ऑब्जेक्षनेबल..
मी रिटायर होण्यापूर्वी एकूण एकतीस वर्षे रेडिओत नोकरी केली. आकाशवाणीवर असताना कोणते शब्द,वाक्यं, गाणी प्रसारीत होऊ द्यायची याबाबत काटेकोर नियम होते. ते पाळावेच लागत. म्हणजे पाळले नाहीत नाहीतर मेमो मिळत. मग मेमोवर न भागलेल्या केसेसना गांभीर्यानुसार प्रसंगी सस्पेन्शन ही भोगावे लागे. तर ते असो.
आता "अबीर गुलाल उधळीत रंग" हा तसा किती रसाळ अभंग आहे की नाही ?!
पण तो आम्ही रेडियोवर लावू शकत नव्हतो, कारण त्यात "उंबर्यासी कैसे शिवू आम्ही यातीहीन " अशी ओळ आहे. म्हणजे आम्ही हीन जातीचे लोक देवा तुझ्या पायरीला कसे शिवू?