धर्म

मिपावरील तज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे !

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
31 Mar 2013 - 6:42 pm

तर्‍हेतर्‍हेचे प्रश्न पडतात. उत्तरे शोधून सापडत नाहीत. अशावेळी मिसळीवर यावे वाटते.
मिसळीवरचे तज्ञ काही मार्गदर्शन करु शकतील ही आशा असते.

भारत देशामधे अनेक शतकांपासून हिंदू धर्म विद्यमान आहे.
तर असे सांगितले जाते की

या देशात खूप विषमता होती. त्यापासून सुटका व्हावी म्हणून पिचलेल्या लोकांनी इतर धर्माचा अवलंब केला.
हे कितपत सत्य आहे ?

विदेशी आक्रमकांबरोबर आलेले धर्म इथल्या लोकांनी स्वखुशीने स्वीकारले.
तर मग ते स्वीकारल्यानंतर झोपडीत राहणारे लोक राजवाड्यात गेले का ?
पूर्वीचे गुलाम नंतर राजे नाहीतर निदान सरदार बनल्याची उदाहरणे आहेत का ?

संस्कृतीधर्मजीवनमानप्रश्नोत्तरे

हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
30 Mar 2013 - 6:44 pm

अग्ने नय सुपथा राये अस्मान्
विश्वानि देव वयुयानि विद्वान्.
युयोध्यस्म्ज्जुहुराणमेनो
भूयिष्ठां तेनमउक्तिं विधेम.
[ईशोपानिषद (मंत्र १8)]

धर्मसमीक्षालेखप्रतिभा

काठमांडू ते कंदाहार - Flight IC 814

मोदक's picture
मोदक in काथ्याकूट
24 Mar 2013 - 11:12 pm

1998 साली झालेल्या विमान अपहरणाबद्दल अनेक ठिकाणी अनेकवेळा सतत चर्चा होत असते.

श्री श्रीरंग जोशींनी या घटनेसंदर्भात विस्तृत लेखन दिवाळी अंकामधील काठमांडू ते कंदहार या लेखामध्ये केले आहेच.

अनेक ठिकाणी होणारे विषयांतर पाहता या विषयावर हा धागा काढत आहे. या धाग्यामध्ये आपण या अपहरणासंदर्भात चर्चा करूया.

संपादक मंडळास नम्र विनंती.

गणपतीला जानवे कोणी घातले ?

शरद's picture
शरद in काथ्याकूट
14 Mar 2013 - 1:28 pm

गणपतीला जानवे कोणी घातले ?
आपण आज गणपतीच्या मूर्त्या वा चित्रे पाहिली तर आपणास असे आढळून येईल की त्याच्या गळात जानवे असते. माझा प्रश्न असा आहे की हे जानवे गणपतीच्या गळ्यांत कोणी, केंव्हा व कां घातले ? नाही, हा धागा पोरकट, थिल्लर व सनसनाटी नव्हे. मी बरा॒च प्रयत्न करून याची उत्तरे शोधावयाचा प्रयास केला आहे. मला उत्तर मिळाले नाही, येथील एखादा अभ्यासू काही सांगू शकेल या आशेने प्रश्न विचारला आहे. प्रथम हा प्रश्न उद्भवलाच कां ? ते पाहू.

व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
10 Mar 2013 - 3:26 pm

विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, "च्यामारी, काय आचरटपणा आहे हा", असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती.

धोरणसंस्कृतीधर्मइतिहाससमाजजीवनमानराजकारणप्रकटनविचारमाध्यमवेधबातमीमतमाहितीसंदर्भवाद

प्रश्न

तिमा's picture
तिमा in काथ्याकूट
5 Mar 2013 - 3:12 pm

हे यक्षाचे प्रश्न नाहीत. एका सश्रद्ध आदरणीय व्यक्तीने एका विज्ञाननिष्ठाला म्हणजे (माझ्यासारख्या माणसाला) विचारलेले बेसिक प्रश्न आहेत. त्याला मी माझ्या बुद्धीला झेपेल अशी उत्तरे दिली आहेत. संभाषण वैयक्तिक निरोपातून असल्यामुळे आत्तापर्यंत अप्रकाशित आहे. त्यावर चर्चा व्हावी या हेतूने इथे देत आहे.

