समाज

सामान्य आणि अ सामान्य

देशपांडे विनायक's picture
देशपांडे विनायक in जनातलं, मनातलं
20 Apr 2014 - 11:09 am

श्री अमोल पालेकर पोलिसाकडे तक्रार करून आले
त्यांचे नाव मतदार यादीतून गायब कसे झाले याचा शोध पोलिसांनी घ्यावा असे त्यांचे म्हणणे दिसते
माझे नाव मतदार यादीत आहे का नाही हे मी नेट वर पाहिले
मतदार यादी नेट वर दिसते हे मी वर्तमानपत्रातून वाचले
माझे नाव मतदार यादीत दिसत नव्हते
नेटवरून मी तक्रार नोंदविली
एका आठवड्यात मला SMS वरून कोणाला भेटावे ते कळवण्यात आले
मी त्या अधिकारी व्यक्तीस जाऊन भेटलो
माझे म्हणणे ऐकल्यावर मला माझे नाव नोंदवून मिळाले
माझे नाव गायब का झाले तेही समजले

समाजअनुभव

आर्र....राजकुमार

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
20 Apr 2014 - 10:46 am

आर्र... राजकुमार

पुणे-मुंबई वोल्वो प्रवासात बरेचदा हिंदी चित्रपट बघावे लागतात. तर आमचे महतभाग्य असे की, काल आम्हाला एक अद्वितीय, 'आर्..राजकुमार' नांवाचा चित्रपट बघायला मिळाला. आधी, थोडावेळ आम्ही त्याकडे बघण्याचे टाळून खिडकीबाहेर बघत होतो. पण मारधाडीचे आवाज, जबरदस्त संवाद आणि गुलजारला घरी बसायला लावतील अशा ग्रेट काव्याची गाणी कानावर आदळू लागली. त्यांत बाहेरुन ऊन यायला लागले. मग पडदा बंद करुन चित्रपट बघायचे ठरवले.

संस्कृतीकलासमाजमौजमजाचित्रपटआस्वादअनुभवविरंगुळा

मतदान---शंभर टक्के

निलरंजन's picture
निलरंजन in काथ्याकूट
18 Apr 2014 - 8:54 pm

भारत देश म्हणजे गेली साठ वर्षे मानाने संसदीय लोकशाही राबविणारा देश , देशाला आपल्या लोकशाही चा सार्थ अभिमान
लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले राज्य वा देश पण इतके असूनही देशाला अजूनही निवडून आलेला प्रतिनिधी शंभर टक्के लोकांनी निवडलेला नाही

नक्की होतेय काय ?

कशी होईन समर्थ लोकशाही?

मतदान सक्तीचे करावे का?

लोकांना मतदानासाठी खेचून आणण्यामधे नेते कमी पडतात का?

मतदान केंद्रावर पोहचायाची व्यवस्था नक्की कुणी करायची?

निवडणूक आयोगाने नक्की काय करावे म्हणजे शंभर टक्के मतदान होईल आणि सुदृढ सशक्त लोकशाही अस्तित्वास येईल?

चेंबूर - कालिना उड्डाणमार्ग अखेर वाहतुकीसाठी उघडला!

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
18 Apr 2014 - 9:58 am

गेली १० वर्षे रखडलेला चेंबूर ते कालिना (सी एस टी मार्ग) उड्डाणमार्ग आज सकाळी वाहतुकीस खुला झाला. ठाणे ते कालिना कचेरी घरापासुन अगदी कचेरीत शिरेपर्यंत वाटेत २ सहकार्‍यांना घेण्यासाठीचे दोन थांबे धरुनही केवळ ३५ मिनिटे लागली. त्यातही रमाबाई नगर ते कालिना विद्यापिठाच्या अलिकडील टप्पा हे अंतर अवघ्या ९ मिनिटात संपले. पहिलाच दिवस असल्याने सर्वत्र वाहतुक पोलिस दक्ष होते. मजा आली. वेळ तर वाचलाच पण घाटकोपरला महामार्ग सोडल्यानंतर घ्यावे लागणारे गल्ली-बोळ, लाल बहादूर शास्त्री मार्ग, भंगार साम्राज्याचा बराचसा भाग व त्या त्या भागातली वाहतुक कोंडी, मनस्ताप हे सगळे टळले.

