मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ग्रोकबद्दलची किरकिर आणि तरूणांमधील कॅन्सर

युयुत्सु ·

स्वधर्म Mon, 03/31/2025 - 16:41
ग्रोकबद्दल लेख असला तरी प्राणायामाने शेवट केला आहे, म्हणून... व्यायाम जितका सूक्ष्म पातळीचा तेवढी त्याचा परिणामकारकता जास्त असा माझा अनुभव आहे. जसे की जीम > योगासने > प्राणायाम > ध्यान हे चढत्या श्रेणीने परिणाम देतात असे वाटते. याचा अर्थात वयाशीही संबंध असावा.

In reply to by स्वधर्म

युयुत्सु Mon, 03/31/2025 - 19:22
@स्वधर्म प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुमचा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि त्यावर माझी एका डॉ०बरोबर काही वर्षापूर्वी झाली होती. व्यायामाने शरीरातील सर्व यंत्रणा कार्यान्वित होतात आणि उर्जेची पातळी, चयापचय वाढतो. प्राणायाम शरीराला शांत करतो कारण परानुकंपी नाड्या (पॅरासिम्पथेटीक नर्व्हस सिस्टम) कार्यान्वित होते. त्यामुळे व्यायामानंतर प्राणायाम लगेच करू नये. व्यायाम शक्यतो सकाळी आणि प्राणायाम संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी केला तर जास्त परिणामकारक होतो. जीम आणि योगासने मूलतः वेगवेगळे आरोग्यप्राप्तीचे मार्ग आहेत, असे माझे मत आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस Mon, 03/31/2025 - 18:28
त्यांनी केलेल्या कष्टाचे पैसे त्याने का मागू नयेत? ते काही भीक मागत नाहीत. तुमच्यासाठी केलेल्या कामाचा मोबदला मागतात. एखादी गोष्ट हौसेने एक दोन वेळा करणं वेगळं आणि त्यावर अवलंबून राहून त्यांच्याकडून सतत उत्तरं मिळवत राहाणं वेगळं नाही का?

In reply to by कंजूस

तेच काम “माझी” चॅट जीपीटी फुकटात करून देते! इलॉन मस्क च आहे ना ग्रोक? इतका पैसा असून पण पैसा पैसा करतो!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

युयुत्सु Mon, 03/31/2025 - 19:28
@अमरेंद्र बाहुबली माझ्याकडे उत्तरासाठी पैसे मागत होता> मला वरील उत्तरे पैसे न टाकता मिळाली. :)

कंजूस Mon, 03/31/2025 - 18:24
Grok ने एवढं सविस्तर उत्तर शोधून दिले हे पाहून आनंद झाला. -------------------- कॅन्सर का होतो किंवा तरुणांचं का होतो याचं उत्तर त्याने ताण( stress) हे दिलं आहे. "तुम्हाला हा रोग stressमुळे झाला होता हे" असं डॉक्टरांकडून ऐकल्यावर कोणत्याही रुग्णाला बरे वाटतेच. ताण( stress) आपल्याला आहे याला रुग्ण सहमत होतोच. मग त्याने जर रोग होत असतील आणि ते आता वाढायला लागलेत याचा अर्थ पूर्वी ताण नव्हताच/ पूर्वीपेक्षा ताणाचे प्रमाण वाढले आहे / लोकांना ताण होतो त्याहीपेक्षा तुम्हाला अधिक असा होतो. किंवा पूर्वी ताणाला सहन करायची क्षमता काही लोकांच्यात अधिक असावी हेसुद्धा म्हणता येईल. प्राणायाम किंवा नामस्मरण किंवा जप करणे हे ताण पचवण्यासाठी वेळकाढूपणा आणण्याची क्लुप्ती यापलिकडे काही नसणार. ज्याचा त्याचा प्रश्न किंवा समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा म्हणता येईल. काही लोक कामाला सुरुवात करताना किंवा जीवनात मार्गक्रमण करताना यापुढे काय होईल ते पाहू, आपले आपण प्रयत्न करून नाही जमल्यास सोडून देऊ या विचाराचेही असू शकतात. म्हणजे हे लोक ताण येण्याच्या अगोदरच त्याला पचवून टाकतात. मग असं झालं किंवा ही प्रवृत्ती ठेवली तर ताणातून शारिरीक बिघाड आणि कॅन्सर होईलच कशाला. ____________ बाकी एआइ जे काही करत आहे ते स्तुत्यच आहे.

In reply to by कंजूस

युयुत्सु Mon, 03/31/2025 - 19:27
@कंजूस ते आता वाढायला लागलेत याचा अर्थ पूर्वी ताण नव्हताच/ पूर्वीपेक्षा ताणाचे प्रमाण वाढले आहे / लोकांना ताण होतो त्याहीपेक्षा तुम्हाला अधिक असा होतो.> पूर्वी ताण नव्हता असा निष्कर्ष काढणे अयोग्य होईल. पण पूर्वी प्रदूषण नक्की कमी होते. ताण + प्रदूषण हे सर्वात घातक कॉम्बिनेशन आहे याची जाणीव फार थोड्या लोकाना असते.

In reply to by युयुत्सु

कंजूस Mon, 03/31/2025 - 21:09
जाणिवा राहतात दूर अंधाऱ्या कोपऱ्यात आणि व्यवहार येतो रस्त्यावर. गावांत काही कमाई नसली की तरुण येतात शहरातल्या भणंग वस्तीत. जाणीवा जपून पोट भरत नसते. प्रदुषणाने शरिराची झीज लवकर भरून येत नाही. म्हणजे स्वच्छ कोरड्या हवेत झोपल्याने लगेच ताजेतवाने होता येते तसे शहरी प्रदुषणी हवेत होत नाही. ताण हे मानसिक आणि आर्थिक असतात. चिंता म्हणू. तीही शरिराला खाते. विज्ञानाने शोधलं भरपूर पण ते अवलंबताच येत नाही हीच अडचण आहे.

In reply to by कंजूस

युयुत्सु Tue, 04/01/2025 - 14:59
विज्ञानाने शोधलं भरपूर पण ते अवलंबताच येत नाही हीच अडचण आहे.> याबाबत मात्र सहमत. कारण निसर्गाने सर्वांना क्षमतांची समान वाटणी केलेली नाही.

चौथा कोनाडा Mon, 03/31/2025 - 19:31
किंवा पूर्वी ताणाला सहन करायची क्षमता काही लोकांच्यात अधिक असावी हेसुद्धा म्हणता येईल. प्राणायाम किंवा नामस्मरण किंवा जप करणे हे ताण पचवण्यासाठी वेळकाढूपणा आणण्याची क्लुप्ती यापलिकडे काही नसणार. ज्याचा त्याचा प्रश्न किंवा समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा म्हणता येईल. काही लोक कामाला सुरुवात करताना किंवा जीवनात मार्गक्रमण करताना यापुढे काय होईल ते पाहू, आपले आपण प्रयत्न करून नाही जमल्यास सोडून देऊ या विचाराचेही असू शकतात. म्हणजे हे लोक ताण येण्याच्या अगोदरच त्याला पचवून टाकतात. मग असं झालं किंवा ही प्रवृत्ती ठेवली तर ताणातून शारिरीक बिघाड आणि कॅन्सर होईलच कशाला.
माझ्याही मनात असाच विचार आलाय .. मोठा ताण आणि त्यवरुन मनात तणाव निर्माण होणे याला अनेक वेळा सामोरे गेलोय ... देवाची किंवा कोणत्याही बाबा, स्वामी, महारा़ज यांना प्रार्थना करत बसलो नाही. स्व-समुपदेशनाने ताण घालवण्यास बराच उपयोग झाला. उत्तम छंद आणि कला यामुळे झाले असावे का ? योग- प्राणायाम मी क्वचितच करतो.

In reply to by चौथा कोनाडा

युयुत्सु Mon, 03/31/2025 - 19:37
देवाची किंवा कोणत्याही बाबा, स्वामी, महारा़ज यांना प्रार्थना करत बसलो नाही.> माफक प्रमाणात देवधर्म, जपजाप्य याचे आधुनिक विज्ञानाला तसे वावडे नाही. पण त्याचे अवडंबर माजवणे, बाबा/बुवांच्या आहारी जाऊन आयुष्याचा ताबा बाबा/बुवाना देणे आणि स्वत्व गमावणे धोकादायक आहे.

सुबोध खरे गुरुवार, 04/03/2025 - 10:06
कर्करोग हा आधुनिक काळाचा शाप आहे हा एक मोठा गैरसमज आहे. इजिप्त मधील ममीज मध्ये हाडाचा , स्तनांचा आणि प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग तसाच ल्युकेमिया सापडला आहे. याचा अर्थ कर्करोग हा आधुनिक काळाचा शाप आहे हे गृहीतक मुळापासूनच चूक आहे. https://www.oncnursingnews.com/view/oldest-known-cancer-cases-found-in-egyptian-mummies https://www.science.org/content/article/mummy-has-oldest-case-prostate-cancer-ancient-egypt तसेच जुन्या काळात ताणतणाव नव्हता हा तितकाच मोठा गैरसमज. निसर्गाच्या भयंकर तांडवाबद्दल असलेले असंख्य गैरसमज हे मोठ्याप्रमाणात तणाव निर्माण करत असत. उदा ढगफुटी पासून ते भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी आणि वर्षानुवर्षे पडणारा दुष्काळ. याशिवाय उद्याचे जेवण मिळेल कि नाही पासून हिंस्त्र श्वापदे साप विंचू यांशी होणार रोजचा सामना हे मानवाचे ताणतणाव वाढवणारे असंख्य मुद्दे होतेच. केवळ १०० वर्षांपूर्वी अकाली मृत्यू होणे हि सामान्य बाब होती यामुळे येणारी मानसिक अस्थिरता स्त्रियांची रोजची होती स्त्रियांची असंख्य व्रतवैकल्ये यापासून मानसिक आधार शोधण्यासाठीच तर जन्माला आली. १९४७ साली आपले सरासरी आयुष्यमान ३२ होते. म्हणजेच सामान्य जनता अशा कर्करोगासारख्या दुर्धर रोगाचा सामना होण्याअगोदरच कैलासवासी होत असे. हे म्हणजे युद्धात निघण्यापूर्वीच साप चावून मृत्यू येण्यासारखे होते. बाकी आधुनिक काळातील प्रदूषण हे म्हणजे कुणीही कधी ही पिळावी अशी बेवारशी बकरी आहे. घरगुती चुलीच्या प्रदूषणामुळे होणारे असंख्य मृत्यू याकडे लक्ष घालणे आवश्यक आहे. Poverty condemns half of humanity across the globe to cook with solid fuels on inefficient stoves. Smoke in homes from these cook stoves is the fourth greatest risk factor for death and disease in the world’s poorest countries, and is linked to 1.6 million deaths per year. https://www.co2balance.com/smoke-the-killer-in-the-kitchen/ NEW DELHI: Indoor air pollution (IAP), resulting from chulhas burning wood, coal and animal dung as fuel, is claiming a shocking 500,000 lives in India every year, most of whom are women and children. According to the World Health Organisation, India accounts for 80% of the 600,000 premature deaths that occur in south-east Asia annually due to exposure to IAP. https://timesofindia.indiatimes.com/india/indoor-air-pollution-is-the-biggest-killer/articleshow/1790711.cms बाकी ताणतणावामुळे कोणताही रोग होते हे बऱ्याच अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या स्वमतांध लोकांचे आवडते गृहीतक आहे. उत्तम उदाहरण म्हणजे एके काळी सिफिलिस हा गुप्तरोग सुद्धा ताणतणावामुळे होतो असा मोठा गैरसमज त्याकाळातील अतिहुशार लोकांनी पस्रवलेला होता. अर्थात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांनी हा रोग treponema pallidum या जंतूंमुळे होतो आणि नंतर त्यावर पेनिसिलीनसारखे रामबाण औषध निघाल्यामुळे हा रोग आता औषधालाही दिसत नाही हि एक गंमत आहे. गुणसूत्रांवरील चार बुकं वाचून आणि ग्रोक बिक वापरून काही दिवसात डॉक्टर होणे हे तितके सोपे नाही

In reply to by सुबोध खरे

दीपक११७७ गुरुवार, 04/03/2025 - 13:52
यावरून शहरात प्रदूषणामुळे ....किडकी बीजे तयार होतात... त्यातून किडके मुलं जन्माला येतात या संशोधनाला छेद जातो

विवेकपटाईत Mon, 04/14/2025 - 08:25
एआई ग्रोक असो की इतर, अंतरजालावर जे फीड असेल तेच उत्तर येईल. जर एखाद्या विषयात चुकीची फीड जास्त असेल तर चुकीचे उत्तर मिळेल. त्यामुळे एआई 100 टक्के विश्वास ठेवणे केंव्हाही उचित नाही.

In reply to by विवेकपटाईत

युयुत्सु Mon, 04/14/2025 - 08:41
श्री० पटाईत, तुमचे ए०आय० चे ज्ञान फारच जुजबी आहे, असे खेदाने म्हणावे लागते आणी तुमच्या लिखाणाची एकूण खोली बघता, तसेच काही इतर बाबी लक्षात घेता त्यात फार भर पडेल असेही वाटत नाही.

In reply to by युयुत्सु

चित्रगुप्त Mon, 04/14/2025 - 22:40
'क' व्यक्ती 'ख' विषयी जे बोलते, त्यातून ऐकण्या - वाचणार्‍याला 'ख' पेक्षा 'क' विषयीच जास्त माहिती मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद. असो.

In reply to by चित्रगुप्त

युयुत्सु Tue, 04/15/2025 - 07:03
श्री० चित्रगुप्त, एकदम बरोबर बोललात. मला पण अशीच माहिती खालील प्रतिसादाच्या भाषेतून मिळाली होती.
बाकी ज्याच्या डोक्यात फक्त एका व्यक्तीच्या द्वेषापाई गोबर भरलेले असते त्याला सर्वत्र गाय शेण गोबर दिसणार. हे साहजिक आहे.
https://www.misalpav.com/comment/1191564#comment-1191564

चित्रगुप्त Tue, 04/15/2025 - 14:34
अगदी. ही गोष्ट सार्वत्रिकच आहेसे दिसते. ('अगदी' हा शब्द आपण अगदी सहजतेने वापरतो, पण आत्ता जरा निवांतपणे अ-ग- दी असा वाचल्यावर अंमळ मौज वाटली. अजबच शब्द आहे हा. याची व्युत्पत्ती कुणाला ठाऊक आहे का ?

स्वधर्म Mon, 03/31/2025 - 16:41
ग्रोकबद्दल लेख असला तरी प्राणायामाने शेवट केला आहे, म्हणून... व्यायाम जितका सूक्ष्म पातळीचा तेवढी त्याचा परिणामकारकता जास्त असा माझा अनुभव आहे. जसे की जीम > योगासने > प्राणायाम > ध्यान हे चढत्या श्रेणीने परिणाम देतात असे वाटते. याचा अर्थात वयाशीही संबंध असावा.

In reply to by स्वधर्म

युयुत्सु Mon, 03/31/2025 - 19:22
@स्वधर्म प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुमचा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि त्यावर माझी एका डॉ०बरोबर काही वर्षापूर्वी झाली होती. व्यायामाने शरीरातील सर्व यंत्रणा कार्यान्वित होतात आणि उर्जेची पातळी, चयापचय वाढतो. प्राणायाम शरीराला शांत करतो कारण परानुकंपी नाड्या (पॅरासिम्पथेटीक नर्व्हस सिस्टम) कार्यान्वित होते. त्यामुळे व्यायामानंतर प्राणायाम लगेच करू नये. व्यायाम शक्यतो सकाळी आणि प्राणायाम संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी केला तर जास्त परिणामकारक होतो. जीम आणि योगासने मूलतः वेगवेगळे आरोग्यप्राप्तीचे मार्ग आहेत, असे माझे मत आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस Mon, 03/31/2025 - 18:28
त्यांनी केलेल्या कष्टाचे पैसे त्याने का मागू नयेत? ते काही भीक मागत नाहीत. तुमच्यासाठी केलेल्या कामाचा मोबदला मागतात. एखादी गोष्ट हौसेने एक दोन वेळा करणं वेगळं आणि त्यावर अवलंबून राहून त्यांच्याकडून सतत उत्तरं मिळवत राहाणं वेगळं नाही का?

In reply to by कंजूस

तेच काम “माझी” चॅट जीपीटी फुकटात करून देते! इलॉन मस्क च आहे ना ग्रोक? इतका पैसा असून पण पैसा पैसा करतो!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

युयुत्सु Mon, 03/31/2025 - 19:28
@अमरेंद्र बाहुबली माझ्याकडे उत्तरासाठी पैसे मागत होता> मला वरील उत्तरे पैसे न टाकता मिळाली. :)

कंजूस Mon, 03/31/2025 - 18:24
Grok ने एवढं सविस्तर उत्तर शोधून दिले हे पाहून आनंद झाला. -------------------- कॅन्सर का होतो किंवा तरुणांचं का होतो याचं उत्तर त्याने ताण( stress) हे दिलं आहे. "तुम्हाला हा रोग stressमुळे झाला होता हे" असं डॉक्टरांकडून ऐकल्यावर कोणत्याही रुग्णाला बरे वाटतेच. ताण( stress) आपल्याला आहे याला रुग्ण सहमत होतोच. मग त्याने जर रोग होत असतील आणि ते आता वाढायला लागलेत याचा अर्थ पूर्वी ताण नव्हताच/ पूर्वीपेक्षा ताणाचे प्रमाण वाढले आहे / लोकांना ताण होतो त्याहीपेक्षा तुम्हाला अधिक असा होतो. किंवा पूर्वी ताणाला सहन करायची क्षमता काही लोकांच्यात अधिक असावी हेसुद्धा म्हणता येईल. प्राणायाम किंवा नामस्मरण किंवा जप करणे हे ताण पचवण्यासाठी वेळकाढूपणा आणण्याची क्लुप्ती यापलिकडे काही नसणार. ज्याचा त्याचा प्रश्न किंवा समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा म्हणता येईल. काही लोक कामाला सुरुवात करताना किंवा जीवनात मार्गक्रमण करताना यापुढे काय होईल ते पाहू, आपले आपण प्रयत्न करून नाही जमल्यास सोडून देऊ या विचाराचेही असू शकतात. म्हणजे हे लोक ताण येण्याच्या अगोदरच त्याला पचवून टाकतात. मग असं झालं किंवा ही प्रवृत्ती ठेवली तर ताणातून शारिरीक बिघाड आणि कॅन्सर होईलच कशाला. ____________ बाकी एआइ जे काही करत आहे ते स्तुत्यच आहे.

In reply to by कंजूस

युयुत्सु Mon, 03/31/2025 - 19:27
@कंजूस ते आता वाढायला लागलेत याचा अर्थ पूर्वी ताण नव्हताच/ पूर्वीपेक्षा ताणाचे प्रमाण वाढले आहे / लोकांना ताण होतो त्याहीपेक्षा तुम्हाला अधिक असा होतो.> पूर्वी ताण नव्हता असा निष्कर्ष काढणे अयोग्य होईल. पण पूर्वी प्रदूषण नक्की कमी होते. ताण + प्रदूषण हे सर्वात घातक कॉम्बिनेशन आहे याची जाणीव फार थोड्या लोकाना असते.

In reply to by युयुत्सु

कंजूस Mon, 03/31/2025 - 21:09
जाणिवा राहतात दूर अंधाऱ्या कोपऱ्यात आणि व्यवहार येतो रस्त्यावर. गावांत काही कमाई नसली की तरुण येतात शहरातल्या भणंग वस्तीत. जाणीवा जपून पोट भरत नसते. प्रदुषणाने शरिराची झीज लवकर भरून येत नाही. म्हणजे स्वच्छ कोरड्या हवेत झोपल्याने लगेच ताजेतवाने होता येते तसे शहरी प्रदुषणी हवेत होत नाही. ताण हे मानसिक आणि आर्थिक असतात. चिंता म्हणू. तीही शरिराला खाते. विज्ञानाने शोधलं भरपूर पण ते अवलंबताच येत नाही हीच अडचण आहे.

In reply to by कंजूस

युयुत्सु Tue, 04/01/2025 - 14:59
विज्ञानाने शोधलं भरपूर पण ते अवलंबताच येत नाही हीच अडचण आहे.> याबाबत मात्र सहमत. कारण निसर्गाने सर्वांना क्षमतांची समान वाटणी केलेली नाही.

चौथा कोनाडा Mon, 03/31/2025 - 19:31
किंवा पूर्वी ताणाला सहन करायची क्षमता काही लोकांच्यात अधिक असावी हेसुद्धा म्हणता येईल. प्राणायाम किंवा नामस्मरण किंवा जप करणे हे ताण पचवण्यासाठी वेळकाढूपणा आणण्याची क्लुप्ती यापलिकडे काही नसणार. ज्याचा त्याचा प्रश्न किंवा समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा म्हणता येईल. काही लोक कामाला सुरुवात करताना किंवा जीवनात मार्गक्रमण करताना यापुढे काय होईल ते पाहू, आपले आपण प्रयत्न करून नाही जमल्यास सोडून देऊ या विचाराचेही असू शकतात. म्हणजे हे लोक ताण येण्याच्या अगोदरच त्याला पचवून टाकतात. मग असं झालं किंवा ही प्रवृत्ती ठेवली तर ताणातून शारिरीक बिघाड आणि कॅन्सर होईलच कशाला.
माझ्याही मनात असाच विचार आलाय .. मोठा ताण आणि त्यवरुन मनात तणाव निर्माण होणे याला अनेक वेळा सामोरे गेलोय ... देवाची किंवा कोणत्याही बाबा, स्वामी, महारा़ज यांना प्रार्थना करत बसलो नाही. स्व-समुपदेशनाने ताण घालवण्यास बराच उपयोग झाला. उत्तम छंद आणि कला यामुळे झाले असावे का ? योग- प्राणायाम मी क्वचितच करतो.

In reply to by चौथा कोनाडा

युयुत्सु Mon, 03/31/2025 - 19:37
देवाची किंवा कोणत्याही बाबा, स्वामी, महारा़ज यांना प्रार्थना करत बसलो नाही.> माफक प्रमाणात देवधर्म, जपजाप्य याचे आधुनिक विज्ञानाला तसे वावडे नाही. पण त्याचे अवडंबर माजवणे, बाबा/बुवांच्या आहारी जाऊन आयुष्याचा ताबा बाबा/बुवाना देणे आणि स्वत्व गमावणे धोकादायक आहे.

