जीवनमान
संवाद
संवाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन जणांचं एकमेकांशी चालणारं संभाषण येतं. पण खरं तर आपला सर्वाधिक संवाद हा आपल्या स्वतःशीच सुरू असतो. आपल्या मनात येणारे विचार हाही या संवादाचाच एक भाग झाला. कधी हा संवाद विचारांच्या रूपात असतो, कधी भावनेच्या, पण तो बहुतेक सारा वेळ सुरूच असतो खरा!
अथ स्त्रीलीळा ।
माझी एक मैत्रीण आहे. टू बेडरुममधे राहते. तिला एक नवरा(सुदैवानं एकच असतो.अधिक लफडी करण्याचे गटस् बहुतेक स्त्रियांमधे नसतात.) आणि दोन मुलगे आहेत. (दोन दोन मुलगे म्हणजे तिचा "स्त्रीजन्म धन्य" झालेला आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात तिचा नवरा बेडरुममध्ये बसून लॅपटॉप जोडून वर्क फ्रॉम होम करत असतो. त्याला कॉनकॉल्स असतात. त्याला डिस्टरबन्स चालत नाही. एक मुलगा सेकंड बेडरुममधे आणि एक मुलगा हॉलमधे झूम वगैरेवर ऑन लाईन शिकत असतात. त्यांनाही शांतता लागते. डिस्टरबन्स चालत नाही. मग मैत्रीणीने बसायचं कुठे? तर स्वयंपाकघरात. गुपचूप. घरात टीव्ही लावायचा नाही. गाणी लावायची नाहीत.
नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?
गेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर(?) ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिवसांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती.
लॉकडाउनमधील रनिंगचा अनुभव
सर्वांना नमस्कार!
रंगराज्य -३ सौ शहरी, एक संगमनेरी
मागिल एका लेखावर मित्राची प्रतिक्रिया होती "संगमनेर च्या मातीचा हा गुणच म्हणावा की काय जणू एखाद्या साहित्यिकाने त्याच्या शब्द संपदेच्या रक्ताने ही भूमी जणू काही हजारो वेळा शिंपडून तृप्त केली असावी त्यामुळेच तर तिथल्या गल्लीबोळात बालपण जगलेल्या तुमच्या सारख्या मित्रांकडून अशी काही साहित्यिक मेजवानी अनुभवावयास मिळते की....लाजवाबच....खूप सुंदर..."
मुक्काम पोस्ट कॉरन्टाईन सेंटर
******
जसं रामाने रावणाला मारलं, ओबामाने ओसामाला मारलं, अगदी तसचं कोरानाला जर एकूण समाजाने मारायचं म्हणजे संपवायचं असेल तर मग ‘कॉरन्टाईन’ होणं हाच जालीम उपाय, करोनापूर्वी ‘कॉरन्टाईन’ या शब्दाचा तसा काही परिचय नव्हता पण आता हा जीभेवर रेंगाळला, ते शुदध मराठीत ‘विलगीकरण’ बोलायला मजा नाही येत… ते जीभेवरुन विरघळल्यासारखं वाटतं….
******
करोना व्हायरस - अंताची सुरवात?
२०व्या शतकाच्या उत्तरार्धात जग खुप जवळ आले. परदेश प्रवास नित्याची बाब झाली. वेगवेगळ्या देशातील लोक दुसर्या देशात सहजपणे स्थायीक होउ लागले. मेल्टिंग पॉट चा कॉन्सेप्ट काही शहरापुरता मर्यादीत न रहाता जगभर पसरला. अत्यंत जोमाने आर्थिक भरभराट होउ लागली. २१व्या शतकाच्या सुरवातीला नवनवीन गॅजेट्स स्वस्तात उपलब्ध झाली. व्हॉट्सअॅपने STD / ISD कॉल्स ईतिहासजमा केले. पण त्याचबरोबर नैसर्गीक साधनसंपत्ती प्रचंड महागली. अवघ्या काही वर्षांतच सोने, जमीन ईत्यादी १० तो १५ पट महागले. लोकांचे आयुष्यमान खुप वाढले. पुढारलेल्या देशात लोक सहजपणे ९० - १०० वर्षे जगु लागली.
बट्ट्याबोळ-१
लॉकडाऊनचा बट्ट्याबोळ
जगभरात लॉकडाऊन हा वाढणाऱ्या पेशंटच्या संख्येच्या तयारीसाठी वापरला जात असताना आपल्या देशात मात्र हाच एकमेव रामबाण उपाय म्हणून वापरला गेला. कोणतेही प्लॅनिंग ना करता जाहीर केलेला लॉकडाऊन 1,2,3 असा मनमानेल तसा वाढवत नेला. त्यादरम्यान गरीब लोकांना अन्न पुरवण्याची , आपापल्या घरी पोचवण्याची कोणतीही सप्लाय चेन तयार केली नाही, 8 वाजता यायचा , राणा भीमदेवी थाटात घोषणा करायच्या आणि लोकांना त्यांच्या नशीबावर सोडून द्यायचे, बाकी कोणाचाही विरोध मोडायला मीडिया आणि सोशल आर्मी तयार असतेच.
शेजारील काकी
शेजारील काकी, सगळ्या दुनियेसाठी कशाही असो, पण माझ्या घरातील सगळ्यांना त्या नेहमी वात्सल्य मायेने बघतात. आमची कधी काही तू तू मै मै होते पण त्यात, त्याचे आमच्या वरील वात्सल्य प्रेम कधी कमी झाले नाही.