समाज

ट्रंक, संदूक इत्यादी..

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
22 Apr 2014 - 10:43 pm

एकंदरीतच, स्मृती म्हणजे बत्तीस मोगरी*. कुठे कसे काय गुपित कुठे दडले असेल याचा नेम नाही. परवा पिझ्झा एक्सप्रेसच्या रेस्तरां मध्ये सजावटीसाठी वापरलेल्या ट्रंका पाहून मेंदूतल्या सुरकुत्यांची बरीचशी उलथापालथ झाली. स्मरणरंजनाचा दोष मान्य आहे. पण आठवणींवरती खरंच ताबा नसतो, त्या कधीही-कुठेही येऊ शकतात.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुक्तकसमाजजीवनमानप्रकटनअनुभव

विवाह मुहुर्ताच्या निमिताने!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
22 Apr 2014 - 7:06 pm

या विषयावर अंतरजालावर किती लेखन झालय हे मला अपरिचित आहे. मी स्वतः सुद्धा,मिपावर अश्या प्रकारचे लेखन कमीच केले आहे. पण पूर्वी हे असले लेखन तुरळकपणे का होइना..पुणे..पिंपरी चिंचवड अश्या एरियातल्या २/३ (लोकल) मासिकांमधुन केले होते. (माझी वहिनी..साप्ताहीक-गगनझेप..वगैरे) काही कारणानी ती लिंक ८ वर्षांपूर्वीच तुटली.पण लिहिण्याची भूक शाबूत होती. तो चान्स पंधरा एक दिवसांपूर्वीच मिळाला. चान्स असं म्हणतो... कारण की एकतर ते दिवस अठवले. आणि दुसरं म्हणजे यावेळी चक्क साप्ताहिक सकाळ मधून फोन आला..म्हणून!

संस्कृतीधर्मसमाजप्रकटन

अपघात

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
21 Apr 2014 - 11:31 pm

मुंबई पुणे एक्प्रेस हायवे वर होणार्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच रस्त्यावर एके दिवशी माझ्या आतेभावाचा देखील अपघात झाला आणि त्यातच तो गेला . मागच्या डिसेंबर महिन्यात आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा याच रस्त्यावर अपघात झाला ज्यात हे दोनही गुणी कलावंत प्राणास मुकले . त्यानंतर बरोबर एका महिन्याने अगदी त्याच पद्धतीने त्याच ठिकाणी झालेल्या अपघातात माझा भाऊ यज्ञेश्वर फाटक हाही गेला . अत्यंत दुर्दैवी अशी हि घटना झाली .

समाजअनुभव

माझी बायपोलर डिसॉर्डर

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
21 Apr 2014 - 9:04 pm

मी डॉक्टर नाही, हे एक प्रांजळ आत्मकथन आहे केवळ या २ हेतूनी केलेल
(१) की जर कोणी अशी लक्षणे अनुभवत असेल तर त्यांना मदत व्हावी
(२) माझ्या समाधानाकरता की माझे सत्य सांगीतले, माझी कथा सांगीतली

या धाग्यावर अवांतर न केल्यास उपकार होतील
____________________________________________

"मी उद्याची अपॉईंट्मेन्ट घेतली आहे, एकतर तू सायकिअ‍ॅट्रीस्ट कडे चल किंवा मला घटस्फोट दे. या दोनांव्यतिरीक्त दुसरा पर्याय मी तुला देत नाही."

समाजजीवनमानराहणीअनुभव

सामान्य आणि अ सामान्य

देशपांडे विनायक's picture
देशपांडे विनायक in जनातलं, मनातलं
20 Apr 2014 - 11:09 am

श्री अमोल पालेकर पोलिसाकडे तक्रार करून आले
त्यांचे नाव मतदार यादीतून गायब कसे झाले याचा शोध पोलिसांनी घ्यावा असे त्यांचे म्हणणे दिसते
माझे नाव मतदार यादीत आहे का नाही हे मी नेट वर पाहिले
मतदार यादी नेट वर दिसते हे मी वर्तमानपत्रातून वाचले
माझे नाव मतदार यादीत दिसत नव्हते
नेटवरून मी तक्रार नोंदविली
एका आठवड्यात मला SMS वरून कोणाला भेटावे ते कळवण्यात आले
मी त्या अधिकारी व्यक्तीस जाऊन भेटलो
माझे म्हणणे ऐकल्यावर मला माझे नाव नोंदवून मिळाले
माझे नाव गायब का झाले तेही समजले

