माझी लाचखोरी....
घटना जुनी आहे.१० वी झाल्यावर सगळे करता तस मला सेवायोजन कार्यालयात नावनोंदणी करायला जायच होत.
गावाकडुन गादी पकडुन जिल्ह्याला जायला उशीर झाला..१ वाजला.कार्यालयात पोहचलो.
माझे येण्याचे कारण तिथल्या कर्मच्यार्याला सांगितल..त्यांने बोर्डाकडे बोट दाखबल..कार्यालय १ वाजता बंद..
डोळ्यासमोर तो बोर्ड,कर्मचारी,पुन्हा होणारी चक्कर,वाया जाणारा वेळ आणी पेसा नाचु लागला..
त्या कर्मचार्याला काही तरी करायची विंनती केली...
मी" काहीतरी करा साहेब..पुन्हा यायला जमणार नाही."
तो," नियम म्हणजे नियम नंतर या.."
मी," बघा काही करता येत का.."