मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग १: प्रस्तावना

मार्गी ·

किल्लेदार Wed, 12/24/2025 - 20:22
आठवणी जाग्या केल्यात. मी मुंस्यारीला दोनदा गेलोय. एकदा डिसेंबर आणि एकदा एप्रिल. फार छान जागा आहे. एप्रिल मधे लाल बुरांश फार छान दिसतो. गुलाबी बुरांश साठी खुलिया टॉपची वारी करावी लागते. माझी चुकली. IMG_7853 IMG_20190427_113916_487

किल्लेदार Wed, 12/24/2025 - 20:22
आठवणी जाग्या केल्यात. मी मुंस्यारीला दोनदा गेलोय. एकदा डिसेंबर आणि एकदा एप्रिल. फार छान जागा आहे. एप्रिल मधे लाल बुरांश फार छान दिसतो. गुलाबी बुरांश साठी खुलिया टॉपची वारी करावी लागते. माझी चुकली. IMG_7853 IMG_20190427_113916_487
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार. नुकताच हिमालयामध्ये भरपूर फिरण्याचा, आकाश दर्शन आणि ट्रेकिंग करण्याचा योग आला. इतके सुंदर अनुभव आले की ते लिहिल्याशिवाय राहू शकत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे तिथे जे अनुभवलं, जे फिरलो ते लिहून आपल्यासोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. हिमालयामध्ये खूप वेळेस जाणं झालं आहे! परंतु दर वेळेस हिमालय अतिशय संमोहक वाटतो. अतिशय वेड लावणारा हा अनुभव असतो. ह्यावेळीसुद्धा हिमालयामध्ये फिरताना वारंवार हा अनुभव येत होता. तिथला सगळा पहाड़ी परिसर, छोटी गावं, एकदम साधे आणि अतिशय चांगल्या स्वभावाने चांगले लोकं! तिथला निसर्ग आणि तिथे फिरतानाचा आनंद!

विशेष व्यक्तींची लैंगिकता ह्यावर डॉ. सचिन नगरकर सरांचं व्याख्यान

मार्गी ·

गामा पैलवान Sat, 10/11/2025 - 19:53
मार्गी, आवेग नियंत्रित करायची सवय असणे हाच खरा सुसंस्कृतपणा म्हणायला हवा. त्या अर्थाने 'विशेष' मुले/माणसे सुसंस्कृतच आहेत. कोणावर कसला प्रसंग येतो याची कल्पनाही करणं अशक्य आहे. श्री. तुषार नातूंनी इथे दिलीप नावाच्या एखा 'विशेष' व्यक्तीसंबंधी त्यांचा एक अनुभव लिहिला आहे ( भाग क्रमांक ७५ ) : https://tusharnatu2013.blogspot.com/2013/03/blog-post_5236.html दिलीप सुसंस्कृत नाही म्हणावं तर त्याची आई सुसंस्कृत म्हणावी का ? आणि मग तिचं शरीर ओरबाडणारा सिनियर सुसंस्कृत समजावा का ? कशाचा कशाला पत्ता लागंत नाही. काहीतरी खटकतंय, पण नेमका प्रश्न विचारता येत नाहीये. 'विशेष' व्यक्तीच्या लैंगिक गरजाही 'विशेष' असतात इतकंच म्हणू शकतो मी या घडीस. आ.न., -गा.पै.

मार्गी Sun, 10/12/2025 - 20:53
सर्वांना धन्यवाद! @ गामा पैलवान जी, ओहह. खूप वेगळी आणि सुन्न करणारी गोष्ट. तुम्ही शेवटी विचारलेला प्रश्न सार्थक आहे.

गामा पैलवान Sat, 10/11/2025 - 19:53
मार्गी, आवेग नियंत्रित करायची सवय असणे हाच खरा सुसंस्कृतपणा म्हणायला हवा. त्या अर्थाने 'विशेष' मुले/माणसे सुसंस्कृतच आहेत. कोणावर कसला प्रसंग येतो याची कल्पनाही करणं अशक्य आहे. श्री. तुषार नातूंनी इथे दिलीप नावाच्या एखा 'विशेष' व्यक्तीसंबंधी त्यांचा एक अनुभव लिहिला आहे ( भाग क्रमांक ७५ ) : https://tusharnatu2013.blogspot.com/2013/03/blog-post_5236.html दिलीप सुसंस्कृत नाही म्हणावं तर त्याची आई सुसंस्कृत म्हणावी का ? आणि मग तिचं शरीर ओरबाडणारा सिनियर सुसंस्कृत समजावा का ? कशाचा कशाला पत्ता लागंत नाही. काहीतरी खटकतंय, पण नेमका प्रश्न विचारता येत नाहीये. 'विशेष' व्यक्तीच्या लैंगिक गरजाही 'विशेष' असतात इतकंच म्हणू शकतो मी या घडीस. आ.न., -गा.पै.

मार्गी Sun, 10/12/2025 - 20:53
सर्वांना धन्यवाद! @ गामा पैलवान जी, ओहह. खूप वेगळी आणि सुन्न करणारी गोष्ट. तुम्ही शेवटी विचारलेला प्रश्न सार्थक आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
विशेष व्यक्तींची लैंगिकता ह्यावर डॉ. सचिन नगरकर सरांचं व्याख्यान अतिशय आवश्यक विषयावर मोलाचं मार्गदर्शन ✪ लैंगिकता- आईच्या पोटात असल्यापासून ते मृत्युपर्यंत ✪ वी.स. पा. गे. समूहाची गोष्ट ✪ "सा. सू. आणि सू. न.!” ✪ “हम कुत्ते के लिए इतना करते हैं, बच्चे के लिए नही?” ✪ कार्यशाळेत रडणारा बाबा ✪ गरज स्वीकाराची व अप्रोप्रिएशनची ✪ ६५% इंटरनेट पॉर्नसाठी वापरलं जातं ✪ पाळी अडचण नाही, ती आली नाही तर अडचण ✪ संवेदनशीलता, सोबत आणि सपोर्ट सिस्टीम हवी ✪ प्रश्नांवर उपायही आहेत! नमस्कार. आज १० ऑक्टोबर- मानसिक आरोग्य जागरूकता दिवस. नुकतंच डॉ.

एचडीएफसी बॅंक-सावधान!

युयुत्सु ·

गामा पैलवान Wed, 10/08/2025 - 17:18
युयुत्सु, सावध केल्याबद्दल आभार. अचानक खाते श्रेणीवर्धित ( = अपग्रेड ) करणे व त्याकरिता शुल्क आकाराने हे दरोड्यासम आहे. राखीव पेढी ( = रिझर्व्ह बँक ) ने याची तातडीने दाखल घ्यायला हवी. किमान रकमेचा स्पष्ट निर्देश जालखातेपानावर ( = ऑनलाईन वेबपेज वर ) व्हायला हवा. तसेच खातेरक्कम किमान पातळीखाली गेल्यास तशा अर्थाची सूचना ग्राहकास संपत्र, सानसंदेश, इत्यादि मार्गांनी पाठवावयास हवी. ती पूर्ववत करण्यासाठी काही दिवसांच्या अवधीही द्यायला हवा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मिलिंद Sun, 10/12/2025 - 20:17
माझ्या मते रिझर्व्ह बँक हीच मुख्यतः बदमाष आहे. या मध्यवर्ती बँकेला ग्राहक मुख्य परिपत्रक (Customer Master Circular) काढण्याव्यतिरिक्त काही ग्राहकोपयोगी करायचे आहे असे वर्तनात तरी दिसत नाही. मी कित्येकदा बँक शाखेंच्या कामकाज सुरु करण्याच्या वेळे बाबत तसेच प्रत्येक बँक शाखेने घ्यायच्या ग्राहक सेवा समितीच्या मासिक मिटिंग्ज संबंधी तक्रारी केल्या होत्या पण त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही.

युयुत्सु Wed, 10/08/2025 - 17:28
नैतिक पाठबळ दिल्याबद्दल धन्यवाद. योग्य वेळी रिझर्व बँकेला याबद्दल कळवणार आहेच. दुर्दैवाची गोष्ट अशी की हा एक अनुभव नाही असे संतापचनक आणखी अनुभव आहेत.

परवाच ३४२ रुपये कापल्याचा मेसेज आयडीबीआय ह्या पेढीने पाठवला, खाते तपासल्यावर कळले की pmjb अंतर्गत कट केले असे कळले, pmjb ही काय बला आहे, हे शोधल्यावर कळले की “ “प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना”, हे पाहून डोकेच फिरले तडक आयडीबीआय ला माझ्या परवानगी विना ही योजना माझ्या खात्यात लागू केलीच कशी रे माकडानो? म्हणून जाब विचारला, त्यांनी तातडीने माझ्या तक्रारीची दखल घेऊन पैसे परत केले!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस गुरुवार, 10/09/2025 - 12:50
प्रत्येक बँकेला मेसेज येतो की एवढी खाती जोडलीच पाहिजेत. बाकीचे काही बोलत नाहीत/ नकार देत नाहीत ती राहतात.

असंका गुरुवार, 10/09/2025 - 23:33
Joint and First
?? मंजे नक्की काय? फर्स्ट वाल्याने दोनदा सही करायची? आधी जॉइंट म्हणून आणि मग फर्स्ट म्हणून? की आपल्याला फर्स्ट ऑर जॉइंट म्हणायचंय?

असंका Fri, 10/10/2025 - 00:32
आपण बॅंकेकडे या संदर्भात तक्रार केली का? त्याचा काय निकाल लागला? तुम्ही इथे फक्त तुमची बाजु तीही अगदी आक्रमक पद्धतीत मांडली आहे. एक शक्यता म्हणून असं झालं असेल का, की आपल्या मुळ खात्यावर परवानगी असलेल्या व्यवहारांची संख्या, शिल्लकेची मर्यादा इ. बाबी आपल्याच कडून ओलांडल्या गेल्या असतील, ज्यामुळे नियमानुसार आपले खाते "सर्व साधारण" खात्यात राहणे शक्य होत नसेल? आणि एक पर्याय आपल्याला सुचवला गेला असेल की मर्यादेत राहील एवढी शिल्लक खात्यावर ठेवून उर्वरित रकमेची मुदत ठेव करावी, जेणेकरून नियमानुसार आपले खाते परत एकदा, एक सर्व साधारण खाते म्हणून वर्गीकृत करता येउ शकेल?

युयुत्सु Fri, 10/10/2025 - 08:57
श्री० असंका १. माझ्या मनातल्या बॅंकेबद्दलच्या भावना, व्यक्त झालेल्या भावनांच्या १०० पट तीव्र आहेत. तो आतापर्यंत आलेल्या अनेक अनुभवांचा साठलेला/एकत्रित परिणाम आहे. परवाचा अनुभव गवताची शेवटची काडी ठरली... २. बॅंकेच्या दोन वेगवेगळ्या डॉक्युमेंटमध्ये वेगवेगळ्या नोंदी का? याचं लेखी उत्तर मला अपेक्षित होतं ते मिळालेलं नाही. तसेच यापूर्वी माझ्या परवानगीशिवाय खात्याचे अपग्रेडेशन कसे केले, या प्रश्नाचेही उत्तर मला मिळालेले नाही. ३. माझं ऑफिशियल कम्युनिकेशन बॅंकेने स्वीकारले नसल्याने मी एफ्डी मोडायचा निर्णय घेतला, काल माझ्या खात्यात मुद्दल आणि थोडे व्याज जमा झाल्याने माझ्यासाठी हा विषय संपला आहे. यापुढे मी एक छ्दाम कोणत्याही बॅंकेत एफ़डी म्हणून ठेवायचा नाही असे ठरवले आहे. ४. चौथा कोनाडा यांचा केवायसी अनुभव संतापजनक आहेच. हॉस्पीटल्सच्या असंवेदनशील कारभारामुळे जसा जनतेचा क्षोभ होतो, तसं जर बॅंकांच्या बाबतीत झालं तर बॅंका थोड्याफार सुधारतील. एरव्ही देशाचे भवितव्य कठीण असल्याचे पूर्वी बनलेले मत आता अधिकच तीव्र बनले आहे.

In reply to by युयुत्सु

असंका Fri, 10/10/2025 - 09:24
माझ्या आयडी व्यतिरीक्त माझ्या प्रतिसादातील एकाही शब्दाची दखल आपण घेतलेली आपल्या प्रतिसादातून दिसून येत नाही.

In reply to by असंका

युयुत्सु Fri, 10/10/2025 - 09:28
एकाही शब्दाची दखल आपण घेतलेली आपल्या प्रतिसादातून दिसून येत नाही. होय. हा विषय माझ्यासाठी संपला असल्याने आणि मी एफडी परत करायची नाही असा निर्णय घेतला असल्याने मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही.

In reply to by युयुत्सु

असंका Fri, 10/10/2025 - 10:17
माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, की उत्तर देणं अडचणीचं आहे? हा विषय आपण मिपावर मांडलेला आहेत. अर्धवट स्वरुपात मांडलेला आहेत. तरीदेखिल विषय स्पष्ट व्हावा म्हणून, आणि जेणेकरून नक्की काय झालंय ते समजावं म्हणून, आपल्याला कमीत कमी मेहेनतीत केवळ 'होय /नाही स्वरुपात' उत्तर देता येतील, असा प्रश्न तयार करून, माझा काही संबंध नसताना मी इथे मेहेनत घेतली आणि आता आपण एकदम म्हणता विषय संपला? विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला? वर म्हणताय "मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही?" ही काय बिनकामाची चर्चा आहे का? तुम्ही एका संस्थेपासून जनतेला सावध करायचं म्हणताय ना? नक्की कशापासून सावध रहायचं ते समजायला नको?

In reply to by असंका

युयुत्सु Fri, 10/10/2025 - 10:36
श्री० असंका, तुम्ही तुम्हाला सोईचे अर्थ लावायला मोकळे आहात. मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही, मी दिलेले पत्र स्वीकारणार नाही आणि मी मात्र उत्तरे देत बसायचे हा एकतर्फी न्याय मला मान्य नाही.
विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला?
असे अर्धवट आणि खोडसाळ निष्कर्ष जेव्हा काढले जातात तेव्हा माझा चर्चा न करण्याचा किती योग्य आहे हे पटते.

In reply to by युयुत्सु

असंका Fri, 10/10/2025 - 11:46
तुम्ही तुम्हाला सोईचे अर्थ लावायला मोकळे आहात. मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही, मी दिलेले पत्र स्वीकारणार नाही आणि मी मात्र उत्तरे देत बसायचे हा एकतर्फी न्याय मला मान्य नाही.
मला सोईचा अर्थ? मी म्हणजे काय एच डी एफ सी बॅंक आहे का? माझी काय सोय गैर सोय असणार आहे त्यात? तुम्हालाच काही मदत करता आली तर पहावं म्हणून विचारत होतो. पत्र घेउन गेला होतात तुम्ही बँकेत, तर हेच मी आधी विचारत होतो ना, की तक्रार केली होतीत का? तुमच्या लेखात कुठे म्हणलं होतं तुम्ही की तुम्ही पत्र घेउन गेला होतात? आता इतक्या शेवटी पहिल्यांदा कळलं की तुम्ही काही एक पत्र घेउन गेला होतात. मग त्यांनी ते घेतलं नाही म्हणजे नक्की काय केलं? तुम्ही ईमेल का नाही केली? रजिस्टर पोस्टाने का नाही पाठवलं? आणि
मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही
हे काय आहे? तुम्ही प्रश्न कसे विचारले होते? लेखी? की तोंडी? लेखी प्रश्नांना लेखी उत्तर आणि तोंडी प्रश्नांना तोंडी उत्तर हा सामान्य व्यवहार आहे.
विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला? असे अर्धवट आणि खोडसाळ निष्कर्ष जेव्हा काढले जातात तेव्हा माझा चर्चा न करण्याचा किती योग्य आहे हे पटते.
मी जे लिहिलंय तो प्रश्न आहे. निष्कर्ष नाही. आणि विषय संपला हा निष्कर्ष असेल, तर ते तुम्हीच लिहिलंय. तेव्हा खोडसाळपणा जर असेल तर तो कोणाचा आहे ते उघड आहे. अपशद्ब न वापरणे आणि अपमानास्पद न बोलणे, ही माझी व्यक्तिगत मर्यादा आहे. धन्यवाद.

सुबोध खरे Fri, 10/10/2025 - 10:11
मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही. मग हा लेख केवळ लोकांना सावधान करण्यासाठी लिहिला आहे का? कि आपल्याला होणारी जळजळ कुठेतरी बाहेर काढण्यासाठी? कारण असे अनुभव सर्वच बँकांकडून जगभर सर्वाना येत असतात. त्यासाठीचे उपाय काय याची चर्चा लोकांना जास्त उपयुक्त ठरली असती.

In reply to by सुबोध खरे

असंका Fri, 10/10/2025 - 10:32
+१. लेखाचं प्रयोजन काय हाच प्रश्न पडतोय. कारण इथे समस्या नक्की काय हे कळलं तर योग्य ती उपाय योजना शोधायला, सुचवायला अनेक वाचक मदत करु शकतील.

आग्या१९९० Fri, 10/10/2025 - 14:00
एका बड्या सरकारी बँकेने KYC साठी कागदपत्रे सादर करण्यास SMS केला. बँकेत जाऊन कागदपत्रे दिली. पाच मिनिटात KYC झाल्याचा SMS आला. तीन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरसाठी बुक केले असता कंपनीकडून बुकिंग नंबर sms आला. दुसऱ्यादिवशी डिलिवरी मेसेज आला पण प्रत्यक्षात डिलिवरी दिली नाही, म्हणून चौकशी करायला गेलो तर KYC अपडेट नसल्याने डिलिवरी होणार नाही असे सांगितले. त्यांच्याकडील मोबाईलने माझ्या डोळ्याचे स्कॅन केले, लगेच मोबाईलवर OTP आला. तो त्यांनी टाकला . कुठलेही कागदपत्र न मागता झाले एका मिनिटात KYC. तासाभरात गॅस सिलेंडर दारात हजर. बँकांना हे तंत्रज्ञान का वापरत नाही?

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु Fri, 10/10/2025 - 14:06
मुळात केवायसी ही प्रक्रिया 1760 वेळा करावी लागता कामा नये. केवायसी एकदा केलं की सगळीकडे त्याचा परिणाम दिसायला हवा.

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० Fri, 10/10/2025 - 14:20
एखाद्याचा मृत्यूचा दाखला काढला की त्याचे आधारकार्ड आपोआप बाद होते. त्याच्या बँक खात्यात सरकारी योजनेतून मिळणारे लाभ बंद व्हायला हवे. परंतु तसे होताना दिसत नाही. बऱ्याच हयात नसलेल्या व्यक्तींचे आधारकार्ड बाद होत नाही. सरकारी डिजिटल भोंगळ कारभार ह्याला कारणीभूत आहे. आधारकार्ड बाद झाले की त्याला लिंक केलेले निवडणूक एपिक कार्ड बाद होऊन मतदार यादीतून नाव वगळले गेले पाहिजे. परंतु तसे का होत नाही समजत नाही.

जगातली सगळ्यात हरा*** बँक, एक्सिस बँक माझे दरमहा १५० रुपये काहीही कारण न देत कापत होती, अनेक तक्रारी, खेटे घालूनही काही उपयोग झाला नाही, नंतर ग्राहक तक्रार मंचात एकामागे एक अनेक तक्रारी टाकल्या, इतक्या की बँकेने सगळे पैसे परत तर केलेच पण अकाउंट बंद झाल्यानंतर घरी डीडी पाठवून पुन्हा पैसे दिले!

