आठवणींच्या जंगलात-१
खाटेवर पडताच भूल दिल्या सारखी क्षणात झोप लागली......पुढे....
http://misalpav.com/node/50393/backlinks
वाचकांचे, प्रतीसादकांचे धन्यवाद.
खाटेवर पडताच भूल दिल्या सारखी क्षणात झोप लागली......पुढे....
http://misalpav.com/node/50393/backlinks
वाचकांचे, प्रतीसादकांचे धन्यवाद.
ध्यास सावळ्या विठूचा मनी
वाट पंढरीची चालावी चालावी...
समस्त संतांना ज्या रूपाने भक्तीची दीक्षा दिली,त्याच विठूच्या रूपाचा ध्यास घेत आजही भक्तीमय वारकरी पंढरीकडे मार्गस्थ करीत राहतो. विठूचे ते कमरेवारचे दोन हात अत्ठ्ठावीस युगांपासून ठेवलेले आहेत.पण आताच लेकराला आवडत्या कामाला लावून एखादी माउली दोन क्षण कमरेवर हात ठेऊन निश्चिंत उभी आहे असा भास होतो.सार्या जगाचा कारभार हाकणारे हात क्षणभर विठूने कमरेवर ठेवले आहेत.
त्या विटेची ती काय समाधी अवस्था घट्ट रोवलेल्या संकल्पांची ध्योताकच आहे.
पूर्वरंग
त्रेचाळीस वर्षापुर्वीची आठवण व अंतरजालावर उपलब्ध आसलेली माहीती एकत्र गुंफून धागा विणायचा प्रयत्न त्यामुळे कुठे कुठे विषयांतर झाले आहे. उद्देश तेंव्हा आणी आता याची सांगड घालत मनोरंजनाचा प्रयत्न.अंतर खुप मोठे आहे लेखनात त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गाभा
३० जुन,"महा"वादळ थांबले होते, धुळ,पाला-पाचोळा खाली बसत होता.नऊ दिवस अथक वादळाच्या बातम्या देणाऱ्या पत्रकार आणी टि व्ही चॅनेल्सनी एक खोलवर श्वास घेतला.
आत्मसमरूप दिसतात ओळी
आत्मस्वरूप असतात ओळी .
इथे नदीचा दिसतो काठ
तिथे संथ प्रवाह पार लावतात ओळी .
निराळ्या वेदनेच्या एकाच गावी
दिसता दिसतो आम्ही सहप्रवासी
कुठे दूर अंधारात हरवले गाव माझे
दिसे मी उगाचच तिथला निवासी
असे शब्द साधे येतात साथी
कविता त्यातुन वाहते प्रपाती .
उरी अंतरी घाव नाजूक खोल
वरी दिसते केवळ शांत ज्योती !
आम्ही नाही ऐसे कवी ज्यास म्हणती
जशी वेदना ती , तसे शब्द हाती.
मनाचेच सारे इथे मांडयाचे ..
न पूर्ती मिळे त्यातूनी .. काय त्याचे?
*वळण नसलेल्या सरळ वाटेवर*
जेंव्हा कोणीतरी खास भेटतं
मग सरळ रेषेतलं आयुष्य
नागमोडी होऊन जातं
वादळ आणी पाऊस
मग नित्याच होतं पण
वादळा पूर्वीची शांतता
सोसण मात्र असह्य होतं
सोसाट्याचा वारा ,गारांचा मारा
संतत श्रावणधार, रस्ता चिबं होतो
आणी हवाहवासा गारवा
वाटेवर पसरतो
भिजलेला रस्ता,दाटलेली हिरवळ
पुन्हा एकदा कुशीत येते
अन वाटेवरली मरगळ
त्वरीत निघून जाते
आसेच कुणीतरी
खास भेटावे
प्रत्येकाला वाटते
मग नागमोडी वाट
सुद्धा सरळ भासते
२७-६-२०२२
टेनिसविश्वातील सर्वांत मानाची ग्रँड स्लॅम स्पर्धा, विंबल्डन टेनिस स्पर्धा सालाबादप्रमाणे 27 जूनपासून सुरू होत आहे. लंडनजवळील ही विंबल्डननगरी टेनिसपटूंची पंढरी म्हणून ओळखले जाते. म्हणूनच या स्पर्धेत मानाच्या सेंटर कोर्टवर खेळण्याचे आणि अर्थातच विजयी होण्याचे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. या सेंटर कोर्टच्या उभारणीला 2022 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणूनच यंदाच्या स्पर्धेच्या निमित्ताने या सेंटर कोर्टविषयी.
