थवाही कविता ! श्रद्धा म्हणजे पुनःपुनः येणार्‍या अनुभवाचा पारिपाक तिच्या शिवाय जग चालत नाही. व ती दरवेळा उपयोगाला येतेच असेही नाही.

एस 22/06/2014 - 11:08
बुवा, कविता आवडेश. पुढील वेडाच्या प्रतीक्षेत.

कंजूस 22/06/2014 - 12:43
श्रध्दा महणजे स्वकृतीचा खेळ बराच जड जातो स्वत:वर येता वेळ . खरोखर कवीबुवा . मंत्र ,जादू ,ज्योतिष ,वैद्यक या विद्यासुध्दा जाणणाऱ्यांना कधी तरी गोत्यात आणतात .

चालायचच, अश्रध्दांना श्रध्द लाचार, केविलवाणे, बिचारे वाटतात तर श्रध्दांना अश्रध्द उध्दट, हेकेखोर व आत्मकेंद्री वाटतात. कारण कुणाची श्रध्दे वर श्रध्दा असते तर कुणाची अश्रध्देवर श्रध्दा असते. कोणी श्रध्देने श्रध्देवर प्रहार करत असतो, तर कोणी श्रध्देने अश्रध्दाला श्रध्द बनवायचा प्रयत्न करत असतो. अश्रध्द श्रध्देने त्यांच्या अश्रध्देवर ठाम असतात, तर श्रध्द अश्रध्दांच्या श्रध्दे विषयी साशंक असतात. श्रध्द त्यांच्या श्रध्दे बद्दल अश्वस्त असतात तर अश्रध्द श्रध्दांच्या श्रध्दे बद्दल चिंताग्रस्त असतात. श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे तिसरी बाजु सापडत नाही हाच खरा वांदा आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस 23/06/2014 - 14:24
श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे तिसरी बाजु सापडत नाही हाच खरा वांदा आहे.
दुसरी ओळ थोडासा बदल करून लिहितो. श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे दांभिकांचे मात्र फावते हाच खरा वांदा आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

धन्या 23/06/2014 - 19:09
श्रध्द त्यांच्या श्रध्दे बद्दल अश्वस्त असतात तर अश्रध्द श्रध्दांच्या श्रध्दे बद्दल चिंताग्रस्त असतात.
अश्रद्धांना श्रद्धांच्या श्रध्देबद्दल चिंता नसती तर काय घडले असते याची एक छोटीशी झलकः १. आजही लोक पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मानत राहीले असते. २. आजही स्त्रीया पतीच्या मृत्यूनंतर सती गेल्या असत्या. ३. आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगणारी स्त्री चूल आणि मुल यांतच अडकून पडली असती. ४. पुत्रप्राप्ती, धनप्राप्तीसाठी आजही सर्रास नरबळी जात राहिले असते. ५. आजही भारतीयांनी समुद्र ओलांडून जायचं धाडस केलं नसतं. ६. आजही सर्पदंशाने, विंचूदंशाने मांत्रिकांकडून विष उतरवण्याच्या नादात अनेक माणसे जीवाला मुकत राहीली असती. ७. अनेक साथीचे आजार देवीच्या कोपाने झाले असे मानून बळी जात राहीले असते. असो... यादी न संपणारी आहे.

In reply to by धन्या

स्पा 23/06/2014 - 19:50
धनाजीपंत तुम्ही आणि वर बरेच जण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात गल्लत करत आहात असे वाटले. बाकी चालु द्या

In reply to by स्पा

धन्या 23/06/2014 - 20:09
सध्या अतिशय प्रसिद्ध असलेला "अंधश्रद्धा" हा शब्दच मुळी चुकीचा आहे. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंध आणि डोळस श्रद्धा असं काही नसते. श्रद्धा म्हणजे एखादया व्यक्तीचा एखादया गोष्टीवरील ठाम विश्वास. ज्या गोष्टीवर माणसांची श्रद्धा असते त्या गोष्टी वास्तवात सत्य असतातच असं नाही. वर मी दिलेली उदाहरणे ही श्रद्धेचीच उदाहरणे आहेत, ज्यात काही तथ्य नव्हते. जेव्हा विवेकवादी चळवळ सुरु झाली तेव्हा सुधारकांना लोकांच्या सार्‍याच श्रद्धांना थेट हात घालायचा नव्हता. म्हणून त्यांनी देव आणि धर्म याच्याशी निगडीत श्रद्धांना नुसतेच "श्रद्धा" म्हणण्यास सुरुवात केली. आणी उरलेल्या बाकी श्रद्धांना त्यांनी "अंधश्रद्धा" असे नांव दिले. सुधारणांचा गाडा पुढे सरकण्यासाठी ती आवश्यक गोष्ट होती.

In reply to by स्पा

धन्या 23/06/2014 - 20:30
पण सरसकट सगळ्या श्रद्धा तुम्ही एकाच क्याटेगरीत तोलता आहात.
होय.
बरे अश्रद्ध म्हणजे काय?
ज्याची श्रद्धा नाही तो.

In reply to by स्पा

धन्या 23/06/2014 - 20:49
आज ज्या प्रथांना आपण "अंधश्रद्धा" समजतो, त्या प्रथा शे-दोनशे वर्षांपूर्वी प्रचलित होत्या तेव्हा त्या धर्मश्रद्धाच होत्या. त्यांना अंधश्रद्धा हे नांव अगदी अलिकडच्या काळात विज्ञानाने त्यांचा फोलपणा सिद्ध केल्यावर चिकटले. न जाणो आज ज्या "श्रद्धा" आहेत त्या येणार्‍या काळात विज्ञानातील प्रगतीमुळे "अंधश्रद्धा" म्हणून मोडीत निघतील. संयमीत प्रतिसादासाठी धन्यवाद. :)