सुबोध खरे गुरुवार, 04/03/2025 - 10:06
कर्करोग हा आधुनिक काळाचा शाप आहे हा एक मोठा गैरसमज आहे. इजिप्त मधील ममीज मध्ये हाडाचा , स्तनांचा आणि प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग तसाच ल्युकेमिया सापडला आहे. याचा अर्थ कर्करोग हा आधुनिक काळाचा शाप आहे हे गृहीतक मुळापासूनच चूक आहे. https://www.oncnursingnews.com/view/oldest-known-cancer-cases-found-in-egyptian-mummies https://www.science.org/content/article/mummy-has-oldest-case-prostate-cancer-ancient-egypt तसेच जुन्या काळात ताणतणाव नव्हता हा तितकाच मोठा गैरसमज. निसर्गाच्या भयंकर तांडवाबद्दल असलेले असंख्य गैरसमज हे मोठ्याप्रमाणात तणाव निर्माण करत असत. उदा ढगफुटी पासून ते भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी आणि वर्षानुवर्षे पडणारा दुष्काळ. याशिवाय उद्याचे जेवण मिळेल कि नाही पासून हिंस्त्र श्वापदे साप विंचू यांशी होणार रोजचा सामना हे मानवाचे ताणतणाव वाढवणारे असंख्य मुद्दे होतेच. केवळ १०० वर्षांपूर्वी अकाली मृत्यू होणे हि सामान्य बाब होती यामुळे येणारी मानसिक अस्थिरता स्त्रियांची रोजची होती स्त्रियांची असंख्य व्रतवैकल्ये यापासून मानसिक आधार शोधण्यासाठीच तर जन्माला आली. १९४७ साली आपले सरासरी आयुष्यमान ३२ होते. म्हणजेच सामान्य जनता अशा कर्करोगासारख्या दुर्धर रोगाचा सामना होण्याअगोदरच कैलासवासी होत असे. हे म्हणजे युद्धात निघण्यापूर्वीच साप चावून मृत्यू येण्यासारखे होते. बाकी आधुनिक काळातील प्रदूषण हे म्हणजे कुणीही कधी ही पिळावी अशी बेवारशी बकरी आहे. घरगुती चुलीच्या प्रदूषणामुळे होणारे असंख्य मृत्यू याकडे लक्ष घालणे आवश्यक आहे. Poverty condemns half of humanity across the globe to cook with solid fuels on inefficient stoves. Smoke in homes from these cook stoves is the fourth greatest risk factor for death and disease in the world’s poorest countries, and is linked to 1.6 million deaths per year. https://www.co2balance.com/smoke-the-killer-in-the-kitchen/ NEW DELHI: Indoor air pollution (IAP), resulting from chulhas burning wood, coal and animal dung as fuel, is claiming a shocking 500,000 lives in India every year, most of whom are women and children. According to the World Health Organisation, India accounts for 80% of the 600,000 premature deaths that occur in south-east Asia annually due to exposure to IAP. https://timesofindia.indiatimes.com/india/indoor-air-pollution-is-the-biggest-killer/articleshow/1790711.cms बाकी ताणतणावामुळे कोणताही रोग होते हे बऱ्याच अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या स्वमतांध लोकांचे आवडते गृहीतक आहे. उत्तम उदाहरण म्हणजे एके काळी सिफिलिस हा गुप्तरोग सुद्धा ताणतणावामुळे होतो असा मोठा गैरसमज त्याकाळातील अतिहुशार लोकांनी पस्रवलेला होता. अर्थात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांनी हा रोग treponema pallidum या जंतूंमुळे होतो आणि नंतर त्यावर पेनिसिलीनसारखे रामबाण औषध निघाल्यामुळे हा रोग आता औषधालाही दिसत नाही हि एक गंमत आहे. गुणसूत्रांवरील चार बुकं वाचून आणि ग्रोक बिक वापरून काही दिवसात डॉक्टर होणे हे तितके सोपे नाही

In reply to by सुबोध खरे

दीपक११७७ गुरुवार, 04/03/2025 - 13:52
यावरून शहरात प्रदूषणामुळे ....किडकी बीजे तयार होतात... त्यातून किडके मुलं जन्माला येतात या संशोधनाला छेद जातो

विवेकपटाईत Mon, 04/14/2025 - 08:25
एआई ग्रोक असो की इतर, अंतरजालावर जे फीड असेल तेच उत्तर येईल. जर एखाद्या विषयात चुकीची फीड जास्त असेल तर चुकीचे उत्तर मिळेल. त्यामुळे एआई 100 टक्के विश्वास ठेवणे केंव्हाही उचित नाही.

In reply to by विवेकपटाईत

युयुत्सु Mon, 04/14/2025 - 08:41
श्री० पटाईत, तुमचे ए०आय० चे ज्ञान फारच जुजबी आहे, असे खेदाने म्हणावे लागते आणी तुमच्या लिखाणाची एकूण खोली बघता, तसेच काही इतर बाबी लक्षात घेता त्यात फार भर पडेल असेही वाटत नाही.

In reply to by युयुत्सु

चित्रगुप्त Mon, 04/14/2025 - 22:40
'क' व्यक्ती 'ख' विषयी जे बोलते, त्यातून ऐकण्या - वाचणार्‍याला 'ख' पेक्षा 'क' विषयीच जास्त माहिती मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद. असो.

In reply to by चित्रगुप्त

युयुत्सु Tue, 04/15/2025 - 07:03
श्री० चित्रगुप्त, एकदम बरोबर बोललात. मला पण अशीच माहिती खालील प्रतिसादाच्या भाषेतून मिळाली होती.
बाकी ज्याच्या डोक्यात फक्त एका व्यक्तीच्या द्वेषापाई गोबर भरलेले असते त्याला सर्वत्र गाय शेण गोबर दिसणार. हे साहजिक आहे.
https://www.misalpav.com/comment/1191564#comment-1191564

चित्रगुप्त Tue, 04/15/2025 - 14:34
अगदी. ही गोष्ट सार्वत्रिकच आहेसे दिसते. ('अगदी' हा शब्द आपण अगदी सहजतेने वापरतो, पण आत्ता जरा निवांतपणे अ-ग- दी असा वाचल्यावर अंमळ मौज वाटली. अजबच शब्द आहे हा. याची व्युत्पत्ती कुणाला ठाऊक आहे का ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
ग्रोकबद्दलची किरकिर आणि तरूणांमधील कॅन्सर ========================= भारतीय समाजात अजुनही ए०आय० बद्दल जी किरकिर चालू आहे, त्यामुळे मी खूप व्यथित झालो आहे. त्यात "ग्रोक" या ए०आय० वर बरेच जण चिखलफेक करत असल्याने मला ग्रोक बद्दल उत्सूकता निर्माण झाली आणि तथ्य शोधायला सुरुवात केली. माझ्या ग्रोक बरोबरच्या संवादात त्याने मला कोणतीच तर्‍हेवाईक उत्तरे दिली नाहीत, पण त्याने केलेल्या "लिटरेचर सर्व्हेने" मी अचंबित झालो. नेमके याच वेळेस माझ्या ओळखीच्या एका डॉ०नी मला एका सेमिनारमध्ये व्याख्यान देणार असल्याचे सांगितले.

बाजाराचा कल : ३१ मार्चचा आठवडा

युयुत्सु ·

युयुत्सु Sun, 03/30/2025 - 09:57
मंडळी, मार्केटमध्ये जेव्हा रॅली येते तेव्हा ती टिकाऊ असते का या बाबत मतमतांतरे व्यक्त होतात. अशा वेळेला विश्वास नक्की कुणावर ठेवायचा? टिकाऊ रॅलीची काही संख्या शास्त्रीय वैशिष्ट्ये असतात. आत्ताच २१ मार्चला संपलेल्या आठवड्यात मार्केटने अपेक्षेप्रमाणे उसळी मारली. पण ही टिकाऊ आहे की नाही यावर काही तज्‍ज्ञांनी शंका व्यक्त केल्या. मी यातले तथ्य तपासण्यासाठी एक संख्याशास्त्रीय़ चाचणी (माझ्या आकलनानुसार) वापरून तपासायचे ठरवले. त्या अगोदर ही चाचणी भूतकाळातील टिकाऊ उसळ्या व्यवस्थित ओळखते का हे डीपसिकच्या मदतीने तपासले. माझे प्राथमिक समाधान झाल्याने २१ मार्चला संपलेल्या आठवड्यातील रॅलीला ही कसोटी लावून बघितली. तेव्हा ही रॅली टिकाऊ नाही असे उत्तर मिळाले. याचा एक अर्थ असा की अजूनही मोठ्या गुंतवणूकदारांना भारताच्या आर्थिक भविष्यावर तितकासा विश्वास नाही... आजच्या ’शुभ’ दिवशी नकारात्मक सूर आळवल्याबद्दल क्षमस्व, पण शेवटी गणित हे गणित असतं आणि तिथे भावनेला स्थान नसते...

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Sun, 03/30/2025 - 10:03
आजच्या ’शुभ’ दिवशी नकारात्मक सूर आळवल्याबद्दल क्षमस्व, पण शेवटी गणित हे गणित असतं आणि तिथे भावनेला स्थान नसते...
आजच्या शुभ दिवशी , आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या भाकिता ला जास्त किंमत आहे , मुहूर्तावर खरेदी करण्याच्या प्रथे पेक्षा ... गुढी पाडव्याच्या शुभेच्छा ! सर्वाना ...

वामन देशमुख Tue, 04/01/2025 - 09:46
या नि पुढच्या आठवड्यात कामाचे चार दिवस आहेत, त्यापुढच्या आठवड्यात तर तीनच दिवस आहेत. तुमच्या prediction (अंदाज?) मध्ये हे गृहीत धरले आहे का? त्याने काही फरक पडतो का? ---
नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
धन्स्! सर्व व्यापारी, गुंतवणूकदार यांना हे वर्ष भरपूर नफ्याचे व परताव्याचे जावो ही शुभेच्छा!

In reply to by वामन देशमुख

युयुत्सु Tue, 04/01/2025 - 11:49
पण ते जाऊ दे... समजा यामूळे जरी भाकीत चुकले तरी मॉडेल स्वत:ला अ‍ॅडजस्ट करते आणि पुढच्या भाकीतासाठी तयार होते. तेव्हा या कालावधीतील भाकीते जास्त काळजीपूर्वक घेणे किंवा भाकीतेच न करणे ... हा हा हा!

युयुत्सु Tue, 04/01/2025 - 11:35
तुमच्या prediction (अंदाज?) मध्ये हे गृहीत धरले आहे का? त्याने काही फरक पडतो का?> प्रश्न चांगला आहे. याचा माझ्या मॉडेल मध्ये विचार केलेला नाही. त्याची सध्या तरी आवश्यकता वाटत नाही कारण त्याचा विचार न करता भाकीते ब-यापैकी बरोबर ठरत आहेत. कामकाजाचे दिवस वाढले तर भाकीत चुकायची शक्यता आहे - कारण अधिक वेळ मिळाल्याने अधिक शक्यता निर्माण होतात. त्यामुळे भाकीत चुकू शकते. तसंच मला या पेक्षा प्रभावी घटक म्हणजे जागतिक बाजारांचा समावेश करायला आवडेल (ते आपल्या बाजारांवर प्रभाव पाडतात) पण सध्या माझ्याकडे पुरेशी कंप्युट पॉवर नाही आणि विश्वासार्ह आणि अखंडित डेटा नाही. तेव्हा सध्या जोपर्यंत I5+8GB आणि I7+16GB या दोन मशिन्स वर भागतंय तेव्हढ पुरेसे आहे. स्वगत - शेवटी आपण भारतीय "भागवा-भागवीमध्ये" आयुष्य घालवऊन तृप्तीच्या ढेकरा देणार...

In reply to by युयुत्सु

वामन देशमुख Fri, 04/04/2025 - 10:05
आज शेवटचा दिवस आहे. बाजार तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे दक्षिणेकडे जात आहे.
स्वगत - शेवटी आपण भारतीय "भागवा-भागवीमध्ये" आयुष्य घालवऊन तृप्तीच्या ढेकरा देणार...
मतभिन्नतेच्या आदरासहित: स्वतःच्याच, चांगल्या विषयावर काढलेल्या लेखमालेवर तुम्ही स्वतःच (वादाला तोंड फुटू शकते असे) अवांतर करू नये असे वाटते. आधीच चांगली-चांगली मिपाखरे इथल्या कर्कश्य कबुतरांच्या त्रासाला कंटाळून इथून उडून गेली आहेत, जी राहिली आहेत तीही जायला नकोत.

युयुत्सु Sun, 03/30/2025 - 09:57
मंडळी, मार्केटमध्ये जेव्हा रॅली येते तेव्हा ती टिकाऊ असते का या बाबत मतमतांतरे व्यक्त होतात. अशा वेळेला विश्वास नक्की कुणावर ठेवायचा? टिकाऊ रॅलीची काही संख्या शास्त्रीय वैशिष्ट्ये असतात. आत्ताच २१ मार्चला संपलेल्या आठवड्यात मार्केटने अपेक्षेप्रमाणे उसळी मारली. पण ही टिकाऊ आहे की नाही यावर काही तज्‍ज्ञांनी शंका व्यक्त केल्या. मी यातले तथ्य तपासण्यासाठी एक संख्याशास्त्रीय़ चाचणी (माझ्या आकलनानुसार) वापरून तपासायचे ठरवले. त्या अगोदर ही चाचणी भूतकाळातील टिकाऊ उसळ्या व्यवस्थित ओळखते का हे डीपसिकच्या मदतीने तपासले. माझे प्राथमिक समाधान झाल्याने २१ मार्चला संपलेल्या आठवड्यातील रॅलीला ही कसोटी लावून बघितली. तेव्हा ही रॅली टिकाऊ नाही असे उत्तर मिळाले. याचा एक अर्थ असा की अजूनही मोठ्या गुंतवणूकदारांना भारताच्या आर्थिक भविष्यावर तितकासा विश्वास नाही... आजच्या ’शुभ’ दिवशी नकारात्मक सूर आळवल्याबद्दल क्षमस्व, पण शेवटी गणित हे गणित असतं आणि तिथे भावनेला स्थान नसते...

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Sun, 03/30/2025 - 10:03
आजच्या ’शुभ’ दिवशी नकारात्मक सूर आळवल्याबद्दल क्षमस्व, पण शेवटी गणित हे गणित असतं आणि तिथे भावनेला स्थान नसते...
आजच्या शुभ दिवशी , आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या भाकिता ला जास्त किंमत आहे , मुहूर्तावर खरेदी करण्याच्या प्रथे पेक्षा ... गुढी पाडव्याच्या शुभेच्छा ! सर्वाना ...

वामन देशमुख Tue, 04/01/2025 - 09:46
या नि पुढच्या आठवड्यात कामाचे चार दिवस आहेत, त्यापुढच्या आठवड्यात तर तीनच दिवस आहेत. तुमच्या prediction (अंदाज?) मध्ये हे गृहीत धरले आहे का? त्याने काही फरक पडतो का? ---
नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
धन्स्! सर्व व्यापारी, गुंतवणूकदार यांना हे वर्ष भरपूर नफ्याचे व परताव्याचे जावो ही शुभेच्छा!

In reply to by वामन देशमुख

युयुत्सु Tue, 04/01/2025 - 11:49
पण ते जाऊ दे... समजा यामूळे जरी भाकीत चुकले तरी मॉडेल स्वत:ला अ‍ॅडजस्ट करते आणि पुढच्या भाकीतासाठी तयार होते. तेव्हा या कालावधीतील भाकीते जास्त काळजीपूर्वक घेणे किंवा भाकीतेच न करणे ... हा हा हा!

युयुत्सु Tue, 04/01/2025 - 11:35
तुमच्या prediction (अंदाज?) मध्ये हे गृहीत धरले आहे का? त्याने काही फरक पडतो का?> प्रश्न चांगला आहे. याचा माझ्या मॉडेल मध्ये विचार केलेला नाही. त्याची सध्या तरी आवश्यकता वाटत नाही कारण त्याचा विचार न करता भाकीते ब-यापैकी बरोबर ठरत आहेत. कामकाजाचे दिवस वाढले तर भाकीत चुकायची शक्यता आहे - कारण अधिक वेळ मिळाल्याने अधिक शक्यता निर्माण होतात. त्यामुळे भाकीत चुकू शकते. तसंच मला या पेक्षा प्रभावी घटक म्हणजे जागतिक बाजारांचा समावेश करायला आवडेल (ते आपल्या बाजारांवर प्रभाव पाडतात) पण सध्या माझ्याकडे पुरेशी कंप्युट पॉवर नाही आणि विश्वासार्ह आणि अखंडित डेटा नाही. तेव्हा सध्या जोपर्यंत I5+8GB आणि I7+16GB या दोन मशिन्स वर भागतंय तेव्हढ पुरेसे आहे. स्वगत - शेवटी आपण भारतीय "भागवा-भागवीमध्ये" आयुष्य घालवऊन तृप्तीच्या ढेकरा देणार...

In reply to by युयुत्सु

वामन देशमुख Fri, 04/04/2025 - 10:05
आज शेवटचा दिवस आहे. बाजार तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे दक्षिणेकडे जात आहे.
स्वगत - शेवटी आपण भारतीय "भागवा-भागवीमध्ये" आयुष्य घालवऊन तृप्तीच्या ढेकरा देणार...
मतभिन्नतेच्या आदरासहित: स्वतःच्याच, चांगल्या विषयावर काढलेल्या लेखमालेवर तुम्ही स्वतःच (वादाला तोंड फुटू शकते असे) अवांतर करू नये असे वाटते. आधीच चांगली-चांगली मिपाखरे इथल्या कर्कश्य कबुतरांच्या त्रासाला कंटाळून इथून उडून गेली आहेत, जी राहिली आहेत तीही जायला नकोत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल : ३१ मार्चचा आठवडा ==================== मंडळी, नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! या खेपेला युयुत्सुनेट चुकलं की बरोबर ठरलं हे ठरवणं मला अवघड जातंय. कारण मला ज्या पातळीपासून बाजार उलट फिरेल असं वाटत होते, ती पातळी झुगारून २३८६९ ला जाऊन उलट फिरलं (हा उलट फिरण्याचा भाग खरा ठरला कारण युयुत्सुनेटला तेव्हढेच म्ह० पुढची दिशा ओळखायला शिकवले आहे). पण रेंजच्या बाबतीत हुलकावणी दिली. आठवडा अखेरीस बंद होताना आठवड्याच्या ओपन जवळच बाजार बंद झाला आहे. माझ्यामते ही त्रुटी "क्षम्य" आहे कारण पातळीचा अंदाज माझा होता, युयुत्सुनेटचा नव्हता.

बाजाराचा कल: २४ मार्चचा आठवडा

युयुत्सु ·

आंद्रे वडापाव Sat, 03/22/2025 - 11:25
तसा मी मिपावर शनिवार रविवार फिरकत नाही .. पण युयुत्सु आपल्या या भाकितासाठी एक डोळा ठेवून येतो गेल्या काही आठवड्यांपासून ... आपल्या भाकिताजवळपास माझीही या येत्या आठवड्यकडून अपेक्षा आहे .. देशी बैल २३७०० पर्यंत नेल्यासारखं दाखवतील पण बाजार तिकडून पलटी मारेल ६६% अपेक्षा किंवा सरप्राईस देण्यासाठी २४७०० पर्यंत नेतील अन तिकडून पलटी मारतील ३४% अपेक्षा ... पण आपल्या अपेक्षांना बाजार काय भीक घालेल (अशी भीती माझ्या मनात ) जर मी (ऍव्हरेज पर्सन) या अपेक्षा ठेवून आहे ... हे तर ऑपेरेटर्सला सुद्धा माहिती असेल ... म्हणून ते कधी दारामागून येऊन आपल्याला भॉ करून दचकवतील ... त्यामुळे हीच धाकधूक ठेवून घाबरत घाबरत एक एक दिवस घालवावा लागतो मला ...

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Sat, 03/22/2025 - 13:37
२३७०० हा पाहिला रेसिस्टेन्स वाटतोय (किंवा माझी श्रद्धा आहे म्हणा ) २४७०० हा दुसरा रेसिस्टेन्स वाटतोय (किंवा माझी श्रद्धा आहे म्हणा )

In reply to by आंद्रे वडापाव

आग्या१९९० Sat, 03/22/2025 - 14:37
RSI ६६ च्या आसपास आहे ओव्हर बॉटच्या जवळ असल्याने प्रॉफिट बुकिंगची शक्यता वाढली आहे. मार्च अखेरचा निफ्टी रेसिस्टेन्स २४३८१ आहे.

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु Sat, 03/22/2025 - 18:26
आग्या१९९० मालक, RSI आणि इतर अनेक इंडिकेटरचा पार चिपाड होई पर्यंत कीस काढला आहे. त्यात असे लक्षात आले की त्याला प्रेडीक्टीव्ह व्हॅल्यू काहीही नाही. तो lagging indicator आहे. RSI ठराविक असताना व्हॉल्युम कसा अहे यावर त्याची उपयुकतता ठरते.

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० Sat, 03/22/2025 - 19:22
बरोबर आहे. कुठल्याच एका इंडिकेटरवर भरोसा ठेवून ट्रेडिंग करणे धोकादायक असते. तरीही ठराविक इंडिकेटरचा वापर करून चांगला नफा कमावता येतो.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु Sat, 03/22/2025 - 18:19
युरो ९१.३ पर्यंत खाली येईल असा माझा अंदाज आहे. कधी ते सांगता येत नाही. युयुत्सुनेट इथे वापरता आले नाही कारण व्हॉल्युम उपलब्ध नाही.

युयुत्सु Sun, 03/23/2025 - 12:00
इकड्चं तिकडचं १. काल एक माहितीपट बघत असताना काही मनोरंजक माहिती समजली की डीपसिकचा संस्थापक अगोदर एक ट्रेडर होता आणि हेज फंड चालवायचा. त्याने तयार केलेल्या अल्गोरिदमने खुप पैसा मिळवून दिला. या पैशातून त्याने जीपीयु खरेदी केले आणि डीपसिक ए०आय० ची निर्मिती केली. २. ग्रोक ए०आय० ने भारत सरकारला उचकवलं असलं तरी "संशोधन-मदतनीस" म्हणून त्याचे काम बघून मी प्रभावित झालो आहे. त्यात थापा सध्यातरी कमी सापडल्या आणी अहवालाचा दर्जा उत्तम होता भारतीय लोक अजूनही ए०आय० बद्दल किरकिरच जास्त करत आहेत. ग्रोक वर बंदी घातली तर मी सरकारवर बंदी घालणार हे मात्र नक्की :)

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Sun, 03/23/2025 - 12:42
अवांतर: यु एस कडे चाट जिपि टी, ग्रोक आहे... चायना कडे डीप सिक आहे, कारण त्यांच्याकडं सायंटिफिक टेम्परामेंट आहे, ए आय त्यांची प्रायोरिटी आहे... आपल्याकडे औरंगजेबचा आत्मा आहे...

वामन देशमुख गुरुवार, 03/27/2025 - 05:28
या धाग्यातील युयुत्सु-नेट चे भाकीत खरे होताना दिसत आहे, अजून दोन दिवस आहेत हा आठवडा, महिना आणि वर्ष संपायला. --- या धाग्यावर तरी अप्रस्तुत प्रतिसाद येऊ नयेत ही वेडी आशा.

आंद्रे वडापाव Sat, 03/22/2025 - 11:25
तसा मी मिपावर शनिवार रविवार फिरकत नाही .. पण युयुत्सु आपल्या या भाकितासाठी एक डोळा ठेवून येतो गेल्या काही आठवड्यांपासून ... आपल्या भाकिताजवळपास माझीही या येत्या आठवड्यकडून अपेक्षा आहे .. देशी बैल २३७०० पर्यंत नेल्यासारखं दाखवतील पण बाजार तिकडून पलटी मारेल ६६% अपेक्षा किंवा सरप्राईस देण्यासाठी २४७०० पर्यंत नेतील अन तिकडून पलटी मारतील ३४% अपेक्षा ... पण आपल्या अपेक्षांना बाजार काय भीक घालेल (अशी भीती माझ्या मनात ) जर मी (ऍव्हरेज पर्सन) या अपेक्षा ठेवून आहे ... हे तर ऑपेरेटर्सला सुद्धा माहिती असेल ... म्हणून ते कधी दारामागून येऊन आपल्याला भॉ करून दचकवतील ... त्यामुळे हीच धाकधूक ठेवून घाबरत घाबरत एक एक दिवस घालवावा लागतो मला ...

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Sat, 03/22/2025 - 13:37
२३७०० हा पाहिला रेसिस्टेन्स वाटतोय (किंवा माझी श्रद्धा आहे म्हणा ) २४७०० हा दुसरा रेसिस्टेन्स वाटतोय (किंवा माझी श्रद्धा आहे म्हणा )

In reply to by आंद्रे वडापाव

आग्या१९९० Sat, 03/22/2025 - 14:37
RSI ६६ च्या आसपास आहे ओव्हर बॉटच्या जवळ असल्याने प्रॉफिट बुकिंगची शक्यता वाढली आहे. मार्च अखेरचा निफ्टी रेसिस्टेन्स २४३८१ आहे.

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु Sat, 03/22/2025 - 18:26
आग्या१९९० मालक, RSI आणि इतर अनेक इंडिकेटरचा पार चिपाड होई पर्यंत कीस काढला आहे. त्यात असे लक्षात आले की त्याला प्रेडीक्टीव्ह व्हॅल्यू काहीही नाही. तो lagging indicator आहे. RSI ठराविक असताना व्हॉल्युम कसा अहे यावर त्याची उपयुकतता ठरते.

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० Sat, 03/22/2025 - 19:22
बरोबर आहे. कुठल्याच एका इंडिकेटरवर भरोसा ठेवून ट्रेडिंग करणे धोकादायक असते. तरीही ठराविक इंडिकेटरचा वापर करून चांगला नफा कमावता येतो.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु Sat, 03/22/2025 - 18:19
युरो ९१.३ पर्यंत खाली येईल असा माझा अंदाज आहे. कधी ते सांगता येत नाही. युयुत्सुनेट इथे वापरता आले नाही कारण व्हॉल्युम उपलब्ध नाही.

