श्रावणातल्या कहाण्या
श्रावणातल्या कहाण्या
श्रावणातल्या कहाण्या
जगातली सर्वोत्तम सुखे फुकटात मिळतात असं कोणीतरी म्हटलं आहेच. तर फुकट मिळणाऱ्या सुखांपैकी "दुपारची झोप" ही मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या दृष्टीने ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. दुपारचे असे मस्त जेवण झालेले असावे. पोट तृप्त असावे. मन अर्धसमाधी अवस्थेत गेलेले असावे. डोळ्यावर हलकेच झोप उतरावी आणि पापण्या अलगद मिटाव्यात.
फक्त अर्धा तास!... अर्धा तास ब्रह्मानंदी टाळी लागावी आणि आपण निद्रादेवीच्या अधीन व्हावे.
हजारो वर्षांची संस्क्रुती असलेल्या आपल्या भारतात कर्तबगार स्त्रीयांची वानवा कधीच नव्हती. पुराणकाळात ज्यांनी वेद्याध्ययन केले अशा गार्गी आणि मैत्रेयी आणि गणीत शिकणारी लिलावती तसेच द्रौपदी तारा मंदोदरी अहिल्या सीता या पंचकन्या अशी फार जरी नसली तरी उदाहरणे आहेत. राज्यकारभाराचे धडे देवून एक आदर्श राजा घडवणार्या जिजाऊसाहेब, लढवय्यी झाशीची राणी , गोरगरीबांचे जीवन सुकर करणार्या अहिल्या देवी होळकर , या स्त्रीयांनी एक इतिहास घडवला.
असतो मा सद्गमय
तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर्मामृतम् गमय
बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28
म्हणजेच
मला असत्याकडून सत्याकडे ने
अंधाराकडून प्रकाशाकडे ने
मृत्यूकडून अमरत्वाकडे ने
*प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ?*
(Beyond the 'Rainwater Harvesting')
भाग - दोन.
--------------
जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं संवर्धन
-------------------------------------------------------------
लहानपणी आजीच्या कुशीत शिरून गोष्टी एेकताना, त्यात पुढे काय होईल याची उत्सुकता आपल्याला शांत बसू देत नाही. हि उत्सुकता ती गोष्ट/कथा उत्कृष्ट असण्याचं द्योतक म्हणता येईल आणि त्या गोष्टीशी आपण एकरूप झाल्याचं लक्षण म्हणता येईल.
या उत्सुकतेपोटीच 'गेम आॅफ थ्रोन्स'च्या आठही सिझन्सना जगभरातल्या तमाम प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या सर्वांग सुंदर सिरीजचा २०११ ला सुरू झालेला प्रवास नऊ वर्षांनी २०१९ ला संपला, कारण या मालिकेची कथा उत्कृष्ट होती आणि तिने प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचे काम अतिशय चोख केले.
म्हातारपणी टीव्हीसारखा दुसरा मित्र नाही. सतत फक्त टीव्ही बघावासा वाटायला लागला की समजावे, आपले वय झाले.
(आणि तोही बघवेनासा झाला की समजावे की आता फारच वय झाले.)
मलाही अशीच म्हातारपणाची जाणीव झाली ती टीव्हीमुळे.
शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे जरा जास्तच होते. दादरला माझ्या मैत्रीणीच्या बहिणीचे लग्न होते. मुलाकडली मंडळी पुण्यातली होती. सकाळी नाष्टा सुरु होता. एक साधारण तीन वर्षाचा मुलगा रडत होता. मी त्या मुलाच्या आईला विचारले
"मुलगा का रडतो आहे?"
"भूक लागली त्याला."
"उपमा तयार आहे द्या त्याला"
नृत्यांगना..... अहं...... !!! (भाग 2)
मागील शुक्रवारी मी 'प्यार किया तो डरना क्या....' या गाण्यामधून सिनेसृष्टीच्या all time लावण्य सम्राज्ञी मधुबालाबद्दल आणि त्या अजरामर गाण्याबद्दल लिहिलं होतं. आज अशाच एका भाव सम्राज्ञी नूतनबद्दल थोडंस.... आणि एका कदाचित फारशा परिचित नसलेल्या गाण्याबद्दल..... ज्यामध्ये तिने नृत्य न करूनही काही क्षण मोहक आणि अर्थपूर्ण पदन्यास दाखवले आहेत.... आणि संपूर्ण गाणं भावविभोर नेत्रांमधून संयत प्रणय व्यक्त करत गाण्याच्या प्रत्येक शब्दला न्याय दिला आहे.
'मोरा गोरा अंग लैले.... मोहे शाम रंग दैदे.... छुप जाऊंगी रात ही मे.... मोहे पी का संग दैदे....'
।। भाषा सरिता इव ।।