In reply to by धन्या

आयुर्हित 24/06/2014 - 23:06
विज्ञानातील प्रगतीमुळे "श्रद्धा" फलदायी व "अंधश्रद्धा" मोडीत निघाली. हा पहा बेलर यूनिवर्सिटी चा शोधः पूजा-पाठ करने और धार्मिक आयोजनों में शामिल होने से तनाव के स्तर में कमी आती है। बेलर यूनिवर्सिटी के शोधकर्ताओं की मानें तो इसका असर ऑफिस में इनसान के प्रदर्शन पर भी दिखता है। वह न सिर्फ काम में ज्यादा मन लगा पाता है, बल्कि उत्पादन क्षमता बढ़ने से उसके प्रमोशन और वेतन-वृद्धि की संभावनाएं भी बढ़ जाती हैं। शोधकर्ताओं ने एक हजार से कर्मचारियों की कार्य क्षमता पर धर्म और आध्यात्म का असर आंका। उन्होंने पाया कि ईश्वर में यकीन रखने, नियमित रूप से पूजा-पाठ करने और धार्मिक आयोजनों में बढ़-चढ़कर हिस्सा लेने वाले लोग पेशेवर जीवन में ज्यादा सफल होते हैं। वे बॉस की नजरों में अच्छी छवि तो बना ही पाते हैं, साथ ही सहकर्मियों से उनके संबंध भी अच्छे होते हैं। साभारः धर्म-कर्म में यकीन करने वाले ज्यादा सफल Rodney Stark points out that religious individuals are more engaged in secular organizations than secular folks. This moves our conversation into the realm of civic (political) involvement, and again the data show that religiously-active individuals shine in this area as well, and this includes not only evangelical Protestants, but Catholics, Jews, and members of other faith traditions. How Religion Benefits Everyone, Including Atheists

श्रद्धा म्हणजे सावंतांची, श्रद्धा म्हणजे देशपांड्यांची श्रद्धा म्हणजे जीवाला त्रास, (बाकी) कुळकर्ण्यांची श्रद्धा म्हणजे सगळ्यांमध्ये खास

In reply to by प्रभाकर पेठकर

चौकटराजा 25/06/2014 - 08:32
शाहीद अफ्रीदी , सनत जयसूर्या.....म्याकलम, युवराज, ........ रवी शास्त्री , गॅरी सोबर्स.......सगळ्यावर कडी.....पी हाटेलवाला !

म्हैस 26/06/2014 - 13:01
आजही लोक पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मानत राहीले असते.
हे मात्र आपल्याकडे नवतं हं . सुर्य पृथ्वी भोवती फिरतो हे पश्चात्याचं मत होतं . आपल्याकडे हे सत्य कितीतरी आधीपासून माहित आहे

In reply to by म्हैस

धन्या 26/06/2014 - 19:32
आपल्याकडे हे सत्य कितीतरी आधीपासून माहित आहे
तसं असतं तर नवग्रहांमध्ये सूर्याच्या ऐवजी पृथ्वी असती. :)

पैसा 26/06/2014 - 23:07
पण बुवा रागवू नका. खरं सांगते. यावेळी कविता उत्स्फूर्त वाटली नाही. यमके जुळवून केल्यासारखी वाटते आहे. त्यामुळे 'कोलोनियल कझिन्स'च्या काही पुरातन रचना उगाच आठवल्या. तुम्ही तुमच्या प्रतिभेला यमकांचे कुंपण घालू नका. तिला मुक्तछंदात उधळू द्या!

म्हैस 27/06/2014 - 14:47
तसं असतं तर नवग्रहांमध्ये सूर्याच्या ऐवजी पृथ्वी असती.
महाराज, सूर्याला नव्ग्रहन्मधे गणल जातं का ? अरे हो ,तुम्ही ञानेश्वरी वाचली नाहीये नाही का . ४ था अध्याय वाचलात तर कळेल.

चौकटराजा 22/06/2014 - 10:45
कविराय ब्वॉ , फारच अर्थवाही कविता ! श्रद्धा म्हणजे पुनःपुनः येणार्‍या अनुभवाचा पारिपाक तिच्या शिवाय जग चालत नाही. व ती दरवेळा उपयोगाला येतेच असेही नाही.

एस 22/06/2014 - 11:08
बुवा, कविता आवडेश. पुढील वेडाच्या प्रतीक्षेत.

कंजूस 22/06/2014 - 12:43
श्रध्दा महणजे स्वकृतीचा खेळ बराच जड जातो स्वत:वर येता वेळ . खरोखर कवीबुवा . मंत्र ,जादू ,ज्योतिष ,वैद्यक या विद्यासुध्दा जाणणाऱ्यांना कधी तरी गोत्यात आणतात .

चालायचच, अश्रध्दांना श्रध्द लाचार, केविलवाणे, बिचारे वाटतात तर श्रध्दांना अश्रध्द उध्दट, हेकेखोर व आत्मकेंद्री वाटतात. कारण कुणाची श्रध्दे वर श्रध्दा असते तर कुणाची अश्रध्देवर श्रध्दा असते. कोणी श्रध्देने श्रध्देवर प्रहार करत असतो, तर कोणी श्रध्देने अश्रध्दाला श्रध्द बनवायचा प्रयत्न करत असतो. अश्रध्द श्रध्देने त्यांच्या अश्रध्देवर ठाम असतात, तर श्रध्द अश्रध्दांच्या श्रध्दे विषयी साशंक असतात. श्रध्द त्यांच्या श्रध्दे बद्दल अश्वस्त असतात तर अश्रध्द श्रध्दांच्या श्रध्दे बद्दल चिंताग्रस्त असतात. श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे तिसरी बाजु सापडत नाही हाच खरा वांदा आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस 23/06/2014 - 14:24
श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे तिसरी बाजु सापडत नाही हाच खरा वांदा आहे.
दुसरी ओळ थोडासा बदल करून लिहितो. श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे दांभिकांचे मात्र फावते हाच खरा वांदा आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

धन्या 23/06/2014 - 19:09
श्रध्द त्यांच्या श्रध्दे बद्दल अश्वस्त असतात तर अश्रध्द श्रध्दांच्या श्रध्दे बद्दल चिंताग्रस्त असतात.
अश्रद्धांना श्रद्धांच्या श्रध्देबद्दल चिंता नसती तर काय घडले असते याची एक छोटीशी झलकः १. आजही लोक पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मानत राहीले असते. २. आजही स्त्रीया पतीच्या मृत्यूनंतर सती गेल्या असत्या. ३. आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगणारी स्त्री चूल आणि मुल यांतच अडकून पडली असती. ४. पुत्रप्राप्ती, धनप्राप्तीसाठी आजही सर्रास नरबळी जात राहिले असते. ५. आजही भारतीयांनी समुद्र ओलांडून जायचं धाडस केलं नसतं. ६. आजही सर्पदंशाने, विंचूदंशाने मांत्रिकांकडून विष उतरवण्याच्या नादात अनेक माणसे जीवाला मुकत राहीली असती. ७. अनेक साथीचे आजार देवीच्या कोपाने झाले असे मानून बळी जात राहीले असते. असो... यादी न संपणारी आहे.