युयुत्सु Sun, 03/23/2025 - 12:00
इकड्चं तिकडचं १. काल एक माहितीपट बघत असताना काही मनोरंजक माहिती समजली की डीपसिकचा संस्थापक अगोदर एक ट्रेडर होता आणि हेज फंड चालवायचा. त्याने तयार केलेल्या अल्गोरिदमने खुप पैसा मिळवून दिला. या पैशातून त्याने जीपीयु खरेदी केले आणि डीपसिक ए०आय० ची निर्मिती केली. २. ग्रोक ए०आय० ने भारत सरकारला उचकवलं असलं तरी "संशोधन-मदतनीस" म्हणून त्याचे काम बघून मी प्रभावित झालो आहे. त्यात थापा सध्यातरी कमी सापडल्या आणी अहवालाचा दर्जा उत्तम होता भारतीय लोक अजूनही ए०आय० बद्दल किरकिरच जास्त करत आहेत. ग्रोक वर बंदी घातली तर मी सरकारवर बंदी घालणार हे मात्र नक्की :)

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Sun, 03/23/2025 - 12:42
अवांतर: यु एस कडे चाट जिपि टी, ग्रोक आहे... चायना कडे डीप सिक आहे, कारण त्यांच्याकडं सायंटिफिक टेम्परामेंट आहे, ए आय त्यांची प्रायोरिटी आहे... आपल्याकडे औरंगजेबचा आत्मा आहे...

वामन देशमुख गुरुवार, 03/27/2025 - 05:28
या धाग्यातील युयुत्सु-नेट चे भाकीत खरे होताना दिसत आहे, अजून दोन दिवस आहेत हा आठवडा, महिना आणि वर्ष संपायला. --- या धाग्यावर तरी अप्रस्तुत प्रतिसाद येऊ नयेत ही वेडी आशा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल: २४ मार्चचा आठवडा ==================== मंडळी, युयुत्सुनेटच्या भाकीतानुसार मार्केटने दमदार रिकव्हरी केली आहे. आता पुढे काय? मार्केट सध्या प्रतिरोध क्षेत्राजवळ असल्याने तेथपर्यंत (२३५५०) जायचा प्रयत्न करेल असा १ अंदाज आहे. पण दुसरा अंदाज आहे युयुत्सुनेटचा - आहे त्या पातळीपासून थोडे मागे फिरेल (महिना अखेर असल्याने) आणि परत २३५५० पर्यंत वर जाईल.  आकृती १ - निफ्टीचा साप्ताहिक आलेख. या आलेखात दोन तांबड्या रेघा हाय आणि लो ची सरासरी दाखवतात.

निघा निघा चिऊताई

अनन्त्_यात्री ·

कर्नलतपस्वी Fri, 03/21/2025 - 12:59
येणारी पिढी चिऊताई बघायला संग्रहालयात न जाओ.... सटिक वर्णन म्हणावे लागेल. लहानपणी आंगणात पाहिलेल्या चिमण्या बघायला कुठे कुठे जावे लागते हा दैवदुर्विलास याची देही याची डोळा बघावा लागत आहे. कालच एक पक्षिमित्राने अमेरिकन चिऊताई चे फोटो पाठवले आहेत. काही चिमण्या अमेरिकेत जाऊन बदलल्या आहेत तर काही अजून तशाच म्हणजे देशी आहेत.. विश्व चिमणी दिवस यावर लेख लिहीण्याचा विचार होता. जुने साहीत्य खंगाळताना Paul Laurence Dunbar 1872 –1906 यांची एक खुप सुंदर कविता वाचनात आली. Paul Laurence Dunbar 1872 –1906 A little bird, with plumage brown, Beside my window flutters down, A moment chirps its little strain, Ten taps upon my window–pane, And chirps again, and hops along, To call my notice to its song; But I work on, nor heed its lay, Till, in neglect, it flies away. So birds of peace and hope and love Come fluttering earthward from above, To settle on life’s window–sills, And ease our load of earthly ills; But we, in traffic’s rush and din Too deep engaged to let them in, With deadened heart and sense plod on, Nor know our loss till they are gone. एक संदेश पण आला आहे. सरली सुरेख थंडी, फोफावला उन्हाळा, संतप्त सूर्य झाला, ओकेल तप्त ज्वाळा.  पक्षी दिशांना फिरतील, ते थव्यांनी सुकतील,कंठ त्यांचे मग शोधतील पाणी, सुकली तळी जळांची. पाणी पिण्यास नाही, त्या सानुल्या जीवांची होईल लाही लाही, त्यांच्या जीवाकरिता इतकी कराचं सेवा, वाटीत एवढेसे पाणी भरून ठेवा. 

कर्नलतपस्वी Fri, 03/21/2025 - 13:00
येणारी पिढी चिऊताई बघायला संग्रहालयात न जाओ.... सटिक वर्णन म्हणावे लागेल. लहानपणी आंगणात पाहिलेल्या चिमण्या बघायला कुठे कुठे जावे लागते हा दैवदुर्विलास याची देही याची डोळा बघावा लागत आहे. कालच एक पक्षिमित्राने अमेरिकन चिऊताई चे फोटो पाठवले आहेत. काही चिमण्या अमेरिकेत जाऊन बदलल्या आहेत तर काही अजून तशाच म्हणजे देशी आहेत.. विश्व चिमणी दिवस यावर लेख लिहीण्याचा विचार होता. जुने साहीत्य खंगाळताना Paul Laurence Dunbar 1872 –1906 यांची एक खुप सुंदर कविता वाचनात आली. Paul Laurence Dunbar 1872 –1906 A little bird, with plumage brown, Beside my window flutters down, A moment chirps its little strain, Ten taps upon my window–pane, And chirps again, and hops along, To call my notice to its song; But I work on, nor heed its lay, Till, in neglect, it flies away. So birds of peace and hope and love Come fluttering earthward from above, To settle on life’s window–sills, And ease our load of earthly ills; But we, in traffic’s rush and din Too deep engaged to let them in, With deadened heart and sense plod on, Nor know our loss till they are gone. एक संदेश पण आला आहे. सरली सुरेख थंडी, फोफावला उन्हाळा, संतप्त सूर्य झाला, ओकेल तप्त ज्वाळा.  पक्षी दिशांना फिरतील, ते थव्यांनी सुकतील,कंठ त्यांचे मग शोधतील पाणी, सुकली तळी जळांची. पाणी पिण्यास नाही, त्या सानुल्या जीवांची होईल लाही लाही, त्यांच्या जीवाकरिता इतकी कराचं सेवा, वाटीत एवढेसे पाणी भरून ठेवा. 

श्वेता२४ Fri, 03/21/2025 - 14:11
मी गॅलरीमध्ये दाणा पाणी ठेवते पक्षांसाठी...कधी आली चिमणी तर इतकं छान वाटतं तिच्या चिवचिवाटाने......!!! खरंतर हे नैसर्गिक सुखही आता किती दूर्मिळ झालंय...

कर्नलतपस्वी Fri, 03/21/2025 - 12:59
येणारी पिढी चिऊताई बघायला संग्रहालयात न जाओ.... सटिक वर्णन म्हणावे लागेल. लहानपणी आंगणात पाहिलेल्या चिमण्या बघायला कुठे कुठे जावे लागते हा दैवदुर्विलास याची देही याची डोळा बघावा लागत आहे. कालच एक पक्षिमित्राने अमेरिकन चिऊताई चे फोटो पाठवले आहेत. काही चिमण्या अमेरिकेत जाऊन बदलल्या आहेत तर काही अजून तशाच म्हणजे देशी आहेत.. विश्व चिमणी दिवस यावर लेख लिहीण्याचा विचार होता. जुने साहीत्य खंगाळताना Paul Laurence Dunbar 1872 –1906 यांची एक खुप सुंदर कविता वाचनात आली. Paul Laurence Dunbar 1872 –1906 A little bird, with plumage brown, Beside my window flutters down, A moment chirps its little strain, Ten taps upon my window–pane, And chirps again, and hops along, To call my notice to its song; But I work on, nor heed its lay, Till, in neglect, it flies away. So birds of peace and hope and love Come fluttering earthward from above, To settle on life’s window–sills, And ease our load of earthly ills; But we, in traffic’s rush and din Too deep engaged to let them in, With deadened heart and sense plod on, Nor know our loss till they are gone. एक संदेश पण आला आहे. सरली सुरेख थंडी, फोफावला उन्हाळा, संतप्त सूर्य झाला, ओकेल तप्त ज्वाळा.  पक्षी दिशांना फिरतील, ते थव्यांनी सुकतील,कंठ त्यांचे मग शोधतील पाणी, सुकली तळी जळांची. पाणी पिण्यास नाही, त्या सानुल्या जीवांची होईल लाही लाही, त्यांच्या जीवाकरिता इतकी कराचं सेवा, वाटीत एवढेसे पाणी भरून ठेवा. 

कर्नलतपस्वी Fri, 03/21/2025 - 13:00
येणारी पिढी चिऊताई बघायला संग्रहालयात न जाओ.... सटिक वर्णन म्हणावे लागेल. लहानपणी आंगणात पाहिलेल्या चिमण्या बघायला कुठे कुठे जावे लागते हा दैवदुर्विलास याची देही याची डोळा बघावा लागत आहे. कालच एक पक्षिमित्राने अमेरिकन चिऊताई चे फोटो पाठवले आहेत. काही चिमण्या अमेरिकेत जाऊन बदलल्या आहेत तर काही अजून तशाच म्हणजे देशी आहेत.. विश्व चिमणी दिवस यावर लेख लिहीण्याचा विचार होता. जुने साहीत्य खंगाळताना Paul Laurence Dunbar 1872 –1906 यांची एक खुप सुंदर कविता वाचनात आली. Paul Laurence Dunbar 1872 –1906 A little bird, with plumage brown, Beside my window flutters down, A moment chirps its little strain, Ten taps upon my window–pane, And chirps again, and hops along, To call my notice to its song; But I work on, nor heed its lay, Till, in neglect, it flies away. So birds of peace and hope and love Come fluttering earthward from above, To settle on life’s window–sills, And ease our load of earthly ills; But we, in traffic’s rush and din Too deep engaged to let them in, With deadened heart and sense plod on, Nor know our loss till they are gone. एक संदेश पण आला आहे. सरली सुरेख थंडी, फोफावला उन्हाळा, संतप्त सूर्य झाला, ओकेल तप्त ज्वाळा.  पक्षी दिशांना फिरतील, ते थव्यांनी सुकतील,कंठ त्यांचे मग शोधतील पाणी, सुकली तळी जळांची. पाणी पिण्यास नाही, त्या सानुल्या जीवांची होईल लाही लाही, त्यांच्या जीवाकरिता इतकी कराचं सेवा, वाटीत एवढेसे पाणी भरून ठेवा. 

श्वेता२४ Fri, 03/21/2025 - 14:11
मी गॅलरीमध्ये दाणा पाणी ठेवते पक्षांसाठी...कधी आली चिमणी तर इतकं छान वाटतं तिच्या चिवचिवाटाने......!!! खरंतर हे नैसर्गिक सुखही आता किती दूर्मिळ झालंय...
लेखनविषय:
काव्यरस
निघा निघा चिऊताई सारीकडे काँक्रीटले दाणा पाणी हरवले शहरी ह्या विषारी धुरके आले घरट्याच्या दारापाशी डोळ्यावर झोप कशी अजूनही उरलेली पाखरे ही भयसूचनांचे गाणे गाऊनी टिपती दाणे अखेरचे झोपू नका अशा तुम्ही वाचविण्या मृत्युक्षणी येईल का मग कोणी बाळाला ह्या बाळाचे मी घेता नाव जागी झाली चिऊताई बाळासकट ती जाई कायमची!

बाजाराचा कल :१७ मार्चचा आठवडा

युयुत्सु ·

आंद्रे वडापाव Fri, 03/14/2025 - 16:15
लॉस हार्वेस्टिंग चालु आहे, हे आर्थिक वर्ष पुर्ण होत नाही... तो पर्यंत मार्केटला असेच टाइट पट्टीत ठेवण्यात येईल.... हे आर्थिक वर्ष पुर्ण होइपर्यंत मार्केट असेच बोअरिंग असेल...

In reply to by आंद्रे वडापाव

वामन देशमुख Sun, 03/16/2025 - 22:17
ये फॉल तो सिर्फ एक झांकी थे... पिक्चर अभिंभीं बाकी हैं.
सहमत आहे आणि तसेच कॉल्स विकले आहेत.

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Mon, 03/17/2025 - 11:26
पुढील ५ वर्षे मार्केट , (२०५०० ते २५५००) या रेंज मध्येच आट्या पाट्या खो खो खेळेल ... (आय अँम कंकरिंग विथ शंकर शर्मा ) According to Sharma, the benchmark Nifty 50 index is set to offer zero returns from the September 2024 highs over the next four to five years.

आंद्रे वडापाव Fri, 03/14/2025 - 16:15
लॉस हार्वेस्टिंग चालु आहे, हे आर्थिक वर्ष पुर्ण होत नाही... तो पर्यंत मार्केटला असेच टाइट पट्टीत ठेवण्यात येईल.... हे आर्थिक वर्ष पुर्ण होइपर्यंत मार्केट असेच बोअरिंग असेल...

In reply to by आंद्रे वडापाव

वामन देशमुख Sun, 03/16/2025 - 22:17
ये फॉल तो सिर्फ एक झांकी थे... पिक्चर अभिंभीं बाकी हैं.
सहमत आहे आणि तसेच कॉल्स विकले आहेत.

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Mon, 03/17/2025 - 11:26
पुढील ५ वर्षे मार्केट , (२०५०० ते २५५००) या रेंज मध्येच आट्या पाट्या खो खो खेळेल ... (आय अँम कंकरिंग विथ शंकर शर्मा ) According to Sharma, the benchmark Nifty 50 index is set to offer zero returns from the September 2024 highs over the next four to five years.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल :१७ मार्चचा आठवडा ==================== मंडळी, मी स्वत:ला चिमटे काढून कंटाळलो! मागील पोस्टमध्ये केलेले "युयुत्सुनेट मात्र पुढच्या आठवड्यात नकारात्मक अनिश्चितता दाखवते आहे." हे भाकीत परत एकदा खरे ठरले आहे! हे कसे ते समजाऊन घ्यायचे असेल तर निफ्टीचा साप्ताहिक कालचौकटीवरील आलेख पाहणे योग्य ठरेल. आकृती १ - पुढील आलेखात निळ्या बाणाने दाखवलेली मेणबत्ती काल संपलेल्या आठवड्याची आहे. ही मेणबत्ती काय दाखवते? मार्केट निश्चित्पणे वर पण गेले नाही आणि फार खाली पण गेले नाही, म्हणजे अनिश्चित राहिले.

माझी मदतनीस..

आजी ·

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 15:15
बरोबर आहे. मदतीनीसाना ही स्वतःच्या प्रगतीचा हक्क आहे. जसजसे शिक्षणाचे प्रमान वाअढत जाईल तसतसे ज्याना मदतनीस लागतात त्याना स्वावलम्बी व्हावे लागेल

स्वधर्म Mon, 03/10/2025 - 17:00
आजी, तुंम्ही अगदी पांढरपेशा माणुसकीने तुमच्या घरी येणार्या मदतनीस बाईंशी वागत आहात, ते ठीकच. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो: मुळात आपल्या समाजात काही लोकांना ही दुसर्यांची नकोशी कामे कमी पैशात करावीच का लागावीत? कोणत्याही प्रगत देशात असा दररोज दुसर्याच्या घरी येऊन काम करणारा वर्ग निदान एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. कारण? तिथे एवढी आर्थिक विषमता नाही. आपल्या देशात मध्यमवर्गीयांना सुध्दा अशी दररोज सेवा घेणे परवडते, कारण त्यांच्या आणि मदतनीसांच्या आर्थिक ऊत्पन्नात बरीच मोठी तफावत आहे. असा वर्ग उपलब्ध असणे, हे कमालीची आर्थिक विषमता असल्याचे लक्षण आहे, आणि ते योग्य नाही. बाकी आपण त्यांच्याशी व्यक्तीगत चांगले वागत असणे व त्याबद्दल स्वतःला बरे वाटणे हे ठीक, पण माणसाच्या श्रमांना एवढी किंमत आली पाहिजे की सर्वसाधारण मध्यमवर्गीयांना अशी सेवा घेणे परवडलेच नाही पाहिजे. अगदी अंथरुणाला खिळलेले, वयस्कर लोक यांना मदतनीस लागतात. काही शिक्षक घरी येऊन शिकवतात, पण त्यांना अशी माणुसकी पुरेशी नाही, तर त्यांचे आभार मानून त्यांना व्यवस्थित सन्मानपूर्वक पैसे द्यावे लागतात.

In reply to by स्वधर्म

खूप छान विचार स्वधर्म! खर आहे! १५००-२००० रुपयात महिनाभर भांडे घासणे नी लादी पुसणे हे कष्टाचे काम करणाऱ्या स्त्रियांबद्दल आदर वाटतो. त्यांचे वयही बऱ्याचदा ४०-५० च्या घरात असते तरीही न थकता त्या चार ते पाच घरे दिवसातून करतात. छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते. सणासुदीला सुटीही नसते. अशी पिळवणूक अनेक ठिकाणी दिसते अश्या लोकांबद्दल वाईट वाटते. काही लोक कंटाळून काम सोडतात नी फळे, भाजीच्या गाड्या लावतात किंवा रिक्षा चालवणे वगैरे करतात! एकंदरीत ह्या परिस्थीतिला देशात प्रचंड असलेली लोकसंख्या कारणीभूत आहे असे वाटते! पण जिकडे मध्यम नी उच्च मध्यमवर्गीय लोक एका मुलानंतर दुसरे मूल जन्माला घालायला दोन ते तीनदा विचार करतात तिकडे हीच लोक हयगय न करता चार पाच तरी मूले सहज जन्माला घालतात! हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही. कधी कधी वाटते हे परिस्थितीच्या रेट्यामुळे आहे कधीकधी वाटते ह्या लोकांनाच सुधारायचे नाही!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti Tue, 03/11/2025 - 08:59
हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही.
शिक्षणाचा अभाव यामुळे हे घडतं. आणि अजून एक समान गोष्ट दिसते या मदतनीस बायकांचे नवरे दारूडेच,जुगारी वगैरेच कसे ? शून्य टक्के पोषण असलेल्या:'दारूवर बंदी' सरकार घालणार नाही,हे चक्र मोडायला बाईच झिजत राहणार :(

In reply to by Bhakti

ही काही पटलं नाही भक्ती ताई. काही मोजक्या लोकांना दारू पिणे निषिध्द आहे , ब्रह्महत्येचे पातक आहे पण इतरांनी दारू आवर्जून प्यावी . दारू पिण्यासारखी देशभक्ती नाही. दारू सिगारेट पिणे आणि पेट्रोलची गाडी चालवणे ही सर्वात मोठ्ठी देशभक्ती आहे कारण सर्वात जास्त कर ह्याच वस्तूंवर आहे. दारू पिऊन गाडी चालवणे हा तर देशभक्तीचा परमोच्च आदर्श आहे . दारूवरचा टॅक्स, पेट्रोल चां टॅक्स, RTO कडे दंड , कोर्टात सेटिंग , वकिलाना नोकरी , न्यायाधीशाला नोकरी . किती किती म्हणून आर्थिक उलाढाल होते ह्या दारू मुळे . उगाच दारूला बदनाम करू नका. - सुधाकर संस्थापक अध्यक्ष तळीराम फॅन क्लब आर्य मदिरा मंदिर =)))) {हलके घ्या. विनोद आहे =))))}

In reply to by प्रसाद गोडबोले

दारूवर सरसकट बंदी हवी, दारू पिताना एखादा सापडल्यास दारू बनवणारा नी पिणारा ह्याना दगडाला बांधून लादेनसारखे अरबी समुद्रात बुडवायला हवे! कितीतरी संसार दारूमुळे उध्वस्त होतात! - दारूला स्पर्श न केलेला बाहुबली!

In reply to by प्रसाद गोडबोले

खिक्क! तुम्ही गुरु म्हणून ४ वर्षाआधी भेटला असतात तर आज मस्त टाकी फुल्ल करून कुठे तरी पडून असतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ Wed, 03/12/2025 - 09:48
छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते
आयटी हमालांची अवस्था फार काही वेगळी नाहिय्ये. नवीन फ्रेशर्स ना १० ते १५ हजारांवर रबवून घेणार्‍या बर्‍याच कंपन्या आहेत. कितीतरी लोकासाठी तर फॅमिली लाईफ हा प्रकार म्हणजे लग्झरी असते. पण करतात ना. नाईलाज असतो. पोटासाठी आणि ब्यांकेच्या हप्त्यांसाठी करावी लागते अशी नोकरी

In reply to by स्वधर्म

Bhakti Tue, 03/11/2025 - 08:55
नाच गं घुमा हा काही महिन्यांपूर्वी आलेला सिनेमा पण मदतनीस आणि मालकीण यांच्या सौजन्यावर होता.या सिनेमा विषयी खूप मिश्र प्रतिक्रिया वाचल्या होत्या म्हणून पाहणार नव्हते.पण एकेदिवशी कंटाळा आला म्हणून पाहिला :) पण यातही हीच कहाणी आशाताई मदतनीस ची होती.आशाताई खतत्रुड नवरा, झोपडपट्टीतली आदळाआपट,मुलाची काळजी ,ट्रॅफिक, बसच्या वेळा या सगळ्यांची कसरत करून येतं.त्यात मालकीणचे अनेक गैरसमज होतं.पण शेवटी आशाताईच मालकीणचे खुप मोठ्ठे स्वप्न पूर्ण करायला मदत करते.आणि आशाताईलाही मालकीण खुप मदत करते.सिनेमा चांगला आहे,थोडा मिर्च मसाला अधिक आहे. पण आज मालकीण असो वा मदतनीस एक बाई दुसऱ्या बाईला समजून घेऊन पुढे जात आहेत,हे खुप मोलाचं आहे.

लेख आवडाला ! आता कम्युनिस्ट विचारसरणी स्विकारलेल्या लोकांना ह्या इथेही शोषक आणि शोषित अशी विभागणी दिसते, पण त्याला काय करणार , त्याला नाईलाज आहे ! ज्यांनी कॅपिटॅलिस्ट विचारसरणी स्विकारली आहे त्यांच्या लेखी मात्र - अशा कोणतेही कॅपिटल नसलेल्या व्यक्तींना, अन्स्किल्ड लेबरला तुम्ही व्यवसाय , रोजगार उत्पन्न करुन देत आहात, जीवनाचे साधन उपलब्ध करुन देत आहात ही खुप मोठ्ठी गोष्ट आहे ! आणि नुसतेच रोजगार निर्मिती न करता सदर व्यक्तीला "कामवाली" असे न संबोधता आदराने मदतनीस असे संबोधत आहात ही खुपच मोठ्ठी गोष्ट आहे ! शिवाय जास्त कामाचे जास्त पैसे देत आहात , जमेल तेव्हा गिफ्ट देत आहात , दिवाळीला बोनसही नक्की देत असाल , एकुणच हे सर्व दर्शवत आहे की तुम्ही क्रोनी कॅपिटॅलिस्ट नाही आहात ! तस्मात् तुमचे कौतुक करावे तितके थोडे आहे ! अशी, तुमच्यासारखी चांगली माणसे समाजात टिकली पाहिजेत , अन्यथा हे कम्युनिस्ट सोशॅलिस्ट लोकं जे की आता आर्मचेअर अ‍ॅक्टिविस्ट आणि अर्बन नक्षल चा बुरखा पांघरुन बसलेत ते एक ना एक दिवस अशा भोळ्या अशिक्षितीत लोकांची माथी भडकावुन "There will be blood." हे सत्य करुन दाखवतील , आणि अनस्किल्ड लेबरला देखील देशोधडीला लावतील ह्यातही शंका नाही ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि Tue, 03/11/2025 - 11:08
समाजवादी विचारसरणी प्रामाणिक नसते असे नव्हे. पण आदर्श, जे असायला हवे ते, डायरेक्ट "असावे".. अशी काहीशी मांडणी भासते. आदर्श पर्याय हा अशक्य असू शकतो, त्यातल्या त्यात आहे ती सिस्टीम हळूहळू बदलत जाईल पण आदर्श करू जाल तर सगळेच कोसळेल. अशी मध्यम मार्गाची आशा करावी लागते हे त्या विचारसरणीला फारसे रुचत नसावे. त्यांनी सुचवलेल्या उपायांनी "नाही रे" वर्गाची "नको रे" अवस्था होऊ शकते.

