कविता
आणखी अपहरणे
'ती'ही त्याचा फुटबॉल करते
कधी कधी किंवा बर्ञाचदाही,
पण अपहरणांना, 'ती'च्या तर्हा अधिक
कधी जन्माला येण्यापुर्वीच अपहरण झालेले असते
आलीच तर 'ती' हा शब्दच अपहरण करतो पहिले
'ती' चे अपहरण करण्याची सवय
आधीच्या 'ती'लाही सोडवत नाही
अपहरण
सूत्रांनी गुणांच्या कट काय केले
नी बंदीगृहांच्या प्रवासास सुरवात काय झाली
स्वतःचेच अपहरण करण्याची दिवा स्वप्ने पहात
सतत अपहरणातूनच तर पुढे सरकतोय .
अपहरणकर्ते फक्त बदलत जातात
अनेकदा अनुमती शिवाय ,
अनेकदा हातातन निसटणार्या अनुमतीने
अपहरणांच्या घटनांचे
हे आत्मचरीत्र
अद्याप बाकी आहे,
वाढवेन म्हणतोय
उसंत मिळेल तसे तसे
नव नव्या अपहरणकर्त्यांची
तेवढीच सोय
जुन्या अपहरणकर्त्यांना
जरासा दिलासा
आठवणींचा कप्पा म्हणजे...
पानगळीचा मौसम येतो,उगाच होते सळ-सळ नुसती...
आठवणींचा कप्पा म्हणजे,जुनी-जुनेरी अडगळ नुसती!
काळ गतीचा वेडा असतो,क्षणात घेतो वळणे नवखी...
वाट कुणाची पाहत नाही,जमात त्याची भटकळ नुसती!
ओळख झाली केंव्हा,कोठे?कधीतरी हे आठवताना...
एकांताचे पडते कोडे... समोर दिसते वर्दळ नुसती!
जेंव्हा जेंव्हा ती आठवते,उगाच स्मरते काही-बाही...
ओठावरती श्रावण फुलतो,उरात होते जळ-जळ नुसती!
मोहरलो होतो तेंव्हाचा..ऋतू मनाने जपला आहे...
घमघमते बघ अजून माझी,फुलावाचुनी ओंजळ नुसती!
—सत्यजित
जातस त जाय
जातस त जाय,
येति रावून बी
नसे काई उपाय
नेजो
पाच पोते तांदूर
पन्नास पायल्या तूर
जाता जाता हेडून घेजो
मोहावरचा मोवतूर
दूध देवाचा बंद करन
आता तुयी गाय
जातस त जाय
करजो
सकारी एक फोन
दिसबुडता आठोन
हर मैन्याले पाठवजो
रुपये हजार-दोन
तुयी वाट पायतीन
घरवाले सप्पाय
जातस त जाय
सांगजो
पोराले आपल्या झाडीच्या गोठी
बाघ कोटी ना बावनथडी कोटी
आला कई त दाखवून डाकजो
अमराईतले सेंदऱ्या, गोल्या, घोटी
निस्यान सोडून तं जाते
वल्या खपनीमदी पाय
जातस त जाय
प्रेम रंग
प्रेम रंग ही कविता प्रेमाच्या विविध रंगांवर केली आहे . तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू शकता.
प्रेम रंग
रंगते मी नेहमीच
तुझ्या रंगांमध्ये
हसते मी नेहमीच
तुझ्या हसण्यामध्ये
खरंच खूप सोपी नसत
दुसऱ्यान मध्ये रंगण
तुझ्या साठी केलंय मी
माझं सोपी जगणं
तुझ्या माझ्यातले रंग
अशेच नेहमी उमलु दे
तुझ माझ प्रेम
कायमच मनी बहरूदे
रंगताना मला तुझी
साथ असुदे
चुकली जरी वाट माझी
तरी हाथी हाथ असुदे....
घरी कधी जायचं?
रस्त्यांवरून फिरताना,
मजेमजेत धावताना
खिदळत असतो, उधळत असतो आम्ही
थकून जेव्हा बसतो
तिथेच, बाजूला एखाद्या झाडाखालच्या दगडावर
माझ्या मांडीवर बसून सानुली माझी
करते चाळा माझ्या शर्टाशी
डाव्या हाताचा अंगठा तोंडात तसाच ठेवून
माझ्याकडे मान तिरपी करत पाहते आणि विचारते
अंगठा तेवढ्यापुरता तोंडातून काढत,
"बाबा, आपण घरी कधी ज्यायच्य?"
मी हसतो, लगेच दोन्ही हातांनी तिला उचलून घेतो
गुदगुल्या करीत तिला खांद्यावर टाकतो
खळखळून तिच्या हसण्याने प्रश्न वाहून गेलेला असतो
मग आम्ही जातो बागेत
बरीच गर्दी असली तिथे जरी
कल्लोळती रंगरेषा
गूढ जांभळ्या कोन्यात
क्लांत आदिम श्वापद
माझ्या मातीच्या पायांची
लाल, रांगडीशी याद
कधी शुभ्र झळाळतो
एक कोना आरस्पानी
अद्भुताची निळी हाक
मग गुंजतसे कानी
कुतूहलास पारव्या
केशरीशी ज्ञानफळे
हिर्वळीस सर्जनाच्या
किल्मिषांचे खत काळे
कल्लोळती रंगरेषा
अशा रात्रंदिन मनी
इंद्रधनूची कमान
शोधू कशाला गगनी
सातोरी
सप्त-समुद्रांमधे मिसळती असंख्य सरिता मधुर जला
मार्गावरती समर्पणाच्या करिती पृथ्वीला सुफला
सप्त-रंग हे इन्द्रधनूचे क्षणभर दिसती-अन विरती
मेघांवरती रविकिरणांचे इन्द्रजाल अद्भूत किती
पुनरावर्तन सात दिसांचे जरी मानवा योग्य दिसे
अनादि काल-प्रवाह वाहे अंत तयाला कुठे असे?
अपूर्व विभ्रम सप्त-सुरांचे राग होउनी अवतरती
कोंदणात तालांच्या त्यांची अमूल्य रत्ने झगमगती
निर्धाराने परिश्रम करता असाध्य जगती काही नुरे
कल्पनेतले सप्त-स्वर्ग मग भूवरी येतिल खरेखुरे
मी तृषार्त भटकत असता
मी तृषार्त भटकत असता
मृगजळास भरते आले
मी मला गवसण्या आधी
वैफल्य विकटसे हसले
शब्दांच्या इमल्यापाशी
सावली शोधण्या गेलो
पण शब्दांचे केव्हाचे
धगधगते पलिते झाले
क्षण क्षणास जोडित जाता
वाटले काळ संपेल
पण वितान हे काळाचे
दशदिशा व्यापुनी उरले