विचार

कर्मण्येवाधिकारस्ते...

अबोलघेवडा's picture
अबोलघेवडा in जनातलं, मनातलं
6 May 2018 - 6:31 pm

गेली कित्येक वर्ष भगवंतांनी सांगितलेल्या या वाक्याचा अर्थ लावतोय... हो बरोबरच वाचलत. कित्येक वर्ष.... अहो, भगवद्गीता ही गोष्टच अशी आहे की जितके वेळा ती वाचू तितके वेळा वेगवेगळे अर्थ लक्षात यायला लागतात.

जितक्या प्रमाणात कर्म करू तितक्या प्रमाणात फळ मिळालं पाहिजे ही अपेक्षा ठेवण्यात काय चुकलं माझं असं माझं मन मला सारखं विचारायचं. या श्लोकात ४ गोष्टी श्रीकृष्णांनी सांगितल्या आहेत. १) फक्त कर्म करण्याचा तुला अधिकार आहे २) कर्माच्या फळांवर तुझा अधिकार नाही. ३) मिळालेल्या फळाला तू कारणीभूत आहेस असे समजू नकोस. आणि ४) या सगळ्यामुळे कर्म न करण्यासही तू उद्युक्त होऊ नकोस.

समाजविचार

ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर-१ 

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
4 May 2018 - 10:17 pm

काही मित्रच असे असतात की ते कधीही भेटले तरी मन कसं प्रसन्न होवून जातं. पण माझ्या या मित्राची जातकुळी जरा वेगळी. मनःस्थिती चांगली असताना भेटला तर वेळ मजेत जातो पण एऱ्हवी मात्र याला पाहीले की ‘कुठून ही ब्याद आली’ असे होते. कारण हा वृत्तीने प्रचंड नास्तीक. नास्तीक असल्याने नास्तीकांचे ‘स्वयंघोषीत अधिकार’ याला प्राप्त. त्यामुळे हा सदैव हातात एक अदृष्य तलवार घेऊन हिंडत असतो. म्हणजे कुणाला चतुर्थीचा ऊपवास असला की याचा लगेच वार. कुणी सोमवारी पिंडीवर अभिषेक केला की याचा लगेच हल्ला. असेन का नास्तीक. काय लक्ष द्यायचे. असंही म्हणता येत नाही. कारण या प्राण्याचा व्यासंग मोठा दांडगा.

वावरविचार

अंतर्मुख!

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
4 May 2018 - 9:40 am

अंधेरी स्टेशनच्या तीन नंबर फलाटावर तीस सेकंद थांबून गाडी पुढे सरकली, आणि दरवाजाशी उभ्या असलेल्या त्या दोघांच्या नजरा सरसावल्या. पलीकडच्या, चार नंबर फलाटावरचं काहीतरी शोधू लागल्या.
गाडी जोगेश्वरीच्या दिशेने निघाली. समोरचा फलाट संपला आणि दोघांचे डोळे चमकले. त्यांनी एकमेकांकडे पाहून खुशी व्यक्त केली.
म्हणून माझेही लक्ष त्या फलाटाकडे, त्या जागेवर खिळले.
फलाटावर टोकाला असलेल्या एका बांधकामाच्या भिंतीवर एक चित्र होते...
अगदी साधे.
बंदूक हातात धरलेल्या युद्धसज्ज जवानाचे!
त्यावर एक वाक्य होते-

समाजप्रकटनविचार

वाचकांचा पत्रव्यवहार अर्थात जनमानस

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
3 May 2018 - 8:06 am

आपण सर्वजण इथे वाचन आणि लेखन करण्यासाठी जमतो. अनेक विषयांवर चर्चा होतात, रंगतात, वादविवाद अन काथ्याकूटही होतो. या माध्यमाव्यतिरिक्तही आपण इतर वाचन करतो. रोजचे वृत्तपत्र वाचन हा आपल्या दिनक्रमाचा एक भाग असतो. त्यावरून एक नजर फिरवल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आज जरी इ-माध्यम प्रस्थापित झालेले असले तरी आपल्यातील बहुतेकांना एखादे तरी छापील वृत्तपत्र वाचायला आवडतेच. जेव्हा आपण ते चाळू लागतो तेव्हा त्याच्या पानांमध्ये आपल्याला विविध विषयांची विभागणी केलेली दिसते. मग आपल्या आवडीनुसार आपण हव्या त्या पानावर रेंगाळतो.

समाजविचार

माझा आजोळ बेळगाव २

स्वप्निल रेडकर's picture
स्वप्निल रेडकर in जनातलं, मनातलं
2 May 2018 - 12:15 am

बेळगाव म्हटलं कि खूप साऱ्या गोष्टी माझ्या मनाभोवती रुंजी घालू लागतात. कॅलिडोस्कोप सारखा वेगवेगळ्या आठवणी,माणसं ,जागा ,चवी नॉस्टॅल्जिक बनवतात .

भाषाप्रकटनविचार

बालाशिष स्तोत्र

खिलजि's picture
खिलजि in जनातलं, मनातलं
30 Apr 2018 - 2:39 pm

खरंच खूप दुःख वाटतेय आजकालच्या बातम्या ऐकून ऐकून . वृत्तांकनामधून आजकाल लहान मुलांवरील अत्याचाराच्या बातम्या जरा जास्तच येत आहेत . खूप विषन्न व्हायला होते हे सारे ऐकून .

