.
.
.
कवितेच्या काही ओळी
जरी सहज सुचल्या
दोन चुकल्या मात्रेत
दोन वृत्तात गंडल्या
यतिभंग एकीमध्ये
एकीमध्ये रसभंग
दोष दूर करण्यास
पछाडिले जंग जंग
मात्रा, वृत्तांची बंधने
पाळताना दमछाक
झाली-आली कुठूनशी
मुक्तछंदाची झुळूक
मुक्तछंदाच्या स्पर्शाने
ओळ ओळ थरारली
कोष कोंदट फोडून
फुलपाखरे उडाली
खळखळा तुटताना
बेड्या आनंदे म्हणती
लघु, गुरू, मात्रा यांची
मुक्तछंदी ना गणती
वेध लागला मुक्तीचा
बंधी कोंडल्या ओळींना
सुंभ जळला-पण का
पीळ जळता जळेना ? :)
नमस्कार. माझी मैत्रीण स्मिता अशी सायकल राईड करणार आहे-
महिलांचा फिटनेस व कँसरबद्दल संवादासाठी सायकल यात्रा
स्मिता मंडपमाळवीचे गोवा ते मुंबई सोलो सायकलिंग
मालदीववर भारतीयांचा संताप, EaseMyTrip कडून सर्व बूकिंग्स रद्द; सीईओ म्हणाले, आपल्या राष्ट्राच्या…" | EaseMyTrip suspends all Maldives flight bookings over anti-PM Modi remarks - https://www.loksatta.com/desh-videsh/easemytrip-suspends-all-maldives-fl...
'माल' वून टाक 'दीवज',चेतवून जंग जंग,
राजसा किती मतांत, चालता टूरिझम बंद...
स्वातंत्र्यपूर्वीचा १८७०-८० मधील काळ जलालपुरच्या मनकर्णिका कोकणस्थ नारायण टिळक यांच्याशी तेव्हाच्या पद्धतीनुसार बालपणीच विवाहबद्ध झाल्या आणि त्या लक्ष्मी नारायण टिळक झाल्या.मी अगदीच सामान्य रुपाची टिळकांसारख्या सुस्वरूप व्यक्तीला कशी पसंत पडले कोण जाणे? असे त्या म्हणतात.पण नारायण टिळक आहेतच अगदी विलक्षण आणि हे लक्ष्मी नारायणाचे जोडपं दुधात साखर विरघळावी अगदी तसच अविरत गोडीचे ,हे त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात पानोपानी समजते.
ओळखा पाहू.
खालीलपैकी एक विधान (स्टेटमेंट) सत्य आहे. पहा
तुम्हाला ओळखता येत आहे का.
१.तुम्ही घेतलेल्या प्रत्येक श्वासात एक अणू मधुबालाने(इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही
नटाचे/नटीचे/व्यक्तीचे नाव टाकू शकता. उदा. शााहरुखखान) टाकलेल्या निश्वासातला असतो.
२.एक द्रव्य (liquid) असेही आहे की जे उतारावर वाहण्याऐवजी चढावर वाहू शकते, म्हणजे नदी
सागराला मिळण्याऐवजी हिमालयाकडे माहेरी परत जाते जणू.
३.लग्न करताना तळमजल्यावर काम करण्याऱ्या मुला/मुलीशी पहिली पसंती द्या कारण त्यांचे वय हळू
काही सिनेमे पुस्तकातल्या सुंदर कवितेसारखे असतात. असाच एक हिंदी सिनेमा. एका रुटीन आयुष्य जगणा-या मध्यमवर्गीय माणसाची कथा. आपला फ्लॅट आपली नौकरी. नव-याचा वेगवेगळ्या पॉलीसी विकण्याचा व्यवसाय. मुलगा इंजिनियरींगच्या शिक्षणासाठी बाहेर गावी आहे.
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही. सूचनांचं स्वागतच.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग १ : डाग
आज भांबावला दिस
काही येई ना मनात
अंधार व्यापलं आकाश
उजेड उरे पणतीत
ठरलेल्या अवसरी
रान गेलंच उठून
पक्षी शोधी रानमेवा
पंख जाती हो थकून .
खेळ चुकलेला सारा
मना दुःख्ख देई मोठे
तिथे लावो कोणी लेप
सारे मोठ्ठे खोटे खोटे
कोठे गेली हीरवळ
मन शिडकावे तीला
मोडलेल्या फांदीवर
एक बांधलेला झुला .
सारे खोट्यात खोट्यात
काय शोधू खरे खरे
नशिबाचे तोडून तारे
दगडाला म्हणती हिरे
अंती खरे एक आहे
झाले ते ते स्विकारावे
आयुष्याच्या सरणीला
मोजून ते ते मांडावे .
दुर्गराज श्रीमान रायगडावरून, राजवाडा, राजसदर वा जगदीश्वर मंदीर असो की भवानी टोक, तिथून साधारण पुर्वेला पाहिलं की एक सुळका त्याच्या वैशिष्ट्यपुर्ण आकाराने लगेचंच लक्ष वेधून घेतो. तिथून, उंचीला तो श्रीमान रायगडाच्याही वरचढ भासतो. वातावरण स्वच्छ असेल तर त्या सुळक्यामागे एक विस्तीर्ण पठार ही नजरेस पडते, श्रीमान रायगडावरून जेव्हा-जेव्हा हा सुळका नजरेस पडायचा तेव्हा-तेव्हा तो मनात एक आव्हान पेरायचा, जणु काही "आहे का हिंमत माझ्या वाटेला यायची ? " असंच विचारतोय असं वाटायचं.