In reply to by गवि

अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Tue, 03/11/2025 - 18:35
साधी गोष्ट होती: मुद्दा एक समाज म्हणून आपल्याकडे किती विषमता आहे, म्हणून काही लोकांना नाईलाजाने ही कामं करावी लागत आहेत, इतका साधा होता. कुणी पैसे दिले व माणुसकी दाखवली, हे ठीकच, त्यावर माझा काही आक्षेप नव्हता. असली कामं समाजातून कमी व्हायला पाहिजेत की नको? 'मदतनीस' स्वतःच म्हणत आहे 'जे जगणं माझ्या वाट्याला आलं ते तिच्या (मुलीच्या) वाट्याला नको.' हे त्यांचं असं जगणं चालूच रहावं, असं वाटणारी माणसं अजून समाजात आहेत, हेच मोठं दुर्दॅव आहे! अर्थात त्यामागे पिढ्यानुपिढ्यांच्या हितसंबंधांना धक्का लागू नये, प्रस्थापित प्रस्थापितच रहावेत, ही मूळ स्वार्थमूलक प्रेरणा आहे. झाडाचं एक पान दुसर्यासारखं नसतं वगैरे गैरलागू सिध्दांत तोंडावर फेकून कशाचंही समर्थन करता येतंच! बरं झालं असले लोक काही काळ तरी देशाच्या नेतृतवात नव्हते, नाहीतर डोक्यावरून मैला वाहून नेणार्याला काम व पैसे देऊन आंम्ही पुण्यच करत आहोत, असं म्हणत समाज तिथेच राहिला असता. अमेरिकेत अजूनही गुलामी प्रथा सुरू असती - गुलाम गुलाम म्हणून जन्माला आला त्यात आमचा काय दोष? त्याचं प्रारब्ध कर्मच तसं असणार असं आमचा वेदांत सांगतो ना. उलट त्याला पैसे व जेवण देऊन आंम्ही त्याच्यावर उपकारच करत आहोत म्हणत त्या अमानुष प्रथेचं समर्थन करत राहिले असते.

In reply to by स्वधर्म

गवि Tue, 03/11/2025 - 20:36
कधीतरी थिअरीज सोडून स्वार्थापलिकडचं सत्य बघा
कधीतरी बघा असे म्हणण्याइतका वाईट नाही हो मी. आणि अमुक एक असावे यात वाद नाहीच. पण त्यासाठी इम्प्लिमेंट काय करायचे?

In reply to by गवि

स्वधर्म Tue, 03/11/2025 - 22:17
गोडबोले यांनी समाजवादी गप्फा, 'झाडाचं पान...', शोषक शोषित इ. इ. ज्या थिअरीज सांगितल्या आहेत, त्यासाठी होता. माझा प्रतिसादही त्यांच्या प्रतिसादाखालीच दिसतोय, तुमच्या नाही. इंप्लीमेंट अनेक देशांनी, संस्थांनी केलंय. मुख्य गोष्ट ही की समाजातली आर्थिक विषमता कमी करणारी धोरणे आखली गेली पाहिजेत. शिक्षण व संधी तळागाळातल्या लोकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आता समाजातील यासारख्या खर्याखुर्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी राज्य आणि केंद्र सरकारे भ्रामक गोष्टींवर काम करत आहेतः उदा. औरंगजेबाची कबर. नद्यांचं पाणी स्वच्छ करण्यासाठी खर्च न करता नाशिकच्या कुंभमेळा आयोजित करण्यावर हजारो कोटी खर्च करणार आहेत. खेडोपाडीच्या शाळांसाठी पैसे नाहीत, पण हजारो कोटी खर्च करून शक्तीपीठ महामार्ग, मोठमोठी स्मारके बांधायचीआहेत.

In reply to by गवि

राम राम गवि ! त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) ज्याला लोकं कॅपिटॅलिझम म्हणतात ते तत्वज्ञानाच्या परिप्रोक्ष्यातुन पाहिलं तर विशुध्द हे "सत्य" आहे "सत्य". सत्य म्हणजे ट्रुथ असे भाषांतर करुन शिकलेल्यांना कसं समजणार ! समाजामध्ये कायमच कोणाकडे तरी जास्त कॅपिटल असणार कोणाकडे तरी कमी ! माणसांचे सोडा , प्राण्यांना देखील कळतं हे, प्राणी आपली टेरेटरी जे की कॅपिटल , ते प्राणापणाने जपतात , वाढवण्याचा प्रयत्न करतात . प्राणी सोडा , झाडांना देखील कळातं हे ! मोठ्ठं झाड जास्तीत जास्त सुर्यप्रकाश घेतं, पाणी घेतं , पोषकतत्व घेतं अन अन्य छोट्या झाडांना झक मारत त्या झाडाच्या सहार्‍याने आसर्‍याने जगता येतं , पण म्हणुन मोठ्ठं झाड तोडलं तर सगळी एको सिस्टीम नष्ट होते अन सगळीच झाडे मरतात , अन मग ती जमीन ग्रास लॅन्ड होऊन जाते . अहो झाडांचं सोडा , निर्जीव ग्रहतार्‍यांनाही आपल्या ग्रॅव्हिटेशनल फिल्ड मध्ये येणारी प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये खेचुन घ्यावी , आणि आपले अस्तित्व वाढवावे , ही "जाणीव" आहे ! हे ते सत्यमेव जयते म्हणातात ना त्यातले सत्य आहे ! मानवी समाजातील कॅपिटल ची एक रचना नष्ट होईल , पण लागलीच दुसरी काही रचना त्याची जागा घेईल , कामवाल्या बाईची पोरगी शिकुन कॉर्पोरेट मध्ये गेली तर तिथे काय परिस्थिती आहे हे आम्ही पाहतो, मग कमावलेले पैसे मार्केट मध्ये टाकु लागली तर कॅपिटल मार्केट मध्ये काय स्थिती , आपण किती चिल्लर आहोत हेही आम्ही पहात आहोत , बरं राजकारणात गेली तर तिथे पॉवर डायनॅमिक्स कसले जबरदस्त आहे हे सगळेच बीड मध्ये पहात आहेत , वॉशिंग्टन डी.सी. मध्येही पहात आहेत ! ज्याला कळतं त्याला कळतं ! यु कॅनॉट एस्केप इट ! यु सिंपली कॅनॉट ! ! हे सत्य आहे सत्य. त्यालाच ऋत असाही अल्मोस्ट समानार्थी शब्द आहे . त्यालाच धर्म असा शब्द आहे . आणि ह्या धर्माचे मुर्तीमंत स्वरुप - तोच राम आहे ! रामो विग्रहवान धर्म : _______________________________________ पण असो. ह्या क्रांती ब्रिंतीच्या बाबतीत मात्र आमचा स्वधर्म ह्यांना फुल्ल सपोर्ट आहे ! कम्युनिझम चा भस्मासुर शेवटी स्वतःच्याच मस्तकावर हात ठेऊन स्वतःचाच नाश करुन घेतु ही वस्तुस्थिती आम्ही अभ्यासली आहे , क्युबा मध्ये पाहिलं , लॅटिन अमेरिकेत पाहिलं , नॉर्थ कोरियात पाहिलं , रशियात पाहिलं , चायना मध्येही कम्युनिस्ट सरकार समानता आणुन तेथील लोकांच्या हिताची काय काळजी घेत आहे हेही पहात आम्ही =)))) तस्मात ह्या बाबतीत , स्वधर्म आमचा तुम्हाला जोरदार पाठिंबा आहे , भिडा तुम्ही , उध्वस्त करुन टाका ही व्यवस्था ! मजा यायला हवा =)))) लाल सलाम ! क्रांती चिरायु होवो ! =)))) Samant

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म गुरुवार, 03/13/2025 - 06:41
>> त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) >> ज्याला कळतं त्याला कळतं ! शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच. राहता राहिला प्रश्न पुलंचा. तुमचा कयास चुकवल्या बद्दल माफ करा, पण मी त्यांची पुस्तके, व्यक्ती आणि वल्ली वगैरे वाचलेली आहेत. पण बालबुध्दीने दिपून जाण्याचे दिवस संपल्यावर दृष्टी विस्तारित झाल्यावर काही वेगळे जाणवते. थोर लेखक होते, त्यांची विनोदबुद्धी तरल होती, भाषेवर हुकूमत होती, पण तेही तेच पाहू शकले जे त्यांना त्यांच्या स्थानावरुन दिसलं. तुंम्ही दुसरीकडे जन्माला आला असाल, तर काही वेगळं जाणवू लागतं. अंतू बर्वा, नंदा प्रधान, नानू सरंजामे यांना आडनावे आहेत, पण नामू परटालाच फक्त कसं बरं आडनांव नाही? त्याची जात हेच त्याचं आडनाव का? त्यांनी महिलांच्या जाडपणावर, रंगावर, गटणेच्या बावळटपणा वर केलेले हुकमी विनोद वेगळ्या प्रकारे दिसू लागले. ... ... चितळे मास्तर मात्र ‘ढ’ मुलांना अत्यंत आदराने पुकारीत. गोदी गुळवणी ही साक्षात ‘ढ’ होती. गोरी, घाऱ्या डोळ्यांची, भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी चवथी-पाचवीपर्यंत जेमतेम शाळेत टिकली. शेवटी अण्णा गुळवण्यांनी तिला उजवली. हे असले विनोद बायकाही अगदी निरागसपणे एन्जॉय करतात, फक्त त्या गोदूसारख्या नसतील तर. अंतू बर्वा काय म्हणतो? ..पण इंग्रज गेला तो कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं? धंदा बुडीत खाती जायला लागला - फुकलंनीत दिवाळं! कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा!’’ ज्यांनी कधी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलाच नाही त्यांच्या मनातील अपराधीपणाची भावना कमी करण्याचं काम पु. ल. देशपांडें करत आहेत का? शिवाय इंग्रज भारत सोडून गेले ते कंटाळून असं बोलून ज्यांनी याकामी बलिदान दिलं त्यांचं श्रेयही काढून घेताहेत. अजून काय हवं? * * * अंतू बर्वा यांची समाजवाद, समता-विषमता याबाबतची मतं तर फारच प्रखर आहेत. कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? पु. ल. देशपांडे यांच्या श्रीमंत भाषेच्या प्रभावातून बाहेर पडणं हे काम आहे. जे त्यांना दिसलं नाही, ते त्यांचं आ करुन वाचणाऱ्या तुंम्हाला काय दिसणार? जाऊ द्या, त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या. मी कुठेही साम्यवादाचं समर्थन केलेलं नाही, फक्त्यात समाजातली आर्थिक विषमता एवढाच मुद्दा होता. त्यामुळे क्रांती वगैरे पाल्हाळाबद्दल आमचा पास. दुसऱ्याला न मांडलेला मुद्दा चिकटवून झोपण्याची युक्ती जुनी झाली.

In reply to by स्वधर्म

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 10:38
त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या.
मी तेच करतो हो आता . तुका म्हणे आता खेळतो कौतुके l झाले तुझे सुख अंतर्बाही ll मी काय तुम्हाला टॅग केलेलं का माझ्या प्रतिसादात, का अक्षता पाठवलेल्या माझ्या प्रतिसादावर तुम्ही प्रतिसाद द्यायला या म्हणून =)))) मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली त्याला मी काय करू =)))) बाकी तुम्हाला जाणवत नसेल पण तुम्ही ज्याप्रकारे मते मांडता की समाजात कायम शोषक शोषित अशी विभागणी असणार , आर्थिक विषमता असणार, संघर्ष केला पाहिजे वगैरे वगैरे ही साम्यवादी मांडणीच आहे . जे तुमच्यात अंतर्बाह्य आहे ते मला तुम्हाला चिकटवायची गरज नाही. असो. चालू द्या तुमचं. बालपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा l ऐरावत रत्न थोर l तया अंकुशाचा मार ll अथक प्रयत्नांनी परत मिळवलं आहे हे बालपण आम्ही. आमचं आम्ही बालोद्यानात खेळत राहतो मजेत . राम

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 20:03
>> मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली. जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती. अगदी स्पष्टपणे! मी फक्त ती नीट संदर्भासहित दाखवून दिली. ती मी चर्चेत आणली असा खोटा कांगावा नका करू. >> कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? याला उत्तर न देता पळ काढला आणि अंगावर शेकतंय म्हटलं की दुसर्‍यांवर जातीवाचक आरोप करायचे! भले शाब्बास!!

In reply to by स्वधर्म

कंटाळा आला ह्या भंपकपणाचा =))))
जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती
आम्हातरी कधीही जात दिसली नाही पुलंच्या लेखनात . महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांनाही दिसलेली नाही, अजुन कोणी पुलंच्या पुस्तकाचे दहन बिहन केल्याचे ऐकिवात नाही. तुम्हाला जात दिसली हा तुमचा प्रॉब्लेम आहे , पुलंचा नाही अन माझाही नाही ! बाष्कळ प्रश्नांना काय उत्तरे देत बसणार ? मुळ मुद्दा हा होता की ही समाजवादी विचारसरणी भंपक आहे , समाजात वर खाली , डावे उजवे , श्रीमंत गरीब, हे भेद होतेच अन राहणारच , तुम्ही जाणुन बुजुन ओढुन ताणुन ते मिटवायचा प्रयत्न केला म्हणुन ते मिटणार नाही , त्याचे फक्त रुप पालटेल. थोटा पांडु, तिरळा हरी साठ्या , हे स्वातंत्र्यात होते , पारतंत्र्यात होते , इंग्रज अन कोण कोकणा रेल्वे अन स्वातंत्र्य प्रगती बिगती बगैरे कितीही झाले तरी हे भेदाभेद राहणारच आहेत . पण म्हणुन ह्या भेदांचे भांडवल करुन सामयवादी शोषक विरुध्द शोशित असा कायमचा संघर्ष जो तुम्ही मांडत आहात तो मात्र तद्दन निरर्थक आहे. अन काय बोलता , पळ काढणे =)))) अंगावर शेकणे =)))) तुमच्या इन जनरल विचारसरणीतील भंपकपणाचा कंटाळा आल्याने उत्तर द्यायची इच्छा नाही. मी कधीही जातिवाचक बोलत नाही कारण मी जाती मानतच नाही . माझ्या लेखी फक्त गट आहेत , जाती नाहीत ! जातीचा उल्लेख तुम्ही केला आहे ह्या प्रतिसादात नामु च्या निमित्ताने "https://www.misalpav.com/comment/1190789#comment-1190789" मी तसा उल्लेख केलेला नाही . चुकुनही कधी केलेला नाही . आता बास =)))) धुळवड पुरे . माझं काही तुम्हाला पटणारं नाहीये, अन तुमचं काही मला पटाणारं नाहीये , मग कशाला उगाच कळफलक बडवत बसा =)))) संघर्ष करा ! संघर्षच करत रहा !

In reply to by स्वधर्म

Bhakti गुरुवार, 03/13/2025 - 10:56
बाकी खुप चांगलं लिहलंय.. पण हे खाली लिहिलेलं टाळू शकला असता तर बरं वाटलं असतं.
शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच.
ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.खेदकारक!

In reply to by Bhakti

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 12:38
ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.
कारण ती वस्तुस्थिती आहे म्हणुन ! ह्यात खेदकारक असं काहीच नाही . एखादा व्यक्ती एखाद्या विशिष्ठ कुटुंबातच का जन्म घेत असावा ? कोणी श्रीमंत कोणी गरीब, कोणी सेलिब्रिटी कोणी भिकारी, कोणी शुद्र कोणी ब्राह्मण, कोणी सुसंकृत कोणी संस्कृती विध्वंसक , कोणी आहे रे , कोणी नाही रे . असं का असावं ? ह्याला व्यवस्थित रितसर तत्वज्ञानाच्या दृष्टीने, अध्यात्मिक उत्तर आहे. आणि पुढे जाऊन तुम्ही ज्या परिस्थितीत जन्माला आलात त्या परिस्थितीतच राहाता असेही नाही , तुम्ही तुमच्या कर्माने तुम्हाला पाहिजे तसे बदल घडवताच ! आमच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये आम्ही जी लिनियर मॉडेल्स बनवतो त्यानुसार बोलायचे झाले तर तुमची सद्य स्थिती = तुमची प्रारब्ध्द कर्मे + संचित कर्मे + क्रियामाण कर्मे + ईश्वरेच्छा अशी समष्ठी असते ! जे संचित आहे ते संचित आहे ! तुम्ही तुमच्या क्रियामाण कर्माने ते ओव्हर राईड करु शकताच ! त्या कामवाल्या बाईंची मुलगी ने कष्ट केले तर तेही उच्च पदस्थ होऊ शकतेच ! (आणि एखाद्या उच्च स्थितीतील व्यक्तीने कर्मे केले नाही तर तो देशोधडीला लागु शकतोच . एकीकडे मुकेस भाई पोरांच्या लग्नांवर अब्जावधी रुपये खर्च करत असताना , त्यांचा सख्खा भाऊ , की ज्याला वडीलोपार्जित इस्टेटीत जास्त माल मिळाला होता , तो अनिल भाई अक्षरशः भिकारी होण्याच्या मार्गावर आहे !) ह्यात काहीही खेदजनक नाही. ज्याक्षणी तुम्हाला ह्या सर्व मॅट्रिक्स चे टर्निंग गेयर्स लक्षात येतात , जेव्हा ह्या मॅट्रिक्स चे अनादी अनंत अस्तित्व लक्षात येते तेव्हा तुम्हाला खेद वगैरे काहीही वाटायचेच बंद होते . त्यानंतर all you can do after that is to appreciate how exquisitely beautifully its designed ! असो हा स्वतंत्र लेखाचा विषय असल्याने इथे जास्त लिहित नाही !

In reply to by Bhakti

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 19:44
तुमच्यासारख्या संवेदनशील व्यक्तीला जन्मावर माणसाचं भवितव्य ठरू नये, असं वाटणं सहाजिक आहे. पण तुंम्हा आंम्हाला काहीही वाटो, जन्मावर बरंच काही ठरतं ही वस्तुस्थिती आहेच. आपल्याला मिळणारी आर्थिक सामाजिक परिस्थिती जन्मावरच अवलंबून नाही का? माणसाला वाढीच्या वयात येणारे अनुभव त्याच्या आर्थिक सामाजिक व भौगोलिक परिस्थितीनुसारच ठरणार. आणि मग पुढे त्याच्या धारणा, मते, दृष्टिकोन हे आजूबाजूला जे मिळतं (शिक्षण, वाचन, संगत इ.) त्यावर ठरणार. ज्याची समज वाढलेली आहे, फक्त त्यालाच या अदृष्य पिंजर्‍याच्या पलीकडे काही दुसरे दृष्टीकोन आहेत हे कळणार. मान्य करणे ही अधिक पुढची पायरी झाली. कोणी कुठे जन्म घ्यावा, हे काही त्या व्यक्तीच्या हातात नाही. कदाचित समाजात संपूर्ण समता (संधी, शिक्षण, व्यवसाय) असणे हि अत्यंत आदर्श अवस्था कधीच येऊ शकणार नाही. पण जगभरातली सरकारे, जी लोककल्याणकारी आहेत त्यांनी हे केले आहे व परिणामतः त्यांच्याकडे विषमता कमी होऊन जीवनाचा दर्जा सुधारलेला आहे, हे तर स्पष्ट आहे. कोण कुठे जन्माला आला याला काही भ्रामक अध्यात्मिक कार्यकारणभाव चिकटवणे व म्हणून समाजात समता असणे याची टर उडवणे, हे मात्र समर्थनीय नाही.

In reply to by स्वधर्म

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 11:38
असे माझे मत आहे. विषमता आहे म्हणून स्पर्धा आहे. स्पर्धा आहे म्हणून विकास/प्रगती आहे. विषमतेवर कसा विजय मिळवायचा किंवा आहे त्या परिस्थितीत खुश रहायचं किंवा रडत बसायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जगात अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर कुरघोडी करून अविश्वसनीय असा बदल घडवून आणला. माझ्याच समोरचे एक उदाहरण. छोटे कुटुंब, आई,वडील एक मुलगा ,मुलगी. आई क्षयरोगी अतिंम टप्प्यात. वडिल नालायक, लंब्या,लंब्या फेकणारे. मुलांच्या जीवावर बांडगुळ म्हणावे लागेल.अर्थिक परिस्थिती हलाखीची. मुलगा स्टॅन्ड वर भाजभाजलेल्या शेंगा विकायचा तर मुलगी लोकांची धुणी भांडी. आई वारली,वडिलांनी दुसरे लग्न केले,मुलांना वाऱ्यावर सोडले. भावंडानी एकमेला आधार दिला. शिक्षण पुढे चालू ठेवले. गावातच काॅलेज असल्याने फारसा खर्च नव्हता. घरभाडे माफक व मुलांची धडपड बघून गल्लीतील लोंकानी शक्य होईल तशी मदत दिली. पुढे मुलगी बि एड,एम एड झाली आज गावातच प्रथितयश ट्युशन्स संस्थेची मालकीण तर मुलगा पुढे बि काॅम,सी ए झाला व स्वताची फर्म टाकली आहे. असो,मुळ विषय साधा सरळ होता. घरातील नोकरांना माणुसकीची वागणूक आणी योग्य मेहेनताना देण्याबाबत. त्याला इतर देशातील परिस्थितीशी तुलना करत भारतीय समाजिक विषमता कशी समाज वाद विरोधी आहे हा मुद्दा उपस्थित करून विषयांतर केले जात आहे. सामाजीक विषमतेला अनेक कारणे आहेत परंतू विषयांतर होईल म्हणून टाळून एवढेच म्हणतो की आपल्या बरोबर जे गरीब आपल्यासाठी काम करतात त्यांना य्योग्य वागणूक व सद्यपरिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करावी. माझ्या पत्नीला घरकामात मदत करण्यासाठी एकच कामवाली बाई गेले तेरा वर्ष नोकरीत आहे.थोडीफार शिक्षण झालेली,अकुशल. नवरा अशीच छोटी मोठी कामे करतो. दोन मुलं नुकतीच दहावी बारावी झालीत. वेळोवेळी जाहीर झालेल्या सरकारी योजनांचा कसा लाभ घ्यायचा हे माझ्या पत्नीने तीला मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री आवास योजनेचा फार्म भरायला लावला. आज तीचे स्वताचे घर झाले आहे. तीनचार अन्य घरात काम करते म्हणून हप्त्यात वाॅशिंग मशीन घेऊन दिले कारण तीच्या घरातील कपडे धुण्याचे श्रम आणी वेळ वाचावा, पिठ दळण्याची विजेची चक्की घ्यायला लावली. आता मुले फावल्या वेळात आसपास च्या घरातील दळणे दळून देतात व अतिरिक्त अर्थार्जन करतात. घर महिलेच्या नावावर असल्याने नवर्‍याची दादागिरी कमी झाली आहे. सरकारच्या लाडक्या बहिणाबाई म्हणून महिना भाऊबीज चालू झाली आहे. अर्थिक परिस्थितीत सुधार होतोय. आता मुलांवर अवलंबून आहे की ते आपल्या आईच्या कष्टाचे कसे परिमार्जन करतात. तर माईसाहेबांनी मांडलेला मुद्दा उचलून धरत एवढेच म्हणेन, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. लहान मोठे,गरीब श्रीमंत हा भेद यावत्चंद्रदिवाकरौ रहाणारच आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 12:44
यावत्चंद्रदिवाकरौ
तत्वज्ञान असं आहे की दिवाकराचे अर्थात सुर्याचं चंद्रापेक्षा मोठ्ठं असणे, जास्त तेजस्वी असणं , स्वयं प्रकाशमान असणं , दाहकारक असणं हेही विषमतेचे प्रतिक आहे , अन्याय आहे वगैरे वगैरे . =))))

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म Fri, 03/14/2025 - 17:06
विषमता हा निसर्गाचा मूळ गुणधर्म आहे, हे निसर्गव्यवहारात ठीक. निसर्गव्यवहारात जंगलातील बलवान प्राणी दुर्बल प्राण्यांना खाणारच. मानवी व्यवहारात असं चालेल काय? पूर्वी असेच होते, राजाला सर्वाधिकार होते. मनात येईल त्याला शिक्षा करण्याचा अधिकार होता. का बरं हे बदललं असावं? मानवी व्यवहारात सामाजिक आर्थिक विषमता टिकवायची का? मानवी व्यवहारात समता (समानता नव्हे) आणण्याचे प्रयत्न कोणत्याही कल्याणकारी राज्याकडून केले जातात. ते थांबवावे का?

In reply to by स्वधर्म

कर्नलतपस्वी Fri, 03/14/2025 - 19:57
कशी मिटवणार? एकाच आई-वडीलांची चार मुले. समान संधी णण एक भरपूर शिकतो डाॅक्टर इंजिनियर होतो. एक शिक्षणात सुमार काहीतरी धंदा काढतो,एक उनाड,मवालीगीरी करतो आता यात समता कुठुन येणार.. प्रत्येक घरात अशी उदाहरणे मिळतील. धंदेवाला खुप पैसा कमवतो तर शिक्षित सन्मान पुर्वक जिवन यापन करतो तर एक गुंडगीरी करून ..... अर्थात काहीही होऊ शकते. गुंडा भरपूर पैसे कमवतो तर धंद्यात नुकसान झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलतो वगैरे,वगैरे....