सौन्दर्य Fri, 10/10/2025 - 23:33
अगदी बरोबर. थोड्याफार फरकाने सगळ्याच बँका खातेदारांना त्रास देण्यासाठीच उघडल्या आहेत असं वाटते . माझा ऍक्सिस बँकेचा अनुभव : माझं ह्या बँकेत गेली ३५ वर्षे खातं आहे. मी गेली २५ वर्षे परदेशात (अमेरिकेत म्हंटल्यावर चर्चेला वेगळेच वळण लागेल) राहतो. तीन-पाच वर्षात एखादी भारत फेरी होते. तीस दिवसांच्या सुट्टीपैकी पंधरा एक दिवस तर बँकेत खेटे घालण्यातच जातात. मागच्या फेरीत ऍक्सिस बँकेत केवायसीचे पेपर जमा केले व केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली. दोनच दिवसानंतर पुन्हा काहीतरी काम निघाले तर बँकेने केवायसीसाठी दिलेले कागदपत्रच परत मागितले. त्यांवर त्याना ते दोनच दिवसांपूर्वी दिल्याचे सांगितले, त्यावर ते म्हणाले आम्ही सर्व कागदपत्र हेडऑफिसला पाठवून देतो आमच्याकडे आता काहीच नाही. मी विचारले की ते स्कॅन करून ठेवत नाहीत का ? तर उत्तर मिळाले, "आम्हाला ओरीजिनल हवे आहेत , स्कॅन कॉपीज चालणार नाहीत" ह्या उत्तरावर हसावे की रडावे हे न कळल्याने हतबुद्ध होऊन काम न होताच घरी परतलो. पुढच्या भारत भेटीत ऍक्सिस बँकेचे खाते बंदच करायचे ठरवले आहे. स्टेट बँक देखील ह्यात मागे नाही . उसकी कहानी फार कभी .

In reply to by सौन्दर्य

माझे कॅनरा, पंजाब नॅशनल, आयडीबीआय, एचडीएफसी, शामराव विठ्ठल अश्या अनेक बँकेत खाते आहेत नी होते. मला त्यातल्या त्यात सर्वात पारदर्शी बँक आयडीबीआय वाटली! एकाच तक्रारीवर काम होते, पण ते तक्रार करावी लागेल अशी कामे ते करतात, एचडीएफसी देखील ठीकठाक आहे , कधी उगाच पैसे कापले नाहीत, पण ट्रांसक्शन च्या भाऊगर्दीत मला दिसले नसेल अशे पैसे त्यांनी देखील उडवले असावेत असा माझा अंदाज आहे. सगळ्यात हरा*** बँक म्हणजे एक्सिस बँक, ह्या बँकेत खाते असेल तर त्वरित बंद करा!

चित्रगुप्त Sat, 10/11/2025 - 04:28
या बँकेच्या अगदी सुरुवातीपासून (पूर्वी Times Bank असे नाव होते) आधीची अनेक वर्षे फरिदाबादला, आणि आता इंदौरच्या शाखेत माझी दोन खाती एच डी एफ सी मधे आहेत. सुरुवातीपासून आजतागायत माझा अनुभव अतिशय चांगला आहे. कधीही कोणतीही तक्रार करावी लागलेली नाही. फोन करून सांगितले तर घरी येऊनही काम करून देतात. हल्ली बरेचसे काम मी नेट-बँकिंगने करत असतो.

गामा पैलवान Wed, 10/08/2025 - 17:18
युयुत्सु, सावध केल्याबद्दल आभार. अचानक खाते श्रेणीवर्धित ( = अपग्रेड ) करणे व त्याकरिता शुल्क आकाराने हे दरोड्यासम आहे. राखीव पेढी ( = रिझर्व्ह बँक ) ने याची तातडीने दाखल घ्यायला हवी. किमान रकमेचा स्पष्ट निर्देश जालखातेपानावर ( = ऑनलाईन वेबपेज वर ) व्हायला हवा. तसेच खातेरक्कम किमान पातळीखाली गेल्यास तशा अर्थाची सूचना ग्राहकास संपत्र, सानसंदेश, इत्यादि मार्गांनी पाठवावयास हवी. ती पूर्ववत करण्यासाठी काही दिवसांच्या अवधीही द्यायला हवा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मिलिंद Sun, 10/12/2025 - 20:17
माझ्या मते रिझर्व्ह बँक हीच मुख्यतः बदमाष आहे. या मध्यवर्ती बँकेला ग्राहक मुख्य परिपत्रक (Customer Master Circular) काढण्याव्यतिरिक्त काही ग्राहकोपयोगी करायचे आहे असे वर्तनात तरी दिसत नाही. मी कित्येकदा बँक शाखेंच्या कामकाज सुरु करण्याच्या वेळे बाबत तसेच प्रत्येक बँक शाखेने घ्यायच्या ग्राहक सेवा समितीच्या मासिक मिटिंग्ज संबंधी तक्रारी केल्या होत्या पण त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही.

युयुत्सु Wed, 10/08/2025 - 17:28
नैतिक पाठबळ दिल्याबद्दल धन्यवाद. योग्य वेळी रिझर्व बँकेला याबद्दल कळवणार आहेच. दुर्दैवाची गोष्ट अशी की हा एक अनुभव नाही असे संतापचनक आणखी अनुभव आहेत.

परवाच ३४२ रुपये कापल्याचा मेसेज आयडीबीआय ह्या पेढीने पाठवला, खाते तपासल्यावर कळले की pmjb अंतर्गत कट केले असे कळले, pmjb ही काय बला आहे, हे शोधल्यावर कळले की “ “प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना”, हे पाहून डोकेच फिरले तडक आयडीबीआय ला माझ्या परवानगी विना ही योजना माझ्या खात्यात लागू केलीच कशी रे माकडानो? म्हणून जाब विचारला, त्यांनी तातडीने माझ्या तक्रारीची दखल घेऊन पैसे परत केले!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस गुरुवार, 10/09/2025 - 12:50
प्रत्येक बँकेला मेसेज येतो की एवढी खाती जोडलीच पाहिजेत. बाकीचे काही बोलत नाहीत/ नकार देत नाहीत ती राहतात.

असंका गुरुवार, 10/09/2025 - 23:33
Joint and First
?? मंजे नक्की काय? फर्स्ट वाल्याने दोनदा सही करायची? आधी जॉइंट म्हणून आणि मग फर्स्ट म्हणून? की आपल्याला फर्स्ट ऑर जॉइंट म्हणायचंय?

असंका Fri, 10/10/2025 - 00:32
आपण बॅंकेकडे या संदर्भात तक्रार केली का? त्याचा काय निकाल लागला? तुम्ही इथे फक्त तुमची बाजु तीही अगदी आक्रमक पद्धतीत मांडली आहे. एक शक्यता म्हणून असं झालं असेल का, की आपल्या मुळ खात्यावर परवानगी असलेल्या व्यवहारांची संख्या, शिल्लकेची मर्यादा इ. बाबी आपल्याच कडून ओलांडल्या गेल्या असतील, ज्यामुळे नियमानुसार आपले खाते "सर्व साधारण" खात्यात राहणे शक्य होत नसेल? आणि एक पर्याय आपल्याला सुचवला गेला असेल की मर्यादेत राहील एवढी शिल्लक खात्यावर ठेवून उर्वरित रकमेची मुदत ठेव करावी, जेणेकरून नियमानुसार आपले खाते परत एकदा, एक सर्व साधारण खाते म्हणून वर्गीकृत करता येउ शकेल?

युयुत्सु Fri, 10/10/2025 - 08:57
श्री० असंका १. माझ्या मनातल्या बॅंकेबद्दलच्या भावना, व्यक्त झालेल्या भावनांच्या १०० पट तीव्र आहेत. तो आतापर्यंत आलेल्या अनेक अनुभवांचा साठलेला/एकत्रित परिणाम आहे. परवाचा अनुभव गवताची शेवटची काडी ठरली... २. बॅंकेच्या दोन वेगवेगळ्या डॉक्युमेंटमध्ये वेगवेगळ्या नोंदी का? याचं लेखी उत्तर मला अपेक्षित होतं ते मिळालेलं नाही. तसेच यापूर्वी माझ्या परवानगीशिवाय खात्याचे अपग्रेडेशन कसे केले, या प्रश्नाचेही उत्तर मला मिळालेले नाही. ३. माझं ऑफिशियल कम्युनिकेशन बॅंकेने स्वीकारले नसल्याने मी एफ्डी मोडायचा निर्णय घेतला, काल माझ्या खात्यात मुद्दल आणि थोडे व्याज जमा झाल्याने माझ्यासाठी हा विषय संपला आहे. यापुढे मी एक छ्दाम कोणत्याही बॅंकेत एफ़डी म्हणून ठेवायचा नाही असे ठरवले आहे. ४. चौथा कोनाडा यांचा केवायसी अनुभव संतापजनक आहेच. हॉस्पीटल्सच्या असंवेदनशील कारभारामुळे जसा जनतेचा क्षोभ होतो, तसं जर बॅंकांच्या बाबतीत झालं तर बॅंका थोड्याफार सुधारतील. एरव्ही देशाचे भवितव्य कठीण असल्याचे पूर्वी बनलेले मत आता अधिकच तीव्र बनले आहे.

In reply to by युयुत्सु

असंका Fri, 10/10/2025 - 09:24
माझ्या आयडी व्यतिरीक्त माझ्या प्रतिसादातील एकाही शब्दाची दखल आपण घेतलेली आपल्या प्रतिसादातून दिसून येत नाही.

In reply to by असंका

युयुत्सु Fri, 10/10/2025 - 09:28
एकाही शब्दाची दखल आपण घेतलेली आपल्या प्रतिसादातून दिसून येत नाही. होय. हा विषय माझ्यासाठी संपला असल्याने आणि मी एफडी परत करायची नाही असा निर्णय घेतला असल्याने मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही.

In reply to by युयुत्सु

असंका Fri, 10/10/2025 - 10:17
माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, की उत्तर देणं अडचणीचं आहे? हा विषय आपण मिपावर मांडलेला आहेत. अर्धवट स्वरुपात मांडलेला आहेत. तरीदेखिल विषय स्पष्ट व्हावा म्हणून, आणि जेणेकरून नक्की काय झालंय ते समजावं म्हणून, आपल्याला कमीत कमी मेहेनतीत केवळ 'होय /नाही स्वरुपात' उत्तर देता येतील, असा प्रश्न तयार करून, माझा काही संबंध नसताना मी इथे मेहेनत घेतली आणि आता आपण एकदम म्हणता विषय संपला? विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला? वर म्हणताय "मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही?" ही काय बिनकामाची चर्चा आहे का? तुम्ही एका संस्थेपासून जनतेला सावध करायचं म्हणताय ना? नक्की कशापासून सावध रहायचं ते समजायला नको?

In reply to by असंका

युयुत्सु Fri, 10/10/2025 - 10:36
श्री० असंका, तुम्ही तुम्हाला सोईचे अर्थ लावायला मोकळे आहात. मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही, मी दिलेले पत्र स्वीकारणार नाही आणि मी मात्र उत्तरे देत बसायचे हा एकतर्फी न्याय मला मान्य नाही.
विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला?
असे अर्धवट आणि खोडसाळ निष्कर्ष जेव्हा काढले जातात तेव्हा माझा चर्चा न करण्याचा किती योग्य आहे हे पटते.

In reply to by युयुत्सु

असंका Fri, 10/10/2025 - 11:46
तुम्ही तुम्हाला सोईचे अर्थ लावायला मोकळे आहात. मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही, मी दिलेले पत्र स्वीकारणार नाही आणि मी मात्र उत्तरे देत बसायचे हा एकतर्फी न्याय मला मान्य नाही.
मला सोईचा अर्थ? मी म्हणजे काय एच डी एफ सी बॅंक आहे का? माझी काय सोय गैर सोय असणार आहे त्यात? तुम्हालाच काही मदत करता आली तर पहावं म्हणून विचारत होतो. पत्र घेउन गेला होतात तुम्ही बँकेत, तर हेच मी आधी विचारत होतो ना, की तक्रार केली होतीत का? तुमच्या लेखात कुठे म्हणलं होतं तुम्ही की तुम्ही पत्र घेउन गेला होतात? आता इतक्या शेवटी पहिल्यांदा कळलं की तुम्ही काही एक पत्र घेउन गेला होतात. मग त्यांनी ते घेतलं नाही म्हणजे नक्की काय केलं? तुम्ही ईमेल का नाही केली? रजिस्टर पोस्टाने का नाही पाठवलं? आणि
मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही
हे काय आहे? तुम्ही प्रश्न कसे विचारले होते? लेखी? की तोंडी? लेखी प्रश्नांना लेखी उत्तर आणि तोंडी प्रश्नांना तोंडी उत्तर हा सामान्य व्यवहार आहे.
विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला? असे अर्धवट आणि खोडसाळ निष्कर्ष जेव्हा काढले जातात तेव्हा माझा चर्चा न करण्याचा किती योग्य आहे हे पटते.
मी जे लिहिलंय तो प्रश्न आहे. निष्कर्ष नाही. आणि विषय संपला हा निष्कर्ष असेल, तर ते तुम्हीच लिहिलंय. तेव्हा खोडसाळपणा जर असेल तर तो कोणाचा आहे ते उघड आहे. अपशद्ब न वापरणे आणि अपमानास्पद न बोलणे, ही माझी व्यक्तिगत मर्यादा आहे. धन्यवाद.

सुबोध खरे Fri, 10/10/2025 - 10:11
मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही. मग हा लेख केवळ लोकांना सावधान करण्यासाठी लिहिला आहे का? कि आपल्याला होणारी जळजळ कुठेतरी बाहेर काढण्यासाठी? कारण असे अनुभव सर्वच बँकांकडून जगभर सर्वाना येत असतात. त्यासाठीचे उपाय काय याची चर्चा लोकांना जास्त उपयुक्त ठरली असती.

In reply to by सुबोध खरे

असंका Fri, 10/10/2025 - 10:32
+१. लेखाचं प्रयोजन काय हाच प्रश्न पडतोय. कारण इथे समस्या नक्की काय हे कळलं तर योग्य ती उपाय योजना शोधायला, सुचवायला अनेक वाचक मदत करु शकतील.

आग्या१९९० Fri, 10/10/2025 - 14:00
एका बड्या सरकारी बँकेने KYC साठी कागदपत्रे सादर करण्यास SMS केला. बँकेत जाऊन कागदपत्रे दिली. पाच मिनिटात KYC झाल्याचा SMS आला. तीन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरसाठी बुक केले असता कंपनीकडून बुकिंग नंबर sms आला. दुसऱ्यादिवशी डिलिवरी मेसेज आला पण प्रत्यक्षात डिलिवरी दिली नाही, म्हणून चौकशी करायला गेलो तर KYC अपडेट नसल्याने डिलिवरी होणार नाही असे सांगितले. त्यांच्याकडील मोबाईलने माझ्या डोळ्याचे स्कॅन केले, लगेच मोबाईलवर OTP आला. तो त्यांनी टाकला . कुठलेही कागदपत्र न मागता झाले एका मिनिटात KYC. तासाभरात गॅस सिलेंडर दारात हजर. बँकांना हे तंत्रज्ञान का वापरत नाही?

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु Fri, 10/10/2025 - 14:06
मुळात केवायसी ही प्रक्रिया 1760 वेळा करावी लागता कामा नये. केवायसी एकदा केलं की सगळीकडे त्याचा परिणाम दिसायला हवा.

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० Fri, 10/10/2025 - 14:20
एखाद्याचा मृत्यूचा दाखला काढला की त्याचे आधारकार्ड आपोआप बाद होते. त्याच्या बँक खात्यात सरकारी योजनेतून मिळणारे लाभ बंद व्हायला हवे. परंतु तसे होताना दिसत नाही. बऱ्याच हयात नसलेल्या व्यक्तींचे आधारकार्ड बाद होत नाही. सरकारी डिजिटल भोंगळ कारभार ह्याला कारणीभूत आहे. आधारकार्ड बाद झाले की त्याला लिंक केलेले निवडणूक एपिक कार्ड बाद होऊन मतदार यादीतून नाव वगळले गेले पाहिजे. परंतु तसे का होत नाही समजत नाही.

जगातली सगळ्यात हरा*** बँक, एक्सिस बँक माझे दरमहा १५० रुपये काहीही कारण न देत कापत होती, अनेक तक्रारी, खेटे घालूनही काही उपयोग झाला नाही, नंतर ग्राहक तक्रार मंचात एकामागे एक अनेक तक्रारी टाकल्या, इतक्या की बँकेने सगळे पैसे परत तर केलेच पण अकाउंट बंद झाल्यानंतर घरी डीडी पाठवून पुन्हा पैसे दिले!

सौन्दर्य Fri, 10/10/2025 - 23:33
अगदी बरोबर. थोड्याफार फरकाने सगळ्याच बँका खातेदारांना त्रास देण्यासाठीच उघडल्या आहेत असं वाटते . माझा ऍक्सिस बँकेचा अनुभव : माझं ह्या बँकेत गेली ३५ वर्षे खातं आहे. मी गेली २५ वर्षे परदेशात (अमेरिकेत म्हंटल्यावर चर्चेला वेगळेच वळण लागेल) राहतो. तीन-पाच वर्षात एखादी भारत फेरी होते. तीस दिवसांच्या सुट्टीपैकी पंधरा एक दिवस तर बँकेत खेटे घालण्यातच जातात. मागच्या फेरीत ऍक्सिस बँकेत केवायसीचे पेपर जमा केले व केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली. दोनच दिवसानंतर पुन्हा काहीतरी काम निघाले तर बँकेने केवायसीसाठी दिलेले कागदपत्रच परत मागितले. त्यांवर त्याना ते दोनच दिवसांपूर्वी दिल्याचे सांगितले, त्यावर ते म्हणाले आम्ही सर्व कागदपत्र हेडऑफिसला पाठवून देतो आमच्याकडे आता काहीच नाही. मी विचारले की ते स्कॅन करून ठेवत नाहीत का ? तर उत्तर मिळाले, "आम्हाला ओरीजिनल हवे आहेत , स्कॅन कॉपीज चालणार नाहीत" ह्या उत्तरावर हसावे की रडावे हे न कळल्याने हतबुद्ध होऊन काम न होताच घरी परतलो. पुढच्या भारत भेटीत ऍक्सिस बँकेचे खाते बंदच करायचे ठरवले आहे. स्टेट बँक देखील ह्यात मागे नाही . उसकी कहानी फार कभी .

In reply to by सौन्दर्य

माझे कॅनरा, पंजाब नॅशनल, आयडीबीआय, एचडीएफसी, शामराव विठ्ठल अश्या अनेक बँकेत खाते आहेत नी होते. मला त्यातल्या त्यात सर्वात पारदर्शी बँक आयडीबीआय वाटली! एकाच तक्रारीवर काम होते, पण ते तक्रार करावी लागेल अशी कामे ते करतात, एचडीएफसी देखील ठीकठाक आहे , कधी उगाच पैसे कापले नाहीत, पण ट्रांसक्शन च्या भाऊगर्दीत मला दिसले नसेल अशे पैसे त्यांनी देखील उडवले असावेत असा माझा अंदाज आहे. सगळ्यात हरा*** बँक म्हणजे एक्सिस बँक, ह्या बँकेत खाते असेल तर त्वरित बंद करा!

चित्रगुप्त Sat, 10/11/2025 - 04:28
या बँकेच्या अगदी सुरुवातीपासून (पूर्वी Times Bank असे नाव होते) आधीची अनेक वर्षे फरिदाबादला, आणि आता इंदौरच्या शाखेत माझी दोन खाती एच डी एफ सी मधे आहेत. सुरुवातीपासून आजतागायत माझा अनुभव अतिशय चांगला आहे. कधीही कोणतीही तक्रार करावी लागलेली नाही. फोन करून सांगितले तर घरी येऊनही काम करून देतात. हल्ली बरेचसे काम मी नेट-बँकिंगने करत असतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एचडीएफसी बॅंक-सावधान! ================= लोक हो, एचडीएफसी बॅंकेचे ग्राहक असाल तर सेवा घेताना अत्यंत सावध रहा! या बॅंकेकडून केले जाणार्‍या गैरव्यवहारांबद्दल समाज-माध्यमांबद्दल अधूनमधून जे वाचायला मिळायचे ते चिंताजनक होतेच पण मला आलेल्या अनेक अनुभवांमुळे आता मला उघड पणे बोलावे लागत आहे. मी नुकतीच बॅंकेच्या छळाला(*) कंटाळून १८ ऑगस्ट रोजी एक एफडी केली. ही एफ़डी करताना Mode of operation : Either or survivor अशी स्पष्ट सूचना दिली होती. तशी नोंद मला बॅंकेकडून मिळालेल्या पोचपावतीच्या पीडीएफ़ मध्ये आहे. ग्राहकाने त्याच्या पैशाविषयी दिलेल्या सूचना जशाच्या तशा बॅंकेने पालन करणे अपेक्षित आहे.