In reply to by धन्या

स्पा 23/06/2014 - 19:50
धनाजीपंत तुम्ही आणि वर बरेच जण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात गल्लत करत आहात असे वाटले. बाकी चालु द्या

In reply to by स्पा

धन्या 23/06/2014 - 20:09
सध्या अतिशय प्रसिद्ध असलेला "अंधश्रद्धा" हा शब्दच मुळी चुकीचा आहे. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंध आणि डोळस श्रद्धा असं काही नसते. श्रद्धा म्हणजे एखादया व्यक्तीचा एखादया गोष्टीवरील ठाम विश्वास. ज्या गोष्टीवर माणसांची श्रद्धा असते त्या गोष्टी वास्तवात सत्य असतातच असं नाही. वर मी दिलेली उदाहरणे ही श्रद्धेचीच उदाहरणे आहेत, ज्यात काही तथ्य नव्हते. जेव्हा विवेकवादी चळवळ सुरु झाली तेव्हा सुधारकांना लोकांच्या सार्‍याच श्रद्धांना थेट हात घालायचा नव्हता. म्हणून त्यांनी देव आणि धर्म याच्याशी निगडीत श्रद्धांना नुसतेच "श्रद्धा" म्हणण्यास सुरुवात केली. आणी उरलेल्या बाकी श्रद्धांना त्यांनी "अंधश्रद्धा" असे नांव दिले. सुधारणांचा गाडा पुढे सरकण्यासाठी ती आवश्यक गोष्ट होती.

In reply to by स्पा

धन्या 23/06/2014 - 20:30
पण सरसकट सगळ्या श्रद्धा तुम्ही एकाच क्याटेगरीत तोलता आहात.
होय.
बरे अश्रद्ध म्हणजे काय?
ज्याची श्रद्धा नाही तो.

In reply to by स्पा

धन्या 23/06/2014 - 20:49
आज ज्या प्रथांना आपण "अंधश्रद्धा" समजतो, त्या प्रथा शे-दोनशे वर्षांपूर्वी प्रचलित होत्या तेव्हा त्या धर्मश्रद्धाच होत्या. त्यांना अंधश्रद्धा हे नांव अगदी अलिकडच्या काळात विज्ञानाने त्यांचा फोलपणा सिद्ध केल्यावर चिकटले. न जाणो आज ज्या "श्रद्धा" आहेत त्या येणार्‍या काळात विज्ञानातील प्रगतीमुळे "अंधश्रद्धा" म्हणून मोडीत निघतील. संयमीत प्रतिसादासाठी धन्यवाद. :)

In reply to by धन्या

आयुर्हित 24/06/2014 - 23:06
विज्ञानातील प्रगतीमुळे "श्रद्धा" फलदायी व "अंधश्रद्धा" मोडीत निघाली. हा पहा बेलर यूनिवर्सिटी चा शोधः पूजा-पाठ करने और धार्मिक आयोजनों में शामिल होने से तनाव के स्तर में कमी आती है। बेलर यूनिवर्सिटी के शोधकर्ताओं की मानें तो इसका असर ऑफिस में इनसान के प्रदर्शन पर भी दिखता है। वह न सिर्फ काम में ज्यादा मन लगा पाता है, बल्कि उत्पादन क्षमता बढ़ने से उसके प्रमोशन और वेतन-वृद्धि की संभावनाएं भी बढ़ जाती हैं। शोधकर्ताओं ने एक हजार से कर्मचारियों की कार्य क्षमता पर धर्म और आध्यात्म का असर आंका। उन्होंने पाया कि ईश्वर में यकीन रखने, नियमित रूप से पूजा-पाठ करने और धार्मिक आयोजनों में बढ़-चढ़कर हिस्सा लेने वाले लोग पेशेवर जीवन में ज्यादा सफल होते हैं। वे बॉस की नजरों में अच्छी छवि तो बना ही पाते हैं, साथ ही सहकर्मियों से उनके संबंध भी अच्छे होते हैं। साभारः धर्म-कर्म में यकीन करने वाले ज्यादा सफल Rodney Stark points out that religious individuals are more engaged in secular organizations than secular folks. This moves our conversation into the realm of civic (political) involvement, and again the data show that religiously-active individuals shine in this area as well, and this includes not only evangelical Protestants, but Catholics, Jews, and members of other faith traditions. How Religion Benefits Everyone, Including Atheists

श्रद्धा म्हणजे सावंतांची, श्रद्धा म्हणजे देशपांड्यांची श्रद्धा म्हणजे जीवाला त्रास, (बाकी) कुळकर्ण्यांची श्रद्धा म्हणजे सगळ्यांमध्ये खास

In reply to by प्रभाकर पेठकर

चौकटराजा 25/06/2014 - 08:32
शाहीद अफ्रीदी , सनत जयसूर्या.....म्याकलम, युवराज, ........ रवी शास्त्री , गॅरी सोबर्स.......सगळ्यावर कडी.....पी हाटेलवाला !

म्हैस 26/06/2014 - 13:01
आजही लोक पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मानत राहीले असते.
हे मात्र आपल्याकडे नवतं हं . सुर्य पृथ्वी भोवती फिरतो हे पश्चात्याचं मत होतं . आपल्याकडे हे सत्य कितीतरी आधीपासून माहित आहे

In reply to by म्हैस

धन्या 26/06/2014 - 19:32
आपल्याकडे हे सत्य कितीतरी आधीपासून माहित आहे
तसं असतं तर नवग्रहांमध्ये सूर्याच्या ऐवजी पृथ्वी असती. :)

पैसा 26/06/2014 - 23:07
पण बुवा रागवू नका. खरं सांगते. यावेळी कविता उत्स्फूर्त वाटली नाही. यमके जुळवून केल्यासारखी वाटते आहे. त्यामुळे 'कोलोनियल कझिन्स'च्या काही पुरातन रचना उगाच आठवल्या. तुम्ही तुमच्या प्रतिभेला यमकांचे कुंपण घालू नका. तिला मुक्तछंदात उधळू द्या!

