भाकरी साठी शोधली चाकरी, चाकरीसाठी सोडलं गांव..
शहरात कुणी ओळखेना तरी , गावात राहायचं नाही राव..
रोजच्या साठी रोज कमवायचं, मिळेल खायला ते गोड मानायचं..
मजूर म्हणून असंच जगायचं, अन श्रीमंतीचं स्वप्न बघायचं..
थकलेलं मन रोज सांगायचं, एक दिवस मी मालक होईल..
माझ्या मालकीच्या गाडीतून माझ्या गावी परत जाईल..
तेव्हढ्यात कुठला आजार आला, धावणारा माणूस घरात कोंडला..
उद्योगधंदे बाजार बंद, अन वाहणारा रस्ता ओस पडला..
घरात खायला पुरणार किती, दुसरीकडं मागायचं किती..
आठवणीने परत गावच्या, मंद झाली होती मती..
जायला रस्ते भरपूर होते, पण साधन काही मिळणार नव्हते..
स्थलांतरित मजुरांचे हे दुःख कधी कुणा कळणार नव्हत
लेख वास्तव दर्शन घडवत आहे
लेख आवडला आणि पटला.
जबरदस्त लिहिलंय ! काय ओघ आहे
धावपळ न करणाऱ्यांना बस कशी मिळणार?
वाह !
लेखनाचा ढाचा बदलल्याने वाचणं