मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

रमतगमत

शिवोऽहम् ·
लेखनविषय:
हिंडताना दूर देशी, गर्द रानी हरवलेला कोणत्या वाटे इथे येऊन मज मी भेटलो निसरड्या वाटेवरी, हलकेच पाऊल टाकता मखमलीचा पायगोवा सोडुनी गुंगावलो वाटले विहिरीत वाकून डोकवावे मोडल्या चाहुलीने कोणत्या बोलाविले मज ना कळे वर्तुळे पाण्यावरीची स्तब्ध होऊ पाहता दिसत शेवाळातले आकाश निळसर बावरे घेता विसावा सावली पारावरी रेंगाळली ऊन कुरवाळीत होते कुरण हिरवे कोवळे दूर कोठे वाजणारी बासरी मी ऐकताना स्पर्शली कविता मनोमन मोरपंखासारखी सांजवेळी गोधुली घरट्यात पक्षी पावता मिटुनी डोळे सूर शोधत बैसलो तेजाळले

छकु

ज्योति अळवणी ·
लेखनविषय:
काव्यरस
छकु एकदा एक गंम्मत झाली.... माझी आईच शाळेत गेली. प्रयोग वही अपूर्ण म्हणून... हातावर पट्टी देखील ख्खाली; इंग्रजीच्या स्पेलिंगची; प्प्रॅक्टिस तिने नव्हतीच् केली... सरांनी 'ढ़ढ्ढोबा' म्हणताच मात्र, हिरमुसली झाली! 'छकुला नाव सांगिन....' अस मनातच म्हणाली; तेवढं म्हणून मग... माझ्यासारखीच खुश झाली. 'सारखा सारखा अभ्यास... मग खेळायचं कधी आम्ही? तुम्ही मोठे झालात..... आमच्यासाठी काही?' खूपसारं खेळून मग खूप खूप दमली; घरी येऊन एकदम 'हुश' करुन बसली. 'भूक लागली ग खूप छकु... खायला काय आहे? शूज काढून दे न....' म्हणे मी दमले आहे. 'अग तू आई नं... मग मी काय खायला देऊ?' म्हंटलं... शाळेत मिच जाईन...

शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद

नरेंद्र गोळे ·
पुष्पदंत विरचित शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद (१ ते २९ श्लोक शिखरिणी वृत्तात आहेत) मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८११०७ १ महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः . तुझा ज्ञात्यांनाही गवसत नसे पार म्हणता स्तुती ब्रम्हादींची उचित न ठरे ज्ञान नसता मला वाटे गावे अवगत जसे स्तोत्र तव ते शिवा स्वीकारावे हृदगतच माझे सरस हे २ अतीतः पंथानं तव च महिमा वाङ्मनसयोः अतद्व्यावृत्त्या यं चकितमभिधत्ते श्रुतिरपि स कस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः पदे त्वर्वाचीने पतति न मनः कस्य न

पडसाद

शिवोऽहम् ·
लेखनविषय:
मऊ सांजवेळी प्रभा दाटलेली, दिसे आसमंतात आता धुके तुझ्याही मनी तेच कल्लोळते का? जशी मंदिरातील घंटा घुमे! स्फुरे का इथे मंत्र बीजाक्षरांचा जरी अंतरंगी जळे वेदना नुरे शब्दमालेतला प्राण तरिही गमे मालकंसातली सांत्वना सरे शुद्ध भावातली सत्यसाक्षी कळा शब्द गीतात साकारता उदासी उगा आर्द्र चित्ती उरावी नदीच्या प्रवाही दिवे सोडता झंकारता त्या स्मृतींची नुपूरे, क्षणांची द्युती शुभ्र तेजाळते जणू ते दरीतील अंधारलेल्या अरण्यातले क्षीणसे काजवे उरी सावल्यांच्या निखारे व्रणांचे, भृगुच्या पदांचे विरागी टिळे कदंबासही का वृथा मोहवावे अनादि चिरंजीव काही निळे? अता पार्थिवाची सराईत वसने लेऊ कसा?

पिंपळ

शिवोऽहम् ·
लेखनविषय:
त्या तीरावर आहे तो पिंपळ पानांतुन ज्याच्या सळसळते ऋतुंची जाग आणि नखांनी ओरबाडतात ज्याला बिलंदर खारी ढोलीतल्या. तळहातच जणू! पिंपळपानं आहेत काही तांबुस कोवळी रेषांतुन जीवन घेऊन ओलंकंच लालसावलेलं, आभा ल्यालेलं प्रकाशाची. जडमूढ मुळांनी धरली आहे माती घट्ट पसरून आपली बोटं लांबचलांब आपोष्णी करायला पृथ्वीच्या गाभ्यातुन! फांद्यांचे बाहू फेकत अस्ताव्यस्त निळावंतीच्या वाणीने सांगतो तो घरट्यातल्या पिल्लांना आणि चोचीतल्या अळ्यांनाही, जन्मजन्मांतरीच्या कर्मकहाण्या वाऱ्यावर दहादिशा होणाऱ्या रुई-म्हाताऱ्यांच्या नी शीळ वाजवणाऱ्या पक्षांच्या. पांथस्थांच्या सावल्या टेकतात त्याच्या बुंध्याशी सुखदु:खांच्या बोला

