गूढ अंधारातील जग -२
गूढ अंधारातील जग -२
मूळ पाणबुडी या शाखेची गरज काय आणि तिचा हेतू किंवा उद्देश काय हे आपण समजून घेऊ.
गूढ अंधारातील जग -२
मूळ पाणबुडी या शाखेची गरज काय आणि तिचा हेतू किंवा उद्देश काय हे आपण समजून घेऊ.
ती ठिणगी होऊन येते
अन वणवा होऊन छळते
ती लकेर लवचिक होते
अन गाण्यातून रुणझुणते
ती कधी निखारा होते
विझुनी मग होते राख
उमलविते त्यातून फूल
मग तिचीच फुंकर एक
ती उल्केसम कोसळते
उखडून दिशांचे कोन
धगधगत्या चित्रखुणांची
ती लिहिते भाषा नविन
जे तरल नि अक्षर ते ते,
जे अथांग, अदम्य ते ते,
जे दूर असूनही भिडते,
जे जटिल तरी जाणवते,
ते तिचेच देणे असते….
…..किती घ्यावे? तरीही उरते !
गूढ अंधारातील जग
आपण कधी खिडकीच नसलेल्या कार्यालयात काम केलं आहे का?
महिनोंमहिने सूर्यप्रकाश , चंद्रप्रकाश, उघडे आभाळ पाहिलेले नाही.
तीन तीन महिने २४ तास त्याच त्याच माणसांचा चेहरा पहिला आहे का?
तीन महिने सलग बिन अंघोळीचे राहिला आहात काय ? आणि वापरलॆले कपडे न धुता टाकून दिले आहेत का? डिस्पोझेबल डायपर नव्हे
तीन महिन्यात केस कापता आले नाहीत म्हणून एखाद्या गोसाव्यासारखे वाढू दिले आहेत का?
महिनोन्महिने डबाबंद अन्न खाल्लंय का?
नमस्कार..
मी डिश टीव्ही चा गेले ३ वर्ष ग्राहक आहे. इतके दिवस त्यांची सेवा सुरळीत चालू होती. मात्र १८.१०.२०१७ रोजी मला एक विचित्र अनुभव डिश टीव्ही कडून मिळाला त्याबद्दलचे हे अनुभवकथन.
मनाच्या एका खोलवर
अंधार्या कप्प्यामधे कुठेतरी
दडपून टाकलेली तूझी आठवण,....
कधीतरी उफाळून बाहेर येतेच
अचानक, मला नकळत......
आणि मग कोरड्या पडलेल्या
जखमा परत भळभळू लागतात
मनावर मोठा दगड ठेवून
तूला लिहिलेले ते शेवटचे पत्र
इतक्या वर्षां नंतरही.... जसेच्या तसे,
डोळ्यांसमोर नाचत असते,
मला आणि फक्त मलाच माहीत आहे
ते पत्र लिहिण्याचे खरे कारण
पत्रात खरे कारण लिहायची हिम्मत झाली नाही
आणि तूझ्याबरोबर खोटं बोलायच नव्हत,
(तू नेहमी प्रमाणे अचूक पकडलेच् असते)
नेणिवेला जाणिवेने छेदता जे उरतसे
ते पुरे समजून घेणे कधिच का सोपे नसे?
या क्षणी ते स्तंभ भासे, शूर्प ते पुढच्या क्षणी
पाहू मी गजरूप कैसे, नेत्र माझे झाकुनी
कोणी त्या म्हणतात माया; वास्तवाचा विभ्रम
कोणी त्या म्हणती अविद्या; सर्जनोद्भव संभ्रम
वास्तवाचे रूप कैसे? कोण जाणे सर्वथा?
ज्ञेय-ज्ञाता भेद फिटता शेष आदिम शांतता
रेशमी साड्यांच्या बासनात
मोरपिशी साडीच्या घडीत
अलगद ठेवलेलं, ते पत्र..
तिथून बाहेर नाही काढत कधी
हलकेच चाचपडते अधूनमधून
त्याचं तिथं असणंच पुरेसं आहे...
त्यातला शब्दंशब्द पाठ आहे
लिहून खोडलेला ,
पाण्याने पुसटलेला...
किती मिनतवा-या. हट्ट,
रुसवे फुगवे काय अन् काय
हातानं लिहिलेल्या त्या एका कागदासाठी..
आपल्यामधे जे काही होतं नव्हतं,
(नव्हतं तेच जास्त खरंतर)
ते संपल्यावर तू शेवटचं पाठवलेलं ते पत्र...
शिवधनुष्य एका हाताने सहज उचलले
भात्यामध्ये शब्दच होते, नंतर कळले
कवितेच्या दरबारी नवशब्दांची मनसब
मिळता कोठे झुकायचे ते नाही कळले
शब्दप्रभूंना वाट विचारीत इथवर आलो
शब्द कधी रक्तातच भिनले, नाही कळले
पुन्हा पुहा मी अंधाराशी केली सलगी
उजाडताना उल्कांचे व्रण शब्दच झाले
"श्रीयुत जोशी श्रेष्ठी आहेत का निवासात?", जरा पुरुषी पण नाजूक आवाजात त्याने विचारले.
"कोण?", मी विचारले.
"मी सुरेश, तसा आपला परिचय नाही. मी श्रीयुत जोशी श्रेष्ठींसोबत एकाच कार्यालयात कार्य करतो."
"अच्छा..या ना आतमध्ये."
"श्रीयुत जोशी श्रेष्ठी नाहीयेत का निवासात?"
"नाही..जोशी साहेब बाहेर गेले आहेत", स्वयंपाकघरातून बाहेर येत माझी काकू म्हणाली.
"रात्रप्रहरी शतपावली करण्यास निर्गमन केले का त्यांनी?"
"नाही हो..जरा कामासाठी बाहेर गेले. तुमचं काही काम होतं का?"
तिचं आणि माझं नातं काही वेगळंच आहे. एकमेकींचे लाड करतो. उपदेश करतो. आमचे जितके मतभेद असतात तितकाच जिव्हाळाही असतो. आमचे संवाद कधी हळवे तर कधी हसून हसून डोळ्यात पाणी आणणारे, कधी बौध्हिक पातळीवरचे तर कधी स्वयंपाकातील धाडसी प्रयोग यांची प्रेरणा देणारे, कधी उद्बोधक तर कधी आयुष्याला वेगळे वळण देणारे असतात.
माझा तिला आणि तिचा मला शारीरिक, बौधहिक, मानसिक बदल लगेच जाणवतो. या मागे कोणती अंतःप्रेरणा असेल ?
जन्मजनमांतरिचा एक स्त्री असल्याचा समान धागे तुझ्यातल्या मला माझे दर्शन घडवून देत असते. कशाला बघू मी उगा आरशात ! माझीच छबी दिसे मला तुझ्याच रूपात !