मैत्री

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
11 Jan 2022 - 10:17 pm

वेळेवर पाऊस आला की येतात ते आनंदाश्रू.

मैत्री होती ढगाची
उंच उंच डोंगराशी
आंगचटीला आला
खोड्या करू लागला

म्हणून ......
टोचून टोचून डोंगर बोलला
भांडण झाल जोरात
म्हणून रडू आल ढगाला
धार लागली डोळ्याला

कट्टी घेऊन डोंगराशी
वसुधेच्या कुशीत घुसला
आसवांनी पुसलेले अश्रू बघून
मनाशीच हसला

मीत्राशीवाय करमेना
आई जवळ मन रमेना
लवकरच येतो म्हणून
डोंगराला भेटायला गेला

भेट झाली मीत्रांची
दोघा पण खुश झाले
अधंळी कोशीबिरीचा खेळ
पुन्हा खेळू लागले

Nisargकवितामुक्तक

सरकार

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
11 Jan 2022 - 7:41 pm

"कुटायस रे ल*ड्या? कार्पोरेशनला ये. 'संगम'ला बसू." सरकारांचा मेसेज.
आता तुम्ही म्हणाल की बरं मग?
तर मग वगैरे काही नाही. सरकार म्हणजे आमचे जुने हितसंबंधी. या शहरात उगवतात अधूनमधून आणि मग काढतात आमची आठवण. आकस्मिक येऊन चकित करण्याची त्यांची पद्धत आहे.
आपणही समजा अशा ऑफरला नाही म्हणत नाही.
अर्थात कामं वगैरे नाचत असतातच पुढ्यात. पण त्याचं काय एवढं..! आख्खं आयुष्य त्यासाठीच पडलेलं आहे..! आज नाही केली तर उद्या करता येतील. किंवा परवा करता येतील.
किंवा करू करू म्हणता येईल.

कथाजीवनमानस्थिरचित्रविचारअनुभवविरंगुळा

*भारतीय चित्रपटात सर्वप्रथम*

srahul's picture
srahul in जनातलं, मनातलं
11 Jan 2022 - 3:31 pm

*भारतीय चित्रपटात सर्वप्रथम*
आता पर्यँत जी भारतीय चित्रपटाची वाटचाल झाली त्याला मुकपटा पासून धरलं तर १०० वर्षे पूर्ण होऊन गेली , बोलपटा पासून धरलं तर साधारण ७५ वर्षे पूर्ण होऊन गेली. या काळात प्रतिथयश लोकांनी या क्षेत्रात नवे नवे प्रयोग केले.या अस्थिर व्यवसायात रुळलेली वाट सोडून नवा रस्ता बनवणे हे जोखमीचे काम.पण तरी सुद्धा काही जिद्दी लोकांनी हे आव्हान स्वीकारलं आणि तो धोका पत्करला. काही यशस्वी झाले , काही अपयशी झाले. पण या साऱ्या धकाधकीतून आपण जो आजचा सिनेमा पाहतोय तो घडला.
एखादी गोष्ट जेव्हा प्रथम घडते तेव्हा तीन शक्यता असतात

चित्रपटविचार

एक होता कार्व्हर (ऐसी अक्षरे ...मेळवीन -५)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
11 Jan 2022 - 12:07 am

एक होता कार्व्हर
लेखिका :वीणा गवाणकर

१

साधी राहणी उच्च विचारसरणी या उक्तीनुसार जगणारे,वागणारे मानव जातीला वरदान असतात. डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर अमेरिकन शास्त्रज्ञ ,कृषी क्षेत्रात अमुल्य कार्य करणारे सतत कार्यमग्न असणारे.पण इथपर्यंत पोहचण्यासाठी वर्णद्वेष हा सर्वात मोठा अडथळा त्या काळात भोगुनही एक तारा शेती क्षेत्रात कायमचा उमटला.

मुक्तकप्रकटनआस्वाद

सल

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
10 Jan 2022 - 9:26 pm

सल - अति लघुकथा
----------------------

मैत्रिणीचा फोन आला . अन ...
ती आली . आम्ही दोघी त्याच्या घरी गेलो .
त्याला हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याला तसं पाहताच डोळ्यांत पाणी साठलं अन मनात आठवणी .
आताही तो कित्ती कूल दिसत होता ! ... तो गेला होता . पण आताही तो कसा शांत झोपल्यासारखा वाटत होता ... वाटलं - आत्ता त्याच्या कुशीत शिरावं अन त्याला बिलगून झोपावं .
आमच्या ब्रेकअप आधी कितीदा तरी मी ...
पण ब्रेकअप झालं नसतं ; तरी ताटातूट ठरलेली होतीच ! नियतीने ठरवलेली .

कथा

नाटक परीक्षण! रणांगण!

kvponkshe's picture
kvponkshe in जनातलं, मनातलं
10 Jan 2022 - 6:56 pm

या १४ जानेवारी २०२२ ला २६० वर्षे होतील !

गेली २६० वर्षे ही भळभळती जखम घेऊन प्रत्येक मराठा जगतोय. आणि या जखमेच्या वेदना मराठयांच्या पुढील पिढीत वारसा म्हणून आपोआपच येतात.

नाट्यसमीक्षा

अहिल्येश्वर मंदिर

केदार भिडे's picture
केदार भिडे in जनातलं, मनातलं
10 Jan 2022 - 2:29 pm

डिसेम्बर २०२१ मध्ये बहिणीसोबत मध्य प्रदेशचा दौरा झाला. इंदोर, ओंकारेश्वर, महेश्वर, मांडू या ठिकाणांना भेट दिली. त्याचा वृत्तांत लिहायचा आहे. तत्पूर्वी हा एक छोटा लेख.

कलालेख

ध्रांगध्रा - ९

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
10 Jan 2022 - 10:15 am

पाय घसरल्यामुळे पाण्यात पूर्ण उताणा पडलोय. महेशचा हात हातातून सुटलाय. तोंडाच्या वर किमान दोन अडीच फूट तरी पाणी आहे.पडल्यामुळे पाण्याचा तळ डहुळलाय. तसाही अंधार आहे. डोळ्यासमोर काहीच दिसत नाहिय्ये.अंधारलेलं... , गढुळलेलं... हिरवट शेवाळंलेलं ....असं सगळं अस्पष्ट दिसतंय.

कथाविरंगुळा

गुजरात सहल २०२१_भाग ३-भूज, द्वारका

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
9 Jan 2022 - 11:39 pm

भाग २ येथे वाचा
------------------------
आज सहलीचा तिसरा दिवस. अर्धा दिवस भूजमध्ये भटकंती करून द्वारकेसाठी प्रवास करावयाचा होता. पण अंतर जास्त असल्याने वाटेत जामनगरलाच मुक्काम करणार होतो. ठरल्याप्रमाणे सकाळी नऊला नाश्ता आटोपून भुजकडे निघालो. वाटेत एका ढाब्यावर चहा घेतला. ढाब्यासमोर खाटा टाकलेल्या होत्या. माणसे येऊन बसली की लगेच प्रत्येकाच्या हातात बशी दिली जात होती व किटलीतून थेट बशीत चहा दिला जात होता. हीच पद्धत नंतर अनेक ठिकाणी दिसली. (चहा रु.१०/-प्रति बशी) चहा मात्र सर्व ठिकाणी उत्तम मिळाला.