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 19:53
तुमची गल्लत होते आहे. अंतीम अवस्था (इंजिनिअर की मवाली इ.) समान असणे म्हणजे समता नव्हे. ते कधीही होऊ शकणार नाही, हे स्पष्टच आहे. सर्वांना जास्तीत जास्त समान संधी, शिक्षण, सन्मान, उपभोगाचे, साधनसंपत्तीवरचे अधिकार मिळणे ही समता.

वामन देशमुख Tue, 03/11/2025 - 12:02
आजी, नेहमीप्रमाणे हा लेखही प्रामाणिक निवेदन-मांडणीमुळे आवडला. माझ्या मते, "मदतनीस" वा इतर कुणीही आपल्याकडे - घरी किंवा ऑफिसात काम करणे आणि आपण त्याचा मोबदला देणे हा एक शुद्ध व्यवहार असतो. त्यात चांगले-वाईट असे काही नसते. त्यांच्या वेळेपेक्षा आपला वेळ अधिक किंमतीचा असतो आणि आपण आपल्याला परवडेल तितके पैसे देऊन तो वेळ विकत घेतो. या व्यवहारात दोघांचाही फायदा असतो. फायदा दिसत नसेल तर व्यवहारात कुणी उतरत नाही, टिकून राहत नाही. यात श्रीमंत, गरीब असाही काही भाग नाही. ज्यांना तसे वाटते त्यांना शुभेच्छा. प्रत्येकच जण कुणापेक्षा तरी श्रीमंत आणि इतर कुणापेक्षा गरीब असतो. वाजवी किंमतीत जमेल तेवढा इतरांना रोजगार देणे हीच खरी मानवता / माणुसकी असे मला वाटते. ठरलेल्या पगारापेक्षा अधिक पैसे देणे किंवा ठरल्यापेक्षा अधिक काम करणे हा त्या त्या व्यक्तींच्या चांगुलपणाचा भाग आहे.

सुबोध खरे Wed, 03/12/2025 - 19:53
मागणी आणि पुरवठा हे तत्व जगभर सर्वत्र काम करताना दिसते. त्यातून सर्वजण एकाच पातळीवर जन्माला येतात आणि परिस्थितीप्रमाणे त्यांचा उद्धार होतो किंवा नाही हे समाजवादी तत्व चूक आहे हे अनेक पातळ्यांवर सिद्ध झालेलं आहे. आमचे वडील नेसत्या वस्त्रानिशी १९५४ मध्ये मुंबईत आले. माटुंग्याच्या रेल्वे वर्क शॉप मध्ये सहाय्यक(अँप्रेन्टिस) म्हणून चिकटले. उरलेल्या वेळात स्टेनोग्राफी आणि टायपिंग शिकले तेथे कामगार म्हणून नोकरी मिळाली नाही. मग औषध कंपनीत टायपिस्ट म्हणून नोकरीस लागले. लग्न आणि मुले झाल्यावरही नोकरी सांभाळून बी ए केले, एल एल बी केले नंतर जमनालाल बजाज सारख्या संस्थेत डी बी एम केले. चतुर्थ श्रेणीतून चढत चढत प्रथम श्रेणीत पोहोचले. वडिलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आमच्या आईने शिक्षण चालू केले. तिने पण बी ए , एम ए आणि बी एड केले. आम्ही कॉलेजात जाईपर्यंत आमचे आईवडील शिकत होते. वयाच्या ४३ व्य वर्षी आई परत शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीस लागली आणि शेवटी ५८ व्य वर्षी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली. एके ठिकाणी एका अतिशय खालच्या भाषेत बोलणाऱ्या इसमाला मी या शब्दात सुनावले होते कि जेंव्हा तुमचे वडील आठवड्याच्या अखेरीस "कुठे बसायचे" म्हणून ठरवत असताना आमचे वडील अभ्यास करत होते आणि थोडी थोडकी नव्हे तर लग्नानंतर ९ वर्षे शिकत होते. यानंतर आमच्या आईने ८ वर्षे शिक्षण घेतले. त्यांच्या खांद्यावर उभे राहून मी आणि माझा भाऊ उच्चशिक्षित झालो आणि सुखवस्तू झालो. संधी मिळाली नाही म्हणून रडत बसणारे असंख्य इसम गेली कित्येक वर्षे पाहत आलो आहे. पण जवळून पहिले असताना त्यांना आतूनच आपल्या उद्धाराची आच नाही असे बऱ्याच वेळेस लक्षात आले. अनेक इसमांना मदत करण्याचा प्रयत्न केला असताना फक्त काही लोकांनाच अशी आतून आच असते हे लक्षात आले. बाकी ध्यान फक्त परिस्थितीबद्दल रडारड करायची असते. आपल्या सहाय्यिकेस नमस्कार आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/13/2025 - 12:44
मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते.
समाजवादी समतावादी मूल्यांमधे जगणार्‍या संवेदनशील माणसांना विषमता हे वास्तव आहे याचे भान त्रास देते. आपण ही यांच्या शोषणाचा घटक आहोत या जाणीव होते मग तो अपराधगंड दूर करण्यासाठी ते विशेषणेच बदलतात. अपंगांना दिव्यांग म्हणणॆ, बलात्कार पीडीतेला निर्भया म्हणणे, मानसिक रुग्णांना शुभार्थी म्हणणॆ, कोरडवाहू शेतकर्‍याला बळीराजा म्हणणे वगैरे..

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 15:05
काम हवे असणारा व काम देणारा असे दोन घटक आहेत. ज्याला जसे परवडते तसे तो स्विकारत असतो. परदेशातही पाळणाघरे आहेत. कामवाल्या बायका आहेत. माळी आहेत. तीथे ज्यांना परवडते ते हायर करतात. पाळणाघरासाठी वयोमानानुसार दर आकारण्यात येतो. चार वर्षाचा नातू आहे काही शे डाॅलरा (म्हणजे जवळपास एखाद लाख) दरमहा द्यावे लागतात. विकसित देशामधे सुद्धा विषमता आहे. आता तिकडच्या कामवालीला ताशी शंभर रुपये जरी मिळत असले तरी ती कामवालीच असते. झाडू, पोचा,बर्तन,लाॅण्ड्री सारखी कामे यंत्रांने सहज बिनबोभाट होतात. बहुतेक फ्लोरिंग कार्पेटेड असल्याने व घरात सेंट्रल ए सी असल्याने धुळ नसतेच. रोबोट प्रशीक्षीत केला की मग नंतर तो बिघडे पर्यंत चुपचाप काम करतो. पगार मागत नाही,संप करत नाही,मोर्चे काढत नाही,काम सोडून जात नाही. इतर यंत्रांचे पण असेच असते. सर्वसाधारण पणे ही यंत्रे पाच वर्षांत करता बनलेली आणतात. त्यानंतर फेकून देतात व नवीन आणतात. आवारातील झाडे कापणे,लाॅन ड्रेसिंग करणे यासाठी सुद्धा स्वयंचलित यंत्रे उपलब्ध आहेत. मनुष्यबळ कमी व महागडे तर सहायक यंत्रे तुलनेत स्वस्त व अधीक फायदेशीर. त्यामुळे सर्वसामान्य (विकसीत देशातील) नागरीक सहायक मनुष्यबळाचा मागे न जाता यंत्रे वापरतात. हे माझे बारा महिन्यांच्या वास्तव्यातील निरीक्षण आहे.

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 15:11
कधीकाळी महान शास्त्रज्ञ,प्रेसिडेंट भारतरत्न पुरस्कृत महामानवाने सुद्धा वर्तमानपत्रे विकली आहेत असे ऐकले आहे. कुठलेही काम लहान मोठे नसते ते फक्त एका साठी अर्थार्जन तर दुसऱ्या साठी सोय असते.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 15:29
कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसत पण त्याला काविळीचे औषध दिलं की सगळं बरं होऊन नॉर्मल दिसायला लागत. पण ज्यानं पिवळा चष्मा घातला आहे अन् सगळं पिवळं आहे असा बोभाटा करत आहे त्याला काय औषध देणार ? एकदा का जगात "शोषक आणि शोषित " अशी विभागणी बघायची सवय झाली आणि सतत एक गट दुसऱ्या गटावर अन्याय करतोय अन् दुसऱ्या गटाने पेटून उठून क्रांती केली पाहिजे वगैरे वगैरे विचारसरणी झाली की त्याला औषध नाही. साम्यवादी , समाजवादी , एलोन मास्क म्हणतो त्या शब्दात बोलायचं झालं तर Woke mind virus ला औषध नाही. असो. अशी माणसं रामाच्या काळात होती, कृष्णाच्या काळात होती, आपल्याही काळात आहेत. त्यांना " संघर्ष करा, संघर्ष च करत रहा " असे काहीसे सांगितलं गेले आहे ते तसे वागत राहतात. त्यात त्यांचा काय दोष ! आम्ही आपलं कृष्णाने सांगितलं तसं "सर्वत्र समबुद्धय:" व्हायचा प्रयत्न करत राहतो. :)

धर्मराजमुटके Fri, 03/14/2025 - 18:19
आजींच्या साध्याभोळ्या, घरगुती लेखावर जडबंबाळ तात्विक चर्चा करणार्‍या डाव्यांचा आणि उजव्यांचा तीव्र निषेध. आज्जे, तुझे नशीब चांगले हो की तुला चांगल्या कामवाल्या बायका मिळाल्या. आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत.

In reply to by धर्मराजमुटके

आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत. खिक्क!

विअर्ड विक्स Fri, 03/14/2025 - 19:44
नोकर असो वा हाताखालचे कामगार वा पांढरपेशी, नोकर वर्ग मालकाने माणूस म्हणून वागवले तर काही वेळेस अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळतो वा काही वेळेस नोकर वर्ग डोक्यावर बसतो . यामध्ये दुसरी शक्यता विचारात घेऊन अनेकजण निर्दयी बनण्याचा प्रयत्न करतात याउलट नम्रता व आदर हि कायमच उत्तम परतावा देते, हा माझा अनुभव आहे. बंगालसारख्या डाव्यांच्या वर्चस्व असलेल्या प्रदेशात कामगार कसे काम नि पैसे चोरी करतात हे अनुभवले आहे . याउलट त्यांच्याशी आदराने वागले तर ते बिनदिक्कत पडेल ते काम करतात. या जगात पोटाची गरज भागवण्यासाठी शिक्षित ,अशिक्षित अनेक जण दुय्यम दर्जाची कामे करतात याला इलाज नाही कारण सगळेच काही फुंसुक वंगडु नसतात.

आजी Sat, 03/22/2025 - 09:10
या लेखावर भरभरून प्रतिसाद आला. खूप चांगली चर्चा घडली. आनंद झाला. या निमित्ताने लिहिलेले उत्तर खूपच मोठे झाल्याने नवीन लेखाच्या रुपात प्रकाशित करत आहे. https://www.misalpav.com/node/52806 सर्वांचे आभार..

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 15:15
बरोबर आहे. मदतीनीसाना ही स्वतःच्या प्रगतीचा हक्क आहे. जसजसे शिक्षणाचे प्रमान वाअढत जाईल तसतसे ज्याना मदतनीस लागतात त्याना स्वावलम्बी व्हावे लागेल

स्वधर्म Mon, 03/10/2025 - 17:00
आजी, तुंम्ही अगदी पांढरपेशा माणुसकीने तुमच्या घरी येणार्या मदतनीस बाईंशी वागत आहात, ते ठीकच. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो: मुळात आपल्या समाजात काही लोकांना ही दुसर्यांची नकोशी कामे कमी पैशात करावीच का लागावीत? कोणत्याही प्रगत देशात असा दररोज दुसर्याच्या घरी येऊन काम करणारा वर्ग निदान एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. कारण? तिथे एवढी आर्थिक विषमता नाही. आपल्या देशात मध्यमवर्गीयांना सुध्दा अशी दररोज सेवा घेणे परवडते, कारण त्यांच्या आणि मदतनीसांच्या आर्थिक ऊत्पन्नात बरीच मोठी तफावत आहे. असा वर्ग उपलब्ध असणे, हे कमालीची आर्थिक विषमता असल्याचे लक्षण आहे, आणि ते योग्य नाही. बाकी आपण त्यांच्याशी व्यक्तीगत चांगले वागत असणे व त्याबद्दल स्वतःला बरे वाटणे हे ठीक, पण माणसाच्या श्रमांना एवढी किंमत आली पाहिजे की सर्वसाधारण मध्यमवर्गीयांना अशी सेवा घेणे परवडलेच नाही पाहिजे. अगदी अंथरुणाला खिळलेले, वयस्कर लोक यांना मदतनीस लागतात. काही शिक्षक घरी येऊन शिकवतात, पण त्यांना अशी माणुसकी पुरेशी नाही, तर त्यांचे आभार मानून त्यांना व्यवस्थित सन्मानपूर्वक पैसे द्यावे लागतात.

In reply to by स्वधर्म

खूप छान विचार स्वधर्म! खर आहे! १५००-२००० रुपयात महिनाभर भांडे घासणे नी लादी पुसणे हे कष्टाचे काम करणाऱ्या स्त्रियांबद्दल आदर वाटतो. त्यांचे वयही बऱ्याचदा ४०-५० च्या घरात असते तरीही न थकता त्या चार ते पाच घरे दिवसातून करतात. छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते. सणासुदीला सुटीही नसते. अशी पिळवणूक अनेक ठिकाणी दिसते अश्या लोकांबद्दल वाईट वाटते. काही लोक कंटाळून काम सोडतात नी फळे, भाजीच्या गाड्या लावतात किंवा रिक्षा चालवणे वगैरे करतात! एकंदरीत ह्या परिस्थीतिला देशात प्रचंड असलेली लोकसंख्या कारणीभूत आहे असे वाटते! पण जिकडे मध्यम नी उच्च मध्यमवर्गीय लोक एका मुलानंतर दुसरे मूल जन्माला घालायला दोन ते तीनदा विचार करतात तिकडे हीच लोक हयगय न करता चार पाच तरी मूले सहज जन्माला घालतात! हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही. कधी कधी वाटते हे परिस्थितीच्या रेट्यामुळे आहे कधीकधी वाटते ह्या लोकांनाच सुधारायचे नाही!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti Tue, 03/11/2025 - 08:59
हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही.
शिक्षणाचा अभाव यामुळे हे घडतं. आणि अजून एक समान गोष्ट दिसते या मदतनीस बायकांचे नवरे दारूडेच,जुगारी वगैरेच कसे ? शून्य टक्के पोषण असलेल्या:'दारूवर बंदी' सरकार घालणार नाही,हे चक्र मोडायला बाईच झिजत राहणार :(

In reply to by Bhakti

ही काही पटलं नाही भक्ती ताई. काही मोजक्या लोकांना दारू पिणे निषिध्द आहे , ब्रह्महत्येचे पातक आहे पण इतरांनी दारू आवर्जून प्यावी . दारू पिण्यासारखी देशभक्ती नाही. दारू सिगारेट पिणे आणि पेट्रोलची गाडी चालवणे ही सर्वात मोठ्ठी देशभक्ती आहे कारण सर्वात जास्त कर ह्याच वस्तूंवर आहे. दारू पिऊन गाडी चालवणे हा तर देशभक्तीचा परमोच्च आदर्श आहे . दारूवरचा टॅक्स, पेट्रोल चां टॅक्स, RTO कडे दंड , कोर्टात सेटिंग , वकिलाना नोकरी , न्यायाधीशाला नोकरी . किती किती म्हणून आर्थिक उलाढाल होते ह्या दारू मुळे . उगाच दारूला बदनाम करू नका. - सुधाकर संस्थापक अध्यक्ष तळीराम फॅन क्लब आर्य मदिरा मंदिर =)))) {हलके घ्या. विनोद आहे =))))}

In reply to by प्रसाद गोडबोले

दारूवर सरसकट बंदी हवी, दारू पिताना एखादा सापडल्यास दारू बनवणारा नी पिणारा ह्याना दगडाला बांधून लादेनसारखे अरबी समुद्रात बुडवायला हवे! कितीतरी संसार दारूमुळे उध्वस्त होतात! - दारूला स्पर्श न केलेला बाहुबली!

In reply to by प्रसाद गोडबोले

खिक्क! तुम्ही गुरु म्हणून ४ वर्षाआधी भेटला असतात तर आज मस्त टाकी फुल्ल करून कुठे तरी पडून असतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ Wed, 03/12/2025 - 09:48
छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते
आयटी हमालांची अवस्था फार काही वेगळी नाहिय्ये. नवीन फ्रेशर्स ना १० ते १५ हजारांवर रबवून घेणार्‍या बर्‍याच कंपन्या आहेत. कितीतरी लोकासाठी तर फॅमिली लाईफ हा प्रकार म्हणजे लग्झरी असते. पण करतात ना. नाईलाज असतो. पोटासाठी आणि ब्यांकेच्या हप्त्यांसाठी करावी लागते अशी नोकरी

In reply to by स्वधर्म

Bhakti Tue, 03/11/2025 - 08:55
नाच गं घुमा हा काही महिन्यांपूर्वी आलेला सिनेमा पण मदतनीस आणि मालकीण यांच्या सौजन्यावर होता.या सिनेमा विषयी खूप मिश्र प्रतिक्रिया वाचल्या होत्या म्हणून पाहणार नव्हते.पण एकेदिवशी कंटाळा आला म्हणून पाहिला :) पण यातही हीच कहाणी आशाताई मदतनीस ची होती.आशाताई खतत्रुड नवरा, झोपडपट्टीतली आदळाआपट,मुलाची काळजी ,ट्रॅफिक, बसच्या वेळा या सगळ्यांची कसरत करून येतं.त्यात मालकीणचे अनेक गैरसमज होतं.पण शेवटी आशाताईच मालकीणचे खुप मोठ्ठे स्वप्न पूर्ण करायला मदत करते.आणि आशाताईलाही मालकीण खुप मदत करते.सिनेमा चांगला आहे,थोडा मिर्च मसाला अधिक आहे. पण आज मालकीण असो वा मदतनीस एक बाई दुसऱ्या बाईला समजून घेऊन पुढे जात आहेत,हे खुप मोलाचं आहे.

लेख आवडाला ! आता कम्युनिस्ट विचारसरणी स्विकारलेल्या लोकांना ह्या इथेही शोषक आणि शोषित अशी विभागणी दिसते, पण त्याला काय करणार , त्याला नाईलाज आहे ! ज्यांनी कॅपिटॅलिस्ट विचारसरणी स्विकारली आहे त्यांच्या लेखी मात्र - अशा कोणतेही कॅपिटल नसलेल्या व्यक्तींना, अन्स्किल्ड लेबरला तुम्ही व्यवसाय , रोजगार उत्पन्न करुन देत आहात, जीवनाचे साधन उपलब्ध करुन देत आहात ही खुप मोठ्ठी गोष्ट आहे ! आणि नुसतेच रोजगार निर्मिती न करता सदर व्यक्तीला "कामवाली" असे न संबोधता आदराने मदतनीस असे संबोधत आहात ही खुपच मोठ्ठी गोष्ट आहे ! शिवाय जास्त कामाचे जास्त पैसे देत आहात , जमेल तेव्हा गिफ्ट देत आहात , दिवाळीला बोनसही नक्की देत असाल , एकुणच हे सर्व दर्शवत आहे की तुम्ही क्रोनी कॅपिटॅलिस्ट नाही आहात ! तस्मात् तुमचे कौतुक करावे तितके थोडे आहे ! अशी, तुमच्यासारखी चांगली माणसे समाजात टिकली पाहिजेत , अन्यथा हे कम्युनिस्ट सोशॅलिस्ट लोकं जे की आता आर्मचेअर अ‍ॅक्टिविस्ट आणि अर्बन नक्षल चा बुरखा पांघरुन बसलेत ते एक ना एक दिवस अशा भोळ्या अशिक्षितीत लोकांची माथी भडकावुन "There will be blood." हे सत्य करुन दाखवतील , आणि अनस्किल्ड लेबरला देखील देशोधडीला लावतील ह्यातही शंका नाही ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि Tue, 03/11/2025 - 11:08
समाजवादी विचारसरणी प्रामाणिक नसते असे नव्हे. पण आदर्श, जे असायला हवे ते, डायरेक्ट "असावे".. अशी काहीशी मांडणी भासते. आदर्श पर्याय हा अशक्य असू शकतो, त्यातल्या त्यात आहे ती सिस्टीम हळूहळू बदलत जाईल पण आदर्श करू जाल तर सगळेच कोसळेल. अशी मध्यम मार्गाची आशा करावी लागते हे त्या विचारसरणीला फारसे रुचत नसावे. त्यांनी सुचवलेल्या उपायांनी "नाही रे" वर्गाची "नको रे" अवस्था होऊ शकते.

In reply to by गवि

अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Tue, 03/11/2025 - 18:35
साधी गोष्ट होती: मुद्दा एक समाज म्हणून आपल्याकडे किती विषमता आहे, म्हणून काही लोकांना नाईलाजाने ही कामं करावी लागत आहेत, इतका साधा होता. कुणी पैसे दिले व माणुसकी दाखवली, हे ठीकच, त्यावर माझा काही आक्षेप नव्हता. असली कामं समाजातून कमी व्हायला पाहिजेत की नको? 'मदतनीस' स्वतःच म्हणत आहे 'जे जगणं माझ्या वाट्याला आलं ते तिच्या (मुलीच्या) वाट्याला नको.' हे त्यांचं असं जगणं चालूच रहावं, असं वाटणारी माणसं अजून समाजात आहेत, हेच मोठं दुर्दॅव आहे! अर्थात त्यामागे पिढ्यानुपिढ्यांच्या हितसंबंधांना धक्का लागू नये, प्रस्थापित प्रस्थापितच रहावेत, ही मूळ स्वार्थमूलक प्रेरणा आहे. झाडाचं एक पान दुसर्यासारखं नसतं वगैरे गैरलागू सिध्दांत तोंडावर फेकून कशाचंही समर्थन करता येतंच! बरं झालं असले लोक काही काळ तरी देशाच्या नेतृतवात नव्हते, नाहीतर डोक्यावरून मैला वाहून नेणार्याला काम व पैसे देऊन आंम्ही पुण्यच करत आहोत, असं म्हणत समाज तिथेच राहिला असता. अमेरिकेत अजूनही गुलामी प्रथा सुरू असती - गुलाम गुलाम म्हणून जन्माला आला त्यात आमचा काय दोष? त्याचं प्रारब्ध कर्मच तसं असणार असं आमचा वेदांत सांगतो ना. उलट त्याला पैसे व जेवण देऊन आंम्ही त्याच्यावर उपकारच करत आहोत म्हणत त्या अमानुष प्रथेचं समर्थन करत राहिले असते.

In reply to by स्वधर्म

गवि Tue, 03/11/2025 - 20:36
कधीतरी थिअरीज सोडून स्वार्थापलिकडचं सत्य बघा
कधीतरी बघा असे म्हणण्याइतका वाईट नाही हो मी. आणि अमुक एक असावे यात वाद नाहीच. पण त्यासाठी इम्प्लिमेंट काय करायचे?

In reply to by गवि

स्वधर्म Tue, 03/11/2025 - 22:17
गोडबोले यांनी समाजवादी गप्फा, 'झाडाचं पान...', शोषक शोषित इ. इ. ज्या थिअरीज सांगितल्या आहेत, त्यासाठी होता. माझा प्रतिसादही त्यांच्या प्रतिसादाखालीच दिसतोय, तुमच्या नाही. इंप्लीमेंट अनेक देशांनी, संस्थांनी केलंय. मुख्य गोष्ट ही की समाजातली आर्थिक विषमता कमी करणारी धोरणे आखली गेली पाहिजेत. शिक्षण व संधी तळागाळातल्या लोकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आता समाजातील यासारख्या खर्याखुर्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी राज्य आणि केंद्र सरकारे भ्रामक गोष्टींवर काम करत आहेतः उदा. औरंगजेबाची कबर. नद्यांचं पाणी स्वच्छ करण्यासाठी खर्च न करता नाशिकच्या कुंभमेळा आयोजित करण्यावर हजारो कोटी खर्च करणार आहेत. खेडोपाडीच्या शाळांसाठी पैसे नाहीत, पण हजारो कोटी खर्च करून शक्तीपीठ महामार्ग, मोठमोठी स्मारके बांधायचीआहेत.