पार्करचे पेन

युयुत्सु ·

हळव्या आठवणी. पार्कर्/शेफर्डची पेन्स लॉकरमध्ये ठेवणारे तेव्हा अनेकजण होते. सोन्याचा दागिना जपुन ठेवतात तशी ही पेन्स जपली जायची.

श्रीरंग_जोशी Fri, 10/03/2025 - 23:54
हृद्य आठवण. लहानपणी अशाच काही अनमोल वाटणार्‍या भेटवस्तू हरवल्याचा सल अजूनही वाटतो.

सविता००१ Tue, 10/07/2025 - 19:26
माझ्या बाबांचा छंद म्हणजे वेगवेगळी, वेगवेगळ्या देशांमधली पेन्स जमवणे. त्यामुळे तुम्ही वर फोटोत दिलं आहे, अगदी तसंच पेन मला चौथीत जेव्हा शाईचं पेन वापरायची परवानगी मिळाली तेव्हा बाबांनी दिलं होतं, दुसरं लालचुटुक शेफर चं. दहावीपर्यंत ही दोन्ही पेन्स मी वापरली. नंतर एका सरांनी मागितलं शेफर चं पेन, तेव्हा सरांना कसं नाही म्हणणार म्हणून मनातल्या मनात खूप चिडून, पण दिलं मी त्यांना. पार्कर चं आहे अजून. पण फारसं हल्ली वापरात नाहीये. मात्र बाबांची आठवण आहे ती. त्यामुळे अमूल्य आहे.

चौथा कोनाडा Wed, 10/08/2025 - 13:44
सुंदर अनुभव, सुंदर लिहिलंय ! मला ही एका आस्ट्रेलियन मित्राने शेफर फाऊंटन पेन भेट दिले होते, ते ही कॅलिग्राफीचे ... दोन चार वर्षे बरेच वापरले.. पण नंतर सुलेखनाची हौस ओस्सल्यावर वापरणे बंद झाले. माझा नातेवाईक अस्सलेल्या कलाविदद्यार्थ्याला भेट देऊन टाकले !

In reply to by चौथा कोनाडा

रामचंद्र गुरुवार, 10/09/2025 - 17:38
आसक्तीमुळे आवडीची वस्तू वापरात नसली तरी सोडवत नाही. तुम्ही आवडीची वस्तू योग्य व्यक्तीकडे पोहोचती केलीत, हे विशेष!

हळव्या आठवणी. पार्कर्/शेफर्डची पेन्स लॉकरमध्ये ठेवणारे तेव्हा अनेकजण होते. सोन्याचा दागिना जपुन ठेवतात तशी ही पेन्स जपली जायची.

श्रीरंग_जोशी Fri, 10/03/2025 - 23:54
हृद्य आठवण. लहानपणी अशाच काही अनमोल वाटणार्‍या भेटवस्तू हरवल्याचा सल अजूनही वाटतो.

सविता००१ Tue, 10/07/2025 - 19:26
माझ्या बाबांचा छंद म्हणजे वेगवेगळी, वेगवेगळ्या देशांमधली पेन्स जमवणे. त्यामुळे तुम्ही वर फोटोत दिलं आहे, अगदी तसंच पेन मला चौथीत जेव्हा शाईचं पेन वापरायची परवानगी मिळाली तेव्हा बाबांनी दिलं होतं, दुसरं लालचुटुक शेफर चं. दहावीपर्यंत ही दोन्ही पेन्स मी वापरली. नंतर एका सरांनी मागितलं शेफर चं पेन, तेव्हा सरांना कसं नाही म्हणणार म्हणून मनातल्या मनात खूप चिडून, पण दिलं मी त्यांना. पार्कर चं आहे अजून. पण फारसं हल्ली वापरात नाहीये. मात्र बाबांची आठवण आहे ती. त्यामुळे अमूल्य आहे.

चौथा कोनाडा Wed, 10/08/2025 - 13:44
सुंदर अनुभव, सुंदर लिहिलंय ! मला ही एका आस्ट्रेलियन मित्राने शेफर फाऊंटन पेन भेट दिले होते, ते ही कॅलिग्राफीचे ... दोन चार वर्षे बरेच वापरले.. पण नंतर सुलेखनाची हौस ओस्सल्यावर वापरणे बंद झाले. माझा नातेवाईक अस्सलेल्या कलाविदद्यार्थ्याला भेट देऊन टाकले !

In reply to by चौथा कोनाडा

रामचंद्र गुरुवार, 10/09/2025 - 17:38
आसक्तीमुळे आवडीची वस्तू वापरात नसली तरी सोडवत नाही. तुम्ही आवडीची वस्तू योग्य व्यक्तीकडे पोहोचती केलीत, हे विशेष!
लेखनविषय:
लेखनप्रकार
 पार्करचे पेन ====== -राजीव उपाध्ये (एप्रिल २०२४) मी दूसरीत असताना माझा सख्खा मामा अमेरीकेला शिक्षणासाठी गेला. तिकडे गेल्यावर त्याने आपले आईवडील आणि बहीणींसाठी १ली भेट म्हणून पार्कर-४५ ची ४ शाईची पेनं पाठवली होती. भावाने पाठवलेल्या या १ल्या भेटीचे माझ्या आईला भयानक अप्रूप होतं. आई त्या पेनला कुणाला हात लावू द्यायची नाही. मला तर नाहीच नाही. एकदा-दोनदा चोरून मी ते हाताळले होते. तेव्हा त्यांची चकाकी, नीबचा गुळगुळीतपणा, पेन हातात धरल्यावर वाटलेला भारीपणा या भावना माझ्या मनात खोलवर रूतून बसल्या.

जाडजूड ग्रंथांद्वारा विषबाधा !

हेमंतकुमार ·

गवि Mon, 09/29/2025 - 13:13
रोचक माहिती. सुरुवातीच्या काळात, विशेषतः जुन्या काळात, एखाद्या पदार्थाचे किंवा तंत्राचे घातक परिणाम असू शकण्याची शक्यता गृहीत न धरता थेट वापर सुरू केला जात असावा. क्ष किरण, तेही तीव्रता कमी न केलेले, अत्यंत घातक असूनही ते समजेपर्यंत अगदी बुटासाठी पावलांचे माप घेण्यासाठी देखील ते तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले होते असे वाचले आहे.

In reply to by गवि

हेमंतकुमार Mon, 09/29/2025 - 13:36
क्ष किरण, तेही तीव्रता कमी न केलेले
बरोबर. यावरून एक गमतीदार घटना घडल्याचे वाचले आहे. 1895 मध्ये एक्स-रे चा शोध लागला. त्याच्याच पुढच्या वर्षी इंग्लंडमधील वृत्तपत्रांमधून एक्स-रे चा ‘दुरुपयोग’ यावर लेख लिहिले गेले होते. हा किरण आरपार भेदू शकणारा असल्याने त्याच्या साह्याने डॉक्टर लोक रुग्णाच्या शरीरातून ‘खाजगी गोष्टी’ आरपार बघत राहतील असे म्हटले गेले होते ! ( X-ray voyeurism). 😍

धर्मराजमुटके Mon, 09/29/2025 - 13:51
साधरण अशाच प्रकारचा मालिकेचा एक भाग ब्योमकेश बक्षी मधे पाहिलेला आठवतो. पुस्तकाच्या पानाला की लिफाफ्या च्या आतमधील कागदाला टाचणी ला विष लावलेले असते आणि त्याद्वारे एकाचा खून घडवून आणलेला असतो.

Bhakti Mon, 09/29/2025 - 14:56
रोचक माहिती.यावर कथा छानच आहेत. लॅबमध्ये डीएनए स्टेनिंग एजेन्ट EtBr,UV light वापरत असू तेव्हा हे कार्सिनोजन आहे सांगावं लागतं.एकदा एक मुलीचा चुकून EtBr ला किंचित स्पर्श झाला तेव्हा ती रडायला लागली. खूप समुपदेशन करून डोसेजवर अवलंबून आहे वगैरे सरांना समजावून सांगावे लागले.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार Tue, 09/30/2025 - 07:36
EtBr ला किंचित स्पर्श झाला तेव्हा ती रडायला लागली.
बरोबर ! वैद्यकीय प्रयोगशाळांमधली काही रसायने देखील त्या गुणधर्माची असतात. त्यामुळे विद्यार्थीदशेत बऱ्याचदा त्यांचा बाऊ केला जातो आणि कधी कधी एकमेकांना घाबरवून थोडीफार गंमतही केली जाते.

मारवा Tue, 09/30/2025 - 02:45
Umberto Eco महान लेखक आहेत. त्यांची Foucault's Pendulum ही जगातील एक अद्भुत विलक्षण अशी कादंबरी आहे. Eco यांचा व्यक्तिगत ग्रंथ संग्रह हा जगातील सर्वात मोठ्या ग्रंथसंग्रह पैकी एक होता. त्यात सुमारे 50 हजार पुस्तके होती. त्यांच्या pendulum कादंबरीत जे ऐतिहासिक सांस्कृतिक संदर्भ येतात ते माती गुंगबकरणारे आहेत. त्यातला plot मेंदूला झिणझिण्या आणणारा आहे. अर्थात ते रहस्यकथा लेखक नाहीत हा तर एक साईड इफेक्ट त्यांच्या लेखनाचा होता.त्यांचं लेखन हे तत्वज्ञान,इतिहास,संस्कृती, या सोबत मानवी मनाचा तळ शोधणार अस आहे. Pendulum ही तर कादंबरी अशी आहे की जी प्रत्येक वाचनात तुम्हाला नवा संदर्भ नवा शब्द देण्याची क्षमता ठेवते. त्यांना एक मुलाखतीत जेव्हा विचारले होते की dan brown ज्याने da vichi code लिहिलेली त्याच्या theory विषयी तेव्हा ते गमतीने म्हणाले होते brown हा pendulum मधील एक पात्र आहे. त्यांच्यात होते की वाचक हा challenged झाला पाहिजे. तुम्ही जमल्यास त्यांची pendulum नक्की वाचा . प्रचंडेहनात करावी लागते पूर्ण समजणे अवघड आहे पण pendulum वाचनाची process च मला तरी खूप आनंद दायक वाटते. धन्यवाद लेखासाठी.

In reply to by मारवा

हेमंतकुमार Tue, 09/30/2025 - 07:44
pendulum नक्की वाचा .
सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद ! खरंच इको थोर लेखक आहेत. त्यांच्या लेखनासाठी ते अनेक वर्ष अनेक प्रकारचे कष्ट घेत. ‘द नेम ऑफ द रोज’ ही कादंबरी लिहिण्यापूर्वी त्यांनी त्या कादंबरीतल्या सगळ्या संन्याशांची रेखाचित्रे काढली होती, तर ‘द आयलंड ऑफ द डे बिफोर’ या कादंबरीसाठी त्यांनी जुन्या काळातल्या जहाजांच्या रचनेचा तीन वर्ष अभ्यास केला होता. . . . Umberto Eco "पुस्तकांचे अस्तित्व' या विषयावर त्यांचे विचार अगदी मननीय आहेत. ते म्हणतात, "पुस्तकाचा शोध चाकाच्या शोधासारखा मानवी इतिहासातल्या मूलभूत शोधांपैकी एक आहे. अशा शोधांत बदलत्या काळानुसार फेरफार होत राहिले तरी त्यातील मूळ संकल्पना कायम राहते. छापीलच्या जागी इ-पुस्तक येईल, पण पुस्तकाला कधी मरण नाही !"

कॉमी Wed, 10/01/2025 - 12:46
मस्त लेख ! पुस्तकाच्या विषारी पानाने हत्या अशी अरेबियन नाईटस मध्ये गोष्ट वाचल्याचे आठवते आहे. राजा युनान आणि वैद्य दुबान नावाची गोष्ट.

गवि Mon, 09/29/2025 - 13:13
रोचक माहिती. सुरुवातीच्या काळात, विशेषतः जुन्या काळात, एखाद्या पदार्थाचे किंवा तंत्राचे घातक परिणाम असू शकण्याची शक्यता गृहीत न धरता थेट वापर सुरू केला जात असावा. क्ष किरण, तेही तीव्रता कमी न केलेले, अत्यंत घातक असूनही ते समजेपर्यंत अगदी बुटासाठी पावलांचे माप घेण्यासाठी देखील ते तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले होते असे वाचले आहे.

In reply to by गवि

हेमंतकुमार Mon, 09/29/2025 - 13:36
क्ष किरण, तेही तीव्रता कमी न केलेले
बरोबर. यावरून एक गमतीदार घटना घडल्याचे वाचले आहे. 1895 मध्ये एक्स-रे चा शोध लागला. त्याच्याच पुढच्या वर्षी इंग्लंडमधील वृत्तपत्रांमधून एक्स-रे चा ‘दुरुपयोग’ यावर लेख लिहिले गेले होते. हा किरण आरपार भेदू शकणारा असल्याने त्याच्या साह्याने डॉक्टर लोक रुग्णाच्या शरीरातून ‘खाजगी गोष्टी’ आरपार बघत राहतील असे म्हटले गेले होते ! ( X-ray voyeurism). 😍

धर्मराजमुटके Mon, 09/29/2025 - 13:51
साधरण अशाच प्रकारचा मालिकेचा एक भाग ब्योमकेश बक्षी मधे पाहिलेला आठवतो. पुस्तकाच्या पानाला की लिफाफ्या च्या आतमधील कागदाला टाचणी ला विष लावलेले असते आणि त्याद्वारे एकाचा खून घडवून आणलेला असतो.

Bhakti Mon, 09/29/2025 - 14:56
रोचक माहिती.यावर कथा छानच आहेत. लॅबमध्ये डीएनए स्टेनिंग एजेन्ट EtBr,UV light वापरत असू तेव्हा हे कार्सिनोजन आहे सांगावं लागतं.एकदा एक मुलीचा चुकून EtBr ला किंचित स्पर्श झाला तेव्हा ती रडायला लागली. खूप समुपदेशन करून डोसेजवर अवलंबून आहे वगैरे सरांना समजावून सांगावे लागले.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार Tue, 09/30/2025 - 07:36
EtBr ला किंचित स्पर्श झाला तेव्हा ती रडायला लागली.
बरोबर ! वैद्यकीय प्रयोगशाळांमधली काही रसायने देखील त्या गुणधर्माची असतात. त्यामुळे विद्यार्थीदशेत बऱ्याचदा त्यांचा बाऊ केला जातो आणि कधी कधी एकमेकांना घाबरवून थोडीफार गंमतही केली जाते.

मारवा Tue, 09/30/2025 - 02:45
Umberto Eco महान लेखक आहेत. त्यांची Foucault's Pendulum ही जगातील एक अद्भुत विलक्षण अशी कादंबरी आहे. Eco यांचा व्यक्तिगत ग्रंथ संग्रह हा जगातील सर्वात मोठ्या ग्रंथसंग्रह पैकी एक होता. त्यात सुमारे 50 हजार पुस्तके होती. त्यांच्या pendulum कादंबरीत जे ऐतिहासिक सांस्कृतिक संदर्भ येतात ते माती गुंगबकरणारे आहेत. त्यातला plot मेंदूला झिणझिण्या आणणारा आहे. अर्थात ते रहस्यकथा लेखक नाहीत हा तर एक साईड इफेक्ट त्यांच्या लेखनाचा होता.त्यांचं लेखन हे तत्वज्ञान,इतिहास,संस्कृती, या सोबत मानवी मनाचा तळ शोधणार अस आहे. Pendulum ही तर कादंबरी अशी आहे की जी प्रत्येक वाचनात तुम्हाला नवा संदर्भ नवा शब्द देण्याची क्षमता ठेवते. त्यांना एक मुलाखतीत जेव्हा विचारले होते की dan brown ज्याने da vichi code लिहिलेली त्याच्या theory विषयी तेव्हा ते गमतीने म्हणाले होते brown हा pendulum मधील एक पात्र आहे. त्यांच्यात होते की वाचक हा challenged झाला पाहिजे. तुम्ही जमल्यास त्यांची pendulum नक्की वाचा . प्रचंडेहनात करावी लागते पूर्ण समजणे अवघड आहे पण pendulum वाचनाची process च मला तरी खूप आनंद दायक वाटते. धन्यवाद लेखासाठी.

In reply to by मारवा

हेमंतकुमार Tue, 09/30/2025 - 07:44
pendulum नक्की वाचा .
सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद ! खरंच इको थोर लेखक आहेत. त्यांच्या लेखनासाठी ते अनेक वर्ष अनेक प्रकारचे कष्ट घेत. ‘द नेम ऑफ द रोज’ ही कादंबरी लिहिण्यापूर्वी त्यांनी त्या कादंबरीतल्या सगळ्या संन्याशांची रेखाचित्रे काढली होती, तर ‘द आयलंड ऑफ द डे बिफोर’ या कादंबरीसाठी त्यांनी जुन्या काळातल्या जहाजांच्या रचनेचा तीन वर्ष अभ्यास केला होता. . . . Umberto Eco "पुस्तकांचे अस्तित्व' या विषयावर त्यांचे विचार अगदी मननीय आहेत. ते म्हणतात, "पुस्तकाचा शोध चाकाच्या शोधासारखा मानवी इतिहासातल्या मूलभूत शोधांपैकी एक आहे. अशा शोधांत बदलत्या काळानुसार फेरफार होत राहिले तरी त्यातील मूळ संकल्पना कायम राहते. छापीलच्या जागी इ-पुस्तक येईल, पण पुस्तकाला कधी मरण नाही !"

कॉमी Wed, 10/01/2025 - 12:46
मस्त लेख ! पुस्तकाच्या विषारी पानाने हत्या अशी अरेबियन नाईटस मध्ये गोष्ट वाचल्याचे आठवते आहे. राजा युनान आणि वैद्य दुबान नावाची गोष्ट.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पंधराव्या शतकात कागदावरील छपाईचा महत्त्वपूर्ण शोध लागला. त्यानंतर कालौघात छापील पुस्तके बाजारात अवतरली. खूप मोठ्या आकाराची पुस्तके तयार करताना त्यांची बांधणी करण्याची विविध तंत्रे विकसित झाली. सुरुवातीला त्यासाठी जनावरांचे चामडे वापरले जायचे परंतु कालांतराने त्याच्या जागी जाडपुठ्ठा वापरात आला. सन 1840 मध्ये अशा बांधणी केलेल्या पुस्तकांचा कणा आकर्षक व चकाकता दिसण्यासाठी बांधणीदरम्यान त्यात पॅरिस ग्रीन या रंगद्रव्याचा देखील वापर होऊ लागला. पुस्तकांच्या सौंदर्यवर्धनाबरोबरच या रंगद्रव्याचा अजूनही एक लाभ होता तो म्हणजे, पुस्तकांचे कृमी व कीटकांपासून संरक्षण.

ये दिल मांगे मोर!

आकाश खोत ·

मारवा Sun, 09/28/2025 - 15:08
आपण समोर ठेवतोय ती लक्ष्य आपल्यासाठी आहेत, आपल्या भल्यासाठी आहेत की निव्वळ आकर्षण म्हणून, समाजात मित्रमैत्रिणींच्या बघितलेल्या गोष्टींमुळे, प्रभावामुळे आहेत, का लोकांना काहीतरी दाखवायला म्हणून आहेत हे समजलं की आपण त्यातून स्वतंत्र होऊ शकतो. नाही तर आपण या अनावश्यक लक्ष्यांचे गुलाम होऊन बसु. तुम्ही समाजसेवा करण्याचं जे लक्ष्य बाळगलंय ते तुमच्या स्वतः च्या भल्यासाठी आहे की निव्वळ नाना रोनाल्डो आदींच्या आकर्षणातून निव्वळ निर्माण झालं आहे ? की तुम्ही मित्र मैत्रिणींना किंवा लोकांना दाखवायला म्हणून समाजसेवे च्या नादी लागलेले आहात? या समाजसेवे च्या नादातून तुम्ही स्वतंत्र होऊ शकता का ? तुम्ही कुठपर्यंत समाजसेवा किंवा तत्सम आंतरिक गोष्टीच्या नादी लागून खऱ्या physical आनंदाला पारखे होणार आहात ? एक माणूस म्हणून तुम्ही कायम स्वतंत्र कधीं होणार ? Self righteousness च्या पिंजऱ्यातून तुम्ही कधी मुक्त होणार ?