१. मन खंबीर नसेल तर माणसाने अश्या प्रसंगी काय करावे?

मन खंबीर नसेल तर माणसाने परमेश्वराचा जरुर आधार घ्यावा.

२. विज्ञानाभिमुख होण्याने मन खंबीर होते काय?

माझे तरी झाले आहे.

३. कर्मकांड करणार्‍या सर्व लोकांची मने खंबीर नसतात काय?

कुंभ कि महाकुंभ?

श्रीनिवास टिळक's picture
श्रीनिवास टिळक in काथ्याकूट
2 Mar 2013 - 8:53 pm

(१) सध्या प्रयागला चालू असलेला कुंभ मेळा व्यवस्थित आणि शांतपणे जात आहे हे वाचून बरं वाटलं. पैलतीरावर (NRI) विविध समुदायांतून कुम्भाबद्दल बरेच प्रश्न विचारले जात आहेत. त्यापैकी मुख्य म्हणजे सद्य मेळावा कुंभ कि महाकुंभ (जो बारा कुंभानंतर म्हणजे १४४ वर्षांनी येतो) मेळा आहे? सद्य (महा) कुंभाची उपस्थिती काही कोटींवर जाईल असं म्हणतात. तर सर्वसामान्य यात्रेकरुबद्दल काय म्हणता येईल? त्याचा/तिचा अनुभव काय आहे? कोणी मि.पा. सदस्य (किंवा त्यांच्या ओळखीचे कोणी) मेळ्याला गेलं होतं का?

काकड आरती

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
10 Feb 2013 - 9:01 pm

( हे अजुन एक खूप जुनं ललित (सप्टे २००८) ! आजकाल बॉल्गवरचा कचरा आवरायला लागले आहे तेव्हा असं काही जुनं पुराणं सापडतं ... ह्या वर्षी कधी नव्हे ते मुंबापुरीत थंडी पडली आहे.. थंडी म्हणजे चांगलीच थंडी ...बा.भ. बोरकरांची "माघामधली प्रभात सुंदर " ही कविता आठवावी इतकी थंडी .... त्या निमित्ताने हे आठवले )

||काकड आरती ||

आज्जी पहाटे पहाटे उठायची.
कार्तिक स्नान महापुण्यवान अस काही तरी म्हणायची .
आम्ही साखरझोपेत असताना, ती थंडगार पाण्याने अंघोळ करायाची .....

अजुन ही आठवत आहेत ते अस्पष्ट से मन्त्र. अजुन ही आठवत आहे ती आजीची गड़बड़....

धर्मआस्वाद

शत्रुघ्न

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
5 Feb 2013 - 1:08 pm

इतिहास मोठा क्रूर आहे. काही लोकांना त्याने देव पदी पोचवले तर काही जणांना उपेक्षेने मारले. ज्याव्यक्तिरेखांची इतिहासाने उपेक्षा केली त्यांत शत्रुघ्नाचे नाव फार वरती आहे. किंबहुना सर्वात वरती तेच आहे. वटवृक्षांच्या सावलीत एखादे रोप कोमेजुन जावे तशी शत्रुघ्नाची व्यक्तिरेखा कोमेजुन गेल्यागत भासते. राम तर देवपदी पोचला. लक्ष्मण अजरामर झाला. भरत भ्रातृप्रेमावर आणि निस्पृहतेवर गाजला. शत्रुघ्नाच्या वाट्याला मात्र ते मोमेंट्स ऑफ फेम आलेच नाहीत.

संस्कृतीनाट्यधर्मइतिहासप्रकटनविचारलेखमत