म्हैस 27/06/2014 - 14:47
तसं असतं तर नवग्रहांमध्ये सूर्याच्या ऐवजी पृथ्वी असती.
महाराज, सूर्याला नव्ग्रहन्मधे गणल जातं का ? अरे हो ,तुम्ही ञानेश्वरी वाचली नाहीये नाही का . ४ था अध्याय वाचलात तर कळेल.
श्रद्धा म्हणजे आधी असतो कल्पनांचा भास श्रद्धा म्हणजे नंतर होतो त्यां'चाच पहिला श्वास श्रद्धा म्हणजे आधी असतो जाणिवांचा खेळ श्रद्धा म्हणजे नंतर होतो फुकट जाणारा वेळ श्रद्धा म्हणजे कुणा तोंडी दो वक्ताची रोटी श्रद्धा म्हणजे काही तोंडी सहज पडलेली बोटी! श्रद्धा म्हणजे काहिंसाठी pre plan जुगारी अड्डा श्रद्धा म्हणजे कुणासाठी स्वत:च पडायचा खड्डा श्रद्धा म्हणजे कुणी करतात ठरवून मोठ्ठी होळी श्रद्धा म्हणजे कुणी मारतात ठरवून छुपी अरोळी श्रद्धा म्हणजे भोळं भाबडं बिन रंगाचं कापड श्रद्धा म्हणजे उघड्या डोळ्यांना बंन्द करणारी झापड श्रद्धा म्हणजे मी(ही) म्हणतो क्रुतीवरचा विश्वास क्रुतीच करणे हा श्रद्धेच

सेहेवागी पोवाडा

अत्रुप्त आत्मा ·

नाखु 31/05/2014 - 09:04
आम्ही तेंडल्या-सेहवाघ्-द्रवीड अशी बिनडोक तुलना करणार्या "जित्राबांना"(बुवा तुम्ही कुठेही तुलना केली नाही तेव्हा सबब ही उपमा तुम्हाला नाहीच्)माफ करतो. पंचपक्वानाच्या थाळीत हरेक पदार्थाने (त्याच्या स्वादाने) परिपूर्णता येते तसे या त्रिमूर्तीचे आहे.

लै भारी ! वीरूने मारला शॉट, चेंडू उडाला भन्नाट जाई कुंपणापार... जाई कुंपणापार अआच्या वीरूप्रेमाला येई पूर...हो..जी..जी..जी..॥

पोवाड्याचे रसग्रहण मला करता येत नाही पण सेहवाग आपला खास. तो खेळपट्टीवर असेपर्यंत एंटरटेनमेंट चालतच राहणार याची फुल्ल ग्यारंटी आणि तोपर्यंत आपण टीव्हीसमोरून काही हलत नाही. नवीन चेंडू फोडणारा त्यासम तोच .

In reply to by अभ्या..

नाखु 23/10/2015 - 08:30
झांजा फक्त आणि फक्त मीच्ज वाजवणार बुवांना फेटा बांधायची जिम्मेदारी चिमण कडे आहे याची नोंद घेणे. अवांतर पोवाड्यावरील अभिप्राय दि ३१ मे लाच नोंदवला आहे सबब पुन्हा नको.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 22/10/2015 - 21:06
बुवा ऐकला हो पवाडा तुम्हच्या पहाडी आवाजात. नंबरी काम झालय एकदम. डफावरची थाप जरा घुमायला हवी होती पण उपलब्ध सामुग्रीने तुम्ही माहोल उभा केलाय. ह्या व्रीरश्रयुक्त पोवाड्याच्या गायनप्रसंगी तुम्ही कीती बेभान झाला होता त्याची ही छबी. bua या अद्वितीय कामगीरीबद्द;ल तुम्हाला मिपाशाहीर हा किताब देण्यात येत आहे.

In reply to by अभ्या..

वेल्लाभट 23/10/2015 - 12:36
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र कहर! मिपा म्यूझिक सहर्ष सादर करित आहे मिपाशाहीरांचे पव्वाडे ! एकच शाहीर - बाकी सगळे बाहीर अलबम्म काढा. आणि हो; हा सहवागला पाठवाच :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

रेकॉर्डिंग करताना माईक बराचं हलवलेला दिसतोय इकडुन तिकडे. आवाज मधुनचं कमी जास्तं होतोय. बाकी मस्तं जमलाय हा गुर्जी. :)!!!!

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 23/10/2015 - 10:03
कोणतर एक नाकेला, गोरेला, काटकुळा पण छाती पुढे काढून फोटो काढत होता. ;) बुवांना त्याने अर्धे आपट्याचे पान सोने म्हणून दिले आणि परत घेतले म्हणे.

In reply to by प्रचेतस

नाखु 23/10/2015 - 11:57
पन्नाशी निमीत्त बुवांचा एक फेटा (डोक्याबरहुकुम) डोळ्यावर न येणारा (बुवांच्या), एक पानाची चंची (पुडी आणि डबी बसेल असी) आणि खेळण्यातली आवाज करणारी (त्याच वेळेला लाईट लागणारी) इथे प्रात्य्क्षीक पहा देऊन करण्यात येत आहे. भेटवस्तूंसाठी बुवांचे हितचिंतक श्री सूड यांची सूचना कायम शिरोधार्थ आहे. शुभेच्छूक "सत्कारच सत्कार चोहिकडे गेला जे पी कुणीकडे "मंडळ आणि चिमण हटेला गँग.

प्रचेतस 22/10/2015 - 22:04
तरी सेहेवागचा असा हा खेळ नेहेमीचाच आहे.. याचा प्रत्यय वाचकांना आला,तर माझा हा प्रथम प्रयत्न सार्थकी लागल्यासारखा वाटेल
आम्हाला आला हो प्रत्यय. पोवाडा खरंच जब्राट झालाय.

