अश्वत्थामा
था॑ब, आलोच
आतले कढ आवरून सावरून
ठसठसणार॑ मेमरी कार्ड फॉरमॅट करून
शहाणा मुखवटा चपखल बसवून
आलोच.
येतो- झाकून तू दिलेल्या भळभळत्या जखमा
येतो- क्षणभर विसरून की मी चिर॑जीव अश्वत्थामा
था॑ब, आलोच
आतले कढ आवरून सावरून
ठसठसणार॑ मेमरी कार्ड फॉरमॅट करून
शहाणा मुखवटा चपखल बसवून
आलोच.
येतो- झाकून तू दिलेल्या भळभळत्या जखमा
येतो- क्षणभर विसरून की मी चिर॑जीव अश्वत्थामा
उकलत मनाची पाकळी
सांज हळवी होते; कधीतरी.....
भिजवून पापणी ओली
रात्र हळवी होते; कधीतरी.....
चुकवून पाहारे सारे
नजरा-नजर होते; कधीतरी.....
मोडून मनाची दारे,
तिची आठवण
उच ...!
येते;
ऊ...च...!!ऊ...च...!!!
(इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?)
कधीतरी.....
-मुकुंद
निराकार, निर्विकार, अनासक्त आणि एकूणच सांगायचं झाल तर अनामिक असा मी एक नदीपात्रातील गोटा. तसा मुळात मी घाटी पण सह्याद्री, मंद्राद्री, निलगिरी नि सातपुडा वगैरे कौतुक आमच्या नशिबात अपवादानेच सापडतील. महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असणाऱ्या मराठवाड्याच्या मध्यबिंदूशी माझी मुळ अजून घट्ट रुजलेली आहेत. माझ्या नाळेशी जोडून असणारा विशाल पाषाण समूह पहिला कि मला मी सर्व व्यापी वगैरे असल्याचा भास होत असे पण, माझ्या मुळ पाषाणाने मला स्वप्नांच्या मागे जाण्याच पाठबळ जरा जबरदस्तीनेच दिल आणि मी या प्रवाहात पडलो.
अजून एक काव्यकथा घेऊन आलोय,
अजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय.
वेदना जुनीच...,
पावसामुळे पुन्हा फुललेली,
कॉफीच्या वादळासह,
पुन्हा मनात सललेली.
अंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा,
उंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा |
गारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती,
जुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती ||
म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....
मी सध्या काय करतो ?
नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ह्या विश्वात म्हणे दोन हजार अब्ज आकाशगंगा आहेत. तर या अब्जावधी आकाशगंगांमधल्या अब्जावधी ग्रहांपैकी एका ग्रहावरच्या अब्जावधी लोकांपैकी मी एक !
ती एक वेडी
जुन्या आठवणींचा कोष
मनाच्या कोपऱ्यात ठेवणारी
एक दिवस तिच्याही नकळत
हा कोष जाणिवेत आला
बघता बघता त्यातनं
एक सुंदर फुलपाखरू निघालं
तिच्या तळहातावर अलगद बसलं
अगदी विश्वासानं
ती कुतूहलाने त्याच्याकडे पाहत राहिली
त्याची ओळख पटवू पाहू लागली
हळूच त्याने पंख मिचकावले
तिला वाटलं
ते काहीतरी बोलतंय मिश्कीलपणे
ओळख पटली
ती हसली
तिच्या कल्पनेपेक्षाही ते आकर्षक निघालं
त्याच्या रूपानं हरखून गेली
जुन्या आठवणीत हरवून गेली
एकटेपणी त्याच्याच विचारात डुंबून गेली
शेवटचा गाव मागे टाकून खूप वेळ झाला होता. चालून चालून त्यांच्या पायात गोळे आले होते. थोडाच वेळ आधी बर्फ पडून गेला होता. हवेतला गारवा वाढंतंच चालला होता. आणि अचानक धीरगंभीर आवाजात कोसळणारा जलप्रपात समोर आला. मंत्र टाकल्यासारखे सगळे एकाच जागी खिळून राहिले. तशी जायला दोन दगडांची वाट होती. पण एखादी उडी मारायला लागली असती. पण त्यांच्या काकडलेल्या शरीराला ती उडी सहन झाली नसती. इथून पुढे जाणं शक्य नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. द्रौपदी तर मटकन खालीच बसली. मग भीमानेच एक बऱ्यापैकी मोठा दगड त्या दोन दगडांवर रचला आणि त्या कामचलावू दगडावरून त्यांनी तो धबधबा पार केला.
अव्यक्त भावना ही, शब्दांविनाच बोले,
अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..
डोळ्यांमधून स्वप्ने, आरास आज झाली..
स्वप्ने तुझीच मजला, माझ्यामध्ये मिळाली ..
ओठी फुलून आले, माझे अबोल गाणे..
अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..
कित्येक चांदण्यांचे नक्षत्र आज झाली ..
रात्रीस स्वप्न पडूनी, उषा तिथे मिळाली
जणू शिंपल्यात मजला मोती नवे मिळाले ..
अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..
डोळयात आसवांची दाटी घडून आली
कृत-अर्थ जीवनाची, त्रिज्या मिटून गेली ..
मृत्यूस अमृताचे, वरदान जे मिळाले ..
अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..
मै कोन हूँ ?
साधं सरळ आयुष्य असतं आमचं. दहावी-बारावीच्या मार्कांवर आमची लायकी ठरते अन कॉलेज सुरु होतं. ते आटपून कुठेतरी नोकरीला लागायचं. मग लग्न, पोरंबाळं,संसार वगैरे वगैरे. आमच्यासारख्या शंभरातल्या ऐंशीजणांची हीच कथा. उरलेले काहीजण कॉलेजमध्ये प्रेम वगैरे करतात, परदेशात वगैरे शिकायला जातात.शेवटी एका पातळीनंतर सगळ्यांची कथा आणि व्यथा सारखीच ! कोणी पुण्यात रडतो तर कोणी क्यालिफोर्नीयात एवढाच काय तो फरक!