विडंबन
जगभर संकल्पज्वराच्या साथीचे थैमान, "कोण" चा इशारा
जागतिक स्वास्थ्य संघटना (कोण) यांनी सूचित केल्याप्रमाणे सध्या जगभर संकल्पज्वराची साथ आलेली आहे.
संघटनेने पत्रक काढून असे जाहीर केले आहे की ही साथ अतिशय वेगाने पसरणारी आणि संसर्गजन्य आहे. विशेषतः आरंभशूर मंडळींना ह्या साथीच्या ज्वराची लागण लगेच होते असे निरीक्षण नोंदवले आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कित्येकदा ही लागण सामूहिक असते असे मत व्यक्त केले आहे.
या आजारासाठी कोणत्याही उपचाराची गरज नसून फक्त थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल आणि साथीची तीव्रता कमी होत जाईल. सामूहिक लागण असेल तर एक एक सदस्य ह्या आजारातून आपोआप बरे होत अंतिमतः केवळ एक किंवा दोन सदस्यांना उपचाराची गरज असेल.
<मंजूर नाही>
क्रान्तितैच्या कविता म्हणजे मेजवानी असते. कितीदा तरी वाचून झाल्या असतील. तरीही पुन्हा वाचतांना फ्रेशच वाटत असतं!
तिची कविता नुसती वर काढूनही समाधान होत नाही. त्यासाठी हा एक विडंबनाचा प्रयत्न! यासाठीची प्रेरणा म्हणजे क्रान्तितैची एक अप्रतीम गझल.. मंजूर नाही
नको बंधने, जाच मंजूर नाही
जिभेलाच उपवास मंजूर नाही !
कसा मान द्यावा तुझ्या वर्तनाला?
सात्विक खाणेच मंजूर नाही !
तुपा शिंपडावे हलक्या पळींनी,
तुपाच्या गडूलाच मंजूर नाही
ना देवेंद्र देव इथे , ना उद्धव आहे साव
ना देवेंद्र देव इथे
ना उद्धव आहे साव
आजही बळीराजा भीक मागतो
पण , त्याला काडीचा नाही भाव
संगीत खुर्ची चालू झाली
पवार वाजवतायत बिगुल
हरेक पठ्ठ्या मग्रूर इथे
पण आपलीच बत्ती गुल
किती बघावं , काय बघावं
कळत नाही काहीच
जो तो आम्हाला नाग वाटतो
आपला वाली कुणी नाहीच
का लावला डाग नखाला ?
डोक्याची झालीय भेळ
कोण बसणार खुर्चीवरती
यातच चाललाय वेळ
लाज बाळगा जरा मनाची
पुरे हि शोभायात्रा
लोकप्रतिनिधी निवडून दिलेयत
कि वेड्यांची भरलीय जत्रा
मी पुन्हा येईन
घेतले तू उधार पैसे
आता देत नसशील
करण्यास ते वसूल
मी पुन्हा येईन
जात असले मी माहेरी
करू नका तुमची थेरं
पाहण्या ते सारं
मी पुन्हा येईन
नाही लिहीता येत पेपर
कॉपी जरी करशील
काय ते तपासण्यास
मी पुन्हा येईन
मला न दाखवता
व्हाटस अप मेसेज पाहता
काय ते पाहता ते पाहण्यास
मी पुन्हा येईन
लेख वगैरे लिहीता येथे भारी
पण या कवीतेला
प्रतिक्रीया देतात की नाही ते पाहण्या
मी पुन्हा येईन
चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला
चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला
तो झाला सोहळा तिहारात
जाहली दोघांची तुरुंगात भेट
मनातले थेट मना मध्ये
मनो म्हणे, " चिद्या, तुझे घोटाळे थोर
अवघाची inx खाऊन टाकला
चिदू म्हणे, एक ते राहिले
तुवा जे पाहिले, पंतप्रधान पदावरी
मनो म्हणे बाबा ते त्वा बरे केले
त्याने तडे गेले प्रामाणिकतेला
मॅडम अट्टल, त्यांची रीत न्यारी
माझी पाटी कोरी राज्य करोनिया
चिदू म्हणे गड्या केली वृथा पायपीट
प्रत्येकाची कोठडी वेगळाली
वेगळीच ताटे वेगळीच वाटी
जेवायला भेटे पुन्हा डाळ भात
संध्याकाळचा पेग ..
संध्याकाळचा पेग ..
जगातली सर्वोत्तम सुखे अगदी स्वस्तात मिळतात असं कोणीतरी म्हटलं आहेच ( हा 'कोणीतरी' कोण म्हणून काय पुसता कीबोर्ड वर बोटे आपटूनी? मीच की तो !). तर स्वस्त मिळणाऱ्या सुखांपैकी "संध्याकाळचा पेग" ही गोष्ट मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या दृष्टीने ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. मस्त संध्याकाळ असावी. सूर्य क्षितिजाकडे झेपावत असावा. किंबहुना नुकताच क्षितिजा पल्याड गेलेला असेल तर अति उत्तम. हुरहूर लावणारी सांज असावी. पोट हलके असावे. मन अर्धसमाधी अवस्थेत जाण्यास उत्सुक असावे. हलकेच एक लार्ज पतियाळा भरावा आणि सोबतीला चखना असावा. अहाहा ....
(रगेल पावट्याचे मनोगत)
मूळ कवीता आशयसंपन्न आहे,हा फक्त साचा तिथून उचलला आहे...
*******
नेहमीच मुदलातून वाचण्याची नाही हौस
अफवा मूळ शोधण्याचा मज नाही सोस
मूळ बातमी शोधण्यात कसली आलीय (?) मौज
भरपेट मीठ मसाला सुद्धा मिळत नाही रोज
सोसायटीत (मला)ओळखीत कुणीच नाही
जालात तर नाव सुद्धा घ्यायचे नाही
विधायक पाहण्यात तर मला रस नाही
दिप पणती भेटण्याचा मला आनंद नाही
विघ्नसंतोषी तरी प्रसिद्धीचा सुटेना वसा
मंगल दाखवून तुम्हीच दिला घुस्सा
अनुमान खालावले तर्कबुद्धी खुंटली
आत्ता मात्र हाव सुद्धा प्रखर वाढली
डोक्याला शॉट [द्वितीया]
प्रेरणा: निवेदन आणि उपास (बटाट्याची चाळ)
रताळ्याच्या चाळीत लपून म्हणून काही राहत नाही! अण्णा पावशांच्या मुलींच्या कुंडल्या त्यांनी खणातून केव्हा काढल्या, गुपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमण बिल्डिंगमधल्या उकिडव्यांच्या घरी केव्हा नेल्या, ही गोष्ट पावशीण- काकूंना कळायच्या आत आमच्या कुंटुबाला कळली!
शोले चित्रपट ,मिपा च्या नजरेतून ( शुद्धलिखित )
१) शोले जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा चालला नव्हता ,तो किंवा गेला बाजार हम आपके हैं कौन पण प्रदर्शकानी लग्नाची कॅसेट म्हणून नाके मुरडली होती
मिसळपाव वर पण बरेच धागे प्रदर्शित होतात एक दोन दिवस प्रतिसाद नाही मग अचानक रतीब सुरु होतो
२) ठाकूर ची सून जया दिवसभर पणत्या मध्ये तेल टाकत असते तसे बरेच लोक जिलब्या टाकत असतात