अभ्या.. Sun, 09/28/2025 - 15:21
मला रोनाल्डोचे एकच पटले. इ त के टॅलेन्ट पाहिजे की भल्या भल्या सिस्टिमनी कशासाठी का होईना पायी लोळण घ्यायला पाहिजे. सौदी अरब च्या अल नासर क्लबने आत्तापर्यंतची सर्वोच्च फुटबॉलमधली सॅलरी (२०० मिलियन युरो पर ईयर) देऊन तर त्याला करारबध्द केलेच पण.. त्याच्या तिथल्या रहिवासासाठी त्याची गर्लफ्रेंड आणि तिच्यापासून झालेली संतती जरी शरीयासंमत नसली तरी अपवाद करुन संमत केली.

मारवा Sun, 09/28/2025 - 16:07
सौदी अरब च्या क्लब ने देव बरोबर ओळखला ! जे का गडगंज कमावले रोनाल्डो ने जे कमावले त्याचे कौतुक वाटते. गडगंज कमवावे सुखे जगावे

मारवा Sun, 09/28/2025 - 15:08
आपण समोर ठेवतोय ती लक्ष्य आपल्यासाठी आहेत, आपल्या भल्यासाठी आहेत की निव्वळ आकर्षण म्हणून, समाजात मित्रमैत्रिणींच्या बघितलेल्या गोष्टींमुळे, प्रभावामुळे आहेत, का लोकांना काहीतरी दाखवायला म्हणून आहेत हे समजलं की आपण त्यातून स्वतंत्र होऊ शकतो. नाही तर आपण या अनावश्यक लक्ष्यांचे गुलाम होऊन बसु. तुम्ही समाजसेवा करण्याचं जे लक्ष्य बाळगलंय ते तुमच्या स्वतः च्या भल्यासाठी आहे की निव्वळ नाना रोनाल्डो आदींच्या आकर्षणातून निव्वळ निर्माण झालं आहे ? की तुम्ही मित्र मैत्रिणींना किंवा लोकांना दाखवायला म्हणून समाजसेवे च्या नादी लागलेले आहात? या समाजसेवे च्या नादातून तुम्ही स्वतंत्र होऊ शकता का ? तुम्ही कुठपर्यंत समाजसेवा किंवा तत्सम आंतरिक गोष्टीच्या नादी लागून खऱ्या physical आनंदाला पारखे होणार आहात ? एक माणूस म्हणून तुम्ही कायम स्वतंत्र कधीं होणार ? Self righteousness च्या पिंजऱ्यातून तुम्ही कधी मुक्त होणार ?

अभ्या.. Sun, 09/28/2025 - 15:21
मला रोनाल्डोचे एकच पटले. इ त के टॅलेन्ट पाहिजे की भल्या भल्या सिस्टिमनी कशासाठी का होईना पायी लोळण घ्यायला पाहिजे. सौदी अरब च्या अल नासर क्लबने आत्तापर्यंतची सर्वोच्च फुटबॉलमधली सॅलरी (२०० मिलियन युरो पर ईयर) देऊन तर त्याला करारबध्द केलेच पण.. त्याच्या तिथल्या रहिवासासाठी त्याची गर्लफ्रेंड आणि तिच्यापासून झालेली संतती जरी शरीयासंमत नसली तरी अपवाद करुन संमत केली.

मारवा Sun, 09/28/2025 - 16:07
सौदी अरब च्या क्लब ने देव बरोबर ओळखला ! जे का गडगंज कमावले रोनाल्डो ने जे कमावले त्याचे कौतुक वाटते. गडगंज कमवावे सुखे जगावे
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डो याचा एक व्हिडिओ पाहण्यात आला. सध्याच्या घडीला सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी (सर्व खेळ धरून) हा एक. इन्स्टाग्रामवर याचे सर्वाधिक अनुयायी आहेत. अर्थातच सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी सुद्धा आहेच. त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातली एक गोष्ट सांगितली. काही वर्षांपासून त्याला एक छान जेट विमान घ्यायची ईच्छा होती. आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत वाटेल तिथे खाजगी प्रवास करता येण्यासाठी. प्रसिद्ध व्यक्तींना लोक कुठेही एकटे सोडत नाहीत. ते दिसले की त्यांचे फोटो व्हिडिओ काढतात, त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात.

सारे काही एकाच जातीसाठी

स्वधर्म ·

मारवा Sun, 09/14/2025 - 09:34
उत्तम लेख अनेक बाबी माझ्यासाठी तरी नवीन होत्या. खर्चाची बाजू तर धक्कादायकच आहे. 1 आरक्षण हा मूलभूत हक्क नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सुस्पष्टपणे आपल्या निकालात नमूद केलेले आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा असेच म्हटलेले होते. आणि हे योग्य असेच आहे. 2 आरक्षणाची 50 टक्केची भिंत पाडायची आहे असे राहुल गांधी जे वारंवार मतपेटीच्या राजकारणासाठी म्हणतात ते भारतीय घटनेनुसार अशक्य आहे. आणि हे उघडपणे विषमतेचे अन्यायाचे समर्थन आहे. 3 आता ताज्या बातमीनुसार बंजारा समाज देखील मराठा तत्त्वाच्या आधारावर आरक्षणाची मागणी करत आहे. हे सर्व चुकीचा पायंडा मराठा आरक्षणात पाडल्यामुळे निर्माण झालेलं संकट आहे. आता समाजातील दरी अजून वाढेल अगोदरच मराठा विरुद्ध ओबीसी गावपातळीवर सूक्ष्म तडा गेलेला आहे जो अर्थातच वाढत जाणार. नुकताच एका ओबीसी तरुणाने आत्महत्या केलेली आहे. 4 सर्वात महत्वाचा मुद्दा आरक्षणाचे मुख्य आकर्षण सरकारी नोकरी ही आहे. जी सर्वाधिक सुरक्षित निश्चित उत्पन्नाचे साधन आहे. मात्र जर 33 टक्के हा एकूण मराठा समाज जर आहे. आणि कमीत कमी मतदार यादी जारी कमी धरली 9 करोड तर मराठा 3 करोड आहेत. या सर्वांना सरकारी नोकऱ्या ज्या अगोदरच कमी कमी होत चाललेल्या आहेत. पुन्हा त्यातही आता पूर्वीप्रमाणे पेन्शन आदी सुविधा बंद व कमी केलेल्या आहेत. आणि पुन्हा आरक्षणातील प्रत्येकाचे percent मोजले तर एकूण इतका मोठा मराठा समाज या आरक्षण मिळाले तरी केवळ या आधाराने प्रगती करू शकेल काय ? 5 Productivity आणि Quality आणि Skill Development हेच या सर्व समस्येवरील Best possibile solution आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

In reply to by मारवा

Bhakti Sun, 09/14/2025 - 10:05
आता समाजातील दरी अजून वाढेल अगोदरच मराठा विरुद्ध ओबीसी गावपातळीवर सूक्ष्म तडा गेलेला आहे जो अर्थातच वाढत जाणार.
एकदम बरोबर.इतका काळ मित्र मैत्रिण, सहकारी मराठा असल्याची नोंदही घेतली नव्हती,गरजच पडली नाही.पण आता सतत मराठा आरक्षण मुद्द्यावरून बोलण्यात हे येते,सकाळ संध्याकाळ त्यांचे स्टेटस,लेख यावरच असतात.
सर्वात महत्वाचा मुद्दा आरक्षणाचे मुख्य आकर्षण सरकारी नोकरी ही आहे.
आणि शिक्षण हाही आहे. आपली व्यवस्था दर्जेदार शिक्षणाकडे अधिक एकाग्र झाल्याशिवाय मुळापासून या समस्या सुटणार नाही. याबाबत मात्र एक नमुद करते की मुलींना(सर्व जात व प्रवर्गातील) उच्च शिक्षण पूर्ण मोफत केले आहे.यामुळे खुप पालकांना मदत झाली व मुलींना चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन‌ दिला आहे. quality , productivity शिवाय पर्याय नाही हे बरोबरच आहे.

युयुत्सु Sun, 09/14/2025 - 09:55
Productivity आणि Quality आणि Skill Development हेच या सर्व समस्येवरील Best possible solution आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते हे कटू सत्य कुणालाही स्वीकारायचे नाहीये.

जरांगे यांची भाषा नक्कीच अयोग्य आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना आदर ठेवणे आवश्यकच आहे. त्यांनी लावलेले पोस्टर तर अपमानकारकच ठरते. त्यांचे आंदोलन बऱ्याच काळापासून सुरू असले, तरी ते चर्चेत आले ते त्यांच्या गावातील आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर. त्या वेळी फडणवीस गृहमंत्री तर शिंदे मुख्यमंत्री होते. ती घटना घडली नसती, तर कदाचित जरांगे यांना एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. विश्वास पाटील भ्रष्टाचारी असतील, पण त्यांच्यापेक्षा कमी गुण मिळवलेला व्यक्ती केवळ जातीच्या आधारावर त्यांच्या पेक्षा मोठ्या पदावर पोहोचत असेल, तर त्याबद्दल कोणालाही नाराजी वाटणे चुकीचे नाही. उद्या अशीच परिस्थिती आरक्षणाचा लाभ मिळालेल्या मराठा समाजासमोर निर्माण होऊ शकते. गुणवत्तेचा आणि कर्तृत्वाचा थेट संबंध नेहमीच लागतो असे नाही, पण निवड मुख्यत्वे त्यावरच ठरते. खासगी कंपन्यांतही हेच दिसून येते—योग्य व्यक्तींना मागे टाकून इतरांना पदोन्नती मिळाली तर त्याबद्दल नाराजी वाटणे साहजिक आहे. आंदोलनात हजारो कोटी रुपये खर्च झाले नसतील; मात्र खर्च झाला असेल तर त्यामागे स्थानिक लोकांचाही सहभाग आहे. माझ्या गावाचे उदाहरण घ्या—गावातून एक आयशर आणि एक पिक-अप गाडी आंदोलनासाठी पाठवण्यात आल्या. त्या गाड्या गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करूनच पाठवल्या. सुरुवातीला आंदोलनात खाण्याची गैरसोय होती; पण नंतर गावकडून भाकऱ्या व इतर अन्नपदार्थ पाठवले जाऊ लागले. मराठा समाजात सध्या अशी धारणा आहे की EBC आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, तर SEBC आरक्षण आधीच न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे OBC प्रवर्गातून आरक्षण मिळाले तरच ते दीर्घकाळ टिकेल, म्हणून OBC आरक्षणाची मागणी अधिक तीव्र होत आहे. यावेळी मात्र जरांगे यांनी ‘सरसकट आरक्षण’ ही मागणी जाणीवपूर्वक पुढे रेटलेली नाही. नोंदी असलेल्या लोकांनाच प्रमाणपत्रे मिळावीत, हे कायद्याला धरूनच आहे आणि त्यात काहीही चुकीचे नाही. ज्यांना आरक्षण मिळाले आहे, त्यांना तो आपला हक्कच आहे असे वाटते; त्यामुळे इतर वाटेकऱ्यांविषयी अप्रियता वाटणे स्वाभाविक आहे. मात्र न्याय आणि संतुलन राखण्यासाठी SC व ST प्रवर्गात creamy layer लागू करणे गरजेचे आहे. तसेच, OBC प्रवर्गाबाबत सुप्रीम कोर्टाने सुचविल्याप्रमाणे, एकदा का आरक्षणाच्या आधारे नोकरी मिळाली की पुढील पिढ्यांना तो लाभ देऊ नये

मारवा Sun, 09/14/2025 - 12:42
यावेळी मात्र जरांगे यांनी ‘सरसकट आरक्षण’ ही मागणी जाणीवपूर्वक पुढे रेटलेली नाही. हैद्राबाद गॅजेट लागु करण्याची मागणी करणे आणि या मागणीच्या माध्यमातुन सर्व मराठ्यांना आरक्षणाची मागणी करणे यात वेगळेपणा काय आहे ? ते गॅजेट कोर्टात टिकणार कि नाही हे पुढची गोष्ट पण आज तरी त्या गॅजेटचा वापर हा "सरसकट सर्व मराठे कुणबी ठरविणे" या हेतुनेच केलेला आहे ना ?

मारवा Sun, 09/14/2025 - 13:12
नुकतीच महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख वर्तमान पत्रात ही काहीशी गुढ जाहीरात झळकली यामध्ये देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणी फुले वाहत आहेत असे दिसत आहे. आणि केवळ "देवाभाऊ" एवढे एकच नाव लिहीलेले आहे बास्स... १- म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पुजा करत आहेत हे चांगलेच आहे पण त्याहुन महत्वाचे म्हणजे "देवाभाऊ" या देवाची ही पद्धतशीर व्यक्तीपुजा चाललेली आहे. सर्व प्रुमुख वर्तमान पत्राचे पहीले पुर्ण रंगीत पान जाहीरात ! याचा खर्च किमान काही करोडोंचा नक्कीच असेल. किती ही करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी स्वतःचा व्यक्तीगत उदो उदो करण्यासाठी ? २ शिंदे विरुद्ध फडणवीस या कोल्ड वॉर ची पण याला पार्श्वभुमी आहे. मागे शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांनी जरांगे यांचे आंदोलन "यशस्वीपणे" हाताळले. आता देवाभाऊंना ते जमणार नाही अशी अटकळ असतांना देवाभाऊ यांनी सुद्धा थेट मुंबईतील आंदोलन " यशस्वीपणे" हाताळले हाच जणु संदेश या जाहीरातीच्या माध्यमातुन दिला जात असावा ३ देवेंद्र फ्डणवीस हेच खरे मराठ्यांचे आणि मराठा आरक्षणाचे शिल्पकार आहेत. मराठा समाजाचे हितरक्षक आहेत असाही संदेश यातुन द्यायचा असेल. ४ व्यक्तीपुजा इतकी टोकाची वाढलेली आहे केंद्रातील सरकार युती सरकार किंवा बिजेपी सरकार नसुन " मोदी सरकार " असे संबोधले जाते. आणि या जाहीरातीत तर चक्क देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य इतका म्हणजे महाराष्ट्राचा उल्लेखही आणि मुख्यमंत्री पदाचा उल्लेखही नकोसा वाटतो कारण मग देवाभाऊ यावरुन फोकस पातळ होइल अशी भिती. किती म्हणजे किती ही व्यक्ती पुजा ! किती हे स्वतःचे स्वत: स्तोम माजवणे ५ प्रश्न जाहीरातीचा नाही किंवा या वेळेचा नाही पुर्वी मायावती सत्तेत होत्या तेव्हा तर त्यांनी चक्क स्वतःचेच पुतळे उत्तर प्रदेशात उभारले होते राजकारण किती व्यक्तीपुजक होत चाललयं करदात्या जनतेचा पैसा किती फालतु स्व प्रसिद्धी साठी उडवला जातो व्यर्थ खर्च होतो. मला नेहमीच एक आश्चर्य वाटत एखादा कायदा नाही का की ज्यात सत्तारुढ सरकार योजनांची वाटल्यास जाहीरात करु शकेल पण एकाही नेत्याचा फोटो शासन खर्चाने किमान जाहीरातीत तरी खर्च करण्यास प्रतिबंध असावा.

In reply to by मारवा

सुबोध खरे Mon, 09/15/2025 - 10:08
राजकारण किती व्यक्तीपुजक होत चाललयं चाललंय? ते तसं स्वातंत्र्यापासूनच होतं. गांधी आणि नेहरू नाव असलेल्या संस्था पूर्ण भारतभर हजारांनी असतील. नोटेवर फक्त महात्मा गांधींचा फोटो का होता? इंदिरा इज इंडिया एकाच घराण्याकडे पक्षाच्या सर्व पदांची वर्णी लावणे यात राजद, समाजवादी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पासून सर्वच पक्ष येतात. जयललिता किंवा करुणानिधी यांचे चार मजली कट आउट्स मी स्वतः चेन्नई मध्ये पहिले आहेत किंवा ४०००० कोटीचे "मायावती आणि त्यांचे हत्ती यांचे पुतळे " लखनौ मध्ये हि सर्व व्यक्तिपूजेची उदाहरणे डोळे झाकले तरी दिसतील अशी आहेत.

हैद्राबाद गॅझेटनुसार ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे, त्यांना दखले मिळतील. ज्यांची नोंद नाही, त्यांनी आपल्या कुळातील नातेवाईकांची नोंद दाखवावी लागेल. त्या नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र आणि नातेवाईक असल्याचा पुरावा सादर झाल्यास त्यांनाही दखले मिळतील. परंतु ज्यांची नोंद नाही आणि कुळातील नातेवाईकांचीदेखील नोंद उपलब्ध नाही, त्यांना दखले मिळणार नाहीत. हैदराबाद आणि सातारा गॅझेट हे एका विशिष्ट भुभागासाठीच लागू असेल. इतर ठिकाणी राहणारे मराठे कदाचित वगळले जातील. देवाभाऊ च्या जाहिराती महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नाहीत. कोणा एखाद्या कॉन्ट्रॅक्टर ने दिलेल्या असतील. त्याबदल्यात ED/CBI पासून सरक्षण किंवा एखाद दुसरे कॉन्ट्रॅक्ट मिळेल.

सलाम लोकमान्य टिळकांनी शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी व्यक्त केलेल्या मतावर सरकारी शिक्कामोर्तब झाले ही बाब लोकमान्यांच्या विचारांचा अभ्यासक म्हणून आमच्यासाठी खूपच उद्बोधक आहे ! बाकी, स्वधर्म, आपले अनेक विषयात टोकाचे मतभेद असले तरी ह्या लेख लिहिण्याच्या तुमच्या धैर्याला , डेरिंग ला आम्ही सलाम करतो. पण तरीही काळजी घ्या, जपा. सरकार चांगले नाही, लोकं चांगली राहिली नाहीत , काळ चांगला राहिला नाही. पाण्यात राहून माशाशी वैर करायचे नसते. एका माणसाच्या धैर्याचे फळ अख्ख्या समाजाला कसे भोगायला लागू शकते हे आम्ही 1948 मध्ये प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्या प्रसंगातील नेते कार्यकर्ते कोण होते हे देखील सर्वांना ज्ञात आहेच . तरीही तुम्ही असा लेख लिहिण्याचे धाडस केले हे आश्चर्यमुग्ध करून टाकणारे आहे . तेव्हा , जपा स्वतःला.

विवेकपटाईत Mon, 09/15/2025 - 17:40
एखाद्या समाजाला नपुंसक करायचे असेल तर त्याला आरक्षण द्या. 5 टक्के सरकारी नौकरी साठी 95 टक्के परीक्षेची तैयारी करत राहणार. नंतर बेरोजगार होणार.

