विचार

सुंदरीचे ओझे

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
20 May 2015 - 5:28 pm

तान्झेन आणि इकीदो पायी प्रवास करीत होते. नुकताच मुसळधार पाउस पडून गेला होता. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी येतच होत्या. चालता चालता ते एका खेडेगावापाशी पोहचले. तिथे एक अरुंद ओढा होता. त्यातून चिखलाचे पाणी वहात होते. हे दोघे तिथे जरा थांबले.
तेवढ्यात, तिथे एक कमनीय बांध्याची, कोमल तनुची, तरुण, जपानी रमणी आली. पावसाने स्वच्छ झालेल्या हवेत तिचे मुखकमल अधिकच प्रसन्न दिसत होते. ती आपला फुलाफुलांचा रेशमी किमोनो सावरत ओढ्यापाशी थांबली. परंतु त्या बिचारीला, प्रयत्न करूनही तो ओढ काही ओलांडता येईना. तिची ती अवस्था पाहून, तान्झेन पुढे झाला.

धर्मवाङ्मयकथासमाजजीवनमानप्रकटनविचार

मदत हवी आहे.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
19 May 2015 - 1:33 pm

या वर्षी जुलै महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. या विषयावर एका पुस्तकाच्या शब्दांकनाचे माझ्याकडे आले आहे.एकाच वेळी दोन भाषांमध्ये हे पुस्तक तयार करताना माझ्यावर ताण आला आहे. या पुस्तकाची काही प्रकरणे लिहायला मला मदत हवी आहे. तयार झालेल्या प्रकरणांचे भाषांतर करण्यासाठी पण मदतीची आवश्यकता आहे.त्या खेरीज उपलब्ध असलेल्या विदाचे आलेख वगैरे बनविण्यासाठी पण मदत हवी आहे.मानधन आणि श्रेयनिर्देश मिळेल. कृपया संपर्क करा . रामदास ९५९४११०८६१ किंवा nathconsulting@gmail.com

समाजविचारप्रतिसादसद्भावना

भारतीय शेती व्यवसाय

चिनार's picture
चिनार in काथ्याकूट
19 May 2015 - 11:09 am

माझ्या एका मित्राने भारतीय शेती व्यवसाय ह्या विषयावर एक लेख लिहिला आहे. कृपया खालील दुवा तपासावा.
लेख आवडल्यास त्या दुव्यावर प्रतिसाद द्यव ही विनंती.
लेखात मांडलेल्या मुद्द्यांवर इथे चर्चा करायला आवडेल.

http://prafulnikam.blogspot.in/2015/03/who-is-killing-our-farmers.html?s...

एक उनाड उन्हाळी दिवस - सीपीचा सेन्ट्रल पार्क आणि अमलतास

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
18 May 2015 - 8:21 pm

मे आणि जुने ह्या दोन महिन्यात सूर्य क्रोधाने लाल होऊन आग ओकीत असतो. या आगीत जिथे धरणी माताच होरपळून जाते, तिथे पृथ्वीवरील प्राण्याची काय बिसात. दिल्लीत रस्त्यावर फिरणार्या आवरा गायी व कुत्रे दिवसभर सूर्याच्या क्रोधापासून स्वत:ला वाचविण्यासाठी सावली आणि पाण्याच्या शोधात भटकत राहतात. दुपारच्या वेळी तर झाडावर पक्षी ही झाडाच्या कोटरात दुबकून राहतात.

वाङ्मयविचार

नरेंद्र मोदींचे परदेश दौरे ,जनतेच्या पैशांची उधळण??????

ग्रेटथिंकर's picture
ग्रेटथिंकर in काथ्याकूट
18 May 2015 - 3:25 pm

नरेन्द्र मोदी सध्या दक्षिण् कोरियाच्या दौर्यावर आहेत.गेल्या 365 दिवसांपैकी 56 दिवस ते देशाबाहेर राहीले आहेत.मोदींनी एका वर्शात जवळपास 17 देशांचे दौरे केले आहेत.प्रश्न असा आहे कि या दौर्यातुन देशाला काय फायदा होतोय ?जी काही तुट्पुंजी गुंतवणुक होते आहे ती प्रामुख्याने गुजरातमध्ये होत आहे.