नाखु 31/05/2014 - 09:04
आम्ही तेंडल्या-सेहवाघ्-द्रवीड अशी बिनडोक तुलना करणार्या "जित्राबांना"(बुवा तुम्ही कुठेही तुलना केली नाही तेव्हा सबब ही उपमा तुम्हाला नाहीच्)माफ करतो. पंचपक्वानाच्या थाळीत हरेक पदार्थाने (त्याच्या स्वादाने) परिपूर्णता येते तसे या त्रिमूर्तीचे आहे.

लै भारी ! वीरूने मारला शॉट, चेंडू उडाला भन्नाट जाई कुंपणापार... जाई कुंपणापार अआच्या वीरूप्रेमाला येई पूर...हो..जी..जी..जी..॥

पोवाड्याचे रसग्रहण मला करता येत नाही पण सेहवाग आपला खास. तो खेळपट्टीवर असेपर्यंत एंटरटेनमेंट चालतच राहणार याची फुल्ल ग्यारंटी आणि तोपर्यंत आपण टीव्हीसमोरून काही हलत नाही. नवीन चेंडू फोडणारा त्यासम तोच .

In reply to by अभ्या..

नाखु 23/10/2015 - 08:30
झांजा फक्त आणि फक्त मीच्ज वाजवणार बुवांना फेटा बांधायची जिम्मेदारी चिमण कडे आहे याची नोंद घेणे. अवांतर पोवाड्यावरील अभिप्राय दि ३१ मे लाच नोंदवला आहे सबब पुन्हा नको.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 22/10/2015 - 21:06
बुवा ऐकला हो पवाडा तुम्हच्या पहाडी आवाजात. नंबरी काम झालय एकदम. डफावरची थाप जरा घुमायला हवी होती पण उपलब्ध सामुग्रीने तुम्ही माहोल उभा केलाय. ह्या व्रीरश्रयुक्त पोवाड्याच्या गायनप्रसंगी तुम्ही कीती बेभान झाला होता त्याची ही छबी. bua या अद्वितीय कामगीरीबद्द;ल तुम्हाला मिपाशाहीर हा किताब देण्यात येत आहे.

In reply to by अभ्या..

वेल्लाभट 23/10/2015 - 12:36
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र कहर! मिपा म्यूझिक सहर्ष सादर करित आहे मिपाशाहीरांचे पव्वाडे ! एकच शाहीर - बाकी सगळे बाहीर अलबम्म काढा. आणि हो; हा सहवागला पाठवाच :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

रेकॉर्डिंग करताना माईक बराचं हलवलेला दिसतोय इकडुन तिकडे. आवाज मधुनचं कमी जास्तं होतोय. बाकी मस्तं जमलाय हा गुर्जी. :)!!!!

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 23/10/2015 - 10:03
कोणतर एक नाकेला, गोरेला, काटकुळा पण छाती पुढे काढून फोटो काढत होता. ;) बुवांना त्याने अर्धे आपट्याचे पान सोने म्हणून दिले आणि परत घेतले म्हणे.

In reply to by प्रचेतस

नाखु 23/10/2015 - 11:57
पन्नाशी निमीत्त बुवांचा एक फेटा (डोक्याबरहुकुम) डोळ्यावर न येणारा (बुवांच्या), एक पानाची चंची (पुडी आणि डबी बसेल असी) आणि खेळण्यातली आवाज करणारी (त्याच वेळेला लाईट लागणारी) इथे प्रात्य्क्षीक पहा देऊन करण्यात येत आहे. भेटवस्तूंसाठी बुवांचे हितचिंतक श्री सूड यांची सूचना कायम शिरोधार्थ आहे. शुभेच्छूक "सत्कारच सत्कार चोहिकडे गेला जे पी कुणीकडे "मंडळ आणि चिमण हटेला गँग.

प्रचेतस 22/10/2015 - 22:04
तरी सेहेवागचा असा हा खेळ नेहेमीचाच आहे.. याचा प्रत्यय वाचकांना आला,तर माझा हा प्रथम प्रयत्न सार्थकी लागल्यासारखा वाटेल
आम्हाला आला हो प्रत्यय. पोवाडा खरंच जब्राट झालाय.
जय हो..
जय हो..

जय हो..

(गद्य).......वीर..वीर.. धुरंधर ...हणामाssर सम्राssट...क्रीकेट मैदान मुलुख तोफ...चालत्या/हलत्या/बोलत्या बॉलरांचा कर्दनकाळ...असा तो कधि कधि काळ सोडणारा..परी खेळला की आग ओकणारा...तेंडुलकरी कारकिर्दीतही आपली अन्---त्याची(ही) छाप सोडणारा... वीरु विरेंद्र अमरेंद्र..धुंव्वाधांर..सरदार..सेहेवाग!!! ऐकू या त्या...चा जय जय कार जी..जी..जी...!

माझं मत कुणाला.....

निलरंजन ·

आयुर्हित 09/04/2014 - 01:31
माझंही मत त्याला रे ज्याने राज्याचा/देशाचा ईकास केला! छान, येऊ द्या अजून....

निलरंजन 09/04/2014 - 06:32
हया फक्त मुखडयाच्या चार ओळी आहेत बाकीची कविता प्रतिसाद म्हणून जाणकार कवीमनाच्या मिञांनी जोडल्यास अत्यानंद होईल मी वाट पाहतोय तुमच्या प्रतिसादाची.....

आयुर्हित 09/04/2014 - 01:31
माझंही मत त्याला रे ज्याने राज्याचा/देशाचा ईकास केला! छान, येऊ द्या अजून....