स्वधर्म Tue, 09/16/2025 - 02:45
काही प्रतिसाद पाहता मला लेखाच्या सुरूवातीचा डिस्क्लेमर पुन्हा एकदा इथे लावावासा वाटतो: टीपः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार नक्कीच करता येऊ शकतो, त्यावर न्यायालयात अनेक खटलेही चालू आहेत. पण हा लेख मराठा समाजाविषयी शासनाचा दृष्टीकोन कसा आहे त्याविषयी आहे. लेखात उल्लेख झालेल्या काही मुद्द्यांबाबत संदर्भ खालीलप्रमाणे: मराठा समाजाच्या मागासलेपणासंबंधी सुप्रीम कोर्टाचा निकाल: परिच्छेद ३१६: https://api.sci.gov.in/supremecourt/2019/23618/23618_2019_35_1501_27992_Judgement_05-May-2021.pdf कालच्या दि १५ सप्टेंबर २०२५ च्या लोकसत्तातील दोन बातम्या: https://www.loksatta.com/nagpur/vishwas-patil-elected-as-president-of-all-india-literature-conference-amy-95-5372562/ वरील बातमी ही मराठा समाजाच्या पुढारलेपणाबाबत आहे की मागासलेपणाबाबत हे आपणच ठरवावे. तिथेच खालील बातमीही आली आहे: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-government-service-career-controversial-irregularities-during-ceo-tenure-mumbai-print-news-vsd-99-5373598/ लोकसत्ता ३ जुलै २०१७: https://www.loksatta.com/mumbai/ceo-vishwas-patil-clear-450-sra-scheme-file-before-5-days-of-retirement-1504067/ लोकसत्ता १२ सप्टेंबर २०१७: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-sra-scam-1549085/ लोकसत्ता १३ जुलै २०१८: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-scam-1712486/ संदर्भासाठी आणखी एक व्हिडिओ: https://youtu.be/Y9Uf6_oPdC8?si=4JfBarETHGs1pkwh

खटपट्या Mon, 09/22/2025 - 23:18
चांगला लेख, मुळात जरंगे यांचे आंदोलन हे फक्त मराठवाडा आणि विदर्भासाठी असावे. कारण तिकडे मराठा आणि कुणबी यांच्यातील सीमारेषा धूसर आहे. आणि सामाजिक स्थान हि सामान असावे (मी त्या भागातील नाही) जरांगे जे आंदोलन करत आहेत ते कोकणातील लोकांना (९०% लोकांना) मान्य नाही. कारण कोकणात कुणबी आणि मराठा लोकांच्या वस्त्या वेगवेगळ्या आहेत दोघात रोटी बेटी व्यवहार होत नाहीत. बाकी दोघेही गुण्यागोविंदानं नांदतात. त्यामुळे सरसकट सर्व मराठा लोकांना कुणबी घोषित करण्यात यावे या मागणीस कोकणी जनता तरी तयार होणार नाही. त्यामुळे सर्व कुणबी लोकांना सरसकट कुणबी म्हणून घोषित करण्यात यावे हे म्हणण्याचा अधिकार जरांगे यांना कोणी दिला? ज्यांच्या नोंदी चुकून मराठा झाल्या असतील आणि त्यांचे कोणी जवळचे नातेवाईक किंवा रक्ताचे नातेवाईक कुणबी असतील त्यांनी खुशाल कुणबी प्रमाणपत्रे घ्यावीत आणि फायदे घ्यावेत. (त्यातही ते ओबीसी मधून घ्यावेत कि नाही याबद्दल वाद राहिलंच) असो, पण जरांगे हे काही संपूर्ण महाराष्ट्राचे मराठा समाजाचे नेते नाहीत आणि त्यांना कोणी अधिकार दिलेले नाहीत.

धर्मराजमुटके Wed, 09/24/2025 - 17:45
मराठा आरक्षण चळवळीचा मुळ उद्देश आरक्षण मिळविणे यापेक्षा दुसर्‍याला मिळतेय ते आम्हाला खुपतेय असा असावा असा संशय घ्यायला जागा आहे. त्यांच्या ताटातलं काढता येत नाही तर आम्हालाही द्या हा अ‍ॅप्रोच नंतर आला असावा. मुळात पिढानपिढ्या एका वर्गाला आरक्षण मिळत राहिलं तर दुसर्‍या वर्गात अस्वस्थता पसरणारच हे साधं लॉजिक आहे. दलितांवर यापुर्वी किती अन्याय झाला आहे, (अन्याय झालाच आहे हे मला मान्य आहेच) आरक्षण कसं त्यांच्या हक्काचं आहे हे काहि ठराविक दशकांपर्यंत / शतकापर्यंत इतर समाजाला समजावणं शक्य आहे पण 'यावच्चंद्रदिवाकरौ' जर आरक्षण राहणार असेल तर एक ना एक दिवस इतर घटकांच्या भावनांचा कडेलोट होणारच हे उघड सत्य आहे. मुळातच कोणत्याही व्यक्तीची / घटनेची / क्रियेची सुरुवात आणि अंत होणे निसर्गनियमास धरून आहे मात्र या विषयाचा अंत कधी होईल ? होईल की नाही ? वंचितांना बरोबरीचे स्थान मिळेल की नाही हे कोणीही सांगू शकत नाही . इथे लोकांना फायदे उपटायला मागास बनायचे असते आणि समाजात वावरताना उच्चवर्गिय बनायचे असते. आरक्षणाचा मुळ हेतू वंचितांना पुढारलेल्या वर्गाच्या बरोबरीने समानतेची वागणूक मिळावी. त्यांना समाजात समान दर्जा मिळावा हा होता. तो दर्जा त्यांची शैक्षणिक, आर्थिक भरभराट झाल्यावरच होईल हा घटनाकारांचा मुळ विचार होता तो आज ७५ वर्षांनंतर देखील साध्य झाला आहे काय ? सो कॉल्ड उच्चवर्णिय उच्च पदस्थ सो कॉल्ड निम्नवर्गियास मनापासून समानतेने वागवितात की मजबूरी म्हणून वागवितात हे ज्याने त्याने आपल्या मनाला विचारावे लागेल. (तुमच्या सात पिढ्या आमची बरोबरी करु शकणार नाही हा फलक काय सांगायचे ते उघड सांगतोच आहे) असे 'यावच्चंद्रदिवाकरौ' आरक्षण पद्धत चालू ठेवण्यापेक्षा ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना एक-दोन/सात पिढ्यांना (जे काही बरोबर असेल ते) अतिप्रचंड /(अगदी अवाजवी असेल तरी देखील) आर्थिक भरपाई देऊन हा विषय संपवावा हे उत्तम. (संदर्भासाठी ज्यूंना दिलेली रिपरेशन्स). आम्हाला मागास म्हणा म्हणून आंदोलने करणार्‍या समाजाने आंदोलने करत बसण्यापेक्षा गुजराती /मारवाडी समाजाच्या पद्धतीने आपल्या समाजासाठी योगदान देऊन काही विकास करता येईल काय ते पहावा. अर्थात या विषयावर कितीही मंथन केले तरी आरक्षण आणि जात भारतातून कधीही जाईल असे वाटत नाही. पर्यायाने हा प्रश्न कधीही सुटणार नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अभ्या.. Wed, 09/24/2025 - 18:27
अर्थात या विषयावर कितीही मंथन केले तरी आरक्षण आणि जात भारतातून कधीही जाईल असे वाटत नाही. पर्यायाने हा प्रश्न कधीही सुटणार नाही. हे तर आहेच. कीती काळ आरक्षण द्यायचे? कोण देतंय आरक्षण असे समजायचे? घटनाकाराच्या मूळ हेतू ला सर्वानीच समजून घ्यायचे? कसे? वनटाईम सेटलमेंट केल्याप्रमाणे एकदमच भरपाई देऊन मिटवायचे उत्तम असे काहीही ठरले तरी इम्प्लीमेंटेशन किती अवघड आहे? एक नवे गृहयुध्द छेडण्याचा प्रकार होइल हा. अन्याय झालेले इतर वर्ग जसे की ज्यू, कृष्ण्वर्णीय, आदीवासी ह्या प्रत्येकाच्या केसीस वेगवेगळ्या आहेत. समाजासाठी योगदान देऊन विकास वगैरे लाँग टर्म गोष्टी प्रबोधन करुन किंवा अगदी शिकवून होतील असे वाट्त नाही. ती आतून येण्याची प्रक्रिया आहे. मोर्च्यात खाणे पिणे मोफत वाटणे अशा इंस्टंट योगदानाला सगळे तयार आहेत. अर्थात तुम्ही म्हणल्याप्रमाणे फायदे उपटायला मागास आणि समाजात वावरताना उच्च्वर्णीय असा दांभिकपणा असताना, घटनेला अभिप्रेत उतरंड आणि समाजातली खरी उतरंड ह्यातला फरक सतत राहणार. जातव्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षणव्यवस्था राहणार हे सर्वांनी कायमचे कोरुन घेईपर्यंत आरक्षण आणि जात भारतातून जाणार नाहीत.

सुबोध खरे गुरुवार, 09/25/2025 - 10:24
सरसकट सर्व जातींच्या आरक्षणाला क्रिमी लेयर लावा हे सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने इंद्र साहनी खटल्यात लिहिलेले आहे. आरक्षण ५० % च्या वर देणे हा गुणवत्ता धारक उमेदवारांच्या नैसर्गिक न्यायाला हरताळ फासल्या सारखे आहे असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. मुळात ५० % आरक्षण असले तरी मागास जमातींना उरलेल्या ५० % मध्ये आपल्या गुणवत्तेवर जागा घेता येतातच. जोवर जातीवर आधारित मतदान होते तोवर कोणताही राजकारणी वरील निकाल लागू करण्यात रस दाखवत नाही. मेडिकल कॉलेजच्या डींन ची मुलगी आरक्षणात सीट मिळवते आणि त्याच कॉलेजात असलेला उच्च जातीतील चपराशी आपल्या मुलाला दोन गुणांनी गेलेला प्रवेश पाहून काय विचार करेल? यातूनच अशा आरक्षणाच्या मागण्या जन्माला येतात. आज आरक्षण संपवा म्हणण्यापेक्षा आपल्या संख्याबळावर दंडेली करून आपल्या पोळीवर तूप ओढणे जास्त सोपे झाले आहे. जाट मराठा शेतकरी आंदोलने हि याची उत्तम उदाहरणे आहेत. आय ए एस असलेल्या बापाची मुलगी आय एफ एस ला आरक्षण घेते हा त्याच जातीतील गरीब उमेदवारावर झालेला भयानक अन्याय आहे. सरसकट क्रिमी लेयर लावा आणि आरक्षण ५० च्या आत ठेवा असे केल्यासच तथाकथित उच्च जातींना अन्याय झाल्याची भावना येणार नाही. आणि क्रमाक्रमाने दर पाच वर्षांनी ५ % आरक्षण कमी करत न्यावे आणि २०४७ पर्यंत आरक्षण संपुष्टात आणावे.

मारवा Sun, 09/14/2025 - 09:34
उत्तम लेख अनेक बाबी माझ्यासाठी तरी नवीन होत्या. खर्चाची बाजू तर धक्कादायकच आहे. 1 आरक्षण हा मूलभूत हक्क नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सुस्पष्टपणे आपल्या निकालात नमूद केलेले आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा असेच म्हटलेले होते. आणि हे योग्य असेच आहे. 2 आरक्षणाची 50 टक्केची भिंत पाडायची आहे असे राहुल गांधी जे वारंवार मतपेटीच्या राजकारणासाठी म्हणतात ते भारतीय घटनेनुसार अशक्य आहे. आणि हे उघडपणे विषमतेचे अन्यायाचे समर्थन आहे. 3 आता ताज्या बातमीनुसार बंजारा समाज देखील मराठा तत्त्वाच्या आधारावर आरक्षणाची मागणी करत आहे. हे सर्व चुकीचा पायंडा मराठा आरक्षणात पाडल्यामुळे निर्माण झालेलं संकट आहे. आता समाजातील दरी अजून वाढेल अगोदरच मराठा विरुद्ध ओबीसी गावपातळीवर सूक्ष्म तडा गेलेला आहे जो अर्थातच वाढत जाणार. नुकताच एका ओबीसी तरुणाने आत्महत्या केलेली आहे. 4 सर्वात महत्वाचा मुद्दा आरक्षणाचे मुख्य आकर्षण सरकारी नोकरी ही आहे. जी सर्वाधिक सुरक्षित निश्चित उत्पन्नाचे साधन आहे. मात्र जर 33 टक्के हा एकूण मराठा समाज जर आहे. आणि कमीत कमी मतदार यादी जारी कमी धरली 9 करोड तर मराठा 3 करोड आहेत. या सर्वांना सरकारी नोकऱ्या ज्या अगोदरच कमी कमी होत चाललेल्या आहेत. पुन्हा त्यातही आता पूर्वीप्रमाणे पेन्शन आदी सुविधा बंद व कमी केलेल्या आहेत. आणि पुन्हा आरक्षणातील प्रत्येकाचे percent मोजले तर एकूण इतका मोठा मराठा समाज या आरक्षण मिळाले तरी केवळ या आधाराने प्रगती करू शकेल काय ? 5 Productivity आणि Quality आणि Skill Development हेच या सर्व समस्येवरील Best possibile solution आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

In reply to by मारवा

Bhakti Sun, 09/14/2025 - 10:05
आता समाजातील दरी अजून वाढेल अगोदरच मराठा विरुद्ध ओबीसी गावपातळीवर सूक्ष्म तडा गेलेला आहे जो अर्थातच वाढत जाणार.
एकदम बरोबर.इतका काळ मित्र मैत्रिण, सहकारी मराठा असल्याची नोंदही घेतली नव्हती,गरजच पडली नाही.पण आता सतत मराठा आरक्षण मुद्द्यावरून बोलण्यात हे येते,सकाळ संध्याकाळ त्यांचे स्टेटस,लेख यावरच असतात.
सर्वात महत्वाचा मुद्दा आरक्षणाचे मुख्य आकर्षण सरकारी नोकरी ही आहे.
आणि शिक्षण हाही आहे. आपली व्यवस्था दर्जेदार शिक्षणाकडे अधिक एकाग्र झाल्याशिवाय मुळापासून या समस्या सुटणार नाही. याबाबत मात्र एक नमुद करते की मुलींना(सर्व जात व प्रवर्गातील) उच्च शिक्षण पूर्ण मोफत केले आहे.यामुळे खुप पालकांना मदत झाली व मुलींना चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन‌ दिला आहे. quality , productivity शिवाय पर्याय नाही हे बरोबरच आहे.

युयुत्सु Sun, 09/14/2025 - 09:55
Productivity आणि Quality आणि Skill Development हेच या सर्व समस्येवरील Best possible solution आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते हे कटू सत्य कुणालाही स्वीकारायचे नाहीये.

जरांगे यांची भाषा नक्कीच अयोग्य आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना आदर ठेवणे आवश्यकच आहे. त्यांनी लावलेले पोस्टर तर अपमानकारकच ठरते. त्यांचे आंदोलन बऱ्याच काळापासून सुरू असले, तरी ते चर्चेत आले ते त्यांच्या गावातील आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर. त्या वेळी फडणवीस गृहमंत्री तर शिंदे मुख्यमंत्री होते. ती घटना घडली नसती, तर कदाचित जरांगे यांना एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. विश्वास पाटील भ्रष्टाचारी असतील, पण त्यांच्यापेक्षा कमी गुण मिळवलेला व्यक्ती केवळ जातीच्या आधारावर त्यांच्या पेक्षा मोठ्या पदावर पोहोचत असेल, तर त्याबद्दल कोणालाही नाराजी वाटणे चुकीचे नाही. उद्या अशीच परिस्थिती आरक्षणाचा लाभ मिळालेल्या मराठा समाजासमोर निर्माण होऊ शकते. गुणवत्तेचा आणि कर्तृत्वाचा थेट संबंध नेहमीच लागतो असे नाही, पण निवड मुख्यत्वे त्यावरच ठरते. खासगी कंपन्यांतही हेच दिसून येते—योग्य व्यक्तींना मागे टाकून इतरांना पदोन्नती मिळाली तर त्याबद्दल नाराजी वाटणे साहजिक आहे. आंदोलनात हजारो कोटी रुपये खर्च झाले नसतील; मात्र खर्च झाला असेल तर त्यामागे स्थानिक लोकांचाही सहभाग आहे. माझ्या गावाचे उदाहरण घ्या—गावातून एक आयशर आणि एक पिक-अप गाडी आंदोलनासाठी पाठवण्यात आल्या. त्या गाड्या गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करूनच पाठवल्या. सुरुवातीला आंदोलनात खाण्याची गैरसोय होती; पण नंतर गावकडून भाकऱ्या व इतर अन्नपदार्थ पाठवले जाऊ लागले. मराठा समाजात सध्या अशी धारणा आहे की EBC आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, तर SEBC आरक्षण आधीच न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे OBC प्रवर्गातून आरक्षण मिळाले तरच ते दीर्घकाळ टिकेल, म्हणून OBC आरक्षणाची मागणी अधिक तीव्र होत आहे. यावेळी मात्र जरांगे यांनी ‘सरसकट आरक्षण’ ही मागणी जाणीवपूर्वक पुढे रेटलेली नाही. नोंदी असलेल्या लोकांनाच प्रमाणपत्रे मिळावीत, हे कायद्याला धरूनच आहे आणि त्यात काहीही चुकीचे नाही. ज्यांना आरक्षण मिळाले आहे, त्यांना तो आपला हक्कच आहे असे वाटते; त्यामुळे इतर वाटेकऱ्यांविषयी अप्रियता वाटणे स्वाभाविक आहे. मात्र न्याय आणि संतुलन राखण्यासाठी SC व ST प्रवर्गात creamy layer लागू करणे गरजेचे आहे. तसेच, OBC प्रवर्गाबाबत सुप्रीम कोर्टाने सुचविल्याप्रमाणे, एकदा का आरक्षणाच्या आधारे नोकरी मिळाली की पुढील पिढ्यांना तो लाभ देऊ नये

मारवा Sun, 09/14/2025 - 12:42
यावेळी मात्र जरांगे यांनी ‘सरसकट आरक्षण’ ही मागणी जाणीवपूर्वक पुढे रेटलेली नाही. हैद्राबाद गॅजेट लागु करण्याची मागणी करणे आणि या मागणीच्या माध्यमातुन सर्व मराठ्यांना आरक्षणाची मागणी करणे यात वेगळेपणा काय आहे ? ते गॅजेट कोर्टात टिकणार कि नाही हे पुढची गोष्ट पण आज तरी त्या गॅजेटचा वापर हा "सरसकट सर्व मराठे कुणबी ठरविणे" या हेतुनेच केलेला आहे ना ?

मारवा Sun, 09/14/2025 - 13:12
नुकतीच महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख वर्तमान पत्रात ही काहीशी गुढ जाहीरात झळकली यामध्ये देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणी फुले वाहत आहेत असे दिसत आहे. आणि केवळ "देवाभाऊ" एवढे एकच नाव लिहीलेले आहे बास्स... १- म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पुजा करत आहेत हे चांगलेच आहे पण त्याहुन महत्वाचे म्हणजे "देवाभाऊ" या देवाची ही पद्धतशीर व्यक्तीपुजा चाललेली आहे. सर्व प्रुमुख वर्तमान पत्राचे पहीले पुर्ण रंगीत पान जाहीरात ! याचा खर्च किमान काही करोडोंचा नक्कीच असेल. किती ही करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी स्वतःचा व्यक्तीगत उदो उदो करण्यासाठी ? २ शिंदे विरुद्ध फडणवीस या कोल्ड वॉर ची पण याला पार्श्वभुमी आहे. मागे शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांनी जरांगे यांचे आंदोलन "यशस्वीपणे" हाताळले. आता देवाभाऊंना ते जमणार नाही अशी अटकळ असतांना देवाभाऊ यांनी सुद्धा थेट मुंबईतील आंदोलन " यशस्वीपणे" हाताळले हाच जणु संदेश या जाहीरातीच्या माध्यमातुन दिला जात असावा ३ देवेंद्र फ्डणवीस हेच खरे मराठ्यांचे आणि मराठा आरक्षणाचे शिल्पकार आहेत. मराठा समाजाचे हितरक्षक आहेत असाही संदेश यातुन द्यायचा असेल. ४ व्यक्तीपुजा इतकी टोकाची वाढलेली आहे केंद्रातील सरकार युती सरकार किंवा बिजेपी सरकार नसुन " मोदी सरकार " असे संबोधले जाते. आणि या जाहीरातीत तर चक्क देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य इतका म्हणजे महाराष्ट्राचा उल्लेखही आणि मुख्यमंत्री पदाचा उल्लेखही नकोसा वाटतो कारण मग देवाभाऊ यावरुन फोकस पातळ होइल अशी भिती. किती म्हणजे किती ही व्यक्ती पुजा ! किती हे स्वतःचे स्वत: स्तोम माजवणे ५ प्रश्न जाहीरातीचा नाही किंवा या वेळेचा नाही पुर्वी मायावती सत्तेत होत्या तेव्हा तर त्यांनी चक्क स्वतःचेच पुतळे उत्तर प्रदेशात उभारले होते राजकारण किती व्यक्तीपुजक होत चाललयं करदात्या जनतेचा पैसा किती फालतु स्व प्रसिद्धी साठी उडवला जातो व्यर्थ खर्च होतो. मला नेहमीच एक आश्चर्य वाटत एखादा कायदा नाही का की ज्यात सत्तारुढ सरकार योजनांची वाटल्यास जाहीरात करु शकेल पण एकाही नेत्याचा फोटो शासन खर्चाने किमान जाहीरातीत तरी खर्च करण्यास प्रतिबंध असावा.