मला जे वाटते ते मी आतापर्यंत करत आलोय . माझ्या मुलाचा जन्म झाल्यापासून मी नित्यनेमाने बालाशिषः स्तोत्र म्हणतो . जेणेकरून खरंच दत्तगुरूंचे रक्षकवच असेल तर ते माझ्या मुलांना लाभावे म्हणून . या स्तोत्राची संख्या ५ आहे . म्हणजे किमान आपल्या मुलांच्या रक्षणासाठी ते दिवसातून किमान पाच वेळा तरी म्हणावे .

वाङ्मयविचार

भारतीय न्यायपालिकेची विक्षिप्तता

arunjoshi123's picture
arunjoshi123 in जनातलं, मनातलं
28 Apr 2018 - 2:11 pm

कदाचित कोणतंच नियंत्रण नसल्यामुळं भारतीय न्यायपालिका रसातळाला गेलेली असू शकते. कदाचित इतर देशांच्या मानाने खूप चांगली असू शकते. कदाचित इतर अन्य संस्थांपेक्षाही बरबटलेली असू शकते. देशात न्याय आहे अशी सर्वसाधारण जनभावना केवळ एक चालत आलेली प्रथा म्हणून जीवंत असावी. तसं न्यायपालिकेच्या बाबतीत "संस्था विथ डिफरन्स" नावाचा काही प्रकार नसावा. मला इथे विक्षिप्त म्हणजे चांगल्या, वाईट, लॉजिकल, इल्लॉजिकल, परस्परविरोधी, आपल्याच अन्य न्यायालयाच्या वा बेंचच्या विरोधी, संविधानविरोधी, देशविरोधी, इ इ घटना अभिप्रेत आहेत.
===============

धोरणविचार

सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा ..

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
26 Apr 2018 - 12:36 pm

सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा ..
प्रसंग पहिला.

एका तरूण मुलीच्या मागे चार ते पाच जण शाळेची बस घेऊन लागतात. ती मुलगी दुचाकी वरून कॉलेज मधून घरी येत असताना, तिचा पाठलाग करतात आणि बस आडवी घालून तिच्या दुचाकीचा अपघात घडवून आणतात. ती मुलगी जखमी होते . अगदी चित्रपटात घडते तसे दृश्य ...पण इथे खरे घडणारे ….त्या मुलीच्या जीवाचे काही बरे वाईट झाले नाही हे तिचे भाग्य. पण झाले असते तर ?

प्रसंग दुसरा.

समाजविचार

माझं आजोळ बेळगाव

स्वप्निल रेडकर's picture
स्वप्निल रेडकर in जनातलं, मनातलं
22 Apr 2018 - 8:52 pm

एप्रिल मध्ये परीक्षा संपता संपताच वेध लागायचे ते बेळगावला पळायचे.. नक्की आठवत नाही पण साधारण ७/८ तारिखला परीक्षा आटोपत आलेल्या असायच्या आणि पेपर सोपा गेल्याच्या आनंदापेक्षा मामाच्या गावाला जायचंय हाच आनंद मनात साठायला लागायचा .तयारी सुरु व्हायची. एसटी लागण्याची भीती हे एकच कारण मनात धाकधूक निर्माण करायचं. वेंगुर्ला ते बेळगाव साधारण तीन साडे तीन तासाचा प्रवास करायला फक्त बेळगावच्या ओढीपोटी तयार असायचो .नाहीतर एसटी नुसती बघितली तरी एक विचित्र गोळा पोटात तयार व्हायचा. दुपारी जेऊन एप्रिल मधल्या भर दुपारी वेंगुर्ला बेळगाव एसटी पकडायचो बस स्टॅन्डवर जाऊन .

वाङ्मयप्रकटनविचारअनुभव

"शिळा"लेख....

ss_sameer's picture
ss_sameer in जनातलं, मनातलं
20 Apr 2018 - 10:43 pm

आमच्या कडे कधीच शिळ उरत नाही.

कारण ज्या दिवशी जेवण मला आवडतं ते अन्न तिला आवडत नाही, आणि तिला आवडलेलं मी पोटभर खाऊ शकत नाही.

आठवड्यातले तीन दिवस कोणीतरी एक पोटापेक्षा जास्त खाऊन तृप्त असतो तर उरलेले तीन दिवस दुसरा, कारण स्वयंपाक सरासरी एक दिवसाआड चांगला बनवला जातो.

अर्थात माझ्या दृष्टीने उत्तम म्हणजे तिच्या दृष्टीने बेचव ह्या व्याख्येप्रमाणे.

आठवड्याचे उरलेले तीन दिवस मी कमी जेवतो याची दोन कारणे, एक म्हणजे आमची अन्नपूर्णा इतकी देखील वाईट स्वयंपाकिण नाही की पूर्ण उपाशी राहावे लागेल. आणि दुसरं म्हणजे मला आवडलेलं तिने खाल्लं तर तिचं मन कसं भरेल?

विनोदप्रकटनविचारविरंगुळा