एक आठवण - गोटू आणि क्रिकेटचा चेंडू

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
14 May 2015 - 9:40 pm

तेंव्हा माझे वय १२ वर्षांचे असेल. अर्थात थोडा मोठा झालो होतो. खेळायला मित्रांसोबत गल्लीच्या बाहेर जाऊ लागलो. जुन्या दिल्लीत आमचे खेळायचे ठिकाण म्हणजे मोरीगेटच्या बाहेर यमुने पर्यंत पसरलेले विस्तीर्ण बगीचे. मोरीगेटच्या बाहेरच क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठे मैदान होते. मैदानाच एक भाग स्टीफन कॉलेजचा होता. म्हणून त्या मैदानाला लोक स्टीफन ग्राउंड म्हणून ओळखायचे. सुट्टींच्या दिवसांत २५-३० क्रिकेट टीम मैदानात खेळत असे. एवढ्या भीड-भाड मध्ये कोणत्या क्षणी डोक्स्यावर कुठून चेंडू येऊन लागेल याची कल्पना करणे ही शक्य नव्हते.

वाङ्मयकथाबालकथाविचार

बाबासाहेब पुरन्दरे यान्ना "महाराष्ट्रभूषण" पुरस्कार

लॉर्ड फॉकलन्ड's picture
लॉर्ड फॉकलन्ड in काथ्याकूट
14 May 2015 - 5:58 pm

ख्यातनाम इतिहासतज्ज्ञ श्री. ब.मो. ऊर्फ बाबासाहेब पुरन्दरे यान्ना महाराष्ट्र सरकारने "महाराष्ट्रभूषण" हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे जाहीर केले आहे.९३ वर्षीय बाबासाहेबान्नी आपले जीवन शिवचरीत्राला वाहून घेतले आहे.वर्षानुवर्षे अनेक गावातून्,शहरातून्,गडान्वर अहोरात्र भ्रमन्ती करुन त्यान्नी असन्ख्य ऐतिहासिक पुरावे गोळा करून अस्सल शिवचरीत्र लिहिले.अत्यन्त ओघवत्या शैलीत लिहिलेल्या प्रभावी भाषेमुळे हे शिवचरीत्र घराघरात पोचले.

डोक्क्यात जाणारी सेल्समनशिप

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
14 May 2015 - 2:40 pm

सेलिंग किंवा मार्केटिंग हे एक स्किल आहे; जे सगळ्यांना जमत नाही. एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी समोरच्या माणसाला प्रवृत्त करणं, हे मला तरी महाकठीण काम वाटतं. नॉट माय चहाचा कप. आज बाजारात तुम्हाला कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तरी तुमच्यापुढे अनेक पर्याय असतात. बरं, स्पर्धा इतकी आहे की कंपन्याही आपली वस्तू विकली जावी (मग ती कशीही असो काहीही असो) हा एककलमी कार्यक्रम घेऊन शर्यतीत उतरलेल्या असतात. त्यांचे मोहरे असतात ते म्हणजे सेल्समन.

समाजजीवनमानतंत्रविचारलेखअनुभवविरंगुळा

मन अतर्क्य....

निनाद जोशी's picture
निनाद जोशी in जनातलं, मनातलं
12 May 2015 - 11:34 am

मानवी मन खरंच किती चंचल असतं. मनाचे झालेले समज,मनाने तयार केलेल्या अनेक दिवसांच्या ओळखी पूर्णपणे बदलायला काही क्षणच पुरेसे असतात. आपल्याला सर्वात जवळचा वाटणारा व्यक्ती काही क्षणातच इतका परका होतो कि ज्याच्या बरोबर आपण अनेक गोष्टी शेअर केलेल्या असतात त्याला नुसते समोर पाहायला हि आपल्याला नकोसे वाटू लागते. त्याच्याशी बोलणे तर सोडाचत्याचा आवाज ऐकला तरी आपल्या मनातील कोलाहल जागृत होऊ लागतो. अश्यावेळी मनाला शांतकरणे अगदीच अशक्य होते. हे मनाचे बदलच मानवी मनाला अतर्क्य बनवतात. मानसशास्त्राचे कितीही शिक्षण घेतले तरी मानवी मनाला अगदी अचूक ओळखण्याची शक्ती कोणालाही मिळत नाही.

मांडणीविचार