In reply to by मारवा

सुबोध खरे Mon, 09/15/2025 - 10:08
राजकारण किती व्यक्तीपुजक होत चाललयं चाललंय? ते तसं स्वातंत्र्यापासूनच होतं. गांधी आणि नेहरू नाव असलेल्या संस्था पूर्ण भारतभर हजारांनी असतील. नोटेवर फक्त महात्मा गांधींचा फोटो का होता? इंदिरा इज इंडिया एकाच घराण्याकडे पक्षाच्या सर्व पदांची वर्णी लावणे यात राजद, समाजवादी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पासून सर्वच पक्ष येतात. जयललिता किंवा करुणानिधी यांचे चार मजली कट आउट्स मी स्वतः चेन्नई मध्ये पहिले आहेत किंवा ४०००० कोटीचे "मायावती आणि त्यांचे हत्ती यांचे पुतळे " लखनौ मध्ये हि सर्व व्यक्तिपूजेची उदाहरणे डोळे झाकले तरी दिसतील अशी आहेत.

हैद्राबाद गॅझेटनुसार ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे, त्यांना दखले मिळतील. ज्यांची नोंद नाही, त्यांनी आपल्या कुळातील नातेवाईकांची नोंद दाखवावी लागेल. त्या नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र आणि नातेवाईक असल्याचा पुरावा सादर झाल्यास त्यांनाही दखले मिळतील. परंतु ज्यांची नोंद नाही आणि कुळातील नातेवाईकांचीदेखील नोंद उपलब्ध नाही, त्यांना दखले मिळणार नाहीत. हैदराबाद आणि सातारा गॅझेट हे एका विशिष्ट भुभागासाठीच लागू असेल. इतर ठिकाणी राहणारे मराठे कदाचित वगळले जातील. देवाभाऊ च्या जाहिराती महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नाहीत. कोणा एखाद्या कॉन्ट्रॅक्टर ने दिलेल्या असतील. त्याबदल्यात ED/CBI पासून सरक्षण किंवा एखाद दुसरे कॉन्ट्रॅक्ट मिळेल.

सलाम लोकमान्य टिळकांनी शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी व्यक्त केलेल्या मतावर सरकारी शिक्कामोर्तब झाले ही बाब लोकमान्यांच्या विचारांचा अभ्यासक म्हणून आमच्यासाठी खूपच उद्बोधक आहे ! बाकी, स्वधर्म, आपले अनेक विषयात टोकाचे मतभेद असले तरी ह्या लेख लिहिण्याच्या तुमच्या धैर्याला , डेरिंग ला आम्ही सलाम करतो. पण तरीही काळजी घ्या, जपा. सरकार चांगले नाही, लोकं चांगली राहिली नाहीत , काळ चांगला राहिला नाही. पाण्यात राहून माशाशी वैर करायचे नसते. एका माणसाच्या धैर्याचे फळ अख्ख्या समाजाला कसे भोगायला लागू शकते हे आम्ही 1948 मध्ये प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्या प्रसंगातील नेते कार्यकर्ते कोण होते हे देखील सर्वांना ज्ञात आहेच . तरीही तुम्ही असा लेख लिहिण्याचे धाडस केले हे आश्चर्यमुग्ध करून टाकणारे आहे . तेव्हा , जपा स्वतःला.

विवेकपटाईत Mon, 09/15/2025 - 17:40
एखाद्या समाजाला नपुंसक करायचे असेल तर त्याला आरक्षण द्या. 5 टक्के सरकारी नौकरी साठी 95 टक्के परीक्षेची तैयारी करत राहणार. नंतर बेरोजगार होणार.

स्वधर्म Tue, 09/16/2025 - 02:45
काही प्रतिसाद पाहता मला लेखाच्या सुरूवातीचा डिस्क्लेमर पुन्हा एकदा इथे लावावासा वाटतो: टीपः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार नक्कीच करता येऊ शकतो, त्यावर न्यायालयात अनेक खटलेही चालू आहेत. पण हा लेख मराठा समाजाविषयी शासनाचा दृष्टीकोन कसा आहे त्याविषयी आहे. लेखात उल्लेख झालेल्या काही मुद्द्यांबाबत संदर्भ खालीलप्रमाणे: मराठा समाजाच्या मागासलेपणासंबंधी सुप्रीम कोर्टाचा निकाल: परिच्छेद ३१६: https://api.sci.gov.in/supremecourt/2019/23618/23618_2019_35_1501_27992_Judgement_05-May-2021.pdf कालच्या दि १५ सप्टेंबर २०२५ च्या लोकसत्तातील दोन बातम्या: https://www.loksatta.com/nagpur/vishwas-patil-elected-as-president-of-all-india-literature-conference-amy-95-5372562/ वरील बातमी ही मराठा समाजाच्या पुढारलेपणाबाबत आहे की मागासलेपणाबाबत हे आपणच ठरवावे. तिथेच खालील बातमीही आली आहे: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-government-service-career-controversial-irregularities-during-ceo-tenure-mumbai-print-news-vsd-99-5373598/ लोकसत्ता ३ जुलै २०१७: https://www.loksatta.com/mumbai/ceo-vishwas-patil-clear-450-sra-scheme-file-before-5-days-of-retirement-1504067/ लोकसत्ता १२ सप्टेंबर २०१७: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-sra-scam-1549085/ लोकसत्ता १३ जुलै २०१८: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-scam-1712486/ संदर्भासाठी आणखी एक व्हिडिओ: https://youtu.be/Y9Uf6_oPdC8?si=4JfBarETHGs1pkwh

खटपट्या Mon, 09/22/2025 - 23:18
चांगला लेख, मुळात जरंगे यांचे आंदोलन हे फक्त मराठवाडा आणि विदर्भासाठी असावे. कारण तिकडे मराठा आणि कुणबी यांच्यातील सीमारेषा धूसर आहे. आणि सामाजिक स्थान हि सामान असावे (मी त्या भागातील नाही) जरांगे जे आंदोलन करत आहेत ते कोकणातील लोकांना (९०% लोकांना) मान्य नाही. कारण कोकणात कुणबी आणि मराठा लोकांच्या वस्त्या वेगवेगळ्या आहेत दोघात रोटी बेटी व्यवहार होत नाहीत. बाकी दोघेही गुण्यागोविंदानं नांदतात. त्यामुळे सरसकट सर्व मराठा लोकांना कुणबी घोषित करण्यात यावे या मागणीस कोकणी जनता तरी तयार होणार नाही. त्यामुळे सर्व कुणबी लोकांना सरसकट कुणबी म्हणून घोषित करण्यात यावे हे म्हणण्याचा अधिकार जरांगे यांना कोणी दिला? ज्यांच्या नोंदी चुकून मराठा झाल्या असतील आणि त्यांचे कोणी जवळचे नातेवाईक किंवा रक्ताचे नातेवाईक कुणबी असतील त्यांनी खुशाल कुणबी प्रमाणपत्रे घ्यावीत आणि फायदे घ्यावेत. (त्यातही ते ओबीसी मधून घ्यावेत कि नाही याबद्दल वाद राहिलंच) असो, पण जरांगे हे काही संपूर्ण महाराष्ट्राचे मराठा समाजाचे नेते नाहीत आणि त्यांना कोणी अधिकार दिलेले नाहीत.

धर्मराजमुटके Wed, 09/24/2025 - 17:45
मराठा आरक्षण चळवळीचा मुळ उद्देश आरक्षण मिळविणे यापेक्षा दुसर्‍याला मिळतेय ते आम्हाला खुपतेय असा असावा असा संशय घ्यायला जागा आहे. त्यांच्या ताटातलं काढता येत नाही तर आम्हालाही द्या हा अ‍ॅप्रोच नंतर आला असावा. मुळात पिढानपिढ्या एका वर्गाला आरक्षण मिळत राहिलं तर दुसर्‍या वर्गात अस्वस्थता पसरणारच हे साधं लॉजिक आहे. दलितांवर यापुर्वी किती अन्याय झाला आहे, (अन्याय झालाच आहे हे मला मान्य आहेच) आरक्षण कसं त्यांच्या हक्काचं आहे हे काहि ठराविक दशकांपर्यंत / शतकापर्यंत इतर समाजाला समजावणं शक्य आहे पण 'यावच्चंद्रदिवाकरौ' जर आरक्षण राहणार असेल तर एक ना एक दिवस इतर घटकांच्या भावनांचा कडेलोट होणारच हे उघड सत्य आहे. मुळातच कोणत्याही व्यक्तीची / घटनेची / क्रियेची सुरुवात आणि अंत होणे निसर्गनियमास धरून आहे मात्र या विषयाचा अंत कधी होईल ? होईल की नाही ? वंचितांना बरोबरीचे स्थान मिळेल की नाही हे कोणीही सांगू शकत नाही . इथे लोकांना फायदे उपटायला मागास बनायचे असते आणि समाजात वावरताना उच्चवर्गिय बनायचे असते. आरक्षणाचा मुळ हेतू वंचितांना पुढारलेल्या वर्गाच्या बरोबरीने समानतेची वागणूक मिळावी. त्यांना समाजात समान दर्जा मिळावा हा होता. तो दर्जा त्यांची शैक्षणिक, आर्थिक भरभराट झाल्यावरच होईल हा घटनाकारांचा मुळ विचार होता तो आज ७५ वर्षांनंतर देखील साध्य झाला आहे काय ? सो कॉल्ड उच्चवर्णिय उच्च पदस्थ सो कॉल्ड निम्नवर्गियास मनापासून समानतेने वागवितात की मजबूरी म्हणून वागवितात हे ज्याने त्याने आपल्या मनाला विचारावे लागेल. (तुमच्या सात पिढ्या आमची बरोबरी करु शकणार नाही हा फलक काय सांगायचे ते उघड सांगतोच आहे) असे 'यावच्चंद्रदिवाकरौ' आरक्षण पद्धत चालू ठेवण्यापेक्षा ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना एक-दोन/सात पिढ्यांना (जे काही बरोबर असेल ते) अतिप्रचंड /(अगदी अवाजवी असेल तरी देखील) आर्थिक भरपाई देऊन हा विषय संपवावा हे उत्तम. (संदर्भासाठी ज्यूंना दिलेली रिपरेशन्स). आम्हाला मागास म्हणा म्हणून आंदोलने करणार्‍या समाजाने आंदोलने करत बसण्यापेक्षा गुजराती /मारवाडी समाजाच्या पद्धतीने आपल्या समाजासाठी योगदान देऊन काही विकास करता येईल काय ते पहावा. अर्थात या विषयावर कितीही मंथन केले तरी आरक्षण आणि जात भारतातून कधीही जाईल असे वाटत नाही. पर्यायाने हा प्रश्न कधीही सुटणार नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अभ्या.. Wed, 09/24/2025 - 18:27
अर्थात या विषयावर कितीही मंथन केले तरी आरक्षण आणि जात भारतातून कधीही जाईल असे वाटत नाही. पर्यायाने हा प्रश्न कधीही सुटणार नाही. हे तर आहेच. कीती काळ आरक्षण द्यायचे? कोण देतंय आरक्षण असे समजायचे? घटनाकाराच्या मूळ हेतू ला सर्वानीच समजून घ्यायचे? कसे? वनटाईम सेटलमेंट केल्याप्रमाणे एकदमच भरपाई देऊन मिटवायचे उत्तम असे काहीही ठरले तरी इम्प्लीमेंटेशन किती अवघड आहे? एक नवे गृहयुध्द छेडण्याचा प्रकार होइल हा. अन्याय झालेले इतर वर्ग जसे की ज्यू, कृष्ण्वर्णीय, आदीवासी ह्या प्रत्येकाच्या केसीस वेगवेगळ्या आहेत. समाजासाठी योगदान देऊन विकास वगैरे लाँग टर्म गोष्टी प्रबोधन करुन किंवा अगदी शिकवून होतील असे वाट्त नाही. ती आतून येण्याची प्रक्रिया आहे. मोर्च्यात खाणे पिणे मोफत वाटणे अशा इंस्टंट योगदानाला सगळे तयार आहेत. अर्थात तुम्ही म्हणल्याप्रमाणे फायदे उपटायला मागास आणि समाजात वावरताना उच्च्वर्णीय असा दांभिकपणा असताना, घटनेला अभिप्रेत उतरंड आणि समाजातली खरी उतरंड ह्यातला फरक सतत राहणार. जातव्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षणव्यवस्था राहणार हे सर्वांनी कायमचे कोरुन घेईपर्यंत आरक्षण आणि जात भारतातून जाणार नाहीत.

सुबोध खरे गुरुवार, 09/25/2025 - 10:24
सरसकट सर्व जातींच्या आरक्षणाला क्रिमी लेयर लावा हे सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने इंद्र साहनी खटल्यात लिहिलेले आहे. आरक्षण ५० % च्या वर देणे हा गुणवत्ता धारक उमेदवारांच्या नैसर्गिक न्यायाला हरताळ फासल्या सारखे आहे असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. मुळात ५० % आरक्षण असले तरी मागास जमातींना उरलेल्या ५० % मध्ये आपल्या गुणवत्तेवर जागा घेता येतातच. जोवर जातीवर आधारित मतदान होते तोवर कोणताही राजकारणी वरील निकाल लागू करण्यात रस दाखवत नाही. मेडिकल कॉलेजच्या डींन ची मुलगी आरक्षणात सीट मिळवते आणि त्याच कॉलेजात असलेला उच्च जातीतील चपराशी आपल्या मुलाला दोन गुणांनी गेलेला प्रवेश पाहून काय विचार करेल? यातूनच अशा आरक्षणाच्या मागण्या जन्माला येतात. आज आरक्षण संपवा म्हणण्यापेक्षा आपल्या संख्याबळावर दंडेली करून आपल्या पोळीवर तूप ओढणे जास्त सोपे झाले आहे. जाट मराठा शेतकरी आंदोलने हि याची उत्तम उदाहरणे आहेत. आय ए एस असलेल्या बापाची मुलगी आय एफ एस ला आरक्षण घेते हा त्याच जातीतील गरीब उमेदवारावर झालेला भयानक अन्याय आहे. सरसकट क्रिमी लेयर लावा आणि आरक्षण ५० च्या आत ठेवा असे केल्यासच तथाकथित उच्च जातींना अन्याय झाल्याची भावना येणार नाही. आणि क्रमाक्रमाने दर पाच वर्षांनी ५ % आरक्षण कमी करत न्यावे आणि २०४७ पर्यंत आरक्षण संपुष्टात आणावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
टीपः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार नक्कीच करता येऊ शकतो, त्यावर न्यायालयात अनेक खटलेही चालू आहेत. पण हा लेख मराठा समाजाविषयी शासनाचा दृष्टीकोन कसा आहे त्याविषयी आहे. आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील सप्टेंबर 2025 मध्ये ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत मनोज जरांगे यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात येऊन धडकले. जरांगे यांनी उपोषण आरंभले. सर्व वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनल्स एक आणि एकच बातमी चालवू लागले ते म्हणजे मराठ्यांचे आंदोलन.

हिंदुत्ववादी आणि उजवे

उपयोजक ·

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अभ्या.. Wed, 09/10/2025 - 19:02
हा लेख टी आर पी खेचणार. प्रतिक्रिया वाचायला नंतर चक्कर मारेन. कीतीची पैज मेहेंदळे सर? . मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स.

In reply to by अभ्या..

अध्ये मध्ये काही ठरावीक शब्द पेरले नी एका अशिक्षित अडाणचोट नेत्याबद्दल खरे बोलले की त्याचे अंधभक्त अंगावर सुटतील, मग सेंचुरी कुठेच नाही गेली! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नावातकायआहे गुरुवार, 09/11/2025 - 15:38
ह्याच अशिक्षित अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. :-) भारत छोडो २.०!

In reply to by नावातकायआहे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 09/11/2025 - 18:43
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. नक्की का? हे छातीठोक पणे सांगू शकता का? मतचोरी वगैरे, अडवणूक आयोगाचा, इडीचा गैरवापर हे शब्द चंद्रावरील आहेत बहुतेक!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अभ्या.. गुरुवार, 09/11/2025 - 18:46
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. ते ईडीबद्दल, किंवा अडवणूक आयोगाबद्दलच बोलत असतील बाहुबली. ;)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नावातकायआहे Fri, 09/12/2025 - 14:44
तामिळनाडु, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, पश्चीम बंगाल मधे अजिबात मतचोरी नाही तसेच अडवणूक आयोग उत्तम काम करत आहे. तिथे हि तक्रार नाही. :-) स्वगतः धागा ऊठत नाहीये.

In reply to by नावातकायआहे

जितेंद्र आव्हाडांच्या मतदार संघातही नाही झाली म्हणे, अगदी बारीक लक्ष ठेऊन होते, अडवणूक आयोगाच्या हालचालींवर.

In reply to by नावातकायआहे

विवेकपटाईत Mon, 09/22/2025 - 16:28
शिक्षित नेत्याला अडाणी म्हणणरे निश्चित महाविद्वान श्रेणीत येतात. ही व्यक्तीगत द्वेषाची पराकाष्ठा आहे. बाकी शिक्षित असाल तर देशाची प्रगति दिसेल. आयकर अडीच लाखापासून 12 लक्ष झालेला दिसेल. एक्साइज विक्री कर सहित अनेक स्थानीय कर इत्यादि जे बजेट मध्ये दरवर्षी वाढत होते आता अर्ध्याहून कमी झाले आहे. बाकी पुढील दहावर्ष तरी मोदी किंवा योगी सहन करावे लागेल.

In reply to by अभ्या..

अभ्या.. Mon, 09/22/2025 - 15:54
मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स. माझा हा एकविसावा. दहा बारा दिवस झाले की आता. . काय शिकायचे ह्यातून? मज्जा :)

स्वधर्म Wed, 09/10/2025 - 20:06
तुंम्ही लिहिले त्याला संदर्भ काय आहे? की या तुमच्या मनातल्या कल्पना आहेत? मी सहज उजव्यांची व्याख्या पाहिली: the section of a political party or system that advocates free enterprise and private ownership, and typically favours socially traditional ideas; the conservative group or section: मला उजव्यांबाबतचे तुमचे १ ते ३ मुद्दे फारसे पटले नाहीत. विशेषतः विकासाबाबतचे. उजवे म्हणजे विकासवादी नसून समाजातल्या खालच्या स्तराकडे बघून धोरणे न ठरवता प्रस्थापित समाज, जात व समूहांनाच फायदा होईल अशी धोरणे ठरवणारे असे वाटते. विकासवादी कोणीही असू शकतो. कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच,

In reply to by स्वधर्म

उपयोजक Wed, 09/10/2025 - 20:48
हे माझे निरीक्षण आहे. भारतातल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांबद्दलचे. डावे विकासवादी असते तर केंद्रात सलग ३ वेळा भाजप आली नसती.

In reply to by उपयोजक

स्वधर्म गुरुवार, 09/11/2025 - 16:53
आपल्या देशातील मतदारांचे देव-धर्मावरील प्रेम (राममंदीर, वेगवेगळ्या गावांची नांवे हिंदू करणे इ.) आणि तर्कशुध्द विचार न करता, भावनेच्या आहारी जाऊन आश्वासनांवर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती ही कारणे आहेत. विकास हा काही फार आधिक दराने झालाय असे नाही, उलट महागाई खूप जास्त प्रमाणात वाढली आहे भाजपच्या शासनकाळात. पण असे वस्तुनिष्ठ विचार करणारे मतदार कमी व जय श्रीराम वाले जास्त, त्यामुळे...

