वाया जाण्याच्या आधीच्या गोष्टी
असं काय आहे की जे करण्यासारखं असतं, हा एक
प्रश्न त्याच्यापुढे आता असतो. आता असले प्रश्न
पडायला वाव आहे, म्हणजे त्याची परिस्थिती बरी
असणार, हे ओघाने आलेच समजा.
पण तेव्हा ती तशी नव्हती.
असं काय आहे की जे करण्यासारखं असतं, हा एक
प्रश्न त्याच्यापुढे आता असतो. आता असले प्रश्न
पडायला वाव आहे, म्हणजे त्याची परिस्थिती बरी
असणार, हे ओघाने आलेच समजा.
पण तेव्हा ती तशी नव्हती.
तो चेहेरा दिसताच माझ्यात काहीतरी बदल होताना मला जाणवतोय. ते मोहक हसू माझ्या ही चेहेर्यावर पसरत जाते. मघा बासरी वाजवताना ऐकू आलेल्या पैंजणाच्या आवाजाची ओळख पटते
मागील दुवा http://misalpav.com/node/49987
काठावरचे गुपित झेलता
अनु'मतीची महत्ता विशेष
वसंताचे मृगजळ खास
कटी बंधात उष्म निश्वास
नभी नाभी ताम्र गोल
चा'लते जातो तोल
आर्त कुंजन
आस पास
पर्ण विरहीत पुष्प तटी दाट
दिंगबर सुरेख मदन पाझरतो
.
.
.
.
.
.
.
स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)
वैशाखाची ऊन्हं जेव्हा नको नको झाली,
वळीवाची आठवण उमलून आली.
बहाव्याने केली रिती फुलांची पखाल,
पंगा-याच्या अंगावर खुळावली लाली..
सावरीच्या म्हातारीला पंख पंख फुटे,
वयासंगे उडुनिया गेले तिचे काटे.
चाफ्याचा बहर जणू बैराग्याची झोळी,
धरू धरू म्हणताना काहीतरी सुटे.
सुकलेले पात्र, मधे खोल खोल डोह,
सुटता सुटेना कसा जीवनाचा मोह.
काठावर कुणी वेडा सूर तोलणारा,
कंठी त्याच्या मल्हाराचा ओला अवरोह.
ह्या आमटीची दीक्षा मला आमच्या मल्लाप्पा नावाच्या शेजार्याने दिली.
पेर्णा पाभे सरांची तू
http://misalpav.com/node/50075
थू -१
तू चालते अशी वटवृक्षाचे जणू खोड ग
अंगावरती भले दांडगे ओंडके जणू ल्याले ग
तू हसते अशी छाती माझी धडधडे ग
गडगडाटाने त्या माझ हासणं सारें लोपते ग
तुझ्या नुसत्या हालचालीनेही वारा वादळी वाहतो ग
येता येता तुझ्या घामाचा गंधही संगे आणतो ग
तू बघते तेव्हा अंगावरती शहारा माझ्या येतो ग
बघून तुला मीच कधीकधी थिजल्यासारखा होतो ग
तू चालते अशी झाडावरची वेल ग
अंगावरती पानं फुलं ल्यायते ग
तू हसते अशी झरा वाहतो ग
खळखळाटानं हासणं पिकतं ग
तुझ्या येण्यानं वारा वाहतो ग
येता येता सुगंघ आणतो ग
तू बघते तेव्हा अंगावर रोमांच येतो ग
बघून तुला मीच लाजल्यागत होतो ग
तू चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता ग
तुझ्या ठाई प्रगती हर्ष आनंद वसतो ग
- पाषाणभेद
२९/०४/२०२२
कोची-एर्नाकुलम ही केरळमधील महत्वाची शहरे असून अलीकडील काळात त्यांच्या विकासाचा वेग झपाट्याने वाढला आहे. कोची-एर्नाकुलमच्या आसपास अनेक विशेष आर्थिक क्षेत्र स्थित आहेत. त्याचबरोबर कोची हे दक्षिण भारतातील एक मोठे नैसर्गिक बंदर असून नौदलासाठी आणि व्यापारी कंपन्यांसाठी युद्धनौका आणि अन्य जहाजे बांधणारी कोचीन शिपयार्ड लिमिटेडची मोठी गोदी इथे आहे. इतकेच नव्हे तर भारतीय नौदलाच्या दक्षिण विभागाचे मुख्यालय, तेलशुद्धिकरण प्रकल्प, केरळ उच्च न्यायालय अशा अनेक महत्वाच्या संस्थाही इथे आहेत.
नुकत्याच केलेल्या मराठवाडा दौऱ्यात परळी येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले 'श्री वैजनाथ' मंदिर, अंबाजोगाई येथील आमची कुलदेवी 'श्री योगेश्वरी' मंदिर, आद्यकवी श्री मुकुंदराज स्वामी समाधीस्थळ आणि जोगाई सभामंडप लेणी (हत्तीखाना) अशा ठिकाणी भेट दिली त्याचा हा थोडक्यात वृत्तांत.
14 एप्रिलला सकाळी 9:30 वाजता घरी नाश्ता केल्यावर डोंबिवली ते परळी असा सुमारे 435 किमीचा प्रवास सुरु झाला. दुपारी दोन-सव्वादोनच्या सुमारास अहमदनगर मधल्या रेस्टोरंटमध्ये जेवण करून पुन्हा प्रवासाला सुरुवात करून संध्याकाळी 7 च्या सुमारास आम्ही परळीला पोचलो.
मी आणि माझी बहीण गाडी चालवत असलो तर रस्त्यावर अन्य चालकांना शिव्या घालत आमचा प्रवास सुरु असतो. अर्थात, असे चालक दरवेळी आम्हाला काही त्रास देतात असे नव्हे, मात्र त्यांचे वागणे अन्य लोकांच्या अपघातास कारणीभूत ठरू शकते म्हणून आम्ही त्यांना शिव्या घालतो, आमच्याच गाडीच्या बाहेर ऐकू जाणार नाहीत एवढ्याच आवाजात.