बेलापूरचा किल्ला
सात आठशे वर्षांचा इतिहास असला तरी काहीसा दुर्लक्षित असा नव्या मुंबईतील बेलापूरचा हा किल्ला. नुकताच एका प्रतिसादात मी या किल्ल्याचा उल्लेख केला होता.
किल्ला सिद्धींनी १५६० ते १५७० या काळात बांधला. त्यानंतर पोर्तुगिजांनी याचा ताबा घेतला. १७३३/१७३७ मध्ये चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याचा ताबा मिळवला. त्यानंतर १९ व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांच्या ताब्यात गेला (माहिती आंतर्जालाहून साभार)
एक माहितीपर लेख येथे वाचावयास मिळेल.