इमारत
प्रस्तावना: हि माझी अजून एक हिंदी-उर्दू कविता आणि चाणक्यने केलेला तिचा मराठी अनुवाद.
प्रस्तावना: हि माझी अजून एक हिंदी-उर्दू कविता आणि चाणक्यने केलेला तिचा मराठी अनुवाद.
वारा शापित आत्म्यासारखं सैरावैरा इकडे तिकडे भटकतो , माझ्या गालांना , केसांना स्पर्शतो , तो स्पर्श तेवढा हलका नसतो , ती झुळूक नसते वाऱ्यामध्ये श्वास घेऊ शकत नाही इतका भन्नाट वारा.
पावसाच्या मातीचा पहिले सुंगध एखाद्या काचेच्या नक्षीदार बाटलीमध्ये साठवून ठेवावा बाकी सर्व रुक्ष ऋतुंमध्ये ती बाटली उघडावी आणि हळू हळू तो सुंगंध माझ्या सर्वांगात मिसळवून टाकावा.
अगदी ओल्या मातीसारख वाटायला हव मन
ज्या नात्यांच्या भरवश्यावर
स्वप्नांचे मी बांधले इमले
त्या नात्यांचे बंध अलगदच सुटले
धरूनी कराशी जयांना जपले मी उराशी
माझ्या प्रेमापेक्षा त्यांनी पैश्यांनाच धरिले उराशी
ज्यांची होती आस त्यानींच केले जीवन उदास
उबदार माझे घरटे आता का रे झाले भकास
आधार ज्यांचा धरूनी उठावे
ते दोर आधाराचे उठण्या आधीच विरले
आपले विश्व तू एकट्या ने विसरावे
नातं तुझे माझे एवढ्यातच तोडले
विश्वास ठेवावा तरी कुणावर
जगी माझे कुणीच नाही उरले
आपलेसे केले ज्यांना तेच
माझ्या जीवावर उठले
गोकुळ नसले तरी चालेल ,
पण आयुष्यात एक राधा असावी !
एकही गोपीका नसली तर चालेल ,
पण आयुष्यात एक राधा असावी !
देवकी - वासुदेवाची सर कोणालाच नाही ,
पण आयुष्यात एक राधा असावी !
पेंद्या नी सुदामानी मैत्री शिकवली ,
पण प्रेम शिकवायला एक राधा असावी !
गीता ऐकायला अर्जुन आहेच ,
पण गीता स्फुरायला एक राधा असावी !
कृष्णाशिवाय सर्वच अपुर्ण ,
पण कृष्ण पुर्ण व्हायला एक राधा असावी !!!
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम '१ एप्रिल'च्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. वगैरे वगैरे.......
मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे.
कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : अंतिम फेरी २०१४ (वर्ष ५ वे)
किती भाग्यवंत मी, आज मला प्रत्यक्ष देव भेटला
स्थितप्रज्ञासारखा उभा राहिलेला, रस्त्याच्या एका कडेला
मी काही एकटाच नव्हतो, दिसला होता देव ज्याला
माझ्या सारख्या बर्याच पामरांना, त्याने आज आशिर्वाद दिला
काय देवा आज इकडे कुठे? मी देवाला विचारले
त्यावर त्याने नुसतेच डोके इकडून तिकडे झटकले
त्याच्या मौना कडे दुर्लक्ष करत मी दोन्ही हात जोडले
आशिर्वाद म्ह्णून त्याने फक्त त्याचे दोन्ही कान हलवले
कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अजय जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com
नमस्कार,
जसे फुलावे रंग साजिरे
श्यामनिळ्याच्या मोरपिसातून
मुके तरी मोहाहुन मोहक
नाते आपुले तसेच आतून..
मी मुरली तू सूर खुळासा
मी यमुना तू माझी खळखळ
तू कविता, मी तुझ्या आतली
आर्त खोल दडलेली तळमळ
तू कान्हा मी अधीर राधा
राघव तू मी तुझी मैथिली
नर्तक तू मी नुपुर नादमय
छुमछुमणारे तुझ्या पाऊली
भेट घडे या वळणावरती
अनोळखीशी आज नव्याने
वर वर सारे परके तरिही
जुळले अंतर जुन्या दुव्याने
परस्परांतच परस्परांनी
पुन्हा नव्याने जावे गुंतून
अनोळखी देहात नांदते
नाते आपुले तसेच आतून..
ओंजळीत या रित्या कुणी सुगंध पेरले
मनास गंध स्पर्शता, शब्द शब्द जाहले ..
भरून अंतरात या कुठून येइ चांदवा
अचूक हेरल्या कुणी खुळ्या अबोल जाणिवा
कुठून रंग पेरती मनी अगम्य कुंचले
रहायचे मनात जे दडून आर्त काहिसे
समूर्त आज जाहले भाव ते खुळे पिसे
मनातले तरंग हे कुणी अचूक झेलले
कशास जीव जाळतो भास पूर्णतः नवा
अनोळखी, तरी कसा स्पर्श वाटतो हवा?
ना कळे कधी कसे जिवात जीव गुंतले...
© अदिती जोशी