निलरंजन 09/04/2014 - 06:32
हया फक्त मुखडयाच्या चार ओळी आहेत बाकीची कविता प्रतिसाद म्हणून जाणकार कवीमनाच्या मिञांनी जोडल्यास अत्यानंद होईल मी वाट पाहतोय तुमच्या प्रतिसादाची.....
माझं मत त्याला रे ज्याने ईकास केला त्याला नाही ज्याने मला नुस्ताच झुलविला त्याला नाही ज्याने मला नुस्ता रडविला माझं मत त्याला रे ज्यानं मला घडविला माझ मत त्याला रे जो शोभलं त्या पदाला सगळीकडे त्याच्या नावाचा डंका मी पिटविला माझं मत त्याला रे माझं मत त्याला.... विडंबन: माझ आभाळ तुला घे(टिंग्या)

सूर्य थकला आहे

गंगाधर मुटे ·

सूर्य थकला आहे


पहाट जरा चेतलेली पण;
सूर्य थकला आहे
नितळण्याच्या बुरख्याखाली
विस्तव निजला आहे
सारं काही सामसूम, मात्र;
एक काजवा जागत आहे
चंद्रकलेच्या गर्भाराला
भिक्षा मागत आहे

वादळं वारं सुटलंय पण;
वीज रुसली आहे
बुद्धिबळांच्या शय्येखाली
ऐरण भिजली आहे
शिवशिवणारे स्पंदन काही
उधाण मोजत आहे
चिवचिवणार्‍या चिमणीमध्ये
दीक्षा शोधत आहे

अंगरख्याची सनदी गुंफण
टरटर उसवत जावी
अपहाराची दुर्धर खाई

निवडणूका जवळ आल्या सारखे वाटतंय

निलरंजन ·
निवडणूका जवळ आल्यासारखे वाटतंय गरीबांची कणव करणारे गल्लोगल्लीत जमलेयं कैवारी जो तो जनतेचा बनू पाहतोय पोटात एक ओठात एक अन मनात काही वेगळच साचलयं पोस्टर फलक बोर्ड नाक्यानाक्यावर लागलेत इच्छुक आणि समर्थक आता आपले घोडे दामटू लागलेत निवडून येण्याची स्वप्न आता घडोघडी पडू लागल्यात जिकण्यासाठीचा हिशेब जे ते ठेवू लागलेत उमेदवारीच्या खेळात आता वजन आपले लावू लागलेत हा आपला हा परका डाव पुन्हा नव्याने मांडू लागलेत आपआपला सवतासुभा मतदार आपले राखू लागलेत मिटींगा मेऴावे भाषण सभा चौकाचौकात घडू लागलेत म्हणूनच म्हणतो निवडणूका जवळ येऊ लागल्यात

तिन कविता तिन ठिगळे

ज्ञानोबाचे पैजार ·

In reply to by इरसाल

"नुकतीच ए जी एम" वरून हे ज्ञानोबांना "अन्युअल जनरल मिटींग"चे संक्षिप्त रूप अपेक्षित असावे असे वाटते... तुम्हाला बहुतेक "आसिस्टंट जनरल मॅनेजर" असं म्हणायचं आहे... चूकभूल देणे घेणे ;)

स्पंदना 09/10/2013 - 03:48
अगागा! पार बाजार उठिवलाय कवितांचा. त्या अज्ञात्कुलच्या कवितांना हात घालण्याएव्हढे कूल झालात तुम्ही पैजारबुवा. मस्त! येक कडक षॅल्युट!!

सस्नेह 09/10/2013 - 12:46
कसले कसले रस भरलेत ओ पैजारबुवा जिलब्यांमधे ? कोडाईकॅनाल, भूछत्री, आई, बाबा अन काय काय.. कॉकटेल भारी जमलंय !

In reply to by प्यारे१

प्यारेकाका, एजीएम झालो नाही एजीएम (अ‍ॅन्युअल जनरल मिटिंग)झाली पण हबिणंदणा बद्दल आभार. हित हापिसात एजीएम वेळेत झाल्याची कोणालाच किंम्मत नाही. एकदा लेट करुन दावतोच.

विटेकर 09/10/2013 - 12:51
उत्तम विडंबन ! सहसा कवितांच्या वाटेस जात नाही. पण हा क्लिक वाया गेला नाही ! लगे रहो !

In reply to by इरसाल

"नुकतीच ए जी एम" वरून हे ज्ञानोबांना "अन्युअल जनरल मिटींग"चे संक्षिप्त रूप अपेक्षित असावे असे वाटते... तुम्हाला बहुतेक "आसिस्टंट जनरल मॅनेजर" असं म्हणायचं आहे... चूकभूल देणे घेणे ;)

स्पंदना 09/10/2013 - 03:48
अगागा! पार बाजार उठिवलाय कवितांचा. त्या अज्ञात्कुलच्या कवितांना हात घालण्याएव्हढे कूल झालात तुम्ही पैजारबुवा. मस्त! येक कडक षॅल्युट!!

सस्नेह 09/10/2013 - 12:46
कसले कसले रस भरलेत ओ पैजारबुवा जिलब्यांमधे ? कोडाईकॅनाल, भूछत्री, आई, बाबा अन काय काय.. कॉकटेल भारी जमलंय !

In reply to by प्यारे१

प्यारेकाका, एजीएम झालो नाही एजीएम (अ‍ॅन्युअल जनरल मिटिंग)झाली पण हबिणंदणा बद्दल आभार. हित हापिसात एजीएम वेळेत झाल्याची कोणालाच किंम्मत नाही. एकदा लेट करुन दावतोच.

विटेकर 09/10/2013 - 12:51
उत्तम विडंबन ! सहसा कवितांच्या वाटेस जात नाही. पण हा क्लिक वाया गेला नाही ! लगे रहो !
पहिले ठिगळ मि.का.

नाटकी बोलतात साले!

गंगाधर मुटे ·

आशु जोग 27/04/2013 - 12:56
> सर्वच धर्मांनी शेतकर्‍याला पाताळात गाडण्यासाठी कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही नक्की काय झालय आत्ता आणि इतिहासात ?

In reply to by आशु जोग

गंगाधर मुटे 27/04/2013 - 22:24
नक्की काय झालय आत्ता आणि इतिहासात ?>>> शेतकरी दरिद्रीरेषेखालीच राहावा म्हणून पुरेपूर व्यवस्थाच केली गेली. आत्ता आणि इतिहासातही.