In reply to by स्वधर्म

स्वधर्म गुरुवार, 09/11/2025 - 17:10
आपल्या समाजाची वृत्ती कशी आहे याचा. असा श्रध्दाळू, आपल्याला खरंच काय हवे आहे याचा विचार न करता देव-धर्मामागे फरपटत जाणार्‍या गर्दीने बनलेला समाज असेल तर उजवे काहीही बोलून सत्तेत येणारच. लालबागच्या राजावरील चर्चा >>> लोक लाखोंच्या संखेने गर्दी करतात. त्यामुळे अशा संस्था शेफारल्या आहेत. अशी असंख्य गणपतीची स्थापना करणारी मंडळे असतील पण लालबागलाच येणारे चित्रपट सृष्टीतील कलाकार, राजकारणी, देशाचे गृहमंत्री यामुळे अशा मंडळाना एक वलय प्राप्त होतं. आपण साध्या भोळ्या आणि फकीर माणसांना अशा चमचमाटाचं फार आकर्षण असतं. आपण त्यातले एक होऊ पाहतो तेव्हा ते पदाधिकारी आपल्या मानगुटाला धरुन ढकलून देतात पण श्रद्धेपोटी या सगळ्या लाथळ्या सहन करतो. आपण स्वत: हून ही गर्दी करतो. ही गर्दी अशीच पुढे वाढत राहणार.

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत Mon, 09/22/2025 - 16:38
उजवे समजाच्या खालच्या स्तरांच्या लोकांची आर्थिक प्रगति व्हावी या कडे विशेष लक्ष देतात. भारताच्या बाबतीत हे शंभर टक्के सत्य उतरले आहे. देशातील 50 टक्के गरीब जनतेपाशी बँक अकाऊंट नव्हते. त्यांची सबसिडी इत्यादि दलाल खाऊन जायचे. डीबीटी मुलेसरकारला साडे तीन कोटी लक्ष रुपयांची बचत झाली आणि सबसिडी खर्‍या लोकांना मिळाली. जे मोदींनी सर्वांचे बँक खाते उघडले. शाळेची स्कॉलरशिप सर्व अनुदान आणि शेतकर्‍यांना ही एफसीआय सरल खात्यात पैसे देऊ लागली. - खाद्य सब्सिडी: ₹1.85 लाख करोड़ की बचत - MGNREGS: ₹42,534 करोड़ की बचत - PM-KISAN: ₹22,106 करोड़ की बचत शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली.

In reply to by नावातकायआहे

अभ्या.. Tue, 09/23/2025 - 16:40
हा पंचविसावा, धाग्यासाठी नाही, हे असले दिवे आहेत त्यांच्यासाठी. शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली. मुद्रा लोनचा मुख्य उद्देश रोजगार निर्मीती. आता वस्तूस्थिती. ह्या आकड्यांच्या कालावधीत तब्बल ७५ हज्जार लघूउद्योग बंद पडलेत. त्यात काम करणारे किती रोजगार गेले ते पण बघा. शिशू मुद्रा लोन चे प्रमाण सर्वाधिक आहे. हे ५० हजाराचे लोन, डिस्बर्स साधारण ४६००० पर्यंत होते. ह्या रकमेत कोणता रोजगार निर्माण होतो तुम्हीच सांगा. बँकाचा एनपीए हा जवळपास १० टक्यापर्यंत गेलाय कारण नो मॉर्टगेज, हाय्येस्ट रिस्क. आधीच सरकारी बँका म्हणजे दिवा कारभार. त्यात वरुन सरकारचा टार्गेटचा दट्ट्या, लोकही स्वतःचे सिबिल खराब, चार चार लोन चालू असे असताना घरातील महिलांना पुढे करुन लोन मागतात, नाही म्हणाल्यास तक्रारींची भीती. पन्नास हजाराच्या लोन मध्ये बँका नंगा नहायेगा क्या निचोडेगा क्या ह्या स्थितीत. केवळ ग्राहक इतर सेवात वाढतील ही आशा आणि एक ना एक दिवस कुठले तरी सरकार हे लोन वेव्ह ऑफ करेल ह्या अपेक्षेत लोन वाटत आहेत. आता आकड्यांचा मोट्ठेपणा. लोन मिळाले तब्बल ३३ लक्ष कोटी पेक्षा जास्त. ह्याच कालावधीत केंद्र सरकारचे जीएस्टी कलेक्शन आहे ५५ लक्ष कोटीपेक्षा जास्त. 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले ह्यातून कीती रोजगार निर्मीती झाली ह्याचा आकडा सरकारकडे नाहीये दुर्दैवाने. जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली गोल्ड लोन घेणार्‍या लोकातही ६८ टक्के स्त्रिया आहेत, सगळ्यात कमी रिस्क असणार्‍या ह्या लोनचे प्रमाण जवळपास २० लक्ष करोड पर्यंत आहे. पण इथे ते पूर्ण फेडू न शकणार्‍यांची संख्या बघा. इथेही गरीबीच हटली का? . वस्तुस्थिती काहीही न बघता फक्त दाणदाण आकडे फेकायचे, चुका दाखवल्या, काही विचारले तर फिरकायचेच नाही. मग काय फक्त एकतर्फी प्रचारासाठी नेमलेय काय तुम्हाला?

उपयोजक Wed, 09/10/2025 - 20:56
कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच, करतात की पण सोबतच ते अल्पसंख्यकांचे लांगुलचालन , हिंदू धर्माची निंदा , हिंदू धर्माला कमी लेखणे हे सुद्धा करतात.

शेखर काळे गुरुवार, 09/11/2025 - 18:42
उजवे हे विकासाविरूध्द, परंपरा जपणारे, प्रतिगामी समजले जायचे. डावे, समाजवादी, पुरोगामी, परंपरा तोडुन समाज नवनिर्मीती करणार होतेे. हा तुम्ही मांडलेला बदल कधी झाला ?

उपयोजक Fri, 09/12/2025 - 18:37
ओली शासन नेपाळात नवतरुणांनी पळवून लावले. पुन्हा हिंदूराष्ट्र करा म्हणताहेत. म्हणजे राष्ट्र हिंदू असणे आणि कम्युनिस्ट असणे या दोन्हीत हिंदुराष्ट्र असणे अधिक लाभदायी आहे असे नेपाळच्या नवतरुणाईला वाटत आहे.

In reply to by उपयोजक

निनाद Sun, 09/14/2025 - 15:40
नेपाळमध्ये २००६ साली राजेशाही संपुष्टात आल्यानंतर आणि २००८ मध्ये देश धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित झाल्यानंतर, राजकीय स्थैर्य येईल अशी अपेक्षा होती. मात्र, मागील १७ वर्षांत नेपाळमध्ये १३ पेक्षा जास्त सरकारे बदलली. या सततच्या राजकीय अस्थिरतेमुळे लोकांचा, विशेषतः तरुणाईचा, कम्युनिस्ट सरकारांवरचा विश्वास उडाला आहे. कम्युनिस्ट सरकारांवर भ्रष्टाचार, कुशासन आणि परकीय शक्तींच्या (विशेषतः चीनच्या) प्रभावाखाली असल्याचा आरोप केला जातो. जनतेला असे वाटते की राजकीय नेत्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी सत्ता वापरली आणि देशाचा विकास थांबला. राजेशाही आणि हिंदू राष्ट्र असताना देशात अधिक स्थिरता आणि शिस्त होती! नेपाळमध्ये ८० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या हिंदू आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र ही ओळख त्यांच्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक अभिमानाचा विषय आहे. धर्मनिरपेक्षता स्वीकारल्यानंतर देशात परदेशी संस्थांनी केलेल्या धार्मिक धर्मांतरण घुसखोरीबद्दल वाढती चिंता व्यक्त केली जात आहे. काही अहवालानुसार, तुर्की आणि इतर काही देशांकडून मिळणाऱ्या निधीचा वापर नेपाळमधील गरीब आणि अनाथ मुलांना कुराण शिकवण्यासाठी केला जात आहे, ज्यामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. ही भीती तरुण हिंदू पिढीला त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अस्तित्वासाठी धोका वाटत आहे, ज्यामुळे ते पुन्हा हिंदू राष्ट्राच्या मागणीला पाठिंबा देत आहेत.

रामचंद्र Fri, 09/12/2025 - 21:46
चंद्राबाबूंच्या राजवटीत आंध्र प्रदेशातील विकासाला गती मिळाली यावर बहुतेक सर्वांचीच सहमती असावी. त्या धर्तीवर त्रिपुरा, प. बंगाल आणि केरळ या राज्यांत दीर्घकाळ कम्युनिस्ट सत्ताकालात असा लक्षणीय विकास झाला का, नसल्यास त्याची कारणे काय असावीत, कोणी सांगेल काय?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अभ्या.. Wed, 09/10/2025 - 19:02
हा लेख टी आर पी खेचणार. प्रतिक्रिया वाचायला नंतर चक्कर मारेन. कीतीची पैज मेहेंदळे सर? . मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स.

In reply to by अभ्या..

अध्ये मध्ये काही ठरावीक शब्द पेरले नी एका अशिक्षित अडाणचोट नेत्याबद्दल खरे बोलले की त्याचे अंधभक्त अंगावर सुटतील, मग सेंचुरी कुठेच नाही गेली! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नावातकायआहे गुरुवार, 09/11/2025 - 15:38
ह्याच अशिक्षित अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. :-) भारत छोडो २.०!

In reply to by नावातकायआहे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 09/11/2025 - 18:43
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. नक्की का? हे छातीठोक पणे सांगू शकता का? मतचोरी वगैरे, अडवणूक आयोगाचा, इडीचा गैरवापर हे शब्द चंद्रावरील आहेत बहुतेक!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अभ्या.. गुरुवार, 09/11/2025 - 18:46
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. ते ईडीबद्दल, किंवा अडवणूक आयोगाबद्दलच बोलत असतील बाहुबली. ;)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नावातकायआहे Fri, 09/12/2025 - 14:44
तामिळनाडु, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, पश्चीम बंगाल मधे अजिबात मतचोरी नाही तसेच अडवणूक आयोग उत्तम काम करत आहे. तिथे हि तक्रार नाही. :-) स्वगतः धागा ऊठत नाहीये.

In reply to by नावातकायआहे

जितेंद्र आव्हाडांच्या मतदार संघातही नाही झाली म्हणे, अगदी बारीक लक्ष ठेऊन होते, अडवणूक आयोगाच्या हालचालींवर.

In reply to by नावातकायआहे

विवेकपटाईत Mon, 09/22/2025 - 16:28
शिक्षित नेत्याला अडाणी म्हणणरे निश्चित महाविद्वान श्रेणीत येतात. ही व्यक्तीगत द्वेषाची पराकाष्ठा आहे. बाकी शिक्षित असाल तर देशाची प्रगति दिसेल. आयकर अडीच लाखापासून 12 लक्ष झालेला दिसेल. एक्साइज विक्री कर सहित अनेक स्थानीय कर इत्यादि जे बजेट मध्ये दरवर्षी वाढत होते आता अर्ध्याहून कमी झाले आहे. बाकी पुढील दहावर्ष तरी मोदी किंवा योगी सहन करावे लागेल.

In reply to by अभ्या..

अभ्या.. Mon, 09/22/2025 - 15:54
मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स. माझा हा एकविसावा. दहा बारा दिवस झाले की आता. . काय शिकायचे ह्यातून? मज्जा :)

स्वधर्म Wed, 09/10/2025 - 20:06
तुंम्ही लिहिले त्याला संदर्भ काय आहे? की या तुमच्या मनातल्या कल्पना आहेत? मी सहज उजव्यांची व्याख्या पाहिली: the section of a political party or system that advocates free enterprise and private ownership, and typically favours socially traditional ideas; the conservative group or section: मला उजव्यांबाबतचे तुमचे १ ते ३ मुद्दे फारसे पटले नाहीत. विशेषतः विकासाबाबतचे. उजवे म्हणजे विकासवादी नसून समाजातल्या खालच्या स्तराकडे बघून धोरणे न ठरवता प्रस्थापित समाज, जात व समूहांनाच फायदा होईल अशी धोरणे ठरवणारे असे वाटते. विकासवादी कोणीही असू शकतो. कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच,

In reply to by स्वधर्म

उपयोजक Wed, 09/10/2025 - 20:48
हे माझे निरीक्षण आहे. भारतातल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांबद्दलचे. डावे विकासवादी असते तर केंद्रात सलग ३ वेळा भाजप आली नसती.

In reply to by उपयोजक

स्वधर्म गुरुवार, 09/11/2025 - 16:53
आपल्या देशातील मतदारांचे देव-धर्मावरील प्रेम (राममंदीर, वेगवेगळ्या गावांची नांवे हिंदू करणे इ.) आणि तर्कशुध्द विचार न करता, भावनेच्या आहारी जाऊन आश्वासनांवर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती ही कारणे आहेत. विकास हा काही फार आधिक दराने झालाय असे नाही, उलट महागाई खूप जास्त प्रमाणात वाढली आहे भाजपच्या शासनकाळात. पण असे वस्तुनिष्ठ विचार करणारे मतदार कमी व जय श्रीराम वाले जास्त, त्यामुळे...

In reply to by स्वधर्म

स्वधर्म गुरुवार, 09/11/2025 - 17:10
आपल्या समाजाची वृत्ती कशी आहे याचा. असा श्रध्दाळू, आपल्याला खरंच काय हवे आहे याचा विचार न करता देव-धर्मामागे फरपटत जाणार्‍या गर्दीने बनलेला समाज असेल तर उजवे काहीही बोलून सत्तेत येणारच. लालबागच्या राजावरील चर्चा >>> लोक लाखोंच्या संखेने गर्दी करतात. त्यामुळे अशा संस्था शेफारल्या आहेत. अशी असंख्य गणपतीची स्थापना करणारी मंडळे असतील पण लालबागलाच येणारे चित्रपट सृष्टीतील कलाकार, राजकारणी, देशाचे गृहमंत्री यामुळे अशा मंडळाना एक वलय प्राप्त होतं. आपण साध्या भोळ्या आणि फकीर माणसांना अशा चमचमाटाचं फार आकर्षण असतं. आपण त्यातले एक होऊ पाहतो तेव्हा ते पदाधिकारी आपल्या मानगुटाला धरुन ढकलून देतात पण श्रद्धेपोटी या सगळ्या लाथळ्या सहन करतो. आपण स्वत: हून ही गर्दी करतो. ही गर्दी अशीच पुढे वाढत राहणार.

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत Mon, 09/22/2025 - 16:38
उजवे समजाच्या खालच्या स्तरांच्या लोकांची आर्थिक प्रगति व्हावी या कडे विशेष लक्ष देतात. भारताच्या बाबतीत हे शंभर टक्के सत्य उतरले आहे. देशातील 50 टक्के गरीब जनतेपाशी बँक अकाऊंट नव्हते. त्यांची सबसिडी इत्यादि दलाल खाऊन जायचे. डीबीटी मुलेसरकारला साडे तीन कोटी लक्ष रुपयांची बचत झाली आणि सबसिडी खर्‍या लोकांना मिळाली. जे मोदींनी सर्वांचे बँक खाते उघडले. शाळेची स्कॉलरशिप सर्व अनुदान आणि शेतकर्‍यांना ही एफसीआय सरल खात्यात पैसे देऊ लागली. - खाद्य सब्सिडी: ₹1.85 लाख करोड़ की बचत - MGNREGS: ₹42,534 करोड़ की बचत - PM-KISAN: ₹22,106 करोड़ की बचत शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली.

In reply to by नावातकायआहे

अभ्या.. Tue, 09/23/2025 - 16:40
हा पंचविसावा, धाग्यासाठी नाही, हे असले दिवे आहेत त्यांच्यासाठी. शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली. मुद्रा लोनचा मुख्य उद्देश रोजगार निर्मीती. आता वस्तूस्थिती. ह्या आकड्यांच्या कालावधीत तब्बल ७५ हज्जार लघूउद्योग बंद पडलेत. त्यात काम करणारे किती रोजगार गेले ते पण बघा. शिशू मुद्रा लोन चे प्रमाण सर्वाधिक आहे. हे ५० हजाराचे लोन, डिस्बर्स साधारण ४६००० पर्यंत होते. ह्या रकमेत कोणता रोजगार निर्माण होतो तुम्हीच सांगा. बँकाचा एनपीए हा जवळपास १० टक्यापर्यंत गेलाय कारण नो मॉर्टगेज, हाय्येस्ट रिस्क. आधीच सरकारी बँका म्हणजे दिवा कारभार. त्यात वरुन सरकारचा टार्गेटचा दट्ट्या, लोकही स्वतःचे सिबिल खराब, चार चार लोन चालू असे असताना घरातील महिलांना पुढे करुन लोन मागतात, नाही म्हणाल्यास तक्रारींची भीती. पन्नास हजाराच्या लोन मध्ये बँका नंगा नहायेगा क्या निचोडेगा क्या ह्या स्थितीत. केवळ ग्राहक इतर सेवात वाढतील ही आशा आणि एक ना एक दिवस कुठले तरी सरकार हे लोन वेव्ह ऑफ करेल ह्या अपेक्षेत लोन वाटत आहेत. आता आकड्यांचा मोट्ठेपणा. लोन मिळाले तब्बल ३३ लक्ष कोटी पेक्षा जास्त. ह्याच कालावधीत केंद्र सरकारचे जीएस्टी कलेक्शन आहे ५५ लक्ष कोटीपेक्षा जास्त. 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले ह्यातून कीती रोजगार निर्मीती झाली ह्याचा आकडा सरकारकडे नाहीये दुर्दैवाने. जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली गोल्ड लोन घेणार्‍या लोकातही ६८ टक्के स्त्रिया आहेत, सगळ्यात कमी रिस्क असणार्‍या ह्या लोनचे प्रमाण जवळपास २० लक्ष करोड पर्यंत आहे. पण इथे ते पूर्ण फेडू न शकणार्‍यांची संख्या बघा. इथेही गरीबीच हटली का? . वस्तुस्थिती काहीही न बघता फक्त दाणदाण आकडे फेकायचे, चुका दाखवल्या, काही विचारले तर फिरकायचेच नाही. मग काय फक्त एकतर्फी प्रचारासाठी नेमलेय काय तुम्हाला?

उपयोजक Wed, 09/10/2025 - 20:56
कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच, करतात की पण सोबतच ते अल्पसंख्यकांचे लांगुलचालन , हिंदू धर्माची निंदा , हिंदू धर्माला कमी लेखणे हे सुद्धा करतात.

शेखर काळे गुरुवार, 09/11/2025 - 18:42
उजवे हे विकासाविरूध्द, परंपरा जपणारे, प्रतिगामी समजले जायचे. डावे, समाजवादी, पुरोगामी, परंपरा तोडुन समाज नवनिर्मीती करणार होतेे. हा तुम्ही मांडलेला बदल कधी झाला ?

उपयोजक Fri, 09/12/2025 - 18:37
ओली शासन नेपाळात नवतरुणांनी पळवून लावले. पुन्हा हिंदूराष्ट्र करा म्हणताहेत. म्हणजे राष्ट्र हिंदू असणे आणि कम्युनिस्ट असणे या दोन्हीत हिंदुराष्ट्र असणे अधिक लाभदायी आहे असे नेपाळच्या नवतरुणाईला वाटत आहे.

