विचार

मन अतर्क्य....

निनाद जोशी's picture
निनाद जोशी in जनातलं, मनातलं
12 May 2015 - 11:34 am

मानवी मन खरंच किती चंचल असतं. मनाचे झालेले समज,मनाने तयार केलेल्या अनेक दिवसांच्या ओळखी पूर्णपणे बदलायला काही क्षणच पुरेसे असतात. आपल्याला सर्वात जवळचा वाटणारा व्यक्ती काही क्षणातच इतका परका होतो कि ज्याच्या बरोबर आपण अनेक गोष्टी शेअर केलेल्या असतात त्याला नुसते समोर पाहायला हि आपल्याला नकोसे वाटू लागते. त्याच्याशी बोलणे तर सोडाचत्याचा आवाज ऐकला तरी आपल्या मनातील कोलाहल जागृत होऊ लागतो. अश्यावेळी मनाला शांतकरणे अगदीच अशक्य होते. हे मनाचे बदलच मानवी मनाला अतर्क्य बनवतात. मानसशास्त्राचे कितीही शिक्षण घेतले तरी मानवी मनाला अगदी अचूक ओळखण्याची शक्ती कोणालाही मिळत नाही.

मांडणीविचार

खंत

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in जनातलं, मनातलं
11 May 2015 - 9:29 pm

आज सकाळी, ब्लड रिपोर्टसाठी इथल्या ‘मेमोरिअल हर्मन’ हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये सकाळी ९.३० वाजता पोहोचायचे होते. हॉस्पिटल घरापासून अंदाजे सहा मैलावर असून ड्राईव्ह टाईम अंदाजे ३० मिनिटांचा होता. हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी जरा लौकरच म्हणजे साडेआठच्या सुमारास घरून कारने निघालो. वाटेत एका सिग्नलजवळ अपघात झाला होता, फार काही झाले नव्हते, फक्त एका कारने पुढील कारला मागून ठोकले होते. इथल्या प्रथेनुसार दोन्ही गाड्या रस्त्यावरच उभ्या होत्या, पोलिसांनी बाजूची लेन देखील अडवून ठेवली होती.

समाजविचार

जरुरत है, जरुरत है......

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
10 May 2015 - 5:03 pm

मुल्ला नसरुद्दिन करडी दाढी [स्वतः ची] कुरुवाळीत, निवांत गप्पा छाटीत बसला होता. गप्पा मारता मारता मित्राने विचारले, “ नसरुद्दिन, तू कधी लग्नाचा विचार नाही का केला?”
नसरुद्दिनची दाढी हसली. म्हणाला, “केला तर! कधीकाळी आम्ही पण तरुण होतोच कि! एकदा मी निश्चय केला - आपण स्वतः साठी एक आदर्श स्त्री शोधायची आणि तिच्याशी निकाह लावायचा. ठरवले. निघालो. वाळवंट ओलांडून दमास्कसला पोहचलो. नशीब बलवत्तर. तिथे एक स्त्री भेटली. अत्यंत देखणी. धर्मपरायण. संपूर्ण कुराण तोंडपाठ असलेली!”
“मग?”

वाङ्मयकथाविनोदसमाजजीवनमानप्रकटनविचारभाषांतर

पुस्तक परिचयः डॉ. आई तेंडुलकर

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
9 May 2015 - 4:59 pm

संदर्भः मूळ इंग्रजी पुस्तकः डॉ. आई गणेश तेंडुलकर, लेखिकाः लक्ष्मी तेंडुलकर धौल, मराठी अनुवादः सुनीता लोहोकरे, राजहंस प्रकाशन, प्रथमावृत्तीः फेब्रुवारी २०१५, किंमतः रु.३००/-

समाजविचारआस्वादमाध्यमवेधमाहिती

खड्डा आणि मी

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
8 May 2015 - 1:10 pm

आमच्या शहरात एक सुप्रसिद्ध खड्डा आहे.संपूर्ण महाराष्ट्र्ात जरी एक वेळ दुष्काळ पडला तरी तो तेव्हा एखाद्या नदीसारखा दुथडीभरुन वाहत असेल यात शंका नाही
तर इतर खडड्याप्रमाणेच याही खड्ड्याचे पुनर्निमाण नेहमीच होत असे. अहो खड्डे आहेत म्हणुन तर लोक गाड्या हळु चालवतात अशी मी स्वताःची समजुत करुन घेतली आहे