आशु जोग 27/04/2013 - 12:57
शिक बाबा शिक, लढायला शिक कुणब्याच्या पोरा आता, लढायला शिक ही इंद्रजित भालेराव यांची कविता असेल तर टाका ना इथे कुणीतरी

गंगाधर मुटे 27/04/2013 - 23:49
लोकसत्ता बातमी दिनांक १९/१०/२०१२ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने २०११ सालच्या शेतकरी आत्महत्येची अलीकडेच आकडेवारी जाहीर करताना देशभरात १४ हजार ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ३३३७ शेतक ऱ्यांनी मृत्यूस कवटाळल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली असली तरी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र शेतकरी आत्महत्यांच्या घटनांत घट झाल्याचे विधान करून या आकडेवारीला शह दिल्याने आकडेवारीच्या नेमक्या सत्यतेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी हा आकडा ३१४१ एवढा होता. आत्महत्याग्रस्त महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतक ऱ्यांची संख्या जवळजवळ ७० टक्के आहे. महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक ऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने संसदेच्या मागील पावसाळी अधिवेशनात १९९५ ते २०११ या कालखंडादरम्यान देशभरात २ लाख ९० हजार ७४० शेतकरी आत्महत्या झाल्याची आकडेवारी सादर केली आहे. दिवाळखोरी किंवा आर्थिक चणचण आणि दारिद्रय़ या कारणांनी या आत्महत्या झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. -------------------------------------------------------------------- आत्महत्या असो की दुर्घटना, सरकारी मृतांचा आकडा हा वास्तवापेक्षा १/३ ने तरी कमीच असतो. त्या हिशेबाने हा आकडा किमान ५ ते ६ लाखाच्या घरात असू शकतो. ---------------------------------------------------------------------

आशु जोग 27/04/2013 - 12:56
> सर्वच धर्मांनी शेतकर्‍याला पाताळात गाडण्यासाठी कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही नक्की काय झालय आत्ता आणि इतिहासात ?

In reply to by आशु जोग

गंगाधर मुटे 27/04/2013 - 22:24
नक्की काय झालय आत्ता आणि इतिहासात ?>>> शेतकरी दरिद्रीरेषेखालीच राहावा म्हणून पुरेपूर व्यवस्थाच केली गेली. आत्ता आणि इतिहासातही.

आशु जोग 27/04/2013 - 12:57
शिक बाबा शिक, लढायला शिक कुणब्याच्या पोरा आता, लढायला शिक ही इंद्रजित भालेराव यांची कविता असेल तर टाका ना इथे कुणीतरी

गंगाधर मुटे 27/04/2013 - 23:49
लोकसत्ता बातमी दिनांक १९/१०/२०१२ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने २०११ सालच्या शेतकरी आत्महत्येची अलीकडेच आकडेवारी जाहीर करताना देशभरात १४ हजार ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ३३३७ शेतक ऱ्यांनी मृत्यूस कवटाळल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली असली तरी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र शेतकरी आत्महत्यांच्या घटनांत घट झाल्याचे विधान करून या आकडेवारीला शह दिल्याने आकडेवारीच्या नेमक्या सत्यतेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी हा आकडा ३१४१ एवढा होता. आत्महत्याग्रस्त महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतक ऱ्यांची संख्या जवळजवळ ७० टक्के आहे. महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक ऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने संसदेच्या मागील पावसाळी अधिवेशनात १९९५ ते २०११ या कालखंडादरम्यान देशभरात २ लाख ९० हजार ७४० शेतकरी आत्महत्या झाल्याची आकडेवारी सादर केली आहे. दिवाळखोरी किंवा आर्थिक चणचण आणि दारिद्रय़ या कारणांनी या आत्महत्या झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. -------------------------------------------------------------------- आत्महत्या असो की दुर्घटना, सरकारी मृतांचा आकडा हा वास्तवापेक्षा १/३ ने तरी कमीच असतो. त्या हिशेबाने हा आकडा किमान ५ ते ६ लाखाच्या घरात असू शकतो. ---------------------------------------------------------------------
नाटकी बोलतात साले!

कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!

राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे

रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे

देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;

त्यांचाच जीव घे तू ..

गंगाधर मुटे ·

"शेतीत राबणाऱ्या खंबीर हो 'अभय' तू एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता" त्या दिवसापासुन हिंदुस्थानाचा सुवर्ण-काळ सुरु होइल.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मूकवाचक 25/04/2013 - 08:56
गझल वाचून चार ओळी सुचल्या: पैशामधून सत्ता सत्तेमधून पैसा भावुक अन अडाणी मतदार आहे सस्ता ते 'जाणते' पुढारी जात्यंध माजलेले मातीत राबतो जो खाईल तोच खस्ता

In reply to by मूकवाचक

गंगाधर मुटे 25/04/2013 - 11:17
सुंदर ओळी झाल्यात. फक्त वृत्त सांभाळण्यासाठी खालीलप्रमाणे बदल करावा लागेल. पैशामधून सत्ता सत्तेमधून पैसा भावूक अन अडाणी मतदार खूप सस्ता..... सुंदर स्वतंत्र व्दिपदी होतोय. ते 'जाणते' पुढारी जात्यंध माजलेले मातीत राबतो जो खाईल तोच खस्ता...... सुंदर स्वतंत्र व्दिपदी होतोय.

गंगाधर मुटे 22/04/2013 - 20:15
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. ही गझलसुद्धा आंतरजालावर तुरळकप्रमाणावर का होईना पण स्वीकारली गेली, ही बाब माझ्यासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी आहे.

अर्धवटराव 23/04/2013 - 01:17
मागे अण्णा हजारे उपोषण प्रकरणी मिपावर बरीच (अपेक्षीत) चर्चा झाली होती. त्यावेळी, भ्रष्टाचाराने गांजलेला शेतकरी स्वतःच्या गळ्यात फास अडकवण्याआधि व्यवस्थेतील दोन-चार जणांना संपवेल, असा काहिसा मुद्दा निघाला होता. एका आंदोलक शेतकर्‍याच्या गजलीत आज तेच भाव बघुन थोडी काळजी वाटायला लागलीये. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

गंगाधर मुटे 24/04/2013 - 17:10
अर्धवटराव कशी गंमत आहे बघा. ३ लाख शेतकरी आत्महत्त्या करून मेलेत पण कुण्णाला म्हणून काळजी नाहीये. पण तो जर का "व्यवस्थेतल्या" एखाद्याला मारणार असेल तर त्या एकासाठी तुम्हाला देखील काळजी पडलीय. ;( - ज्या दिवशी त्या आत्महत्या करणार्‍याला हे गमक कळेल की, अरे आपण स्वतःच मरणे म्हणजे निष्कारणच जीव गमावणे आहे. पण सोबत एखाद्याला घेऊन मेलो तर हा देश हादरेल.मरणोप्रांत आपला फोटो टीव्हीवर झळकेल, ब्रेकींग न्यूज होईल. पेपरचे रकानेच्या रकाने भरून येईल.... तर त्यास सोबत एखाद्याला घेऊन मरणे केव्हाही परवडेल. ;) -