सध्या कोकणात वास्तव्य असल्याने मुंबईत काही कारणाशिवाय येणं होत नाही. सुरवातीला शिक्षणासाठी आणि मग नोकरीसाठी काही काळ मुंबई मध्ये असल्याने मुंबई लोकलची चांगली माहिती आहे. सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर तिन्ही मार्गांवर तेव्हा भरपूर भटकून घेतलंय. त्यामुळे लोकलची सवय नसली तरी भीती मात्र नक्कीच नाही. हां पीक अवर्स ना मी जाण्याचं टाळते निश्चित. मुंबईला आल्यावर कधी वेळ आलीच लोकलने फिरायची तर मला खूप उत्सुकता असते. एक तर मी नेहमी स्लो लोकल पकडते. याआधीच्या अनुभवानुसार मी फास्ट लोकल पकडली कि ती सिग्नलला एवढा वेळ काढते कि स्लो पुढे निघून जाते.
सध्या कोकणात वास्तव्य असल्याने मुंबईत काही कारणाशिवाय येणं होत नाही. सुरवातीला शिक्षणासाठी आणि मग नोकरीसाठी काही काळ मुंबई मध्ये असल्याने मुंबई लोकलची चांगली माहिती आहे. सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर तिन्ही मार्गांवर तेव्हा भरपूर भटकून घेतलंय. त्यामुळे लोकलची सवय नसली तरी भीती मात्र नक्कीच नाही. हां पीक अवर्स ना मी जाण्याचं टाळते निश्चित. मुंबईला आल्यावर कधी वेळ आलीच लोकलने फिरायची तर मला खूप उत्सुकता असते. एक तर मी नेहमी स्लो लोकल पकडते. याआधीच्या अनुभवानुसार मी फास्ट लोकल पकडली कि ती सिग्नलला एवढा वेळ काढते कि स्लो पुढे निघून जाते.
पुनर्जन्माचं तसं काय फिक्स नसतंय. किती टाईम
लागेल काय सांगता येत नाय..!
म्हणजे असं बघा की जुनी गोष्ट आहे..! साधारण दोनेक हजार वर्षें झाली असतील...! तेव्हा आपल्या भागात सातवाहन वगैरेंचं राज्य होतं..
त्यांची एक राजकन्या होती.. आणि मला ती आवडायची.
अर्थात, माझ्यासारख्या हजारो फाटक्या मनुष्यांना
ती आवडत असणार हे साहजिकच आहे..
आणि हे तिच्या खिजगणतीतही नसणार, हे ही स्वाभाविकच म्हणावे लागेल.!
नॉर्मली ते तसेच असते..!
मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज (ट)’ आणि पंजाबमधील फिरोजपूर कँट यादरम्यान धावणारी ‘पंजाब मेल’ गेल्या 1 जूनला 110 वर्षांची झाली आहे. मुंबईहून ‘पंजाब मेल’ सुरू झाली त्या दिवसाची नक्की तारीख माहीत नाही. पण रेल्वेने ती तारीख 1 जून 1912 असेल असे गृहीत धरले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटनमधून भारतात आलेले अधिकारी आणि अन्य युरोपियन प्रवाशांसाठी ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी ती गाडी तत्कालीन ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते अखंड भारताच्या वायव्य सीमांत प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरपर्यंत धावत होती.