बाबूंचे अच्छे दिन आले
(बाह्य दिल्लीत राहणारे काही बाबू जाणा-येण्याचा वेळ ही ८ तासात सामावून घायचे. आता कार्यालयात १० तास काम करावे लागतो आणि शिवाय जायला यायला दीड-दोन तास लागतातच. १५ मिनिटे उशीर झाला कि अर्धी सुट्टी कट. असे हे बाबूंचे अच्छे दिन सुरु झाले आहेत)
दोनतास जायला
दोन तास यायला
वर दहा तास काम
बाबूंचे असे
अच्छे दिन आले.
न घेताच सुट्ट्या
कश्या काय संपल्या
मिनिटाच्या उशिराने
पाण्यात त्या बुडाल्या.
बाबूंच्या सुट्ट्यांचे असे
अच्छे दिन आले.