प्रश्नत्रयी
कृष्ण-विवराच्या
गर्भीच्या कल्लोळा
वेध का लागती
दिक्काल-मुक्तीचे ?
स्थूलास व्यापून
सूक्ष्मात सांडता
कैवल्य ओलांडी
उंबरे कशाचे ?
तुझ्या नि माझ्या
निर्लेप नात्याला
पाश हे कशाला
जीवन मृत्यूचे ?
कृष्ण-विवराच्या
गर्भीच्या कल्लोळा
वेध का लागती
दिक्काल-मुक्तीचे ?
स्थूलास व्यापून
सूक्ष्मात सांडता
कैवल्य ओलांडी
उंबरे कशाचे ?
तुझ्या नि माझ्या
निर्लेप नात्याला
पाश हे कशाला
जीवन मृत्यूचे ?
भरली होती एकदा 'Social Networking' ची सभा
Twitter होता मध्यस्थानी, Facebook सोबत उभा..
चढ़ाओढ़ होती लागली, कोण Social Networking चा राजा
Google Plus आणि Ibibo करत होते प्रसिद्धीसाठी गाजा - वाजा..
Orkut म्हणाले Facebook ला , तुझ्यामुळे गेली माझी खुर्ची
Facebook च्या आगमनाने Orkut ला भलतीच लागली होती मिरची..
Linked IN म्हणाले आहे मी 'Professional', मलाच करा 'King'
सगळे म्हणाले, "Timepass" की बात करो तो "LINKED IN is Nothing " ..
Whatsapp म्हणाले गर्वाने, करतात मला सगळे Like
काय माहित,देव जाणे, रूसून कोपऱ्यात का बसले Hike..
सध्या निवडणुकांमुळे वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांचे उत्पन्नाचे आकडे वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळत आहेत. त्यात देखील जे आधी पासूनच मान्यवर (?) आहेत त्यांच्या संपत्तीमध्ये गेल्या कार्यकाळात झालेली वाढ हि विशेषत्वाने नोंद घेण्यासारखी आहे. केवळ पाच वर्षातील हि प्रचंड वाढ बघता हि सगळी मंडळी कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊन वेगाने संपत्तीकडे झेपावत आहेत असे दिसून येते.
वृत्तबद्ध लिहिताना
माझी एक गोची होते
यमक जुळवू जावे तर
अलगद काही निसटून जाते
माझी कविता "जुळत" नाही
टोटलच बघा लागत नाही
(अन जुळलीच बेटी चुकून तर..)
कमावलेली कृत्रिमता
हट्टीपणे हटत नाही
कवितेचे झटपट वर्ग
कुठे कोणी घेतं का?
असल्यास जरा सांगा मला
प्रतिभा विकत मिळते का?
(एक कोडं सुटत नाही ...)
भावना इतक्या तरल कशा?
शब्द इतके रुक्ष कसे ?
मग त्याची कविता वाचता वाचता
डोळ्यात पाणी येतेच कसे?
त्या आतल्या द्युतीला
उमजू कसे? न कळते
-जी सर्वव्यापी ऐसे
स्थलकाल भरुनी उरते
चक्षूस ना दिसे ती
पाळी न नियम कोते
क्षणमात्र लुप्त होते
क्षणि झगमगून उठते
ही तीच का मिती, जी-
-स्पर्शात रंग भरते
-ध्वनितून नव-रसांना
-उधळीत गंध होते
माझ्या घरात कौलारू छपरातून एक तिरीप यायची. जमिनीवर निट वर्तुळ काढणारी. आणि तिच्यात असंख्य रंगीबेरंगी पऱ्या रहायाच्या. घराला माळा होता. त्यावर जुनी पुस्तकं , नारळ , भांडी, ट्रंका असं काहिही शोधताना खजिन्याचा मालक असल्या सारखं वाटायचं . लपाछपी च्या खेळात सतत जिंकवण्या साठी असंख्य जागा अपोआप तयार व्हायच्या . फटाक्यांची पिशवी अडकवायला फक्त ताई चाच हात पोचेल असा मोठा खिळा होता . चौकात आंधळी कोशिंबीर कितीही मुलं खेळू शकतील एवढी जागा होती. पडवी वरच्या सोप्या सारखा सुबक सोपा मी कुठेही बघितला नाही आणि पडवी वरच्या रांगोळी सारखी रांगोळी कधीही कुठेच सजली नाही .
तुझ्या अंतरीची, मला जाण आहे;
जरी गीत माझे, तुला ताण आहे.
जरी ना निथळली, कधी कांत माझी;
तुझे पावसाळे, मला रोष आहे.
..............................................मुकुंद
जोवर ना ती तेज दुधारी
कट्यार दु:ख्खाची मज चिरते
तोवर माझे शोकगीतही
शब्दच केवळ, काव्य नव्हे ते
जोवर ना ती रिमझिमणारी
श्रावण सर मज चिंब भिजविते
तोवर माझे पाऊसगाणे
शब्दच केवळ, काव्य नव्हे ते
जोवर ना मज दुमदुमणारी
हाक अनाहत ऐकू येते
तोवर रचिले सूक्त जरी मी
शब्दच केवळ, काव्य नव्हे ते
प्रतिभेचे लखलखते लेणे
जोवर या झोळीत न येते
तोवर स्फुरला मंत्र जरी मज
शब्दच केवळ, काव्य नव्हे ते
भेळ पुराण ...
रंग मनाचा,रंग क्षणाचा,
क्षणाक्षणाला विरघळणारा.
क्षणात हसरा,क्षणात हळवा,
डाव्या गाली ओघळणारा.
पुसता अश्रू आवेगाने,
रंग काजळी विस्कटणारा.
अंमळ उसासे स्फुंदत असता,
रंग बोचरा गहिवरणारा.
मित्रांची ती चौकट जमता,
रंग खुशीचा खळखळणारा.
कातरवेळी काहुरणारा,
पिंग गुलाबी रंग बावरा.