जीवनमान
मालवणचे देवधर: काही मौखिक आठवणींची नोंद
(नोंद: या आठवणी त्रोटक आहेत. एका संध्याकाळी दोनतीन तास चाललेल्या गप्पांवरून दुसऱ्या दिवशी जे व जितके आठवले तसे नोंदले आहे. यात जातिसंस्था, शिवाशीव वगैरे प्रथांचा उल्लेख काळानुरूप आला असला तरी त्यांचे उदात्तीकरण करण्याचा मुळीच हेतू नाही. कुणाला ते तसे उल्लेखही अनुचित वाटण्याची शक्यता आहे, त्यांची आधीच माफी मागतो)
***
पाणीबाणी
सावर्डे - नाशिक, पालघर अन् ठाणे जिल्ह्याच्या टोकावरलं आदिवासी गावं. . . पुर्णत: जंगलात. तीन डोंगरांच्या मध्ये दरीत वसलेलं. वस्ती १२५ कुटुंबांची. अजुनही बारमाही रस्ता नाही. म्हणजे आता पावसाळ्यात चार महीने गाडी घेवुन या गावात जाता येणार नाही. अशी परिस्थिती होती सन २०१८ पर्यंत. सावर्डे गाव गेल्याच वर्षी रस्त्यानं जोडलं गेलयं, ते स्वातंत्र्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी. मोखाडा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायती अंतर्गत असलेलं सावर्डे गावात पोहोचायला दरीतील घाट उतरुन जावं लागतं.
कशाला हवी ही दुकानं?
अक्षरशः १०-१५ वर्षे या वेगवेगळ्या दुकानांतून फिरून मला असे वाटते ,,ते असीम्य ,अदृश्य शक्ती असतांना ह्या दुकानांची गरज ती काय.
अगदी अडाणी ,अशिक्षित लोकांना भोंदुच्या दुकानापाशी पाहिले की आपण अस्वथ होतो.मग नकळत वडीलधारी यांच्या मानाखातर सहस्त्रनामी जप करणाऱ्यांच्या दुकानात आपणही गेलोच होतो की...किंवा जातोच की.बुरखा ओढलेला असतो मनातल्या मनात तो दिसत नाही.सरळ उठून निसर्गात जाव वाटत.बर सामान्यांना नाही उमजत तर शहरातील प्रतिष्ठीत,शिक्षित अन्नदानाचे गोंडस नाव घेऊन,देणग्या उधळत या दुकानांना चालूच ठेवतात.बर अन्नदान कोणाला तर आपल्याच जनाला ...मग वृधाश्रम ,अनाथाश्रम का नाही दिसत ?
'W' च्या पाठलागाची चित्तरकथा !!
एकदा अंगाला, (मेंदूला म्हणू या हवं तर) चिकटलेली 'मास्तरकी' जाता जात नाही याचा अनुभव आज आला.
आता काही वेळापूर्वी 'धमाल' बघत होतो आणि सिनेमा बघता बघता मला माझ्या क्षेत्रातला 'W' डोळ्यासमोर दिसायला लागला.
***
मुलगा किंवा मुलगी दहावी मस्त पर्सेंटेज मिळवून पास झाल्यावर शुभेच्छा द्यायला येणार्यांपैकी कोणीतरी ही 'W' ची फ्रेम भेट म्हणून देतो.
या 'W'चा अर्थ युपीएससी-एमपीएससी- आयआयटी-नीट-जेइइ -टोफेल जीआरइ -अशा क्रमाने जसा घ्याल तसा असतो.
पण टार्गेट 'W' नसते. टार्गेट असते 'W' च्या खाली असलेले १० कोटी!!
स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि नातीगोती
मामलेदार नावाचं गारूड
काल मामलेदार मिसळ चे जनक गेले आणि प्रकर्षाने तात्याची आठवण झाली. ज्या संकेतस्थळाचं नाव मिसळपाव आहे त्यावर मामलेदार मिसळ विषयी काही तरी लिहावे अशी अतीव इच्छा झाली.
या संकेतस्थळाचा जनक तात्या अभ्यंकर आणि मामलेदार मिसळ म्हणजे तात्याचा जीव की प्राण.
बाहेरून आलेल्या कुण्या जालमित्राला मामलेदार ला घेऊन जाणं हा तात्याचा छंदच.
काल लक्ष्मण शेठ गेले आणि सर्व प्रसारमाध्यमांनी त्याची आवर्जून दखल घेतली, खास करून व्हॉट्स ॲप वर अनेकांनी मामलेदार मिसळ वर भरभरून लिहिलं. मामलेदार मिसळ ही ठाणे शहराची एक ओळखच.
पुन्हा पानिपत!

भावातीत अवस्था - कोडींग करताना
सध्या मिपावर बरेच धागे विदेहत्व आणि भावातीत अवस्था यांची चर्चा करत आहे. लेख लिहायचे प्रयोजन म्हणजे आम्हालाही भावातीत अवस्था गाठण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे .परंतु ते बोटात बोटे घालून बसण्याइतके सोपे नाही किंवा कुठल्याही नशेत तंद्री लागण्याइतका सरळ हि नाही .
हि अवस्था गाठण्यासाठी १०-१५ वर्षांची तापशर्या आहे . संगणक विज्ञान आणि अणुविद्युत तंत्रज्ञान शिकण्यासाठी अतीव मेहनत घेतली आहे .अनेक गुरु व ग्रंथ यांचे आमच्या तपात मोलाचे योगदान आहे.
वृक्षासिनी
एमपीएसीच्या क्लासच्या बाहेरच्या आवारात तरुण मुला-मुलीचा घोळका नेहमीसारखाच. दुपारचे तीन वाजायला दहा मिनिटं होती, सतिश आणि बाकी जण तिथं कधीचेच येऊन तिथल्या घोळक्यात सामील होत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होते, बरोबर तीनच्या ठोक्याला चालू बॅच संपून यांना आत प्रवेश मिळणार होता, त्याला आता या येणा-या खेपेला काही करुन एमपीएसी पास होत सरकारी नोकरी पक्की करायची होती, अगोदरचे दोन प्रयत्न काहीश्या गुणांमुळे हुकले होते, त्यामुळे यावेळी निर्धार पक्का होता.