अक्षयपात्र
स्वतःशी कणभर असताना
दोन्ही हातांनी मणभर द्यायची इच्छा असते
तेव्हा तो भेटतो.
कणभराने तृप्त होतो.
अक्षयपात्र तिच्या काळजाचं झालेलं असतं .
खळाळत उधळत वाहतो प्रेमाचा झरा
आटत नाही.
लाघवी हसरा चेहरा डोळ्यात तेवत राहतो
विझतच नाही.
अव्यक्ताचं हे महाभारत पेलायला पुन्हा
कृष्णसखाच लागतो.
कृष्णसखा भेटतो.
फक्त त्यासाठी त्या अनवट वाटेवरची
द्रौपदी व्हावं लागतं .