In reply to by गवि

राम राम गवि ! त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) ज्याला लोकं कॅपिटॅलिझम म्हणतात ते तत्वज्ञानाच्या परिप्रोक्ष्यातुन पाहिलं तर विशुध्द हे "सत्य" आहे "सत्य". सत्य म्हणजे ट्रुथ असे भाषांतर करुन शिकलेल्यांना कसं समजणार ! समाजामध्ये कायमच कोणाकडे तरी जास्त कॅपिटल असणार कोणाकडे तरी कमी ! माणसांचे सोडा , प्राण्यांना देखील कळतं हे, प्राणी आपली टेरेटरी जे की कॅपिटल , ते प्राणापणाने जपतात , वाढवण्याचा प्रयत्न करतात . प्राणी सोडा , झाडांना देखील कळातं हे ! मोठ्ठं झाड जास्तीत जास्त सुर्यप्रकाश घेतं, पाणी घेतं , पोषकतत्व घेतं अन अन्य छोट्या झाडांना झक मारत त्या झाडाच्या सहार्‍याने आसर्‍याने जगता येतं , पण म्हणुन मोठ्ठं झाड तोडलं तर सगळी एको सिस्टीम नष्ट होते अन सगळीच झाडे मरतात , अन मग ती जमीन ग्रास लॅन्ड होऊन जाते . अहो झाडांचं सोडा , निर्जीव ग्रहतार्‍यांनाही आपल्या ग्रॅव्हिटेशनल फिल्ड मध्ये येणारी प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये खेचुन घ्यावी , आणि आपले अस्तित्व वाढवावे , ही "जाणीव" आहे ! हे ते सत्यमेव जयते म्हणातात ना त्यातले सत्य आहे ! मानवी समाजातील कॅपिटल ची एक रचना नष्ट होईल , पण लागलीच दुसरी काही रचना त्याची जागा घेईल , कामवाल्या बाईची पोरगी शिकुन कॉर्पोरेट मध्ये गेली तर तिथे काय परिस्थिती आहे हे आम्ही पाहतो, मग कमावलेले पैसे मार्केट मध्ये टाकु लागली तर कॅपिटल मार्केट मध्ये काय स्थिती , आपण किती चिल्लर आहोत हेही आम्ही पहात आहोत , बरं राजकारणात गेली तर तिथे पॉवर डायनॅमिक्स कसले जबरदस्त आहे हे सगळेच बीड मध्ये पहात आहेत , वॉशिंग्टन डी.सी. मध्येही पहात आहेत ! ज्याला कळतं त्याला कळतं ! यु कॅनॉट एस्केप इट ! यु सिंपली कॅनॉट ! ! हे सत्य आहे सत्य. त्यालाच ऋत असाही अल्मोस्ट समानार्थी शब्द आहे . त्यालाच धर्म असा शब्द आहे . आणि ह्या धर्माचे मुर्तीमंत स्वरुप - तोच राम आहे ! रामो विग्रहवान धर्म : _______________________________________ पण असो. ह्या क्रांती ब्रिंतीच्या बाबतीत मात्र आमचा स्वधर्म ह्यांना फुल्ल सपोर्ट आहे ! कम्युनिझम चा भस्मासुर शेवटी स्वतःच्याच मस्तकावर हात ठेऊन स्वतःचाच नाश करुन घेतु ही वस्तुस्थिती आम्ही अभ्यासली आहे , क्युबा मध्ये पाहिलं , लॅटिन अमेरिकेत पाहिलं , नॉर्थ कोरियात पाहिलं , रशियात पाहिलं , चायना मध्येही कम्युनिस्ट सरकार समानता आणुन तेथील लोकांच्या हिताची काय काळजी घेत आहे हेही पहात आम्ही =)))) तस्मात ह्या बाबतीत , स्वधर्म आमचा तुम्हाला जोरदार पाठिंबा आहे , भिडा तुम्ही , उध्वस्त करुन टाका ही व्यवस्था ! मजा यायला हवा =)))) लाल सलाम ! क्रांती चिरायु होवो ! =)))) Samant

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म गुरुवार, 03/13/2025 - 06:41
>> त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) >> ज्याला कळतं त्याला कळतं ! शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच. राहता राहिला प्रश्न पुलंचा. तुमचा कयास चुकवल्या बद्दल माफ करा, पण मी त्यांची पुस्तके, व्यक्ती आणि वल्ली वगैरे वाचलेली आहेत. पण बालबुध्दीने दिपून जाण्याचे दिवस संपल्यावर दृष्टी विस्तारित झाल्यावर काही वेगळे जाणवते. थोर लेखक होते, त्यांची विनोदबुद्धी तरल होती, भाषेवर हुकूमत होती, पण तेही तेच पाहू शकले जे त्यांना त्यांच्या स्थानावरुन दिसलं. तुंम्ही दुसरीकडे जन्माला आला असाल, तर काही वेगळं जाणवू लागतं. अंतू बर्वा, नंदा प्रधान, नानू सरंजामे यांना आडनावे आहेत, पण नामू परटालाच फक्त कसं बरं आडनांव नाही? त्याची जात हेच त्याचं आडनाव का? त्यांनी महिलांच्या जाडपणावर, रंगावर, गटणेच्या बावळटपणा वर केलेले हुकमी विनोद वेगळ्या प्रकारे दिसू लागले. ... ... चितळे मास्तर मात्र ‘ढ’ मुलांना अत्यंत आदराने पुकारीत. गोदी गुळवणी ही साक्षात ‘ढ’ होती. गोरी, घाऱ्या डोळ्यांची, भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी चवथी-पाचवीपर्यंत जेमतेम शाळेत टिकली. शेवटी अण्णा गुळवण्यांनी तिला उजवली. हे असले विनोद बायकाही अगदी निरागसपणे एन्जॉय करतात, फक्त त्या गोदूसारख्या नसतील तर. अंतू बर्वा काय म्हणतो? ..पण इंग्रज गेला तो कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं? धंदा बुडीत खाती जायला लागला - फुकलंनीत दिवाळं! कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा!’’ ज्यांनी कधी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलाच नाही त्यांच्या मनातील अपराधीपणाची भावना कमी करण्याचं काम पु. ल. देशपांडें करत आहेत का? शिवाय इंग्रज भारत सोडून गेले ते कंटाळून असं बोलून ज्यांनी याकामी बलिदान दिलं त्यांचं श्रेयही काढून घेताहेत. अजून काय हवं? * * * अंतू बर्वा यांची समाजवाद, समता-विषमता याबाबतची मतं तर फारच प्रखर आहेत. कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? पु. ल. देशपांडे यांच्या श्रीमंत भाषेच्या प्रभावातून बाहेर पडणं हे काम आहे. जे त्यांना दिसलं नाही, ते त्यांचं आ करुन वाचणाऱ्या तुंम्हाला काय दिसणार? जाऊ द्या, त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या. मी कुठेही साम्यवादाचं समर्थन केलेलं नाही, फक्त्यात समाजातली आर्थिक विषमता एवढाच मुद्दा होता. त्यामुळे क्रांती वगैरे पाल्हाळाबद्दल आमचा पास. दुसऱ्याला न मांडलेला मुद्दा चिकटवून झोपण्याची युक्ती जुनी झाली.

In reply to by स्वधर्म

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 10:38
त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या.
मी तेच करतो हो आता . तुका म्हणे आता खेळतो कौतुके l झाले तुझे सुख अंतर्बाही ll मी काय तुम्हाला टॅग केलेलं का माझ्या प्रतिसादात, का अक्षता पाठवलेल्या माझ्या प्रतिसादावर तुम्ही प्रतिसाद द्यायला या म्हणून =)))) मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली त्याला मी काय करू =)))) बाकी तुम्हाला जाणवत नसेल पण तुम्ही ज्याप्रकारे मते मांडता की समाजात कायम शोषक शोषित अशी विभागणी असणार , आर्थिक विषमता असणार, संघर्ष केला पाहिजे वगैरे वगैरे ही साम्यवादी मांडणीच आहे . जे तुमच्यात अंतर्बाह्य आहे ते मला तुम्हाला चिकटवायची गरज नाही. असो. चालू द्या तुमचं. बालपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा l ऐरावत रत्न थोर l तया अंकुशाचा मार ll अथक प्रयत्नांनी परत मिळवलं आहे हे बालपण आम्ही. आमचं आम्ही बालोद्यानात खेळत राहतो मजेत . राम

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 20:03
>> मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली. जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती. अगदी स्पष्टपणे! मी फक्त ती नीट संदर्भासहित दाखवून दिली. ती मी चर्चेत आणली असा खोटा कांगावा नका करू. >> कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? याला उत्तर न देता पळ काढला आणि अंगावर शेकतंय म्हटलं की दुसर्‍यांवर जातीवाचक आरोप करायचे! भले शाब्बास!!

In reply to by स्वधर्म

कंटाळा आला ह्या भंपकपणाचा =))))
जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती
आम्हातरी कधीही जात दिसली नाही पुलंच्या लेखनात . महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांनाही दिसलेली नाही, अजुन कोणी पुलंच्या पुस्तकाचे दहन बिहन केल्याचे ऐकिवात नाही. तुम्हाला जात दिसली हा तुमचा प्रॉब्लेम आहे , पुलंचा नाही अन माझाही नाही ! बाष्कळ प्रश्नांना काय उत्तरे देत बसणार ? मुळ मुद्दा हा होता की ही समाजवादी विचारसरणी भंपक आहे , समाजात वर खाली , डावे उजवे , श्रीमंत गरीब, हे भेद होतेच अन राहणारच , तुम्ही जाणुन बुजुन ओढुन ताणुन ते मिटवायचा प्रयत्न केला म्हणुन ते मिटणार नाही , त्याचे फक्त रुप पालटेल. थोटा पांडु, तिरळा हरी साठ्या , हे स्वातंत्र्यात होते , पारतंत्र्यात होते , इंग्रज अन कोण कोकणा रेल्वे अन स्वातंत्र्य प्रगती बिगती बगैरे कितीही झाले तरी हे भेदाभेद राहणारच आहेत . पण म्हणुन ह्या भेदांचे भांडवल करुन सामयवादी शोषक विरुध्द शोशित असा कायमचा संघर्ष जो तुम्ही मांडत आहात तो मात्र तद्दन निरर्थक आहे. अन काय बोलता , पळ काढणे =)))) अंगावर शेकणे =)))) तुमच्या इन जनरल विचारसरणीतील भंपकपणाचा कंटाळा आल्याने उत्तर द्यायची इच्छा नाही. मी कधीही जातिवाचक बोलत नाही कारण मी जाती मानतच नाही . माझ्या लेखी फक्त गट आहेत , जाती नाहीत ! जातीचा उल्लेख तुम्ही केला आहे ह्या प्रतिसादात नामु च्या निमित्ताने "https://www.misalpav.com/comment/1190789#comment-1190789" मी तसा उल्लेख केलेला नाही . चुकुनही कधी केलेला नाही . आता बास =)))) धुळवड पुरे . माझं काही तुम्हाला पटणारं नाहीये, अन तुमचं काही मला पटाणारं नाहीये , मग कशाला उगाच कळफलक बडवत बसा =)))) संघर्ष करा ! संघर्षच करत रहा !

In reply to by स्वधर्म

Bhakti गुरुवार, 03/13/2025 - 10:56
बाकी खुप चांगलं लिहलंय.. पण हे खाली लिहिलेलं टाळू शकला असता तर बरं वाटलं असतं.
शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच.
ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.खेदकारक!

In reply to by Bhakti

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 12:38
ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.
कारण ती वस्तुस्थिती आहे म्हणुन ! ह्यात खेदकारक असं काहीच नाही . एखादा व्यक्ती एखाद्या विशिष्ठ कुटुंबातच का जन्म घेत असावा ? कोणी श्रीमंत कोणी गरीब, कोणी सेलिब्रिटी कोणी भिकारी, कोणी शुद्र कोणी ब्राह्मण, कोणी सुसंकृत कोणी संस्कृती विध्वंसक , कोणी आहे रे , कोणी नाही रे . असं का असावं ? ह्याला व्यवस्थित रितसर तत्वज्ञानाच्या दृष्टीने, अध्यात्मिक उत्तर आहे. आणि पुढे जाऊन तुम्ही ज्या परिस्थितीत जन्माला आलात त्या परिस्थितीतच राहाता असेही नाही , तुम्ही तुमच्या कर्माने तुम्हाला पाहिजे तसे बदल घडवताच ! आमच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये आम्ही जी लिनियर मॉडेल्स बनवतो त्यानुसार बोलायचे झाले तर तुमची सद्य स्थिती = तुमची प्रारब्ध्द कर्मे + संचित कर्मे + क्रियामाण कर्मे + ईश्वरेच्छा अशी समष्ठी असते ! जे संचित आहे ते संचित आहे ! तुम्ही तुमच्या क्रियामाण कर्माने ते ओव्हर राईड करु शकताच ! त्या कामवाल्या बाईंची मुलगी ने कष्ट केले तर तेही उच्च पदस्थ होऊ शकतेच ! (आणि एखाद्या उच्च स्थितीतील व्यक्तीने कर्मे केले नाही तर तो देशोधडीला लागु शकतोच . एकीकडे मुकेस भाई पोरांच्या लग्नांवर अब्जावधी रुपये खर्च करत असताना , त्यांचा सख्खा भाऊ , की ज्याला वडीलोपार्जित इस्टेटीत जास्त माल मिळाला होता , तो अनिल भाई अक्षरशः भिकारी होण्याच्या मार्गावर आहे !) ह्यात काहीही खेदजनक नाही. ज्याक्षणी तुम्हाला ह्या सर्व मॅट्रिक्स चे टर्निंग गेयर्स लक्षात येतात , जेव्हा ह्या मॅट्रिक्स चे अनादी अनंत अस्तित्व लक्षात येते तेव्हा तुम्हाला खेद वगैरे काहीही वाटायचेच बंद होते . त्यानंतर all you can do after that is to appreciate how exquisitely beautifully its designed ! असो हा स्वतंत्र लेखाचा विषय असल्याने इथे जास्त लिहित नाही !

In reply to by Bhakti

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 19:44
तुमच्यासारख्या संवेदनशील व्यक्तीला जन्मावर माणसाचं भवितव्य ठरू नये, असं वाटणं सहाजिक आहे. पण तुंम्हा आंम्हाला काहीही वाटो, जन्मावर बरंच काही ठरतं ही वस्तुस्थिती आहेच. आपल्याला मिळणारी आर्थिक सामाजिक परिस्थिती जन्मावरच अवलंबून नाही का? माणसाला वाढीच्या वयात येणारे अनुभव त्याच्या आर्थिक सामाजिक व भौगोलिक परिस्थितीनुसारच ठरणार. आणि मग पुढे त्याच्या धारणा, मते, दृष्टिकोन हे आजूबाजूला जे मिळतं (शिक्षण, वाचन, संगत इ.) त्यावर ठरणार. ज्याची समज वाढलेली आहे, फक्त त्यालाच या अदृष्य पिंजर्‍याच्या पलीकडे काही दुसरे दृष्टीकोन आहेत हे कळणार. मान्य करणे ही अधिक पुढची पायरी झाली. कोणी कुठे जन्म घ्यावा, हे काही त्या व्यक्तीच्या हातात नाही. कदाचित समाजात संपूर्ण समता (संधी, शिक्षण, व्यवसाय) असणे हि अत्यंत आदर्श अवस्था कधीच येऊ शकणार नाही. पण जगभरातली सरकारे, जी लोककल्याणकारी आहेत त्यांनी हे केले आहे व परिणामतः त्यांच्याकडे विषमता कमी होऊन जीवनाचा दर्जा सुधारलेला आहे, हे तर स्पष्ट आहे. कोण कुठे जन्माला आला याला काही भ्रामक अध्यात्मिक कार्यकारणभाव चिकटवणे व म्हणून समाजात समता असणे याची टर उडवणे, हे मात्र समर्थनीय नाही.

In reply to by स्वधर्म

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 11:38
असे माझे मत आहे. विषमता आहे म्हणून स्पर्धा आहे. स्पर्धा आहे म्हणून विकास/प्रगती आहे. विषमतेवर कसा विजय मिळवायचा किंवा आहे त्या परिस्थितीत खुश रहायचं किंवा रडत बसायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जगात अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर कुरघोडी करून अविश्वसनीय असा बदल घडवून आणला. माझ्याच समोरचे एक उदाहरण. छोटे कुटुंब, आई,वडील एक मुलगा ,मुलगी. आई क्षयरोगी अतिंम टप्प्यात. वडिल नालायक, लंब्या,लंब्या फेकणारे. मुलांच्या जीवावर बांडगुळ म्हणावे लागेल.अर्थिक परिस्थिती हलाखीची. मुलगा स्टॅन्ड वर भाजभाजलेल्या शेंगा विकायचा तर मुलगी लोकांची धुणी भांडी. आई वारली,वडिलांनी दुसरे लग्न केले,मुलांना वाऱ्यावर सोडले. भावंडानी एकमेला आधार दिला. शिक्षण पुढे चालू ठेवले. गावातच काॅलेज असल्याने फारसा खर्च नव्हता. घरभाडे माफक व मुलांची धडपड बघून गल्लीतील लोंकानी शक्य होईल तशी मदत दिली. पुढे मुलगी बि एड,एम एड झाली आज गावातच प्रथितयश ट्युशन्स संस्थेची मालकीण तर मुलगा पुढे बि काॅम,सी ए झाला व स्वताची फर्म टाकली आहे. असो,मुळ विषय साधा सरळ होता. घरातील नोकरांना माणुसकीची वागणूक आणी योग्य मेहेनताना देण्याबाबत. त्याला इतर देशातील परिस्थितीशी तुलना करत भारतीय समाजिक विषमता कशी समाज वाद विरोधी आहे हा मुद्दा उपस्थित करून विषयांतर केले जात आहे. सामाजीक विषमतेला अनेक कारणे आहेत परंतू विषयांतर होईल म्हणून टाळून एवढेच म्हणतो की आपल्या बरोबर जे गरीब आपल्यासाठी काम करतात त्यांना य्योग्य वागणूक व सद्यपरिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करावी. माझ्या पत्नीला घरकामात मदत करण्यासाठी एकच कामवाली बाई गेले तेरा वर्ष नोकरीत आहे.थोडीफार शिक्षण झालेली,अकुशल. नवरा अशीच छोटी मोठी कामे करतो. दोन मुलं नुकतीच दहावी बारावी झालीत. वेळोवेळी जाहीर झालेल्या सरकारी योजनांचा कसा लाभ घ्यायचा हे माझ्या पत्नीने तीला मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री आवास योजनेचा फार्म भरायला लावला. आज तीचे स्वताचे घर झाले आहे. तीनचार अन्य घरात काम करते म्हणून हप्त्यात वाॅशिंग मशीन घेऊन दिले कारण तीच्या घरातील कपडे धुण्याचे श्रम आणी वेळ वाचावा, पिठ दळण्याची विजेची चक्की घ्यायला लावली. आता मुले फावल्या वेळात आसपास च्या घरातील दळणे दळून देतात व अतिरिक्त अर्थार्जन करतात. घर महिलेच्या नावावर असल्याने नवर्‍याची दादागिरी कमी झाली आहे. सरकारच्या लाडक्या बहिणाबाई म्हणून महिना भाऊबीज चालू झाली आहे. अर्थिक परिस्थितीत सुधार होतोय. आता मुलांवर अवलंबून आहे की ते आपल्या आईच्या कष्टाचे कसे परिमार्जन करतात. तर माईसाहेबांनी मांडलेला मुद्दा उचलून धरत एवढेच म्हणेन, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. लहान मोठे,गरीब श्रीमंत हा भेद यावत्चंद्रदिवाकरौ रहाणारच आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 12:44
यावत्चंद्रदिवाकरौ
तत्वज्ञान असं आहे की दिवाकराचे अर्थात सुर्याचं चंद्रापेक्षा मोठ्ठं असणे, जास्त तेजस्वी असणं , स्वयं प्रकाशमान असणं , दाहकारक असणं हेही विषमतेचे प्रतिक आहे , अन्याय आहे वगैरे वगैरे . =))))

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म Fri, 03/14/2025 - 17:06
विषमता हा निसर्गाचा मूळ गुणधर्म आहे, हे निसर्गव्यवहारात ठीक. निसर्गव्यवहारात जंगलातील बलवान प्राणी दुर्बल प्राण्यांना खाणारच. मानवी व्यवहारात असं चालेल काय? पूर्वी असेच होते, राजाला सर्वाधिकार होते. मनात येईल त्याला शिक्षा करण्याचा अधिकार होता. का बरं हे बदललं असावं? मानवी व्यवहारात सामाजिक आर्थिक विषमता टिकवायची का? मानवी व्यवहारात समता (समानता नव्हे) आणण्याचे प्रयत्न कोणत्याही कल्याणकारी राज्याकडून केले जातात. ते थांबवावे का?

In reply to by स्वधर्म

कर्नलतपस्वी Fri, 03/14/2025 - 19:57
कशी मिटवणार? एकाच आई-वडीलांची चार मुले. समान संधी णण एक भरपूर शिकतो डाॅक्टर इंजिनियर होतो. एक शिक्षणात सुमार काहीतरी धंदा काढतो,एक उनाड,मवालीगीरी करतो आता यात समता कुठुन येणार.. प्रत्येक घरात अशी उदाहरणे मिळतील. धंदेवाला खुप पैसा कमवतो तर शिक्षित सन्मान पुर्वक जिवन यापन करतो तर एक गुंडगीरी करून ..... अर्थात काहीही होऊ शकते. गुंडा भरपूर पैसे कमवतो तर धंद्यात नुकसान झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलतो वगैरे,वगैरे....

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 19:53
तुमची गल्लत होते आहे. अंतीम अवस्था (इंजिनिअर की मवाली इ.) समान असणे म्हणजे समता नव्हे. ते कधीही होऊ शकणार नाही, हे स्पष्टच आहे. सर्वांना जास्तीत जास्त समान संधी, शिक्षण, सन्मान, उपभोगाचे, साधनसंपत्तीवरचे अधिकार मिळणे ही समता.

वामन देशमुख Tue, 03/11/2025 - 12:02
आजी, नेहमीप्रमाणे हा लेखही प्रामाणिक निवेदन-मांडणीमुळे आवडला. माझ्या मते, "मदतनीस" वा इतर कुणीही आपल्याकडे - घरी किंवा ऑफिसात काम करणे आणि आपण त्याचा मोबदला देणे हा एक शुद्ध व्यवहार असतो. त्यात चांगले-वाईट असे काही नसते. त्यांच्या वेळेपेक्षा आपला वेळ अधिक किंमतीचा असतो आणि आपण आपल्याला परवडेल तितके पैसे देऊन तो वेळ विकत घेतो. या व्यवहारात दोघांचाही फायदा असतो. फायदा दिसत नसेल तर व्यवहारात कुणी उतरत नाही, टिकून राहत नाही. यात श्रीमंत, गरीब असाही काही भाग नाही. ज्यांना तसे वाटते त्यांना शुभेच्छा. प्रत्येकच जण कुणापेक्षा तरी श्रीमंत आणि इतर कुणापेक्षा गरीब असतो. वाजवी किंमतीत जमेल तेवढा इतरांना रोजगार देणे हीच खरी मानवता / माणुसकी असे मला वाटते. ठरलेल्या पगारापेक्षा अधिक पैसे देणे किंवा ठरल्यापेक्षा अधिक काम करणे हा त्या त्या व्यक्तींच्या चांगुलपणाचा भाग आहे.

