काळ
काळ
वासंती तिशीची झाली तरी लग्नाचा विचार करायला तयार नव्हती. तिच्या आई-वडिलांना ती काहीशी उशिराच झाली होती. बाबा आणि आई देखील दोघेही रिटायर होऊन सिनियर सिटीझन्सचं आयुष्य जगायला लागल्याला आता तीन-चार वर्ष होऊन गेली होती. त्यामुळे त्यांची इच्छा होती की आपण धडधाकट आहोत आणि थोडीफार जमापुंजी हाताशी आहे तोपर्यंत लेकीचं लग्न हौसेमौजेने करून टाकावं.