समाजअनुभव

आर्र....राजकुमार

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
20 Apr 2014 - 10:46 am

आर्र... राजकुमार

पुणे-मुंबई वोल्वो प्रवासात बरेचदा हिंदी चित्रपट बघावे लागतात. तर आमचे महतभाग्य असे की, काल आम्हाला एक अद्वितीय, 'आर्..राजकुमार' नांवाचा चित्रपट बघायला मिळाला. आधी, थोडावेळ आम्ही त्याकडे बघण्याचे टाळून खिडकीबाहेर बघत होतो. पण मारधाडीचे आवाज, जबरदस्त संवाद आणि गुलजारला घरी बसायला लावतील अशा ग्रेट काव्याची गाणी कानावर आदळू लागली. त्यांत बाहेरुन ऊन यायला लागले. मग पडदा बंद करुन चित्रपट बघायचे ठरवले.

संस्कृतीकलासमाजमौजमजाचित्रपटआस्वादअनुभवविरंगुळा

मतदान---शंभर टक्के

निलरंजन's picture
निलरंजन in काथ्याकूट
18 Apr 2014 - 8:54 pm

भारत देश म्हणजे गेली साठ वर्षे मानाने संसदीय लोकशाही राबविणारा देश , देशाला आपल्या लोकशाही चा सार्थ अभिमान
लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले राज्य वा देश पण इतके असूनही देशाला अजूनही निवडून आलेला प्रतिनिधी शंभर टक्के लोकांनी निवडलेला नाही

नक्की होतेय काय ?

कशी होईन समर्थ लोकशाही?

मतदान सक्तीचे करावे का?

लोकांना मतदानासाठी खेचून आणण्यामधे नेते कमी पडतात का?

मतदान केंद्रावर पोहचायाची व्यवस्था नक्की कुणी करायची?

निवडणूक आयोगाने नक्की काय करावे म्हणजे शंभर टक्के मतदान होईल आणि सुदृढ सशक्त लोकशाही अस्तित्वास येईल?

चेंबूर - कालिना उड्डाणमार्ग अखेर वाहतुकीसाठी उघडला!

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
18 Apr 2014 - 9:58 am

गेली १० वर्षे रखडलेला चेंबूर ते कालिना (सी एस टी मार्ग) उड्डाणमार्ग आज सकाळी वाहतुकीस खुला झाला. ठाणे ते कालिना कचेरी घरापासुन अगदी कचेरीत शिरेपर्यंत वाटेत २ सहकार्‍यांना घेण्यासाठीचे दोन थांबे धरुनही केवळ ३५ मिनिटे लागली. त्यातही रमाबाई नगर ते कालिना विद्यापिठाच्या अलिकडील टप्पा हे अंतर अवघ्या ९ मिनिटात संपले. पहिलाच दिवस असल्याने सर्वत्र वाहतुक पोलिस दक्ष होते. मजा आली. वेळ तर वाचलाच पण घाटकोपरला महामार्ग सोडल्यानंतर घ्यावे लागणारे गल्ली-बोळ, लाल बहादूर शास्त्री मार्ग, भंगार साम्राज्याचा बराचसा भाग व त्या त्या भागातली वाहतुक कोंडी, मनस्ताप हे सगळे टळले.

समाजजीवनमानप्रकटनसद्भावनाप्रतिक्रियामाहिती

चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
18 Apr 2014 - 1:59 am

चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल

कार बनवणे आणि विकणे इतकं आव्हानात्मक आहे हे त्यावर काम करण्याआधी माहीत नव्हतं.
यावेळी आपण कार बाजाराची गुंतागुंत ( Complexity) आणि ग्राहकाची निर्णय प्रक्रिया पाहूयात, म्हणजे नंतर त्याचा संदर्भ येईल तेव्हा पटकन लक्षात येईल. अर्थात दुचाकीला पण बऱ्याच प्रमाणात हे सगळं लागू होतं, पण दुचाकीसाठीची ही प्रक्रिया थोडीशी सोपी आहे.

समाजजीवनमानप्रकटनविचारआस्वाद

केलं की नाही?

साती's picture
साती in जनातलं, मनातलं
17 Apr 2014 - 9:14 am

सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत.
राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ?
या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ.
माहिती लिहिणे अपेक्षित आहे.
बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते!

आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!

समाजजीवनमानराजकारणअनुभव