In reply to by गंगाधर मुटे

अर्धवटराव 24/04/2013 - 17:30
परिस्थिती खरच इतकी बीकट होत चालली आहे याचीच चिंता आहे. 'अभय' ला इतकं निर्वाणीचं लिहावं लागतय.... अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

गंगाधर मुटे 24/04/2013 - 18:57
क्षमस्व अर्धवटराव, तुम्हाला शेतकर्‍यांची नव्हे तर त्याला आत्महत्तेला प्रवृत्त करणार्‍या व्यवस्थेची काळजी पडली की काय, असा मी चुकीचा अर्थ घेतला होता. दिलगीर आहे. :)

कविता आवडली …फ़ार भयानक परिस्थिती आहे…ग़ंमत म्हणजे समाजात एका व्यवसाय करणारा दुसरा व्यवसाय करणा~या च्या दुःखाबाबत आपला संबंधच नाही असे वागताना दिसतो.-९२-९ ५ च्या दरम्यान लाखो कामगार बेकार झाले ।गिरणॆ कामगार देशोधडीस लागले सारे जणच ह्या चक्रातून जात आहेत। गेले आहेत। शेत क~यानॆ हिंमत धरून मुकाबला करावा ………… सरकारी नोकरी हि एकच शाश्वत नोकरी आहे। ………। आत्मा हत्ये बद्दल अनेक नेते विचार वंत यांनी आपापली मते व्यक्त केली आहेतच।

"शेतीत राबणाऱ्या खंबीर हो 'अभय' तू एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता" त्या दिवसापासुन हिंदुस्थानाचा सुवर्ण-काळ सुरु होइल.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मूकवाचक 25/04/2013 - 08:56
गझल वाचून चार ओळी सुचल्या: पैशामधून सत्ता सत्तेमधून पैसा भावुक अन अडाणी मतदार आहे सस्ता ते 'जाणते' पुढारी जात्यंध माजलेले मातीत राबतो जो खाईल तोच खस्ता

In reply to by मूकवाचक

गंगाधर मुटे 25/04/2013 - 11:17
सुंदर ओळी झाल्यात. फक्त वृत्त सांभाळण्यासाठी खालीलप्रमाणे बदल करावा लागेल. पैशामधून सत्ता सत्तेमधून पैसा भावूक अन अडाणी मतदार खूप सस्ता..... सुंदर स्वतंत्र व्दिपदी होतोय. ते 'जाणते' पुढारी जात्यंध माजलेले मातीत राबतो जो खाईल तोच खस्ता...... सुंदर स्वतंत्र व्दिपदी होतोय.

गंगाधर मुटे 22/04/2013 - 20:15
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. ही गझलसुद्धा आंतरजालावर तुरळकप्रमाणावर का होईना पण स्वीकारली गेली, ही बाब माझ्यासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी आहे.

अर्धवटराव 23/04/2013 - 01:17
मागे अण्णा हजारे उपोषण प्रकरणी मिपावर बरीच (अपेक्षीत) चर्चा झाली होती. त्यावेळी, भ्रष्टाचाराने गांजलेला शेतकरी स्वतःच्या गळ्यात फास अडकवण्याआधि व्यवस्थेतील दोन-चार जणांना संपवेल, असा काहिसा मुद्दा निघाला होता. एका आंदोलक शेतकर्‍याच्या गजलीत आज तेच भाव बघुन थोडी काळजी वाटायला लागलीये. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

गंगाधर मुटे 24/04/2013 - 17:10
अर्धवटराव कशी गंमत आहे बघा. ३ लाख शेतकरी आत्महत्त्या करून मेलेत पण कुण्णाला म्हणून काळजी नाहीये. पण तो जर का "व्यवस्थेतल्या" एखाद्याला मारणार असेल तर त्या एकासाठी तुम्हाला देखील काळजी पडलीय. ;( - ज्या दिवशी त्या आत्महत्या करणार्‍याला हे गमक कळेल की, अरे आपण स्वतःच मरणे म्हणजे निष्कारणच जीव गमावणे आहे. पण सोबत एखाद्याला घेऊन मेलो तर हा देश हादरेल.मरणोप्रांत आपला फोटो टीव्हीवर झळकेल, ब्रेकींग न्यूज होईल. पेपरचे रकानेच्या रकाने भरून येईल.... तर त्यास सोबत एखाद्याला घेऊन मरणे केव्हाही परवडेल. ;) -

In reply to by गंगाधर मुटे

अर्धवटराव 24/04/2013 - 17:30
परिस्थिती खरच इतकी बीकट होत चालली आहे याचीच चिंता आहे. 'अभय' ला इतकं निर्वाणीचं लिहावं लागतय.... अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

गंगाधर मुटे 24/04/2013 - 18:57
क्षमस्व अर्धवटराव, तुम्हाला शेतकर्‍यांची नव्हे तर त्याला आत्महत्तेला प्रवृत्त करणार्‍या व्यवस्थेची काळजी पडली की काय, असा मी चुकीचा अर्थ घेतला होता. दिलगीर आहे. :)

कविता आवडली …फ़ार भयानक परिस्थिती आहे…ग़ंमत म्हणजे समाजात एका व्यवसाय करणारा दुसरा व्यवसाय करणा~या च्या दुःखाबाबत आपला संबंधच नाही असे वागताना दिसतो.-९२-९ ५ च्या दरम्यान लाखो कामगार बेकार झाले ।गिरणॆ कामगार देशोधडीस लागले सारे जणच ह्या चक्रातून जात आहेत। गेले आहेत। शेत क~यानॆ हिंमत धरून मुकाबला करावा ………… सरकारी नोकरी हि एकच शाश्वत नोकरी आहे। ………। आत्मा हत्ये बद्दल अनेक नेते विचार वंत यांनी आपापली मते व्यक्त केली आहेतच।
त्यांचाच जीव घे तू ..... हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता मातीत राबताना इतके कळून आले फुकटात ठोस जखमा!