In reply to by उपयोजक

निनाद Sun, 09/14/2025 - 15:40
नेपाळमध्ये २००६ साली राजेशाही संपुष्टात आल्यानंतर आणि २००८ मध्ये देश धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित झाल्यानंतर, राजकीय स्थैर्य येईल अशी अपेक्षा होती. मात्र, मागील १७ वर्षांत नेपाळमध्ये १३ पेक्षा जास्त सरकारे बदलली. या सततच्या राजकीय अस्थिरतेमुळे लोकांचा, विशेषतः तरुणाईचा, कम्युनिस्ट सरकारांवरचा विश्वास उडाला आहे. कम्युनिस्ट सरकारांवर भ्रष्टाचार, कुशासन आणि परकीय शक्तींच्या (विशेषतः चीनच्या) प्रभावाखाली असल्याचा आरोप केला जातो. जनतेला असे वाटते की राजकीय नेत्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी सत्ता वापरली आणि देशाचा विकास थांबला. राजेशाही आणि हिंदू राष्ट्र असताना देशात अधिक स्थिरता आणि शिस्त होती! नेपाळमध्ये ८० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या हिंदू आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र ही ओळख त्यांच्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक अभिमानाचा विषय आहे. धर्मनिरपेक्षता स्वीकारल्यानंतर देशात परदेशी संस्थांनी केलेल्या धार्मिक धर्मांतरण घुसखोरीबद्दल वाढती चिंता व्यक्त केली जात आहे. काही अहवालानुसार, तुर्की आणि इतर काही देशांकडून मिळणाऱ्या निधीचा वापर नेपाळमधील गरीब आणि अनाथ मुलांना कुराण शिकवण्यासाठी केला जात आहे, ज्यामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. ही भीती तरुण हिंदू पिढीला त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अस्तित्वासाठी धोका वाटत आहे, ज्यामुळे ते पुन्हा हिंदू राष्ट्राच्या मागणीला पाठिंबा देत आहेत.

रामचंद्र Fri, 09/12/2025 - 21:46
चंद्राबाबूंच्या राजवटीत आंध्र प्रदेशातील विकासाला गती मिळाली यावर बहुतेक सर्वांचीच सहमती असावी. त्या धर्तीवर त्रिपुरा, प. बंगाल आणि केरळ या राज्यांत दीर्घकाळ कम्युनिस्ट सत्ताकालात असा लक्षणीय विकास झाला का, नसल्यास त्याची कारणे काय असावीत, कोणी सांगेल काय?
बरेच भारतीय हे हिंदुत्ववादी लोक आणि उजव्या विचारांचे लोक यामध्ये गल्लत करतात. आधी बघू की हिंदुत्ववादी म्हणजे काय? १) त्यांना हिंदू धर्मातले देव ही संकल्पना मान्य असते. ते राम , कृष्ण , शंकर , हनुमान असे जे जे हिंदू धर्मातले देव आहेत ते त्यांना मान्य असतात. ते त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिकित्सा करत नाहीत. हे काहीसे आक्रमक असतात. २) ते हिंदू धर्माबद्दल चुकीच्या शब्दात केलेली टीका , निर्भत्सना यांना कडाडून विरोध करतात. ३) त्यांना हिंदू धर्मातल्या बऱ्याचशा परंपरा , हिंदू धार्मिक ग्रंथ हे मान्य असतात. ते त्यांची चिकित्सा करत बसत नाहीत.

कल्पका:

युयुत्सु ·
लेखनविषय:
काव्यरस
नास्ति भारत: देश: यत्र कल्पका: सन्ति दुर्लभा:। अपमानिता: यदा नित्यं प्रगतीस्तत्र कथं भवेत्॥ --राजीव उपाध्ये

सोबत. . . अखेरच्या क्षणांची

हेमंतकुमार ·

कर्नलतपस्वी Mon, 09/08/2025 - 12:48
लेख अतिशय महत्वाचा जाणाऱ्या साठी व मागे रहाणार्‍या साठीही. वैद्यकीय क्षेत्र अतिशय जवळून बघितल्याने बरेच अनुभव आले आहेत. काही दिवसापूर्वीच एक नात्मयातील महिला अत्यवस्थ होत्या त्याना त्यांचे मरण कळले होते जणू,त्यांनी सांगीतले मी फार तर दोन किंवा तीन दिवस तुमच्रयाबरोबर रहाणार आहे. माझी स्वताची आई जेंव्हा गेली त्याच्या एक दिवस आगोदर मला डायपर व व्हिल चेअर आणावी लागली. त्याच रात्री तीने माझ्या हाताने दुध पिवून झोपेतच प्राण सोडला. आयुष्य भर स्वताच्या पायावर खंबीर उभी असलेली माझी आई, आता अवलंबून रहावे लागणार या धसक्याने गेली असावी. कारण अशक्तपणा सोडल्यास सारे वैद्यकीय पॅरामिटर सामान्य होते. तेंव्हा आपण मांडलेले मुद्दे खरोखरच मार्गदर्शक आहेत. "फिलिंग ऑफ इम्पेंडिग डुम", अशी रुग्णाची अवस्था ओळखण्यास,समजून घेण्यास मदतच करतील.

श्वेता व्यास Mon, 09/08/2025 - 14:27
जवळच्या दोन वृद्ध वक्तींबाबत वरील बरीचशी लक्षणे जाणवली होती. आपल्या जिवलग अथवा कुटुंबीयांच्या मृत्यूची चाहूल लागणे हा कुतुहलमिश्रित दुःखद विषय असतो. अगदी खरंय ! नकळत पणे सारखं जाऊन श्वास चालू आहे का पाहणं म्हणजे आपण असं गृहीतच धरलंय की ही व्यक्ती जाणार याचा फार त्रास व्हायचा.

हेमंतकुमार Mon, 09/08/2025 - 15:31
अभिप्राय, प्रोत्साहन आणि आपल्या जवळच्या व्यक्तीसंबंधीचे अनुभव मोकळेपणाने मांडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद !
डाॅक्टरानू
हा शब्दप्रयोग भलताच आवडला आहे. कोकणी ना ?

सुधीर कांदळकर Mon, 09/08/2025 - 17:04
अनवट विषय हे अगदी खरे. हल्लीच कायप्पावर ढकलपत्रातून एक विचार आला होता. बालपण, किशोरावस्था, तारुण्य, गृहस्थ मध्यमवय, वृद्धावस्था हे जसे मानवी जीवनातील क्रमाने येणारे टप्पे आहेत तसाच मृत्यू हाही एक अपरिहार्य टप्पा मानून त्याला शक्य तेवढ्या धीराने सामोरे जावे. अर्थात हे आचरणात आणणे तेवढे सोपे नसावे. मी तर प्रायोपवेशन करणार. आपण लक्षणे दिली ते फार छान केलेत. त्यामुळे ते केव्हा सुरू करावे याचा थोडाफार अंदाज येईल. बहुधा हाताला गजरे बांधेन आणि स्वर्गात गेल्यावर रंभामेनकांवर उधळायला एक नोटांचे बंडल देखील ठेवणार असे म्हणतोय. रंभामेनकांच्या मागे गेलो तर तुम्हाला राग तर नाही येणार ना?

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार Mon, 09/08/2025 - 20:15
रंभामेनकांच्या मागे गेलो तर तुम्हाला राग तर नाही येणार ना?
राग कसला? उलट बरेच वाटेल. माणसाने इथे असले काय किंवा तिकडे असले काय, आनंदातच राहावे. तुमच्या मागोमाग काही वर्षांनी मी पण तिकडे येईन तेव्हा तुमचाच वशिला लावेन म्हणतो !

श्वेता२४ Mon, 09/08/2025 - 19:41
मी माझ्या घरातील अनेक वृद्धांची घरात/ हॉस्पिटलमध्ये बऱ्याचदा सेवा केलेली आहे. परंतू आतापर्यंत कोणाचाही मृत्यू प्रत्यक्ष जवळून पाहिलेला नाही. खरंतर तशी इच्छाही नाही. परंतु ही माहिती सर्वांनाच असणे खूप आवश्यक आहे. कारण प्रत्येक जण कधी ना कधी अशा प्रकारच्या अनुभवांना सामोरे जाणारा असतो. त्यामुळे तुमच्यासारख्या तज्ञ डॉक्टरांच्या कडून ही लक्षणे माहीत असणे व त्याबाबत एक सामान्य माणसाने काय करावे याबाबत तुम्ही दिलेल्या सल्ला अतिशय उपयुक्त आहे.

तिता Mon, 09/08/2025 - 20:03
Living Will बद्दल काही माहिती मिळेल का? नैसर्गिक मृत्यू शांतपणे आला तर चांगलेच पण जर असे नसेल तर इतरांना फार त्रास होतो. आणि आजारी माणसाला काही जाणीवच नसते. Living Will मुळे सर्वांचीच सुटका होईल.

In reply to by तिता

हेमंतकुमार Mon, 09/08/2025 - 20:17
Living Will बद्दल काही माहिती
भारतातील यासंबंधीच्या कायद्यांची माहिती देण्यासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात मार्गदर्शक केंद्र अलीकडेच सुरू झालेले आहे. त्यांच्या संस्थळावर सर्व माहिती मिळेल.

स्वधर्म Mon, 09/08/2025 - 20:18
पण पटकन वाचण्याची छाती झाली नाही. आधी प्रतिसादच वाचले. असो. वडीलांच्या मृत्यूची आठवण आली. रात्रभर ते बरळत होते व मी त्यांच्याच दवाखान्यातील खोलीत कधी जागा कधी झोपलेलो होतो. सकाळी जेंव्हा डॉ आले, तेंव्हा वडील बरेचसे शांत झाले होते. डॉक्टरांनी मला बाहेर थांबायला सांगितले व काही वेळा नंतर वडील गेले. रात्री ते नाकातील नळी काढ म्हणत होते पण मी तसे केले नाही कारण नंतर अन्न देता येणार नाही म्हणून सांगितले होते. मला कधी कधी वाटते की काढायला हवी होती नळी, म्हणजे त्यांना जाताना जरा आणखी बरे वाटले असते. राहून गेले मनात पण.

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार Wed, 09/10/2025 - 12:45
या विषयावरील पूर्वीची चर्चा या स्वतंत्र लेखात वाचता येईल. सध्या जगभरातील 196 पैकी जेमतेम डझनभर देशांमध्ये ऍक्टिव्ह इच्छामरणाचा कायदा झालेला आहे. त्याचा अद्यतन सारांश असा आहे : 1. नेदरलँडस : जगात सर्वप्रथम कायदा मंजूर (एप्रिल 2002). आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी त्याचा वापर करून जीवन संपवले. 2. Ecuador : फेब्रुवारी 2024 मध्ये कायदा लागू 3. इटली : इथे डॉक्टरांना मृत्यूचे इंजेक्शन द्यायला परवानगी नाही; ते फक्त रुग्णाला मदत करू शकतात (assisted dying) 4. पेरू : फक्त एका व्यक्तीला न्यायालयीन आदेशाने परवानगी दिली गेली. 5. पोर्तुगाल : कायदा संसदेत मंजूर झाला आहे परंतु अजून काही तांत्रिक प्रक्रिया बाकी आहे. 6. इंग्लंड : विधेयक इंग्लंडच्या संसदेत 314वि. 291 मतांनी संमत करण्यात आले. आता यथावकाश त्याचे कायद्यात रूपांतर होईल. . . भारतात अजूनही आपण पॅसिव्ह प्रकारासंबंधीच कायदा करण्याच्या टप्प्यावर आहोत. अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे येत असतात परंतु संसदेच्या पटलावर ऍक्टिव्हचा विषय यायला (?) किती वर्षे लागतील ते माहित नाही.

कर्नलतपस्वी Mon, 09/08/2025 - 12:48
लेख अतिशय महत्वाचा जाणाऱ्या साठी व मागे रहाणार्‍या साठीही. वैद्यकीय क्षेत्र अतिशय जवळून बघितल्याने बरेच अनुभव आले आहेत. काही दिवसापूर्वीच एक नात्मयातील महिला अत्यवस्थ होत्या त्याना त्यांचे मरण कळले होते जणू,त्यांनी सांगीतले मी फार तर दोन किंवा तीन दिवस तुमच्रयाबरोबर रहाणार आहे. माझी स्वताची आई जेंव्हा गेली त्याच्या एक दिवस आगोदर मला डायपर व व्हिल चेअर आणावी लागली. त्याच रात्री तीने माझ्या हाताने दुध पिवून झोपेतच प्राण सोडला. आयुष्य भर स्वताच्या पायावर खंबीर उभी असलेली माझी आई, आता अवलंबून रहावे लागणार या धसक्याने गेली असावी. कारण अशक्तपणा सोडल्यास सारे वैद्यकीय पॅरामिटर सामान्य होते. तेंव्हा आपण मांडलेले मुद्दे खरोखरच मार्गदर्शक आहेत. "फिलिंग ऑफ इम्पेंडिग डुम", अशी रुग्णाची अवस्था ओळखण्यास,समजून घेण्यास मदतच करतील.

श्वेता व्यास Mon, 09/08/2025 - 14:27
जवळच्या दोन वृद्ध वक्तींबाबत वरील बरीचशी लक्षणे जाणवली होती. आपल्या जिवलग अथवा कुटुंबीयांच्या मृत्यूची चाहूल लागणे हा कुतुहलमिश्रित दुःखद विषय असतो. अगदी खरंय ! नकळत पणे सारखं जाऊन श्वास चालू आहे का पाहणं म्हणजे आपण असं गृहीतच धरलंय की ही व्यक्ती जाणार याचा फार त्रास व्हायचा.

हेमंतकुमार Mon, 09/08/2025 - 15:31
अभिप्राय, प्रोत्साहन आणि आपल्या जवळच्या व्यक्तीसंबंधीचे अनुभव मोकळेपणाने मांडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद !
डाॅक्टरानू
हा शब्दप्रयोग भलताच आवडला आहे. कोकणी ना ?

सुधीर कांदळकर Mon, 09/08/2025 - 17:04
अनवट विषय हे अगदी खरे. हल्लीच कायप्पावर ढकलपत्रातून एक विचार आला होता. बालपण, किशोरावस्था, तारुण्य, गृहस्थ मध्यमवय, वृद्धावस्था हे जसे मानवी जीवनातील क्रमाने येणारे टप्पे आहेत तसाच मृत्यू हाही एक अपरिहार्य टप्पा मानून त्याला शक्य तेवढ्या धीराने सामोरे जावे. अर्थात हे आचरणात आणणे तेवढे सोपे नसावे. मी तर प्रायोपवेशन करणार. आपण लक्षणे दिली ते फार छान केलेत. त्यामुळे ते केव्हा सुरू करावे याचा थोडाफार अंदाज येईल. बहुधा हाताला गजरे बांधेन आणि स्वर्गात गेल्यावर रंभामेनकांवर उधळायला एक नोटांचे बंडल देखील ठेवणार असे म्हणतोय. रंभामेनकांच्या मागे गेलो तर तुम्हाला राग तर नाही येणार ना?

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार Mon, 09/08/2025 - 20:15
रंभामेनकांच्या मागे गेलो तर तुम्हाला राग तर नाही येणार ना?
राग कसला? उलट बरेच वाटेल. माणसाने इथे असले काय किंवा तिकडे असले काय, आनंदातच राहावे. तुमच्या मागोमाग काही वर्षांनी मी पण तिकडे येईन तेव्हा तुमचाच वशिला लावेन म्हणतो !

श्वेता२४ Mon, 09/08/2025 - 19:41
मी माझ्या घरातील अनेक वृद्धांची घरात/ हॉस्पिटलमध्ये बऱ्याचदा सेवा केलेली आहे. परंतू आतापर्यंत कोणाचाही मृत्यू प्रत्यक्ष जवळून पाहिलेला नाही. खरंतर तशी इच्छाही नाही. परंतु ही माहिती सर्वांनाच असणे खूप आवश्यक आहे. कारण प्रत्येक जण कधी ना कधी अशा प्रकारच्या अनुभवांना सामोरे जाणारा असतो. त्यामुळे तुमच्यासारख्या तज्ञ डॉक्टरांच्या कडून ही लक्षणे माहीत असणे व त्याबाबत एक सामान्य माणसाने काय करावे याबाबत तुम्ही दिलेल्या सल्ला अतिशय उपयुक्त आहे.

तिता Mon, 09/08/2025 - 20:03
Living Will बद्दल काही माहिती मिळेल का? नैसर्गिक मृत्यू शांतपणे आला तर चांगलेच पण जर असे नसेल तर इतरांना फार त्रास होतो. आणि आजारी माणसाला काही जाणीवच नसते. Living Will मुळे सर्वांचीच सुटका होईल.

In reply to by तिता

हेमंतकुमार Mon, 09/08/2025 - 20:17
Living Will बद्दल काही माहिती
भारतातील यासंबंधीच्या कायद्यांची माहिती देण्यासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात मार्गदर्शक केंद्र अलीकडेच सुरू झालेले आहे. त्यांच्या संस्थळावर सर्व माहिती मिळेल.

स्वधर्म Mon, 09/08/2025 - 20:18
पण पटकन वाचण्याची छाती झाली नाही. आधी प्रतिसादच वाचले. असो. वडीलांच्या मृत्यूची आठवण आली. रात्रभर ते बरळत होते व मी त्यांच्याच दवाखान्यातील खोलीत कधी जागा कधी झोपलेलो होतो. सकाळी जेंव्हा डॉ आले, तेंव्हा वडील बरेचसे शांत झाले होते. डॉक्टरांनी मला बाहेर थांबायला सांगितले व काही वेळा नंतर वडील गेले. रात्री ते नाकातील नळी काढ म्हणत होते पण मी तसे केले नाही कारण नंतर अन्न देता येणार नाही म्हणून सांगितले होते. मला कधी कधी वाटते की काढायला हवी होती नळी, म्हणजे त्यांना जाताना जरा आणखी बरे वाटले असते. राहून गेले मनात पण.

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार Wed, 09/10/2025 - 12:45
या विषयावरील पूर्वीची चर्चा या स्वतंत्र लेखात वाचता येईल. सध्या जगभरातील 196 पैकी जेमतेम डझनभर देशांमध्ये ऍक्टिव्ह इच्छामरणाचा कायदा झालेला आहे. त्याचा अद्यतन सारांश असा आहे : 1. नेदरलँडस : जगात सर्वप्रथम कायदा मंजूर (एप्रिल 2002). आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी त्याचा वापर करून जीवन संपवले. 2. Ecuador : फेब्रुवारी 2024 मध्ये कायदा लागू 3. इटली : इथे डॉक्टरांना मृत्यूचे इंजेक्शन द्यायला परवानगी नाही; ते फक्त रुग्णाला मदत करू शकतात (assisted dying) 4. पेरू : फक्त एका व्यक्तीला न्यायालयीन आदेशाने परवानगी दिली गेली. 5. पोर्तुगाल : कायदा संसदेत मंजूर झाला आहे परंतु अजून काही तांत्रिक प्रक्रिया बाकी आहे. 6. इंग्लंड : विधेयक इंग्लंडच्या संसदेत 314वि. 291 मतांनी संमत करण्यात आले. आता यथावकाश त्याचे कायद्यात रूपांतर होईल. . . भारतात अजूनही आपण पॅसिव्ह प्रकारासंबंधीच कायदा करण्याच्या टप्प्यावर आहोत. अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे येत असतात परंतु संसदेच्या पटलावर ऍक्टिव्हचा विषय यायला (?) किती वर्षे लागतील ते माहित नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
दीर्घकालीन दुर्धर आजार अनेकांच्या वाट्याला येतात. संबंधित आजाराचे सर्व उपचार करून डॉक्टर्स थकले की शेवटी रुग्णाच्या नातेवाईकांना अंतिम सल्ला दिला जातो तो म्हणजे, “आता मृत्यूची वाट पाहण्याखेरीज आपल्या हातात काही नाही”. खरंय, अशा केसेसमध्ये मृत्यू हा अंतिम आणि नैसर्गिक ‘उपाय’ ठरतो. अशा तऱ्हेने त्या रुग्णाचे आयुष्यातील अखेरचे पर्व चालू होते आणि ते किती काळ चालेल हे अनिश्चित असते. आपल्या जिवलग अथवा कुटुंबीयांच्या मृत्यूची चाहूल लागणे हा कुतुहलमिश्रित दुःखद विषय असतो. प्रत्यक्ष मृत्यू होईपर्यंत कुटुंबीय अथवा सेवक अशा कोणाला ना कोणाला तरी रुग्णाची सोबत करावी लागते.