माध्यमवेध

संवादिका - ३

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
22 Jun 2014 - 1:50 am

"आहेस का रे?"

"आहे ना गं, तुझ्यासाठी मी नेहमी इथेच आहे."

"तुझी व्यवधानं सांभाळावी लागणारच नं मला?"

"व्यवधानं का तुझ्यापेक्षा महत्त्वाची असतील?"

"माहितेय माहितेय, दिवसभरात किती वेळा उपलब्ध असतोस ते चांगलं माहितेय मला."

"असं काय करतेस, तुमने पुकारा और हम चले आये, कधीही, केव्हाही.... :-D"

"नेहमी आम्हालाच पुकारावं लागतं, हेच दु:खं आहे नं..."

"असं का म्हणतेस? पापी पेट के लिये नोकरी तो करनीच पडेंगी ना...?"

"तुझ्या या बेदर्दी नोकरी पायी तुझी ही छोकरी तुझ्यासाठी किती झुरतेय हे कळतं नं तुला?"

संस्कृतीनाट्यकथाराहणीगुंतवणूकमौजमजाप्रकटनआस्वादमाध्यमवेधअनुभवमाहितीविरंगुळा

'कुणी घर देता का घर' - नटसम्राटाचा टाहो

जीएस's picture
जीएस in जनातलं, मनातलं
20 Jun 2014 - 6:37 pm

आपल्या विविधरंगी नाट्यप्रयोगांनी गेली दोन वर्षे जनतेचे अथक मनोरंजन करणार्‍या नटसम्राटाने अखेर 'कुणी घर देता का घर' असा आर्त टाहो फोडला आहे. आणि त्यांचा हा नवा नाट्यप्रवेश नेहेमीप्रमाणे जनतेपर्यंत नेण्याचे 'बहुतही क्रांतीकारी' काम अर्थातच केले आहे मिडीयातील एकमेव KCHP (केजरी सर्टिफाईड ऑनेस्ट पर्सन [या सर्टिफिकेशनसाठी देणगीसह भेटा अथवा लिहा.....]) पुण्यप्रसून वाजपेयी यांनी.

समाजराजकारणप्रकटनमाध्यमवेध

महाराष्ट्रातील पाणि व्यवस्थापन आणि सिंचनाच्या समस्यांचा मान्सून

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
16 Jun 2014 - 11:37 am

गोदावरी नदीचा इतिहास अभ्यासताना गौतम ऋषिंनी गोदावरीचा प्रवाह महाराष्ट्रात आणण्यापुर्वी म्हणे २१ दुष्काळ पडले हि झाली आख्यायीका, पण नवीनतम हवामान पुरातत्व संशोधनांनुसार भारतातील दुष्काळांचा इतिहासही सिंधू संस्कृती इतकाच जुना म्हणजे चार साडे चार हजार वर्षे पर्यंत मागे जातो आहे असे दिसते; हा झाला प्राचीन इतिहास. अलिकडच्या इतिहासाकडे पाहीलतरी आधून मधून दुष्काळ हे महाराष्ट्राच्या पाचवीला नेहमीच पुजलेले.

चर्चा बेलबॉण्डची

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
28 May 2014 - 4:00 pm

आर्थीक गैरव्यवहारांचे घोटाळ्यांचे समर्थन सहसा कुणीच करत नाही. आर्थीक गैरव्यवहारांचे घोटाळ्यांचे आरोप आणि जबाबदारीचा उल्लेख करण्या साठी लागणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संबंधीत आरोपीत व्यक्तींची हकनाक बदनामी होणार नाही ह्याचे पथ्यपाळण्याचा समतोल ह्याचे कायदेविषयक पैलू वेगळ्या धाग्याचा विषय आहे.

गांधीजींबद्दलची भुमिका डावे-समाजवादी स्पष्ट करतील का?

विकास's picture
विकास in काथ्याकूट
14 May 2014 - 6:38 am

आज निवडणुकींच्या निकालाच्या (अगदी अगदी) पूर्वसंध्येस एका बातमीत खालील वाक्ये वाचनात आली:

"....गांधी यांच्या महिलांबाबतच्या आणि जातीयवादाबाबतच्या विचारांचा इतिहास पाहिल्यास त्यांना महात्मा केलेच कोणी, असा प्रश्न निर्माण होतो...त्यांचा उल्लेख 'देशातील पहिले भांडवलदार पुरस्कृत समाजसेवक' असा केला... 'कधी संत तुकाराम यांच्यावरील नाटके तयार करून ४६ रुपये जमा करणे तर कधी अस्पृश्यता उच्चाटनाच्या नावखाली ब्रिटीश कंपन्यांकडून दोन लाख रुपये मागणे, अशाप्रकारचे कार्य करणारे गांधी हे महात्मा असूच शकत नाहीत. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत नेमके काय केले, याबाबतच इतिहास पुन्हा समोर आला पाहिजे', "

मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाची सक्ती करता येणार नाही.

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
7 May 2014 - 2:28 pm

आजच्या अनेक वर्तमानपत्रात "मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाची सक्ती करता येणार नाही". अशी बातमी वाचायला मिळाली.कर्नाटक शासनाने अश्या प्रकारचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. त्यावर स्थगिती आणावी अशी याचिका दाखल करण्यात आली असताना उच्च न्यायालयाच्या निर्णयानूसार वरील वृत्त वाचायला मिळाले.

हे वाचतांना खालील विचार मनात आले.

शांत अरनब गोस्वामी ,निश्चल वागळे आणि साधेसुधे भारतीय न्युज चॅनेल्स

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
28 Apr 2014 - 6:52 pm

भारतीय टी.व्ही न्युज चॅनल्स च्या संख्येत गेल्या पाच वर्षांत लक्षणीय/अनाकलनीय/असहनीय वाढ झालेली आहे. त्यात मी केवळ हिन्दी-मराठी-इंग्रजी न्युज वाहीन्यांवीषयी बोलतोय. बाकी सध्या बाजुला ठेउयात. तर या नव्या मीडीयाने अनेक नवनिवेदकांची सुनामी आलेली आहे. अनेक नव्या चेहरयांना संधी मिळालेली आहे व अति उत्साहाने सारेच कामाला लागले आहेत. व सध्याचा निवडणुकी चा सीझन तर वृत्त निवेदकांचा (विणीच्या हंगामा सारखा) हंगाम असतो. यात निवेदकांच्या प्रतिभेला जणु नवा जन्म लाभतो.

नमोंची देशाकरताची आर्थीक रणनिती : इकॉनॉमीक टाइम्स मधील मुलाखत

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
22 Apr 2014 - 8:23 pm

मोदींना पंतप्रधानपदाची संधी किती हे ठरवणारं घोडा मैदान दूर नाही, गणित जुळवा जूळवीत काही वेळ लागलातरी मे अखेर पर्यंत चित्रस्पष्ट होईलच. किमानपक्षी संसदेतेले एका मोठ्या पक्षाचे नेते हे बिरूद तर कुठेच नाही गेल. कोणत्याच पक्षाला २/३ बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने किमान महत्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाची मदत घ्यावीच लागेल. मोदी आणि त्यांच भविष्यातील अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय (व्यापारी) संबंध या बद्दल इतर मिपा धाग्यांवर चर्चा चालुच आहे.