समाजजीवनमानप्रकटनसद्भावनाप्रतिक्रियामाहिती

चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
18 Apr 2014 - 1:59 am

चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल

कार बनवणे आणि विकणे इतकं आव्हानात्मक आहे हे त्यावर काम करण्याआधी माहीत नव्हतं.
यावेळी आपण कार बाजाराची गुंतागुंत ( Complexity) आणि ग्राहकाची निर्णय प्रक्रिया पाहूयात, म्हणजे नंतर त्याचा संदर्भ येईल तेव्हा पटकन लक्षात येईल. अर्थात दुचाकीला पण बऱ्याच प्रमाणात हे सगळं लागू होतं, पण दुचाकीसाठीची ही प्रक्रिया थोडीशी सोपी आहे.

समाजजीवनमानप्रकटनविचारआस्वाद

केलं की नाही?

साती's picture
साती in जनातलं, मनातलं
17 Apr 2014 - 9:14 am

सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत.
राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ?
या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ.
माहिती लिहिणे अपेक्षित आहे.
बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते!

आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!

समाजजीवनमानराजकारणअनुभव

माहिती हवी आहे-.........सहकारी सोसायटी.

चौकटराजा's picture
चौकटराजा in काथ्याकूट
15 Apr 2014 - 6:56 pm

खालील विषयांवर निश्चित अशी माहिती कुणाकडे असल्यास हवी आहे.

सहसा बिल्डर गाळा धारकाना पार्किंग वाटून देतो. यात स्टिल्ट खाली पार्किंग हवे असेल तर काही पैसे आपल्या करारात न दाखवता रोखीने घेतो. नंतर काही काळाने इमारतीचे खरेदी खत करून सहकारी गृहरचना संस्था स्थापन केली जाते. काही कालाने दुचाक्यांची संस्ख्या वाढते .अशी वेळ आल्यास चारचाकी बाहेर हकलण्याचे दडपण जनरल बॉडीचा ठराव करून किंवा अनधिकृत्त पणे धमकी वगैरे देऊन आणण्यात येते. अशा स्थितीत बिल्डरने केलेले वाटप वा जनरल बॉडीने केलेला ठराव यात
कायदेशीरित्या महत्ता कोणाची.(who supercedes whom ? )

आडनावाच्या आडून...

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं
14 Apr 2014 - 10:45 pm

शाळेचा पहिला दिवस. ५ वी चा वर्ग. वर्गशिक्षिका जोशीबाई. वर्गाची 'ओळखपरेड' चालू होती.एक-एक विद्यार्थी उभे राहून आपली ओळख करून देत होता.मी उभा राहीलो (उंची कमी असल्यामुळे उभा आहे का बसलेला आहे ह्यात विशेष फरक पडत नव्हता व बाकहि उंच होते.) मीही माझी ओळख करून दिली. सगळ्या वर्गाची ओळखपरेड पूर्ण झाल्यावर बाईंनी माझ्याकडे बघितले व म्हणाल्या 'गोडसे' माझ्यासमोरील पहिल्या बाकावर बस. पुढून तिसर्या बाकावरून थेट मी पहील्या बाकावर आलो. पहिल्या बाकावरचा हुशार शिंदे तिसर्या बाकावर फेकला गेला. सापशिडीचा खेळ म्हणावा तर मी कोणतेही फासे टाकले नव्ह्ते. उंचिचे म्हणावे तर तोही माझ्याइतकाच उंचीचा होता.

विनोदसमाजविरंगुळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सचिन७३८'s picture
सचिन७३८ in जनातलं, मनातलं
14 Apr 2014 - 6:53 am

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी-कोटी प्रणाम. जय भीम !!!

उध्दरली कोटी कुळे ।
भीमा तुझ्या जन्मामुळे ।।

Babasaheb

धोरणइतिहाससाहित्यिकसमाजराजकारण