संस्कृतीजीवनमानरेखाटनस्थिरचित्रविचारप्रश्नोत्तरेवाद

१० हजार एकर जमीन बांगलादेशला दिली

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
8 May 2015 - 10:50 am

भारत-बांगलादेश यांच्यामधील जमीन देवाण घेवाणीचे विधेयक सर्व संमतीने पास झाले. सरकारला यासाठी सर्व विरोधी पक्षांनीही सहकार्य केले. या विधेयकाबाबत काही मतभेदाचे मुद्दे होते. बांगलादेशला जमीन देण्याला भारतातील काही गटांचा विरोध होता. त्यांना ही एक प्रकारची माघार वाटत होती.

आजच्या पास झालेल्या विधेयकामुळे भारताकडून बांगलादेशला १० हजार एकरचा भूभाग मिळेल तर बांगलादेशकडून भारताला ५१० एकरचा प्रदेश मिळेल.

धोरणविचार

रविंद्र पाटील : नाव ओळखीचं वाटतंय ???

नीलमोहर's picture
नीलमोहर in जनातलं, मनातलं
8 May 2015 - 10:19 am

रविंद्र पाटील या नावाला स्वतंत्र ओळख नाही पण 'सलमान खान' हा संदर्भ दिला की त्यांची ओळख पटू शकेल.
रविंद्र पाटील हे सलमानचा अंगरक्षक म्हणून नेमलेले पोलिस काँस्टेबल होते, होते म्हटले कारण आता ते या जगात नाहीत. पैसा आणि अधिकार या दोहोंच्या ताकदीने मिळून एका निष्पाप प्रामाणिक माणसाचा कसा बळी घेतला त्याचीच ही कहाणी.

गेले काही दिवस लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेल्या चि.कु.सलमान खान खटल्याबाबत माहिती करून घेतांना काही धागे मिळाले. या संदर्भातील काही लेख आंतरजाल तसेच व्हॉटसएप इ.वर उपलब्ध आहेत त्यातील हा एक त्यात असलेल्या तपशीलवार माहितीमुळे इथे देत आहे.

धोरणसमाजराजकारणप्रकटनविचारलेखबातमीमाहितीसंदर्भ

फक्त इंग्रजीने भागेल..? भविष्यवेध २०३०.

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
8 May 2015 - 5:23 am


विशेष सूचना: हा लेख 'माझे बरोबर का तुझे बरोबर' ह्या वादासाठी नसून सगळ्या बाजूने विचार करून एखाद्या किंवा अनेक पर्यायांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न समजूया.

नुकत्याच झालेल्या ह्या धाग्यावरच्या चर्चेत बरेच मुद्दे मांडले गेले. त्यात काही बाबतीत गोंधळ आहे असं वाटतंय म्हणून नवीन धागा काढतोय.

हा सगळा खटाटोप पुन्हा करण्याचं कारण आजच्या ५-८ वयोगटातली मुलं असलेल्या पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून.

आधीच्या धाग्यात चर्चिले गेलेले महत्त्वाचे दोन मुद्दे:

'' अरे, ऐकतोस ना रे...''

संकेत२५'s picture
संकेत२५ in जनातलं, मनातलं
7 May 2015 - 2:16 pm

एखाद्या स्वप्नवतं दुनयेत गाढ असता अचानकपणे जाग यावी अन ते स्वप्नचं कोलमडून जावे तसंच काहीसं आयुष्यात कधी घडतं .
आयुष्यातले ' रंग ' एकाकी बदलतात.. अन होत्याच न्हवतं होवून जातं.
'क्षणा' चा हि विलंब न लागता...
अशीच एक रविवारची रात्र ,हास्य आनंदा कडून वेद्नेकडे झुकलेली ...

जीवनमानविचार