खेळसारीचा खेळिया
खेळसारीचा खेळ
खेळसारीचा खेळ
दिस सरतो असा, आठवांचा ठसा, मिटून चालला
दिस सरतो असा, पाखरांचा थवा, उडून चालला.
दिस मेघापरी झरुन चालले
दिस वाळूपरी सुटून चालले
दिस सरतो असा, स्वप्नांचा दिवा, विझून चालला.
दिस गंधापरी विरून चालले
दिस रंगापरी पुसून चालले
दिस सरतो असा, या फुलांचा पसा, लुटून चालला.
दिस आले कधी सोबती घेउनी
दिस गेले कधी एकटा सोडुनी
दिस सरतो असा, ओळखीचा जसा, निघून चालला.
दीपक पवार.
कोलाहल !
सायकलची बेल, दुचाकी चारचाकी चे हॉर्नस
ट्रक चे कर्कशः ब्रेक, वेगाचे आवाज
ट्रामच्या दाराची उघड झाक , हेलिकॉप्टरची झार झार
ट्रेन च्या प्लॅटफॉर्म वरची अनाउन्समेंट ,
मधेच ऍम्ब्युलन्स चा सायरन ,
सगळीकडे गडबड, धांदल, गोंगाट,किलबिलाट !
शब्द कल्लोळ!
शाळेच्या दिवसात,'विषय सर्वथा नावडे',या अवस्थेत, सिनेमे व गाण्यांमुळे त्यातल्या त्यात हिंदी फार जवळची वाटे.उर्दू आणि हिंदीतला फरक कळत नसल्याने,
(अजूनही नाहीच म्हणा!)उर्दू हिंदीतच गणली जाई.
गम्मत म्हणजे अनेक शब्दांचे अर्थ माहीत नसत.
अंदाजाने शब्दांचे अर्थ लावायचे.त्यातून अनर्थ होत.
'सबद सबद सब कोई कहे सबद के हाथ न पाव'असं कबीर म्हणतात.सिनेमाची शिर्षके,संवाद आणि गाण्यातल्या,अनेक 'सबदांना',मीच 'हाथ- पाव 'देवून चालवत असे.त्यामुळे,शब्दांच्या पलीकडले, सारे काही ,राग 'अडाण्यातच'असे!
ईशान्येकडील राज्यांमधील सीमावाद
स्वातंत्र्यानंतर ईशान्येकडील आसाम, नागालँड, त्रिपुरा इत्यादी प्रदेशांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण झाले. मात्र त्यात आसाममध्ये अनेक भाषिक, वांशिक, धार्मिक गटांचा समावेश असल्यामुळं हे सर्वात मोठं आणि वैविध्यपूर्ण घटकराज्य बनलं होतं. कालांतरानं स्थनिक समुदायांची मागणी आणि भाषावार प्रांतरचनेचं सूत्र यांच्या आधारावर आसाममधून विविध घटकराज्यांची निर्मिती करण्यात आली. तसं होत असताना सर्व घटकराज्यांनी एकमेकांच्या प्रदेशावर आपापले दावे करण्यास सुरुवात केली. त्यामुळं त्यांच्यात सीमावादाला सुरुवात झाली.
✪ हरंगुळच्या शिस्तबद्ध व अष्टावधानी जनकल्याण निवासी विद्यालयाला भेट
✪ विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शन व फन लर्न सत्र घेण्याचा अनुभव
✪ सत्रांमधला मुलांचा सहभाग आणि ऊर्जा!
✪ पहाटे चंद्र बघण्याचा मुलांचा अनुभव आणि त्यांना तो दाखवण्याचा माझा अनुभव!
✪ शिक्षकांचं काम किती कठीण असतं ह्याची झलक
✪ दिवसातून अडीच तास मैदानावर खेळणारे विद्यार्थी- दुर्मिळ दृश्य!
✪ सेरेब्रल पाल्सी व इतर बौद्धिक व शारीरिक दिव्यांगांसाठीच्या संवेदना प्रकल्पाला भेट
मुळ कवी दिपक पवारांची क्षमा मागून....
(आली जरी रात सजणी...)
झाली किती रात सजणी, नावडे मजला "थांब जरा येते", सांगणे.
अधिरला जीव माझा, असे कसे तुझे हे वागणे.
खडबड, खडबड आवाजास, ताल देती तुझी काकणे.
बरे वाटते का असे, सारखे सारखे वाकून माझे पाहणे.
झोपले चंद्र तारे,निद्रिस्त झाल्या उषा निशा.
मोकळ्या झाल्या आता, कुजबूजण्यास दाही दिशा.
संस्कार म्हणजे काय? मूल संस्कारी आहे म्हणजे मोठ्यांचा आदर करणे, त्यांच्या वेळोवेळी पाया पडणे, चांगला अभ्यास व देवधर्म या सवयी तिला किंवा त्याला आहेत असं म्हणायचे. हल्लीच्या काळात हे निकष थोडे वेगळे आणी कालानुसार आधुनिक असतील पण गर्भितार्थ तोच. एखाद्या व्यसनाधीन वा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर वाईट संस्कार झाले आहेत असं मानलं जातं.
व्यसन
माझ्याकडे एक ४८ वर्षाच्या बाई आल्या होत्या. त्यांचा डावा हात दुखत होता. त्यासाठी त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या डाव्या खांद्याची सोनोग्राफी करायला सांगितली होती.
सोनोग्राफी करण्याच्या अगोदर त्यांच्या आजाराची माहिती असावी म्हणून आणि मध्यम वयीन, डावा हात दुखतो आहे म्हणून मी त्यांना विचारले कि त्यांच्या हृदयाची तपासणी झाली आहे का? त्यावर त्यांनी आपली फाईल दाखवली.
त्यात इ सी जी , स्ट्रेस टेस्ट आणि इको कार्डिओग्राफी चे अहवाल होते ते सर्व व्यवस्थित होते म्हणजेच या बाईंना हृदयाचा काहीही आजार नव्हता.
यानंतर मी त्यांना विचारले कि हृदय तर व्यवस्थित आहे