समीक्षा
अतिरंजित Sarcasm उर्फ Asterix: The Mansions of the Gods
माझ्या लहानपणी, म्हणजे तसा मी लहानच आहे अजून आणि तस ही मी २५ वर्षांनंतर वय मोजणं सोडून दिल, कारण देव साहेब म्हणून गेले आहेत कि “ Age is just a number.” तर माझ्या लहानपणी जेव्हा आपल्याकडे उपग्रह वाहिन्याचं नुकताच आगमन झाल होत तेव्हा स्टार वाहिनीच स्टार मुव्हीज चानल नवीनच बाजारात आल तेव्हाची ही गोष्ट. स्टार मुव्हीज त्या काळातली माझ्या माहिती प्रमाणे भारतातील पहिली स-शुल्क वाहिनी होती. त्या वेळी तिथल्या सिनेमांना हिंदी सबटायटल्स असायची. तसेच त्या काळातले रात्री उशिरा लागणारे १८+ हा एक रम्य विषय आहे.
पुस्तक परिचय - वडीलधारी माणसे - लेखिका शांताबाई शेळके
शांताबाईंच पुस्तक म्हणून सहजच दुकानात दिसलं आणि घेतलं हे पुस्तक. आज चवथ्या किंवा पाचव्यांदा वाचतेय. नावावरून कळलं असेलच कि यात व्यक्तिचित्र वाचायला मिळतील. शांताबाईंच्या कविता मला खूप आवडतात. पण त्यांचं गद्य लेखन मी फारसं वाचलेलं नाही. त्यामुळे हे पुस्तक दिसल्यावर मी लगेच घेतलं. आणि अगदी डोळे मिटून विश्वास ठेवावा आणि तो सार्थ ठरावा असं या पुस्तकाबाबत झालं. सहज सध्या सोप्या भाषेत त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या काही व्यक्तींबाबत यात लिहिले आहे. कुठे बोजड शब्दांचा वापर नाही, कुठे अतिरेकी कौतुक केले नाही.
आठवणींचा पाऊस: रसग्रहण
सततचा पाऊस मनावर मळभ साचवतो. मनातील आठव वर येऊ लागतात. एकटेपण असेल एक उदाससवाणी छाया भर पावसात आपल्या आजूबाजूला तयार होते. ना कसले काम करवत ना काही घडते. आपले कुणी जवळ नसल्याची खंत अधीकच जाणवते.
रात्रभर पडणारा पाऊस अशा वेळी झोप घेऊ देत नाही. सतत आठवणींचे उमाळे फुटत असतात. उत्तररात्री कधीतरी डोळ्याला डोळा लागतो.
अशा वेळी कवी म्हणतो:
रात्रभर पडणारा पाऊस
सकाळी नकोसा होतो
कितीही हलका का असेना
जेव्हा सतत बरसतो
पंचायत - २
टीप : पंचायत सीजन १ पहिला नसल्यास पुढे वाचू नये. सीजन दोन चे रसभंग इथे नाही दिले आहेत. त्यामुळे तो पहिला नसल्यास सुद्धा तुम्ही वाचू शकता.
गावच्या गजाली म्हणून मी एक लेखमाला इथे लिहिली होती. ग्रामीण भागांतील सर्वसाधारण जीवन आणि त्यातील सध्या सध्या गोष्टींतील मनोरंजन हि त्याची पार्शवभूमी होती. ऍमेझॉन च्या पंचायत ह्या सिरीज चे कथानक सुद्धा तेच आहे. त्यामुळे मला ती आवडणे अतिशय अपेक्षित होते. पण सर्वानाच हि सिरीज अत्यंत आवडली आहे.
हे पाहा: माय ऑक्टोपस टीचर
कटाक्ष-
नेटफ्लिक्स माहितीपट
वेळ - ८५ मिनिटे
भाषा- इंग्रजी
ओळख-
‘पंजाब मेल’
मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज (ट)’ आणि पंजाबमधील फिरोजपूर कँट यादरम्यान धावणारी ‘पंजाब मेल’ गेल्या 1 जूनला 110 वर्षांची झाली आहे. मुंबईहून ‘पंजाब मेल’ सुरू झाली त्या दिवसाची नक्की तारीख माहीत नाही. पण रेल्वेने ती तारीख 1 जून 1912 असेल असे गृहीत धरले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटनमधून भारतात आलेले अधिकारी आणि अन्य युरोपियन प्रवाशांसाठी ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी ती गाडी तत्कालीन ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते अखंड भारताच्या वायव्य सीमांत प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरपर्यंत धावत होती.
भोंगा - मराठी चित्रपट
गेले काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि देशातही गाजत असलेल्या मशिदीवरील भोंगा या विषयाच्या निमित्ताने "भोंगा" या चित्रपटाचा अल्पपरिचय.
काही महिन्यांपुर्वी झी ५ अॅपवर मी हा चित्रपट पाहिला. शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे असे विकीवरुन समजते.
चित्रपटाची कथा मशिदीवरील भोंगा, भोंग्यावरुन दिली जाणारी अजान या विषयाभोवती गुंफलेली आहे.
50 वर्षांची चिरतरुण ‘राजधानी’
मुंबईहून दिल्लीला रेल्वेने जाण्या-येण्यासाठी आजही पहिली पसंती असलेली 12951/52 राजधानी एक्सप्रेस येत्या 17 मेला 50 वर्षांची होत आहे. आज ही रेल्वेगाडी हायटेक झाली असली तरी तिच्यात येत्या काळात अजूनही सुधारणा होत जाणार आहेत.
पुस्तक परिचय: "ही वाट एकटीची" -- व. पु. काळे
ही वाट एकटीची ही वपु काळे यांची अगदी पहिलीच कादंबरी. या कादंबरीची नायिका आहे विद्युलता उर्फ बाबी. बाबी एक स्वातंत्र्य विचारांची तेजस्वी, निर्भीड व करारी मुलगी आहे. ती तत्वनिष्ठ आहे, हट्टी आहे. ती कुणालाही न घाबरता स्वतःचे विचार परखडपणे मांडते.