सुबोध खरे Wed, 03/12/2025 - 19:53
मागणी आणि पुरवठा हे तत्व जगभर सर्वत्र काम करताना दिसते. त्यातून सर्वजण एकाच पातळीवर जन्माला येतात आणि परिस्थितीप्रमाणे त्यांचा उद्धार होतो किंवा नाही हे समाजवादी तत्व चूक आहे हे अनेक पातळ्यांवर सिद्ध झालेलं आहे. आमचे वडील नेसत्या वस्त्रानिशी १९५४ मध्ये मुंबईत आले. माटुंग्याच्या रेल्वे वर्क शॉप मध्ये सहाय्यक(अँप्रेन्टिस) म्हणून चिकटले. उरलेल्या वेळात स्टेनोग्राफी आणि टायपिंग शिकले तेथे कामगार म्हणून नोकरी मिळाली नाही. मग औषध कंपनीत टायपिस्ट म्हणून नोकरीस लागले. लग्न आणि मुले झाल्यावरही नोकरी सांभाळून बी ए केले, एल एल बी केले नंतर जमनालाल बजाज सारख्या संस्थेत डी बी एम केले. चतुर्थ श्रेणीतून चढत चढत प्रथम श्रेणीत पोहोचले. वडिलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आमच्या आईने शिक्षण चालू केले. तिने पण बी ए , एम ए आणि बी एड केले. आम्ही कॉलेजात जाईपर्यंत आमचे आईवडील शिकत होते. वयाच्या ४३ व्य वर्षी आई परत शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीस लागली आणि शेवटी ५८ व्य वर्षी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली. एके ठिकाणी एका अतिशय खालच्या भाषेत बोलणाऱ्या इसमाला मी या शब्दात सुनावले होते कि जेंव्हा तुमचे वडील आठवड्याच्या अखेरीस "कुठे बसायचे" म्हणून ठरवत असताना आमचे वडील अभ्यास करत होते आणि थोडी थोडकी नव्हे तर लग्नानंतर ९ वर्षे शिकत होते. यानंतर आमच्या आईने ८ वर्षे शिक्षण घेतले. त्यांच्या खांद्यावर उभे राहून मी आणि माझा भाऊ उच्चशिक्षित झालो आणि सुखवस्तू झालो. संधी मिळाली नाही म्हणून रडत बसणारे असंख्य इसम गेली कित्येक वर्षे पाहत आलो आहे. पण जवळून पहिले असताना त्यांना आतूनच आपल्या उद्धाराची आच नाही असे बऱ्याच वेळेस लक्षात आले. अनेक इसमांना मदत करण्याचा प्रयत्न केला असताना फक्त काही लोकांनाच अशी आतून आच असते हे लक्षात आले. बाकी ध्यान फक्त परिस्थितीबद्दल रडारड करायची असते. आपल्या सहाय्यिकेस नमस्कार आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/13/2025 - 12:44
मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते.
समाजवादी समतावादी मूल्यांमधे जगणार्‍या संवेदनशील माणसांना विषमता हे वास्तव आहे याचे भान त्रास देते. आपण ही यांच्या शोषणाचा घटक आहोत या जाणीव होते मग तो अपराधगंड दूर करण्यासाठी ते विशेषणेच बदलतात. अपंगांना दिव्यांग म्हणणॆ, बलात्कार पीडीतेला निर्भया म्हणणे, मानसिक रुग्णांना शुभार्थी म्हणणॆ, कोरडवाहू शेतकर्‍याला बळीराजा म्हणणे वगैरे..

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 15:05
काम हवे असणारा व काम देणारा असे दोन घटक आहेत. ज्याला जसे परवडते तसे तो स्विकारत असतो. परदेशातही पाळणाघरे आहेत. कामवाल्या बायका आहेत. माळी आहेत. तीथे ज्यांना परवडते ते हायर करतात. पाळणाघरासाठी वयोमानानुसार दर आकारण्यात येतो. चार वर्षाचा नातू आहे काही शे डाॅलरा (म्हणजे जवळपास एखाद लाख) दरमहा द्यावे लागतात. विकसित देशामधे सुद्धा विषमता आहे. आता तिकडच्या कामवालीला ताशी शंभर रुपये जरी मिळत असले तरी ती कामवालीच असते. झाडू, पोचा,बर्तन,लाॅण्ड्री सारखी कामे यंत्रांने सहज बिनबोभाट होतात. बहुतेक फ्लोरिंग कार्पेटेड असल्याने व घरात सेंट्रल ए सी असल्याने धुळ नसतेच. रोबोट प्रशीक्षीत केला की मग नंतर तो बिघडे पर्यंत चुपचाप काम करतो. पगार मागत नाही,संप करत नाही,मोर्चे काढत नाही,काम सोडून जात नाही. इतर यंत्रांचे पण असेच असते. सर्वसाधारण पणे ही यंत्रे पाच वर्षांत करता बनलेली आणतात. त्यानंतर फेकून देतात व नवीन आणतात. आवारातील झाडे कापणे,लाॅन ड्रेसिंग करणे यासाठी सुद्धा स्वयंचलित यंत्रे उपलब्ध आहेत. मनुष्यबळ कमी व महागडे तर सहायक यंत्रे तुलनेत स्वस्त व अधीक फायदेशीर. त्यामुळे सर्वसामान्य (विकसीत देशातील) नागरीक सहायक मनुष्यबळाचा मागे न जाता यंत्रे वापरतात. हे माझे बारा महिन्यांच्या वास्तव्यातील निरीक्षण आहे.

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 15:11
कधीकाळी महान शास्त्रज्ञ,प्रेसिडेंट भारतरत्न पुरस्कृत महामानवाने सुद्धा वर्तमानपत्रे विकली आहेत असे ऐकले आहे. कुठलेही काम लहान मोठे नसते ते फक्त एका साठी अर्थार्जन तर दुसऱ्या साठी सोय असते.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 15:29
कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसत पण त्याला काविळीचे औषध दिलं की सगळं बरं होऊन नॉर्मल दिसायला लागत. पण ज्यानं पिवळा चष्मा घातला आहे अन् सगळं पिवळं आहे असा बोभाटा करत आहे त्याला काय औषध देणार ? एकदा का जगात "शोषक आणि शोषित " अशी विभागणी बघायची सवय झाली आणि सतत एक गट दुसऱ्या गटावर अन्याय करतोय अन् दुसऱ्या गटाने पेटून उठून क्रांती केली पाहिजे वगैरे वगैरे विचारसरणी झाली की त्याला औषध नाही. साम्यवादी , समाजवादी , एलोन मास्क म्हणतो त्या शब्दात बोलायचं झालं तर Woke mind virus ला औषध नाही. असो. अशी माणसं रामाच्या काळात होती, कृष्णाच्या काळात होती, आपल्याही काळात आहेत. त्यांना " संघर्ष करा, संघर्ष च करत रहा " असे काहीसे सांगितलं गेले आहे ते तसे वागत राहतात. त्यात त्यांचा काय दोष ! आम्ही आपलं कृष्णाने सांगितलं तसं "सर्वत्र समबुद्धय:" व्हायचा प्रयत्न करत राहतो. :)

धर्मराजमुटके Fri, 03/14/2025 - 18:19
आजींच्या साध्याभोळ्या, घरगुती लेखावर जडबंबाळ तात्विक चर्चा करणार्‍या डाव्यांचा आणि उजव्यांचा तीव्र निषेध. आज्जे, तुझे नशीब चांगले हो की तुला चांगल्या कामवाल्या बायका मिळाल्या. आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत.

In reply to by धर्मराजमुटके

आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत. खिक्क!

विअर्ड विक्स Fri, 03/14/2025 - 19:44
नोकर असो वा हाताखालचे कामगार वा पांढरपेशी, नोकर वर्ग मालकाने माणूस म्हणून वागवले तर काही वेळेस अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळतो वा काही वेळेस नोकर वर्ग डोक्यावर बसतो . यामध्ये दुसरी शक्यता विचारात घेऊन अनेकजण निर्दयी बनण्याचा प्रयत्न करतात याउलट नम्रता व आदर हि कायमच उत्तम परतावा देते, हा माझा अनुभव आहे. बंगालसारख्या डाव्यांच्या वर्चस्व असलेल्या प्रदेशात कामगार कसे काम नि पैसे चोरी करतात हे अनुभवले आहे . याउलट त्यांच्याशी आदराने वागले तर ते बिनदिक्कत पडेल ते काम करतात. या जगात पोटाची गरज भागवण्यासाठी शिक्षित ,अशिक्षित अनेक जण दुय्यम दर्जाची कामे करतात याला इलाज नाही कारण सगळेच काही फुंसुक वंगडु नसतात.

आजी Sat, 03/22/2025 - 09:10
या लेखावर भरभरून प्रतिसाद आला. खूप चांगली चर्चा घडली. आनंद झाला. या निमित्ताने लिहिलेले उत्तर खूपच मोठे झाल्याने नवीन लेखाच्या रुपात प्रकाशित करत आहे. https://www.misalpav.com/node/52806 सर्वांचे आभार..
लेखनप्रकार
मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते. माझा मुलगा, सून, नातू हेही त्यांना ताई किंवा बाई, काकू, मावशी अशी त्यांच्या वयाकडे बघून हाक मारतात. त्यांना अहो जाहो करतात. माझ्या एक सांसारिक बाई म्हणून असलेल्या आयुष्यात अनेक मदतनीस आल्या. माझ्या घरी त्या अनेक वर्षे टिकायच्या. माझी बदली होईपर्यंत त्या माझं काम सोडायच्या नाहीत. घरी मी, माझे मिस्टर, मुलगा, सासू सासरे होते.

नववधू प्रिया मी..

सर्वसाक्षी ·

सर्वसाक्षी Sun, 03/09/2025 - 00:37
निघण्यापूर्वी विजाचा आणि स्त्रियांचा निरोप घेतला कृपया विजाचा आणि सरिताचा असे वाचावे. ( स्वयंसुधारणेचा प्रताप)

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 11:10
हे अशी मंडळी असतात काही. अगदी कोत्या मनाची. आयुष्यात आलेल्या संधीचा उपयोग करून बरोअब्बर वेळेवर इतराना त्रास द्यायची हौस भागवून घेतात

सौंदाळा Mon, 03/10/2025 - 12:56
काहीतरी भन्नाट वाचायला मिळेल म्हणून उत्सुकता होती पण वहिनीने वाट लावली सगळ्याची. असो लेख छान झालाय. पण समजा ब्लॉकची चावी मिळाली असती तर काय 'सजावट' करायचा विचार होता हे पण सांगून टाका.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 15:12
साक्षी भाऊ लिहीते झाले ते महत्वाचे. साक्षी भाऊ फोटो चांगले काढतात कॅमेर्याने . आता एखादे फोटो सेशन येऊद्या...... निसर्गाचे

चौथा कोनाडा Mon, 03/17/2025 - 13:00
साक्षीभाऊंनी त्या काळची नवविवाहित जोडप्यांची अस्सल समस्या कुशलतेने मांडलीय. त्या वेळचा पतिपत्नी रोमान्स हा जोडप्याचा रोमान्स नसून कौटुंबिक रोमान्स असायचा .... आहे त्यात जोडप्याने अ‍ॅडजेस्ट करत यातुन एकांत शोधत नातं दृढ करायचं. आम्ही पण यातून तावून सुलाखून गेलोय.. यशस्वी झालोय ! साक्षीभाऊ अश्या कहाण्या येउंद्या आजून !

श्वेता२४ Mon, 03/17/2025 - 15:54
वहीनीची कृती कुचकेपणाची होती यात काही वाद नाही. पण त्यामागे तीला यात पराकोटीची तडजोड करावी लागलेली असणार असे दिसते. स्वताच्या लग्नात दोन्ही भाऊ सोबत राहत नसतानाही नवीन फ्लॅट घ्यायचा 'समजुतदारपणा' दाखविणाऱ्या विजूने दादा-वहीनीच्या प्रायव्हसी बाबत कोणताही समजूतदारपणा भूतकाळात दाखविेलेला दिसत नाही. त्याचाच वचपा वहीनीने काढलेला दिसतो. माझ्या माझ्या एका मित्राने लग्न झाल्यानंतर हनिमूनला जाण्याचे नियोजन केले होते. त्याच्या घरात त्याच्या वहिनीने असाच दंगा केला. त्यांच्या घरात लग्न झाल्यानंतर असे फिरायला जाण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे लग्नानंतर लगेचच त्याच्या मोठ्या भावाला कोणीही फिरायला जाऊ दिले नाही. लग्नानंतर महिन्यांनी त्याचा भाऊ वहिनीला घेऊन तिच्या माहेरी गेला आणि तिथून ते गुपचूप फिरायला गेले होते. त्यामुळे त्याच्या वहिनीने लग्नानंतर माझ्या मित्राने हनिमूनला जाऊ नये असा पवित्रा घेतला. माझा मित्र त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत लाडका होता. ३-४ वर्षाच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असल्यामुळे आई-वडीलही आता नव्या गोष्टी स्वीकारू लागले होते. त्यामुळे मित्राच्या हनिमूनला त्यांचा विरोध नव्हता. मित्राने हे मला सांगताच मी त्यांला हेच म्हणले की ज्यावेळी तुझ्या भावाच्या हनिमूनची गोष्ट होती त्यावेळी त्या दोघांनी हनिमूनला जावे याबाबत तू काय स्टॅन्ड घेतला होतास? त्यावर तो म्हणाला की मी काहीच बोललो नाही. घरचे सगळेच त्या विरोधात होते. त्यामुळे आई-बाबांना मी कसा विरोध करणार? त्यावर मी त्याला म्हणले तू काही इतका लहान नक्कीच नव्हतास की याबाबत एक भूमिका घेऊ शकशील. तू तुझ्या आई-वडिलांचे मत बदलायला हवे होतेस. कमीत कमी दादा वहिनी च्या बाजूने बोलला असतास तर आज वहिनीने इतका विरोध केला नसता.....

सर्वसाक्षी Sun, 03/09/2025 - 00:37
निघण्यापूर्वी विजाचा आणि स्त्रियांचा निरोप घेतला कृपया विजाचा आणि सरिताचा असे वाचावे. ( स्वयंसुधारणेचा प्रताप)

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 11:10
हे अशी मंडळी असतात काही. अगदी कोत्या मनाची. आयुष्यात आलेल्या संधीचा उपयोग करून बरोअब्बर वेळेवर इतराना त्रास द्यायची हौस भागवून घेतात

सौंदाळा Mon, 03/10/2025 - 12:56
काहीतरी भन्नाट वाचायला मिळेल म्हणून उत्सुकता होती पण वहिनीने वाट लावली सगळ्याची. असो लेख छान झालाय. पण समजा ब्लॉकची चावी मिळाली असती तर काय 'सजावट' करायचा विचार होता हे पण सांगून टाका.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 15:12
साक्षी भाऊ लिहीते झाले ते महत्वाचे. साक्षी भाऊ फोटो चांगले काढतात कॅमेर्याने . आता एखादे फोटो सेशन येऊद्या...... निसर्गाचे

चौथा कोनाडा Mon, 03/17/2025 - 13:00
साक्षीभाऊंनी त्या काळची नवविवाहित जोडप्यांची अस्सल समस्या कुशलतेने मांडलीय. त्या वेळचा पतिपत्नी रोमान्स हा जोडप्याचा रोमान्स नसून कौटुंबिक रोमान्स असायचा .... आहे त्यात जोडप्याने अ‍ॅडजेस्ट करत यातुन एकांत शोधत नातं दृढ करायचं. आम्ही पण यातून तावून सुलाखून गेलोय.. यशस्वी झालोय ! साक्षीभाऊ अश्या कहाण्या येउंद्या आजून !

श्वेता२४ Mon, 03/17/2025 - 15:54
वहीनीची कृती कुचकेपणाची होती यात काही वाद नाही. पण त्यामागे तीला यात पराकोटीची तडजोड करावी लागलेली असणार असे दिसते. स्वताच्या लग्नात दोन्ही भाऊ सोबत राहत नसतानाही नवीन फ्लॅट घ्यायचा 'समजुतदारपणा' दाखविणाऱ्या विजूने दादा-वहीनीच्या प्रायव्हसी बाबत कोणताही समजूतदारपणा भूतकाळात दाखविेलेला दिसत नाही. त्याचाच वचपा वहीनीने काढलेला दिसतो. माझ्या माझ्या एका मित्राने लग्न झाल्यानंतर हनिमूनला जाण्याचे नियोजन केले होते. त्याच्या घरात त्याच्या वहिनीने असाच दंगा केला. त्यांच्या घरात लग्न झाल्यानंतर असे फिरायला जाण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे लग्नानंतर लगेचच त्याच्या मोठ्या भावाला कोणीही फिरायला जाऊ दिले नाही. लग्नानंतर महिन्यांनी त्याचा भाऊ वहिनीला घेऊन तिच्या माहेरी गेला आणि तिथून ते गुपचूप फिरायला गेले होते. त्यामुळे त्याच्या वहिनीने लग्नानंतर माझ्या मित्राने हनिमूनला जाऊ नये असा पवित्रा घेतला. माझा मित्र त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत लाडका होता. ३-४ वर्षाच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असल्यामुळे आई-वडीलही आता नव्या गोष्टी स्वीकारू लागले होते. त्यामुळे मित्राच्या हनिमूनला त्यांचा विरोध नव्हता. मित्राने हे मला सांगताच मी त्यांला हेच म्हणले की ज्यावेळी तुझ्या भावाच्या हनिमूनची गोष्ट होती त्यावेळी त्या दोघांनी हनिमूनला जावे याबाबत तू काय स्टॅन्ड घेतला होतास? त्यावर तो म्हणाला की मी काहीच बोललो नाही. घरचे सगळेच त्या विरोधात होते. त्यामुळे आई-बाबांना मी कसा विरोध करणार? त्यावर मी त्याला म्हणले तू काही इतका लहान नक्कीच नव्हतास की याबाबत एक भूमिका घेऊ शकशील. तू तुझ्या आई-वडिलांचे मत बदलायला हवे होतेस. कमीत कमी दादा वहिनी च्या बाजूने बोलला असतास तर आज वहिनीने इतका विरोध केला नसता.....
लेखनप्रकार
साधारण पस्तीस वर्षे झाली असतील या गोष्टीला विजा लग्न ठरल्याची बातमी घेऊन आला. आमच्या मित्रपरिवारामध्ये सर्वात लहान. गेल्या पाचेक वर्षात एकेक करून जवळपास सगळ्यांची लग्न होऊन गेली होती. नेहमी प्रमाणे सर्वांनी मुलगी कोण कुठली काय करते अशी सरबत्ती केली. वर पार्टीची मागणी होतीच. सगळ्यांनाच हुरूप आला, एक नवा कार्यक्रम मिळाला. त्या काळात इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे सबकुछ मित्र मंडळी सांभाळायची. सर्वांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं सर्वांचे आईवडील आपल्या मुलांच्या मित्रांना घरचेच समजायचे. लग्न पार पडणं ही सामूहिक जबाबदारी असायची आणि ती हौसेने पार पाडली जायची.

इतरांच्या कठीण काळात त्यांची सावली होणारे सोबती

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ The more you sweat in peace, the less you bleed in war! ✪ शिक्षण ही जशी शिक्षक- विद्यार्थी अशी दुतर्फा प्रक्रिया आहे तशी आरोग्यसुद्धा आहे ✪ अवघड प्रश्नांवर भाष्य करून उत्तरांचा मागोवा घेणारं पुस्तक ✪ गंभीर विषय पण अनौपचारिक, unpredictable शैली व विनोदाचा शिडकावा ✪ स्वत:ला अनेक प्रश्न विचारण्याची गरज ✪ “व्यक्त होण्याचं" आणि संवादाचं महत्त्व- बोलने से सब होगा ✪ स्वत:साठीचा वेळ- me time बद्दल अपराधभाव सोडून देण्याची गरज ✪ केवळ रुग्णांचेच सोबती नाही तर सर्वांचे व स्वत:चेही सोबती होण्याची दिशा ✪ प्रत्येकाने सजग व्हावं अशी एक छोटी चेकलिस्ट नमस्कार.

सतारीचे बोल

कर्नलतपस्वी ·

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Mon, 02/24/2025 - 17:10
हाॅस्पिटल मधे आढ्याकडे बघताना काही ओळी सुचल्या त्या इथे व कायप्पावर डकवल्या एवढेच काय ते. हाय काय नाय काय...याच बरोबर मित्रपरिवारांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल एकत्रित आभार मानण्याचा प्रयत्न. मी मस्त आहे.

बाजीगर Tue, 02/25/2025 - 19:12
वाह वा सर काय बेफिकिर attitude आहे, मन जवा मर्द आहे,शरीर कुरकुर करतेय. काय शैलीदार ओळी लिहिल्यात... "हृदयाची सतार बिघडली होती !" काळजी घ्या गोळ्या,आहार विहार डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाने करा. (अस्मादिकांना सुद्धा १३ एप्रिल् २०२४ ला हार्ट अटॅक आला होता, मायबाप कतार सरकार ने तात्काळ एन्जिओप्लास्टी करून 2 स्टेन्ट टाकल्या, जीव वाचला, ह्या एप्रिल ला दक्षिण अमेरिका टुर ला जातोय, साजरा करायला.... माझा ब्लॉग https://www.blogger.com/blog/post/edit/5935388206732301965/2657780580706138001 )

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Mon, 02/24/2025 - 17:10
हाॅस्पिटल मधे आढ्याकडे बघताना काही ओळी सुचल्या त्या इथे व कायप्पावर डकवल्या एवढेच काय ते. हाय काय नाय काय...याच बरोबर मित्रपरिवारांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल एकत्रित आभार मानण्याचा प्रयत्न. मी मस्त आहे.

बाजीगर Tue, 02/25/2025 - 19:12
वाह वा सर काय बेफिकिर attitude आहे, मन जवा मर्द आहे,शरीर कुरकुर करतेय. काय शैलीदार ओळी लिहिल्यात... "हृदयाची सतार बिघडली होती !" काळजी घ्या गोळ्या,आहार विहार डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाने करा. (अस्मादिकांना सुद्धा १३ एप्रिल् २०२४ ला हार्ट अटॅक आला होता, मायबाप कतार सरकार ने तात्काळ एन्जिओप्लास्टी करून 2 स्टेन्ट टाकल्या, जीव वाचला, ह्या एप्रिल ला दक्षिण अमेरिका टुर ला जातोय, साजरा करायला.... माझा ब्लॉग https://www.blogger.com/blog/post/edit/5935388206732301965/2657780580706138001 )
लेखनविषय:
काव्यरस
जरा सोडला लगाम ढिला, अंग प्रत्यंगाने संकेत दिला. हळूहळू कुरकूर करू लागलं. गोबरे झाले गाल,टम्मं पोट फुगलं. हात पायाच्या झाल्या काड्या, कांट्यांनी चढल्या नव्वद माड्या. कधी नव्हे तो पिंगळा साद देत होता. दिवसा घोरासुर कुस्ती खेळत होता. कधी माझ्या भोवती जग फिरले, तर कधी डोळ्यासमोर तारे विरले. भर दुपारी जगाला भोवळ आली. आणी बोळवण धन्वंतरींच्या घरी झाली. काही रक्तपिपासू रक्त शोषू लागले, तर प्रकांड पंडीत कारण शोधू लागले. हृदयाची सतार बिघडली होती दिड दा दिड दा लय बेकाबू होती गवसणीतूनच तारा छेडल्या सतारीच्या खुंट्या पिळल्या सतार झाली म्हातारी... तारा नाजूक झाल्यात. तार सप्तक लावू नका. आर्त स्

घर पाहावे बांधून: २

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·

गावाची लोकसंख्या ५०० पर्यंत असावी. तीही आजूबाजूच्या वस्त्या मिळून. जिथे ग्रामपंचायत आहे तिथे मोजून २० घरे सुद्धा नाहीत.

आग्या१९९० Sat, 02/08/2025 - 09:01
शिवाय सगळ्या स्लॅबवर सोलर पॅनेल + सोलर हीटर + पाण्याची टाकी बसवले जातील त्यामुळे उन्हाळ्यात घर फार तापणार नाही. ह्यातील सोलर हिटर लावण्याऐवजी ते पैसे वाचवून गरज असेल तर अधिक क्षमतेचे सोलर पॅनल लावून वीजनिर्मिती करा. ही अतिरिक्त वीज घरात इलेक्ट्रिक गिझर लावून गरम पाणी मिळवण्याकरिता वापरात येईल. ह्याचा फायदा म्हणजे टेरेसवरची जागा अडवली जाणार नाही आणि तुलनेने खर्चही कमी होईल.

In reply to by आग्या१९९०

त्यामुळे सोलर पॅनेल आणि त्यांचा मेंटेनंस + अपग्रेड यांच्यासाठी स्पेशल स्वतंत्र आर्थिक तरतूद करत आहे. त्यामुळे ज्या गोष्टीची वारंटी जास्त ते बसवणे सयुक्तिक ठरेल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घर पूर्ण व्हायला किती काळ जाईल काही सांगता येत नाही. २०३० पर्यंत होईल अशी अपेक्षा आहे.

Bhakti Sat, 02/08/2025 - 10:32
अय्यो तुमचं वय केवळ ३५ आणि इतकं सुंदर प्लॅनिंग! मस्तच!मला पण आवडलं असतं असं फार्म हाऊस बांधायला ,पण..जाऊ द्या.बाकी शेजारीच फार्म हाऊस की नुसतीच हौस नावाचा धागा अगदी याच विषयावरचा नैराश्य आणतो.पण तुम्ही फार्म हाऊस एकदम आयडियल.मी मध्यंतरी संपदा कुलकर्णीचे फार्मचे व्हिडिओ पाहायचे.त्यांनंतर फेबुवर वृंदावन नावाचं एक फार्म हाऊसचे पेज आहे, खुपच प्रसन्न वाटतं.मृण्मयी देशपांडेने तर हाताने मातीचे घर बांधले आहे आणि जोडीला स्ट्रॉबेरीची शेती,एकदम झकास! तुमच्या घराला शुभेच्छा!

