सॉल्विंग द मॅन-कोलोन जिगसॉ : उर्फ एनिमाचे भांडे
पेर्णा
"याड लागलं, याड लागलं" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली.
नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर? का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता?
‘हॅलो…’
आता कुणा टिपिकल वर्हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला.
ज्योतिषशास्त्र हा ज्यांचा आवडीचा विषय आहे त्यांना,
कृष्णमुर्ती ही ज्योतिषपध्दती नक्कीच परिचयाची किंवा निदान ऐकून तरी नक्की माहिती असेल.
कोण होते हे कृष्णमुर्ती? काय योगदान होतं त्यांचं ज्योतिषशास्त्रात?
या कृष्णमुर्ती पध्दतीचे जनक प्रोफेसर के.एस. कृष्णमुर्ती यांची ही त्यांच्या आजच्या १०८ व्या जयंतीनिमित्य थोडक्यात ओळख.
प्रिय मिपाकरांनो,
मिरचीच्या लागवडीच्या निमित्ताने, येत्या २-३ दिवसांत, कोल्हापूरला जाण्याचा विचार आहे.
ह्या वेळी आमची सौ. पण आमच्या बरोबर असेलच.
ह्या निमित्ताने कोल्हापूरकरांना भेटता येईल म्हणून हा धागा प्रपंच.
कळावे,
लोभ आहेच, तो वाढेल ही खात्री पण आहे.
आपलाच,
मुवि.
फटाके, फराळ, रांगोळ्या, आका़शकंदील, गोडधोड इत्यादिंबरोबरच मराठी घरांमधून दिवाळीचा अजून एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. कमीत कमी ३-४ दिवाळी अंक घरात आल्याशिवाय दिवाळी पूर्णपणे साजरी झाल्यासारखी वाटत नाही! परदेशात राहणारी मराठी मंडळीही ह्याला अपवाद नाहीत.
आता तर नेहमीच्या पारंपारिक दिवाळी अंकांसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही निघत आहेत. वेगवेगळ्या मराठी संस्थळेही दिवाळी अंक काढतात. उद्या पहाटे ५ (भाप्रवे बहुधा) नंतर मिपाचा दिवाळी अंकही दणक्यात प्रकाशित होईल आणि तो वाचायचीही उत्सुकता आहे.
प्रिय मिपाकरांनो,
होणार, होणार म्हणता-म्हणता आम्ही शेतकरी झालो.
पण सध्या आम्हाला शेती कामासाठी मजूर हवे आहेत.
सध्या आम्ही मिरचीची लागवड करत असल्याने आणि येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवड (आवळा, रिठा , शेवगा इ.) करणार असल्याने. ज्यांना ह्या शेतीविषयी ज्ञान असेल त्यांना प्राधान्य.
१. वेळच्या वेळी पगार दिल्या जाईल.
२. राहण्याची सोय केल्या जाईल.
३. २-३ गुंठे जागा त्यांच्या भाजी-पाल्यासाठी दिल्या जाईल.
४. दरवर्षी एका महिन्याच्या पगारा इतपत बोनस दिल्या जाईल.
म्हराटी शाळंची घंटी वाजली. . . . मजी येक वाजला!
लगी म्या भांडं घिउन काकुंच्या घरला जाते.
''काकू जरा मुरवण देता का?''
''बस बाळा दोन मिन्ट, होतंय.'' काकू.
मलाबी बरं वाटतं जरा- रेडिवो आयकायला भेटतो. लई छान मराठी गाणी लावत्यात काकू.
काकू चांगल्या हायत. रोज मुर्वान मागितलं तरी नाय म्हणीत नैत.
पन तेंची तायडी?. ती घरात नसल्यालीच बरी.
नायतर मग चवकशा सुरूच-
''सुमी रोज कशाला येती?''
''आन मुरवान यवड्या मोट्ट्या भांड्यात कशाला?''
उरलं तर काकू कालवनच देत्यात. मग काय दिपवाळीच!
मनुष्य संघटना का स्थापन करतो याचे कारण साधे आहे. त्याला त्याच्या किंवा आपल्या समाजाच्या कमकुवतपणाची जाणीव होते म्हणून. चार लोक जोडल्यानंतर एक शक्ती निर्माण होइल अशी त्याची अपेक्षा असते. हे संघटन समाज लगेच स्वीकारेल अशी स्थिती नसते. त्याला स्वतःसाठी लोकांच्या हृदयात जागा निर्माण करावी लागते. प्रसंगी इतरांना "थोडे सरकून घ्या" असे सांगावे लागते. तरच जागा निर्माण होते.
शेतकरी राया...
अपुला शेतकरी राया, शेती प्रेमाची करतो..
अवघ्या भुकेल्या जनांची, ओंजळ प्रितीने भरतो..
अपुला शेतकरी राया, नांगर ओढतो जोमानं..
पिक हलते डुलते, शेती खुलते प्रेमानं..
अपुला शेतकरी राया, धनधान्य खुलवितो..
सार्या जगाचा तो बाप, जगी प्रेम फुलवितो..
अपुला शेतकरी राया, कर्जाखालीच राबतो..
पर्जन्याच्या वाटेवर, तोच एकला थांबतो..
अपुला शेतकरी राया, रोज जगतो मरतो..
जगा धान्य पुरवूनी, पोटी भाकरी भरतो..
अपुला शेतकरी राया, संसाराचे सोने करतो..
जगा सुखी करवूनी, स्वत: गरिबीमधे झुरतो..
नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
डिस्क्लेमरः या लेखात बरेच मुद्दे आहेत ज्यावर एक एक कादंबरी होईल, पण थोडक्यात मांडायचा प्रयत्न केला आहे. गोड मानून घ्यावा. प्रतिसादांमधे चर्चा/प्रश्न उत्तरे यातून आणखी उपयुक्त होईल अशी आशा. धन्यवाद.