धर्म

धर्मांतरे का होतात ?

सचीन's picture
सचीन in काथ्याकूट
25 Dec 2013 - 1:42 pm

जगाच्या इतिहासात अनेक धर्मांतरे घडली आपल्या भारत भूमीत हि अनेक धर्मांतरे घडली ह्याचे काय कारण असावे?

लोक धर्मांतर का करत असावेत?
माणूस हा आपल्या धर्मावर प्रेम करतो.त्याचा आदर करतो. धर्माने दिलेल्या रिती परंपरा, पाळतो आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे नि दुसर्याचा धर्म कसा टाकावू आहे ह्याबद्दल घसा सुकेपर्यंत चर्चा करतो वाद विवाद करतो प्रसंगी गुद्दागुद्दी हि करतो तरीही धर्मांतरे का होतात?.

गायत्री मंत्राचा सोपा अर्थ

अमित खोजे's picture
अमित खोजे in काथ्याकूट
24 Dec 2013 - 1:49 am

बायकोच्या घरी चहा प्यायला म्हणून गेलो. चहा पीत असताना मेहुण्यांनी मध्येच एक बॉम्ब टाकला.
"गायत्री मंत्राचा अर्थ माहिती आहे का?"

चहा सगळा नाकातोंडातून बाहेर, एवढा जोराचा ठसका लागला. मनात म्हटले चहा पिताना गायत्री मंत्र नदीवरच्या भटाने देखील म्हटला नसेल तर यांना कुठून आठवण आली? नवीनच लग्न झालेले. त्यामुळे बायकोच्या घरी आपली इज्जत जायला नको म्हणून म्हटले पहिले मंत्र तरी आठवतोय का? लगेच मनातल्या मनात त्या मंत्राची उजळणी करून बघीतली.

मूर्तीपूजा

राही's picture
राही in काथ्याकूट
22 Dec 2013 - 12:06 pm

सगुणोपासकांच्या श्रद्धा आणि भक्तीप्रती पूर्ण आदर आहे. कुठेही निंदानालस्ती अथवा टिंगलटवाळी करण्याचा हेतू नाही असे सांगून आता एका प्रश्नाकडे वळावेसे वाटते. कृपया विचार व्हावा, युद्ध नको (अशी अपेक्षा).

दिव्यास्त्रांची मर्यादा आणि अंधश्रद्धा निर्मूलन

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
12 Dec 2013 - 11:31 am

रामायणात एक सुन्दर गोष्ट आहे.
विश्वामित्रांनी दशरथाकडून राम-लक्ष्मणांना राक्षसांच्या वधासाठी मागून नेले, तेव्हा त्यांना वनात प्रथम बला-अतिबला या दोन विद्या शिकवल्या. त्यानंतर जेव्हा त्यांना दिव्यास्त्रे देण्याची वेळ आली तेव्हा काही अस्त्रे विश्वामित्रांनी दोघांना दिली आणि त्यानंतर ते म्हणाले,
यानंतर काही अस्त्रे मी फक्त रामालाच देणार आहे. कारण त्यांचा वापर करण्यासाठी लागणारा संयम फक्त त्याच्याकडेच आहे.
महाभारतातही अशीच काहीतरी गोष्ट आहे.अर्जुन आणि अश्वत्थाम्याची.

हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन

उद्दाम's picture
उद्दाम in काथ्याकूट
6 Dec 2013 - 12:43 pm

हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन

हिंदु धर्मात दहन केले जाते. पण एक माणूस जाळायला लाकूड फार लागते. विजेवरची दहन सोय सगळीकडे उपलब्ध नसते.

त्यामुळे हिंदु लोकानाही दफनाची सोय करता येईल काय? ( सध्या लिंगायत समाजात अशी पद्धत आहे. ) दफनाला लाकूड लागत नाही. शिवाय ठराविक काळ ८-१० वर्षे वगैरे गेला की त्याच जागेत पुन्हा पुन्हा दफन होऊ शकते.

खरा काँग्रेसभक्त

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
23 Nov 2013 - 12:44 pm

कुमार केतकरांचा अवतार छ.गडमधे जन्माला आला की काय अशी शंका यावी असा हा एक अस्सल काँग्रेसप्रेमी भारतीय!

http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-OTS-chhatisgarhs-rajeshwarao...

राजेशराव पवार नामक छत्तीसगडमधील कुणी विभूती महाराणी सोनिया, युवराज राहुल, युवराज्ञी प्रियांका यांची रोज साग्रसंगीत पूजा करतात. आपले जाणते पवार ह्यातून काही स्फूर्ती घेतील काय ?

खाद्यसंस्कृती पुणेकरांची

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
18 Nov 2013 - 12:10 am

"ऐ कंबख्त तुने पेयिच नै " असे वारंवार ऐकवणार्‍या एका मित्राच्या खास आग्रहास्तव एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. लस्सी. लस्सी पिउन आलो. उगा भलते संशय नकोत. ऑस्कर वाइल्ड (हा गे होता) एकदा फ्रान्समधल्या एका प्रसिद्ध कुंटणखान्यातुन तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडला होता. बरोबर आहे गाढवाला गुळाची चव काय तशी "आदमी हु आदमी से प्यार करता हु" म्हटल्यावर मग बाई ती फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध वेश्यागृहातली असली तरी काय फरक पडतो. आमचेही तसेच झाले. म्हणजे कुंटणखान्यातुन बाहेर पडुन नाही. लस्सीगृहातुन बाहेर पडुन. तोंड कडु झाले.

संस्कृतीकलाधर्मपाकक्रियाइतिहाससमाजऔषधोपचारशिक्षणमौजमजासद्भावनाआस्वादलेखअनुभवमतवादविरंगुळा

भारतरत्न ,सचिन आणी ध्यांनचंद ?

बाबा पाटील's picture
बाबा पाटील in काथ्याकूट
16 Nov 2013 - 7:20 pm

सचिनला या क्षणी भारतरत्न मिळाले ही अतिशय आनंदाची आणी अभिमानाची गोष्ट झाली फक्त भारतसरकार मेजर ध्यानसिंग यांना विसरले याचेच वाईट वाटते . भारतीय क्रिडाविश्वावर या दोघांचे अगणित उपकार आहेत त्यामुळे …?

नवे व्यवसाय

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
14 Nov 2013 - 10:04 am

शेठ वालचंद हिराचंद ह्यांच्या वडिलोपार्जित बिडी व्यवसायातून, ते वडिलांशी भांडून, निर्धाराने बाहेर पडले आणि साखर उद्योगाची पायाभरणी केली. का? तर समाजविघातक व्यवसायांनी स्वतःचे पोट भरणे त्यांना मंजूर नव्हते. साखरेचा व्यवसाय, त्याकाळी त्यांना समाजोद्धारक वाटला होता. आज; साखर, मीठ, तेल, तूप इत्यादी संहत पदार्थांचा आरोग्यरक्षणातील अपूर्व अडथळा पाहता; साखर व्यवसाय समाजास कितपत हितकर आहे, ह्याविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.

संस्कृतीधर्मसमाजजीवनमानराहणीप्रकटनलेखअनुभव

मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
9 Nov 2013 - 1:35 pm

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

संस्कृतीकलाधर्मइतिहाससमीक्षा