गज़ल

MipaPremiYogesh ·
लेखनविषय:
गज़ल गजल म्हणजे डोळ्यांच्या काजळातील रेघ! जसे श्रावणात बरसणारे मेघ!!! गजल म्हणजे जुन्या  आठवणीतील धागा! जशी कृष्णासाठी आसुसलेली राधा!!! गजल म्हणजे पहिले प्रेम! जसा गोऱ्या गालावरील नाजूक थेंब!!! गजल म्हणजे  श्रावणातील पाऊस! जसे श्रावणातील पावसात चिंब भिजलेले केस!!! गजल म्हणजे  नक्षत्र स्वाती! जसा त्या नक्षत्रात तयार झालेला सुंदर मोती!!! गजल म्हणजे ओंजळीतील हिरवंगार पान! जशी मल्हार रागातील घेतलेली सुंदर तान!!! गजल म्हणजे  राग मेघमल्हार! जसा कोणासाठी तरी केलेला साजशृंगार!!! ~ योगेश पुराणिक

पाकळी!

दिनेश५७ ·
लेखनविषय:
सकाळ झाली कोवळी किरणे अंगावर आली अन् पाकळ्यांनी हळूच डोळे किलकिले केले एक फुलपाखरू बागडतच पाकळीवर येऊन बसले अन् मिटलेल्या साऱ्या पाकळ्या फूल फूल होऊन गेल्या... किरणांनी न्हाऊन ताज्या झाल्या, वाऱ्यासंगे डोलू लागल्या, सुगंध उधळत झुलू लागल्या... उमलत्या पाकळ्यांना फुलपाखरांचे थवे गुदगुल्या करू लागले अन् हसूहसूं होऊन पाकळ्या लाजल्या... सारा दिवस तोच खेळ! तिन्हिसांजा झाल्या किरणांनी अलगद दडी मारली पंख मिटून फुलपाखरांनी पानाआड दडी मारली... कोवळी पालवी मिटू लागली... वाराही मिटून गेल्यागत चिडीचूप होऊन बसला... उजेडही मिटून गेला, अन् दिवसभर डोळे मिटून बसलेल्या अंधाराला जाग आली... अचानक अंगावर आलेला अं

हि सर पावसाची पुन्हा आज आली.

AjayRGodse ·
काव्यरस
हि सर पावसाची पुन्हा आज आली हि सर पावसाची पुन्हा आज आली पुन्हा आसवांची मोकळी वाट झाली मन व्याकुळ होते, पुन्हा चिंब न्हाते, क्षितिजावरी का तुला ते पहाते ? पुन्हा पावसाशी तुझी बात झाली. हि सर पावसाची, हि ओढ तुला भेटण्याची. हि सर पावसाची पुन्हा आज आली तुझ्या आठवाणी पुन्हा जाग आली मन बेभान होते, तुझे गीत गाते. का मिलनाची तुला साद देते ? तुला भेटण्याची का मना आस झाली ? हि सर पावसाची, हि ओढ फक्त मिलनाची. हि सर पावसाची पुन्हा आज आली. तुझ्या अंतरीचे गुज सांगून गेली. मन बेधुंद होते, विरहात झुरते. स्वप्नी तुझ्या का हळुवार बुडते? निसटून गेली पुन्हा रात्र ओली.

असेलही वा नसेलही...

प्राची अश्विनी ·
लेखनविषय:
काव्यरस
असेलही वा नसेलही... दोनच या शब्दांवर सारे जगणे अपुले वसेलही... धर्मच गेला देऊन उत्तर शाश्वत वैश्विक प्रश्नाचे. परी न विसरू शकला डोळे कधीच नंतर द्रोणाचे. मनात त्याच्या खंत तयाची रुतून बसली असेलही.... असेलही वा नसेलही दोनच या शब्दांवर सारे जगणे अपुले वसेलही... डोळ्यांमध्ये प्राण आणुनी कुणी विचारी आज तिला, पहा बदललो पुरा राणि मी आवडेन का अता तुला? हसून उत्तर टाळू जाता नयनी पाणी नसेलही... असेलही वा नसेलही दोनच या शब्दांवर सारे जगणे त्यांचे वसेलही...

रदीफ नाही कधी जुळला ...

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
रदीफ नाही कधी जुळला न कधीही काफिया सुचला गजल जगण्यातला तरिही कैफ भरपूर अनुभवला जिव्हारी लागतिल ऐसे कितीतरी वार परतविले तरी एल्गार युध्दाचा जखम ओली असुन केला सदैवच लागले होते ध्यान हे ऐहिकापार इकडच्या ऊनछायेचा कधी अफसोस ना केला