स्वप्न जागृतीची सीमा
स्वप्न जागृतीची सीमा
अर्ध सत्य अर्धा भास
अलौकिकाच्पा कवेत
पडे वास्तवाचा फास
सीमेवर कल्लोळती
नाद रंगांचे सागर
अपूर्वाची अनुभूती
गंध, रस, स्पर्शापार
उंबरा हा अदृष्टाचा
असूनही नसण्याचा
नसलेल्या असण्याशी
उराउरी भेटण्याचा
स्वप्न जागृतीची सीमा
अर्ध सत्य अर्धा भास
अलौकिकाच्पा कवेत
पडे वास्तवाचा फास
सीमेवर कल्लोळती
नाद रंगांचे सागर
अपूर्वाची अनुभूती
गंध, रस, स्पर्शापार
उंबरा हा अदृष्टाचा
असूनही नसण्याचा
नसलेल्या असण्याशी
उराउरी भेटण्याचा
मला हा सिनेमा आवडला याचे कारण या सिनेमात एक वाक्य आहे. हे वाक्य ऐकून ४८ वर्षापुर्वी मला मिळालेला सल्ला आठवला. सल्ला न मागता मिळालेला नव्हता त्यामुळे न ऐकण्याचे कारण नव्हते. मी तो अमलात आणला आणि सुखी झालो.
त्या काळी कुटुंब नियोजनावर खूप चर्चा होत असे. फॅमिली प्लॅनींग बद्दल कुतूहल होते. कॉपर टी बद्दल ,मी कटिंग ला गेलेल्या सलून मधे चाललेली चर्चा ऐकणे अशक्य झाल्याने ती थांबवण्याची विनंती करावी लागली.
काय आहे रे गोव्यात बिकनी, बिच आणि बीयर? हे वाक्य अनेकदा ऐकले होते. तसे बघायला गेले तर हे काही खोटे नव्हते. मी याआधी जेंव्हाही गोव्याला गेलो ते फक्त उत्तर गोवा, दक्षिण गोवा मधले समुद्र किनारे, दोन मोठी चर्च, शांता दुर्गा मंदिर आणि मंगेशीचे मंदिर येवढेच केले होते. या व्यतिरीक्त गोव्यात खरच काही आहे का हा प्रश्न मलाही पडला होता. मी तसा फार पूर्वी काही कामानिमित्त सांकलीच्या भागात गेलो होतो पण तेंव्हा सुद्धा मी काम झाल्यावर उत्तर गोवा दक्षिण गोवा असाच फिरलो होतो. त्यावेळी म्हापशाच्या मासेबाजारात मारलेला फेरफटका मात्र कायम लक्षात राहिला.
माझी आई खूप धार्मिक होती. त्याउलट वडील तर्क कठोर. आई देवाची पूजा रोज मनोभावे करायची. तिला वेळ नसेल तर मोठा भाऊ करायचा. आई सर्व व्रतवैकल्ये,श्रावणातले उपास, गौरी गणपती, नागपंचमी, गोकुळाष्टमी, दसरा, पाडवा सगळं, सगळं करायची. शिवाय विनायकी आणि अंगारकी करायची. जिवतीची पूजा करायची.
वडील म्हणायचे,"या हल्लीच्या काळात जिवतीएवढी मुलं परवडणार आहेत का? शिवाय जिवतीचा कागद चिकटवून काय होणार आहे? मुलांवर विज्ञाननिष्ठ संस्कार करणं हे आईवडिलांचं कर्तव्य."
लिसा लिसा - प्रेमाचा निरागस गुंता
प्रियदर्शनचे दिग्दर्शन असलेल्या अनेक चित्रपटांतील कथा हि एखाद्या शांत , निवांत , निसर्ग रमणीय गावामधे घडते . उदाहरणार्थ हिंदीतील मुस्कुराहट , खट्टा मिठा .
लिसा लिसा या २००३ मधे प्रदर्शीत झालेल्या तामीळ चित्रपटामधीलही वातावरण असेच रम्य , शहरी धकाधकीपासुन दुर आहे . कथा नायक राकेश ( शाम ) हा तरुण येथे आपले वाडवडीलोपार्जीत घर , शेती एकट्याने सांभाळतो आहे . पुढे मागे पैसे कमावण्यासाठी परदेशात जाण्यासाठीही त्याचे प्रयत्न चालु आहेत .
आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला शेवटच्या ओव्हर मध्ये १२ धावांची गरज आहे....प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार ३० पेक्षा अधिक धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे..अश्या वेळेस विश्वातला कोणताही कर्णधार शेवटची ओव्हर संघातील सर्वात अनुभवी गोलंदाजाला देणे पसंत करेल.....पण ३ यष्टयांच्या मागे उभ्या असलेल्या कर्णधाराच्या मनात वेगळाच प्लॅन होता. त्याने शेवटची ओवर फक्त ३ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या जोगिंदर शर्माला दिली आणि इथेच भारतीय क्रिकेट मधल्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. तो सामना होता पहिल्यावहिल्या T-२० विश्वचषकाचा अंतिम सामना.
पुरूष एक वाल्या कोळी
आयुष्यभर विणतो जाळी
पापाचा घडा मात्र
शेवटी त्याच्याच भाळी
जाळ्यात शिकार फसेल
म्हणून वाट बघत बसतो
कर्तव्य पुर्तीचा भ्रम
उगाच जपत आसतो
पुरूष एक वाल्या कोळी.....
तहान नाही भूक नही.
बसला होता नाक्यावर
डोक आलं जाग्यावर
जेव्हाआप्तानीं मारलं फाट्यावर
नारायण नारायण जाप करी
नारदाची आली स्वारी
ऐकुन विनंती वाल्याची
म्हणती,त्रेता मधे एकच होता
पुरूष एक वाल्या कोळी......
कलीयुगी सारेच वाल्या
एवढे राम कोठून आणू
नाही केवट नाही राम
ज्याचे ओझे त्यालाच घाम
पेरणा http://misalpav.com/node/49655
अनन्त्_यात्री सरांच्या कळकळीच्या विनंती चा मान ठेऊन दारू हा विषय सोडून विडंबन पाडत आहे
ऐसे(ही) ऐकिले आकाशी
(१) केव्हातरी एकदा म्हणे
दारू हा विषय सोडून
ग्रहकक्षांच्या कातीव रेषा
वितान अवकाशाचे व्यापून-
अचूकतेची लय सांभाळीत-
परस्परांशी अंतर राखून-
कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो,
फिराल तुम्ही अथकपणाने
विश्वांताचा क्षण आला तरी
अमुच्या आभासी पण तरिही
अभेद्य ऐशा बेड्या घालून?"
जरी नाहीस समोर तू, कायम सोबत असतेस तू ..
एकांत रात्री ही सरतात सहज, कारण स्वप्नांमध्ये असतेस तू ..
माझ्या ध्यानी मनी वसतेस तू, सुंदर विभ्रम करतेस तू ..
कल्पांती नेतील प्रेमदूत माझे, मला मोहित करतेस तू !
वाऱ्याच्या झुळूकेबरोबर येतेस तू ,
आरशातही पाहताना दिसतेस तू ..
पण प्राण अडकतो श्वासात,
जेव्हा अवचित कधी दिसतेस तू !
अव्यक्त राहूनही जिंकतेस तू, कधीही कशीही आवडतेस तू ..
कोरडी पडली होती जीभ सांगताना, "मला खूप आवडतेस तू" !
थोडी गडबडलीस तू, तरीही माफी मागत होतीस तू ..
"मला नाही जमणार" सांगताना, मात्र निर्विकार होतीस तू !