आमार कोलकाता - भाग ४
८५ अँमहर्स्ट स्ट्रीट, कोलकाता
चित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता.
८५ अँमहर्स्ट स्ट्रीट, कोलकाता
चित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता.
दो डोळ्यांचे झरते पाणी इथून मजला स्पष्ट दिसे
त्या पाण्याच्या आवेगावर ओठावरले गीत फिरे
डोळ्यांमधल्या रेषा तांबूस पूरी सांगते व्यथा खरी
सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी
गदगद्णारे हृदय राजसा तुझा पोचतो इथे हुंदका
पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला
सहवासाचे अत्तर नाही तरी मिठीचा भास कोवळा
इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा
-शिवकन्या
लेखमालेचे यापूर्वीचे दोन भाग इथे वाचता येतील :
आमार कोलकाता - भाग १ - http://www.misalpav.com/node/45320
आमार कोलकाता - भाग २ - http://www.misalpav.com/node/45361
आमार कोलकाता - भाग ३
हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता.
लेखमालेचा पहिला भाग येथे वाचता येईल :-
http://www.misalpav.com/node/45320
आमार कोलकाता - भाग २
प्रास्ताविक आणि मनोगत :-
राजकारणात पीए नावाची जमात म्हणजे जरा अवघड जागेचं दुखणं असतं. कारण त्यांना नेत्याच्या सगळ्या भानगडी माहीत असतात. त्याचा पैसा कुठून येतो, कधीपर्यंत टिकणार आहे ते कोणाच्या कोण सोबत त्याची सेटिंग आहे. अनेक ठिकाणी नेत्यांचा अर्धा कारभार हे पीए लोकंच निभावून नेतात. लोकसत्तेतलं दोन फुल एक हाफ किंवा महाराष्ट्र टाइम्स मधलं दिड दमडी मध्ये तंबी दुराई ने राजकारणावर केलेलं खुसखुशीत भाष्य तुम्ही कधी ना कधीतरी वाचलंच असेल, त्याच तंबी दुराई म्हणजे श्रीकांत बोजेवार यांची पावणेदोन पायांचा माणूस हि कादंबरी सुद्धा तशीच चिमटे काढणारी आहे.
शुभ्र रुपेरी हव्यात लाटा बटाबटांच्या डोक्यावरती
नकोच तेव्हा काळीकुरळी बट डोळ्यावर सळसळणारी
शेलाटीशी रेघ वक्रशी हातावरती उमटून जावी
टिचकी मारून गिरकी घेता झोका माझा खाली यावा
डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे
त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा
नाजुक साजुक पेरांवरती खोडावरचे रिंगण यावे
साल कोवळी मधुमासाची गंध फुलांचा उडून जावा
पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली
एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....
मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर
लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर
सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात
घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस....
तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे
बघू देत लोकांना देवांना साधुंना
माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून
तिच्या देहात लयदार मिसळताना.....
खरंतर कालच या आठवणींना उजाळा आलेला पण इथं लिहायचं राहून गेलं.
लहानपणी म्हणजे ४त असताना आमच्या घरी जानी गाय होती. माझ्या गावापासून ११ किमीवर बहिणीचे गाव होते. त्यांच्याकडे दुभते जनावर नसल्याने वडिलांनी त्यांना दिलेली. पण गाय इतकी खतरनाक होती की चुकून जरी सुटली तर थेट माझ्या घरी पोहोचून जायची. तीच वासरू नसताना सुद्धा. तीनचार वेळा असं झाल्यावर राहूदे म्हणून नंतर तिकडे पाठवलीच नाही.
हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी
धडधड धडधड रान पेटते......
शोक कुणाला? खंत कुणाला?
चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती
लपलप लपलप ज्वाला उठती......
शोक कुणाला?खंत कुणाला?
पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे
भडभड भडभड पाने रडती....
शोक कुणाला? खंत कुणाला?
पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे
चरचर चरचर डोळे झरती......
शोक कुणाला? खंत कुणाला?
कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते
करकर करकर शाप जीवांचे,
थरथर.... इथवर ऐकू येते.....
-शिवकन्या