घायाळ मी हरिणी...
हा लेख खूप दिवस डोक्यात होता. पण लिहायला जमले नाही आणि माझा पिंड लेखकाचा नाही असं मला वाटायचं. पण सध्या असं वाटायला लागलं की लिहिण्याची गरज आहे. गेले काही दिवस समलैंगीकतेवरून चर्चांचा बाजार उठला आहे. काही बुद्धीवादी, “पटाइत” लोकं तर स्वत:लाच निसर्ग समजून, जगातील सर्व गोष्टींना नैसर्गिक आणि अनैसर्गिक, उत्कर्ष-विनाश, असं वेगळं करू लागली आहेत. म्हणून मग विचार केला की आपणसुद्धा का नाही चार शब्द लिहावेत? म्हणून हा खटाटोप.....