In reply to by Bhakti

आहे भक्तीजी. हौस म्हणून बांधतोय पण तिथेच उर्वरित आयुष्य काढावे असे ठरवतोय. उन्हाळ्यात आमच्या इकडे प्रचंड ऊन असते, पाणी नसते त्यामुळे त्या काळात तिथे राहणे चॅलेंजिंग आहे. मला यातून कोणताही आर्थिक फायदा मिळवायचा नाही.

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 16:54
आणि शेतघर, हा वेगळा विषय आहे. वार्षिक ६० ग्रॅम सोने नफा स्वरूपात देणारे शेत असेल तर, त्या शेतातच राहून पूर्ण वेळ शेती हाच व्यवसाय करणे, हा उत्तम निर्णय आहे.

In reply to by मुक्त विहारि

शेतातून मला काडीचाही नफा अपेक्षित नाही मुक्त विहारी. खरेतर शेतसाठी वार्षिक खर्च धरलेला आहे. तो एक खर्चिक छंद म्हणून केला जाईल. नुकसान कमीत कमी करणे इतकेच ध्येय आहे.

In reply to by मुक्त विहारि

परंतु असली गुंठ्यांमधे केलेली विखंडित शेती कधिसुद्धा फायद्यात येत नाही. विखंडित शेती + ७५ च्या वर पीके घेतल्यावर त्या शेतीतून काय आर्थिक फायदा मिळणार सांगा. प्रचंड प्रमाणात शेती आणि मोनोकल्चर याशिवाय आधुनिक शेती आर्थिक फायद्यात येऊ शकत नाही. मोनोकल्चर आले की पुन्हा रोगराया आणि रिस्कसुद्धा येतेच. त्यामुळे शेती हा एक खर्चिक छंद म्हणूनच पाहावे. मला मोनोकल्चरचा तिटकारा आहे त्यामुळे हे एक पाच एकराचे गार्डन समजा. एखाद्या वर्षी चांगला भाव मिळणे वेगळे आणि दरवर्षी कन्सिस्टंटली डबल डिजिट आरओआय मिळणे वेगळे. शेती हा व्यवसाय करणे म्हणजे पायावर धोंडा.

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 17:06
कमी खर्चात आणि नैसर्गिक रित्या घर बांधायचे असेल तर, लॉरी बेकर, यांच्या पद्धतीने घर बांधणे हा एक पर्याय आहे. https://www.google.com/search?client=ms-android-oppo-rvo2&sca_esv=aac09e88d3bc5d88&sxsrf=AHTn8zrOMJXQcnAAzzD6gG-R-Q0IlCK1rA:1739014068972&q=Laurie+baker+famous+buildings+near+Dombivli,+Maharashtra&udm=2&fbs=ABzOT_CpGl4iTifXrR0wiRhoFvN4KC3CZFw4eZw55Dhid0WPwh0pbdXXPcCe9TjVbzqvWIqhP3EnI625VoKzCtGFu_zXErxo2grtsK7dIjOnaueeuzZup9MJiSO16XHvTmwUNRBusuq8RVPnnqcg7TimoH_GaEE6vnE59rjBQMr6h6oqzVNCDgB9PJz9LN6xL7d1pQIpsvPFIzzAKtjqpVjLqYZv9kVAF88KfawEpfpiHLCUk-bU54M&sa=X&ved=2ahUKEwjYpdye_LOLAxVPyDgGHZmAHyIQtKgLegQIFhAB&biw=360&bih=668&dpr=2 वैयक्तिक पातळीवर सांगायचे तर , मी कंटेनर घर बांधीन. स्वस्त आणि टिकाऊ. मी स्वतः कंटेनर घरात राहिलो असल्याने, मला तरी शेतघरासाठी हा पर्याय उत्तम वाटतो.

In reply to by मुक्त विहारि

आग्या१९९० Sat, 02/08/2025 - 20:31
मी येत्या तीन वर्षात शेतात cold storage कंटेनरमध्ये करणार आहे. पंधरा वर्षापूर्वी बंगला बांधण्याऐवजी कंटेनर घर बांधले असते तर खूप फायदेशीर आणि देखभाल करणे कमी खर्चिक झाले असते असे आता वाटू लागले आहे. बंगल्यावर सोलर पॅनल तेव्हा लावायचा विचार केला होता,परंतु नंतर दुसरे स्वस्त पर्याय उपलब्ध झाल्याने कॅन्सल केला.

In reply to by आग्या१९९०

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 20:47
कंटेनर घर, हा सर्वोत्तम पर्याय आहे. कमी वेळ, कमी खर्च, कमी देखभाल आणि किती पण उंच किंवा पसरट बांधता येते. शिवाय, थंड प्रदेशातील शेती करता येते. उदा. पुण्यात केशर शेती.

In reply to by आग्या१९९०

कंटेनर घर हे शेतघर म्हणून ठिक आहे पण हे माझे शेतघर नाही. हेच मुख्य घर असणार आहे आणि त्यामुळे मला घरा सारखे घर हवे आहे. मला कंटेनर घराची आईडियाच पटत नाही कारण एकतर आमच्या भागात उन्हाळ्यात तापमान ४०+ असते. दुसरे म्हणजे मला घराच्या मटेरियलचे नैसर्गिक टेक्स्चर हवे आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

मुक्त विहारि Sun, 02/09/2025 - 01:01
मी ५०-५५ डिग्री तापमान असताना देखील, ह्या घरात राहिलो आहे. AC असेल तरच इतक्या गरम तापमानात राहता येते आणि आखाती देशांत AC असतोच. इत्यलम....

In reply to by मुक्त विहारि

माझ्या जमिनीला नॅचरल स्लोप आहेत त्यामुळे मी खरेतर अर्धे अंडरग्राऊंड घर बांधू शकतो. पूर्ण अंडरग्राऊंड घरांमधे वर्षभर नैसर्गिकरित्या २०-२२ च्या रेंजमधे तापमान राहते हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे (बाहेर -५ तापमान असताना देखिल) त्यामुळे एसी आणि त्याचा मेंटेनन्स हे मला खरेतर फारशी भावणारी गोष्ट नाही. शिवाय कंटेनर घरांचे अस्थेटिक्स मला भावत नाही. तसेही सामान्य लोक जिथे अनाठायी खर्च करतात तिथे मी करणार नाही. (उदा. महागातल्या टाइल्स, पीओपी, अत्यंत भंगार टेस्टचे गॉडी इंटेरियर इत्यादी इत्यादी )

In reply to by मुक्त विहारि

मी त्यांचा अभ्यास केलेला आहे. मला नॉइज़ कॅन्सलिंग विंडो किंवा तश्या आधुनिक व्यवस्थांशिवाय राहणे अशक्य आहे. त्यामुळे खर्च वाढणार आहे हे नक्कीच आहे. हा खरेतर साधा प्लान आहे परंतु खर्च सुविधेवर जास्त आहे.

चित्रगुप्त Mon, 02/10/2025 - 08:25
तुम्ही दिलेल्या नकाशात attached toilet दोन्हीपैकी एकाही खोलीला नाही. म्हातारपणी आणि आजारपणात ते खूपच गरजेचे ठरते. त्या दृष्टीने एक खोली पुढे, दुसरी मागे कीचनजवळ, आणि दोन्हीच्या मधे टॉयलेट, असे करता येईल. जिन्याच्या पायर्‍या फार तर साडेसात इंच उंचीच्या, आणि single flight जिन्याऐवजी मधे सपाट लँडिंग असावे. .

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्तजी, सर्व खोल्यांना attached टॉयलेट आहे. जिन्याला लागून असेलेल्या रूमला जिन्या खाली attached टॉयलेट आहे, दुसऱ्या बेडरूमला देखील attached टॉयलेट आहे. आपण ले आऊट पुन्हा पहावा ही नम्र विनंती. जिन्याचा उपयोग जरूरीपूर्ता असणार आहे कारण माझा हॉल जवळ जवळ मोकळाच असणार आहे.

स्वधर्म Mon, 02/10/2025 - 13:02
आण्णा, तुमचा विचार खूप चांगला आहे, पण जरा धाडसाचा वाटतोय. माझ्याही मनात आमच्या शेतावर जाऊन राहण्याचा विचार आहे. तुमच्याप्रमाणेच आमच्या शेताच्या शेजाऱ्यांनी द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. मी कटाक्षाने आमचे शेत करणाऱ्या नातेवाईकास द्राक्षे लाऊ नये, असे सांगितले आहे. द्राक्ष हे पीक एखाद्या आय सी यू मधल्या पेशंटसारखे जपावे लागते खते व बेसुमार औषधे मारावीच लागतात. परिणामी आमच्या सर्व शेजाऱ्यांच्या विहिरीचे पाणी सवळ झाले आहे. सर्वच शेतकरी 30 लीटरचे पिण्याच्या पाण्याचे कॅन वापरत आहेत पण रासायनिक खते व औषधे कमी करण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत गावी जाऊन रहायचे, तर तयारी ठेवावी लागेल. तुंम्ही घरासाठी 30 लाख रु. एकदम गुंतवण्यापेक्षा काही दिवस तिथेच आजूबाजूल राहून या प्रयोगाची चाचणी करून बघा. सोयीसुविधा, लोक, आपल्याला तिथे करमेल का याची खात्री झाल्यावरच घराचा खर्च करावा असे सुचवतो. बाकी पक्कं ठरलं असेल, तर शुभेच्छा.

In reply to by स्वधर्म

माझा द्राक्ष लावण्याचा अजिबात विचार नाही. मी ते करून पाहिले आहे मला त्या शेतीची प्रचंड चीड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जागा निवडण्यामागे दोन्ही टोकाला पाण्याची तळी आहेत. वरचे तळे बरेच मोठे आहे आणि सध्या ते अजून मोठे करण्याचे काम सुरू आहे,

In reply to by हणमंतअण्णा शंक…

स्वधर्म Mon, 02/10/2025 - 13:31
शेजार्यांच्या द्राक्ष या पिकामुळे होणारी पर्यावरणाची अवस्था हा होता. त्यांना औषधांची फवारणी जवळजवळ रोजच करावी लागते. त्यामुळे हवाही आरोग्यदायक रहात नाही.

In reply to by स्वधर्म

तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे. हा विचार नीट करावा लागेल. हवा प्रदूषित होत असेल तर नक्कीच गंभीर मामला आहे.

In reply to by स्वधर्म

खूप चांगल्या आहेत आणि तसे करण्यासाठी मी आमच्या जुन्या शेतात काही दिवस राहून पाहिले आहे. सोयीसुविधा म्हणजे काहीही नाहीत. लोक मात्र खूप चांगले आहेत कारण तो आमचाच भाग आहे करमेल का ते कुणास ठाऊक. मला तर साक्षात न्यू यॉर्क मधे पण करमले नव्हते. त्यामुळे आता ते देवाजीच्या हातातच आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद!!

गावाची लोकसंख्या ५०० पर्यंत असावी. तीही आजूबाजूच्या वस्त्या मिळून. जिथे ग्रामपंचायत आहे तिथे मोजून २० घरे सुद्धा नाहीत.

आग्या१९९० Sat, 02/08/2025 - 09:01
शिवाय सगळ्या स्लॅबवर सोलर पॅनेल + सोलर हीटर + पाण्याची टाकी बसवले जातील त्यामुळे उन्हाळ्यात घर फार तापणार नाही. ह्यातील सोलर हिटर लावण्याऐवजी ते पैसे वाचवून गरज असेल तर अधिक क्षमतेचे सोलर पॅनल लावून वीजनिर्मिती करा. ही अतिरिक्त वीज घरात इलेक्ट्रिक गिझर लावून गरम पाणी मिळवण्याकरिता वापरात येईल. ह्याचा फायदा म्हणजे टेरेसवरची जागा अडवली जाणार नाही आणि तुलनेने खर्चही कमी होईल.

In reply to by आग्या१९९०

त्यामुळे सोलर पॅनेल आणि त्यांचा मेंटेनंस + अपग्रेड यांच्यासाठी स्पेशल स्वतंत्र आर्थिक तरतूद करत आहे. त्यामुळे ज्या गोष्टीची वारंटी जास्त ते बसवणे सयुक्तिक ठरेल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घर पूर्ण व्हायला किती काळ जाईल काही सांगता येत नाही. २०३० पर्यंत होईल अशी अपेक्षा आहे.

Bhakti Sat, 02/08/2025 - 10:32
अय्यो तुमचं वय केवळ ३५ आणि इतकं सुंदर प्लॅनिंग! मस्तच!मला पण आवडलं असतं असं फार्म हाऊस बांधायला ,पण..जाऊ द्या.बाकी शेजारीच फार्म हाऊस की नुसतीच हौस नावाचा धागा अगदी याच विषयावरचा नैराश्य आणतो.पण तुम्ही फार्म हाऊस एकदम आयडियल.मी मध्यंतरी संपदा कुलकर्णीचे फार्मचे व्हिडिओ पाहायचे.त्यांनंतर फेबुवर वृंदावन नावाचं एक फार्म हाऊसचे पेज आहे, खुपच प्रसन्न वाटतं.मृण्मयी देशपांडेने तर हाताने मातीचे घर बांधले आहे आणि जोडीला स्ट्रॉबेरीची शेती,एकदम झकास! तुमच्या घराला शुभेच्छा!

In reply to by Bhakti

आहे भक्तीजी. हौस म्हणून बांधतोय पण तिथेच उर्वरित आयुष्य काढावे असे ठरवतोय. उन्हाळ्यात आमच्या इकडे प्रचंड ऊन असते, पाणी नसते त्यामुळे त्या काळात तिथे राहणे चॅलेंजिंग आहे. मला यातून कोणताही आर्थिक फायदा मिळवायचा नाही.

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 16:54
आणि शेतघर, हा वेगळा विषय आहे. वार्षिक ६० ग्रॅम सोने नफा स्वरूपात देणारे शेत असेल तर, त्या शेतातच राहून पूर्ण वेळ शेती हाच व्यवसाय करणे, हा उत्तम निर्णय आहे.

In reply to by मुक्त विहारि

शेतातून मला काडीचाही नफा अपेक्षित नाही मुक्त विहारी. खरेतर शेतसाठी वार्षिक खर्च धरलेला आहे. तो एक खर्चिक छंद म्हणून केला जाईल. नुकसान कमीत कमी करणे इतकेच ध्येय आहे.

In reply to by मुक्त विहारि

परंतु असली गुंठ्यांमधे केलेली विखंडित शेती कधिसुद्धा फायद्यात येत नाही. विखंडित शेती + ७५ च्या वर पीके घेतल्यावर त्या शेतीतून काय आर्थिक फायदा मिळणार सांगा. प्रचंड प्रमाणात शेती आणि मोनोकल्चर याशिवाय आधुनिक शेती आर्थिक फायद्यात येऊ शकत नाही. मोनोकल्चर आले की पुन्हा रोगराया आणि रिस्कसुद्धा येतेच. त्यामुळे शेती हा एक खर्चिक छंद म्हणूनच पाहावे. मला मोनोकल्चरचा तिटकारा आहे त्यामुळे हे एक पाच एकराचे गार्डन समजा. एखाद्या वर्षी चांगला भाव मिळणे वेगळे आणि दरवर्षी कन्सिस्टंटली डबल डिजिट आरओआय मिळणे वेगळे. शेती हा व्यवसाय करणे म्हणजे पायावर धोंडा.

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 17:06
कमी खर्चात आणि नैसर्गिक रित्या घर बांधायचे असेल तर, लॉरी बेकर, यांच्या पद्धतीने घर बांधणे हा एक पर्याय आहे. https://www.google.com/search?client=ms-android-oppo-rvo2&sca_esv=aac09e88d3bc5d88&sxsrf=AHTn8zrOMJXQcnAAzzD6gG-R-Q0IlCK1rA:1739014068972&q=Laurie+baker+famous+buildings+near+Dombivli,+Maharashtra&udm=2&fbs=ABzOT_CpGl4iTifXrR0wiRhoFvN4KC3CZFw4eZw55Dhid0WPwh0pbdXXPcCe9TjVbzqvWIqhP3EnI625VoKzCtGFu_zXErxo2grtsK7dIjOnaueeuzZup9MJiSO16XHvTmwUNRBusuq8RVPnnqcg7TimoH_GaEE6vnE59rjBQMr6h6oqzVNCDgB9PJz9LN6xL7d1pQIpsvPFIzzAKtjqpVjLqYZv9kVAF88KfawEpfpiHLCUk-bU54M&sa=X&ved=2ahUKEwjYpdye_LOLAxVPyDgGHZmAHyIQtKgLegQIFhAB&biw=360&bih=668&dpr=2 वैयक्तिक पातळीवर सांगायचे तर , मी कंटेनर घर बांधीन. स्वस्त आणि टिकाऊ. मी स्वतः कंटेनर घरात राहिलो असल्याने, मला तरी शेतघरासाठी हा पर्याय उत्तम वाटतो.

In reply to by मुक्त विहारि

आग्या१९९० Sat, 02/08/2025 - 20:31
मी येत्या तीन वर्षात शेतात cold storage कंटेनरमध्ये करणार आहे. पंधरा वर्षापूर्वी बंगला बांधण्याऐवजी कंटेनर घर बांधले असते तर खूप फायदेशीर आणि देखभाल करणे कमी खर्चिक झाले असते असे आता वाटू लागले आहे. बंगल्यावर सोलर पॅनल तेव्हा लावायचा विचार केला होता,परंतु नंतर दुसरे स्वस्त पर्याय उपलब्ध झाल्याने कॅन्सल केला.

In reply to by आग्या१९९०

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 20:47
कंटेनर घर, हा सर्वोत्तम पर्याय आहे. कमी वेळ, कमी खर्च, कमी देखभाल आणि किती पण उंच किंवा पसरट बांधता येते. शिवाय, थंड प्रदेशातील शेती करता येते. उदा. पुण्यात केशर शेती.

In reply to by आग्या१९९०

कंटेनर घर हे शेतघर म्हणून ठिक आहे पण हे माझे शेतघर नाही. हेच मुख्य घर असणार आहे आणि त्यामुळे मला घरा सारखे घर हवे आहे. मला कंटेनर घराची आईडियाच पटत नाही कारण एकतर आमच्या भागात उन्हाळ्यात तापमान ४०+ असते. दुसरे म्हणजे मला घराच्या मटेरियलचे नैसर्गिक टेक्स्चर हवे आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

मुक्त विहारि Sun, 02/09/2025 - 01:01
मी ५०-५५ डिग्री तापमान असताना देखील, ह्या घरात राहिलो आहे. AC असेल तरच इतक्या गरम तापमानात राहता येते आणि आखाती देशांत AC असतोच. इत्यलम....

In reply to by मुक्त विहारि

माझ्या जमिनीला नॅचरल स्लोप आहेत त्यामुळे मी खरेतर अर्धे अंडरग्राऊंड घर बांधू शकतो. पूर्ण अंडरग्राऊंड घरांमधे वर्षभर नैसर्गिकरित्या २०-२२ च्या रेंजमधे तापमान राहते हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे (बाहेर -५ तापमान असताना देखिल) त्यामुळे एसी आणि त्याचा मेंटेनन्स हे मला खरेतर फारशी भावणारी गोष्ट नाही. शिवाय कंटेनर घरांचे अस्थेटिक्स मला भावत नाही. तसेही सामान्य लोक जिथे अनाठायी खर्च करतात तिथे मी करणार नाही. (उदा. महागातल्या टाइल्स, पीओपी, अत्यंत भंगार टेस्टचे गॉडी इंटेरियर इत्यादी इत्यादी )

In reply to by मुक्त विहारि

मी त्यांचा अभ्यास केलेला आहे. मला नॉइज़ कॅन्सलिंग विंडो किंवा तश्या आधुनिक व्यवस्थांशिवाय राहणे अशक्य आहे. त्यामुळे खर्च वाढणार आहे हे नक्कीच आहे. हा खरेतर साधा प्लान आहे परंतु खर्च सुविधेवर जास्त आहे.

चित्रगुप्त Mon, 02/10/2025 - 08:25
तुम्ही दिलेल्या नकाशात attached toilet दोन्हीपैकी एकाही खोलीला नाही. म्हातारपणी आणि आजारपणात ते खूपच गरजेचे ठरते. त्या दृष्टीने एक खोली पुढे, दुसरी मागे कीचनजवळ, आणि दोन्हीच्या मधे टॉयलेट, असे करता येईल. जिन्याच्या पायर्‍या फार तर साडेसात इंच उंचीच्या, आणि single flight जिन्याऐवजी मधे सपाट लँडिंग असावे. .

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्तजी, सर्व खोल्यांना attached टॉयलेट आहे. जिन्याला लागून असेलेल्या रूमला जिन्या खाली attached टॉयलेट आहे, दुसऱ्या बेडरूमला देखील attached टॉयलेट आहे. आपण ले आऊट पुन्हा पहावा ही नम्र विनंती. जिन्याचा उपयोग जरूरीपूर्ता असणार आहे कारण माझा हॉल जवळ जवळ मोकळाच असणार आहे.

स्वधर्म Mon, 02/10/2025 - 13:02
आण्णा, तुमचा विचार खूप चांगला आहे, पण जरा धाडसाचा वाटतोय. माझ्याही मनात आमच्या शेतावर जाऊन राहण्याचा विचार आहे. तुमच्याप्रमाणेच आमच्या शेताच्या शेजाऱ्यांनी द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. मी कटाक्षाने आमचे शेत करणाऱ्या नातेवाईकास द्राक्षे लाऊ नये, असे सांगितले आहे. द्राक्ष हे पीक एखाद्या आय सी यू मधल्या पेशंटसारखे जपावे लागते खते व बेसुमार औषधे मारावीच लागतात. परिणामी आमच्या सर्व शेजाऱ्यांच्या विहिरीचे पाणी सवळ झाले आहे. सर्वच शेतकरी 30 लीटरचे पिण्याच्या पाण्याचे कॅन वापरत आहेत पण रासायनिक खते व औषधे कमी करण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत गावी जाऊन रहायचे, तर तयारी ठेवावी लागेल. तुंम्ही घरासाठी 30 लाख रु. एकदम गुंतवण्यापेक्षा काही दिवस तिथेच आजूबाजूल राहून या प्रयोगाची चाचणी करून बघा. सोयीसुविधा, लोक, आपल्याला तिथे करमेल का याची खात्री झाल्यावरच घराचा खर्च करावा असे सुचवतो. बाकी पक्कं ठरलं असेल, तर शुभेच्छा.

In reply to by स्वधर्म

माझा द्राक्ष लावण्याचा अजिबात विचार नाही. मी ते करून पाहिले आहे मला त्या शेतीची प्रचंड चीड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जागा निवडण्यामागे दोन्ही टोकाला पाण्याची तळी आहेत. वरचे तळे बरेच मोठे आहे आणि सध्या ते अजून मोठे करण्याचे काम सुरू आहे,

In reply to by हणमंतअण्णा शंक…

स्वधर्म Mon, 02/10/2025 - 13:31
शेजार्यांच्या द्राक्ष या पिकामुळे होणारी पर्यावरणाची अवस्था हा होता. त्यांना औषधांची फवारणी जवळजवळ रोजच करावी लागते. त्यामुळे हवाही आरोग्यदायक रहात नाही.

In reply to by स्वधर्म

तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे. हा विचार नीट करावा लागेल. हवा प्रदूषित होत असेल तर नक्कीच गंभीर मामला आहे.

In reply to by स्वधर्म

खूप चांगल्या आहेत आणि तसे करण्यासाठी मी आमच्या जुन्या शेतात काही दिवस राहून पाहिले आहे. सोयीसुविधा म्हणजे काहीही नाहीत. लोक मात्र खूप चांगले आहेत कारण तो आमचाच भाग आहे करमेल का ते कुणास ठाऊक. मला तर साक्षात न्यू यॉर्क मधे पण करमले नव्हते. त्यामुळे आता ते देवाजीच्या हातातच आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
तर बऱ्याच दिवसांनी अपडेट देण्याइतपत प्रगती झाली असल्याने हा पुढचा भाग. जोवर घर बांधून पूर्ण होत नाही तोवर संयम बाळगणे इतकेच आपल्या हातात आहे. १. कुठे? आधी घर कुठे बांधावे हा एक यक्षप्रश्न छळत होता. त्या प्रश्नाचे नीट उत्तर सापडत नव्हते. आधी ठरवले होते की तालुक्याच्या ठिकाणी बांधावे. त्यासाठी एक दोन गुंठे जागाही घेतली १० लाखांना. पण तो विचार गळू लागला. २००० नंतर भारत झपाट्याने बदलला आहे. एकिकडे पुणे हे एक जबरदस्त मोठे खेडेगाव झाले आहे आणि गावं सुद्धा बरीच बदलली आहेत. तालुक्याच्या गावाच्या जत्रेला मी ५ वर्षांनी गेलो होतो.