धर्म

शिव: मूर्तीशास्त्र

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
19 Jan 2014 - 6:04 pm

भारतात जे दैवत सर्वाधिक पुजले जाते ते म्हणजे शिव. शिव हा दोन्ही प्रकारे पुजला जातो. लिंग स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात.

लिंग पूजा ही पार सिंधू संस्कृतीपासून पाहण्यात येते. अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची. निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या चमत्काराचे प्रतिक म्हणून स्त्रीशक्तीची उपासना योनीपूजेच्या स्वरूपात तर पुरुष शक्तीची उपासना लिंग स्वरूपात करण्यास प्रारंभ झाला असे म्हणता यावे. पुढे वैदिक आर्यांनी ह्या दोन्ही पूजांना आपल्यात सामावून घेत शिव व शक्ती यांच्या उपासनेच्या प्रथा रूढ केल्या.

कलाधर्मइतिहासकथाछायाचित्रणमाहितीसंदर्भ

काकस्पर्ष

दिवटा कारटा's picture
दिवटा कारटा in काथ्याकूट
18 Jan 2014 - 7:28 am

आज एक सिनेमा पाहिला इन्विजिबल या नावाचा. आत्मा मरणासन्न अवस्थेतलं शरीर शोधतो अशी साधारण कथा असलेला चित्रपट. आयएमडीबीवर रीव्हिव्यू वाचताना ट्रिवियामध्ये एक गोष्ट वाचली.

"The shirt that Nick is wearing at the end of the movie bears a crow on the chest. In some Native American legends (and the graphic novel by James O'Barr bearing the name) the crow could carry a person's soul back from the land of the dead."

(http://www.imdb.com/title/tt0435670/trivia?ref_=tt_trv_trv)

मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या ताब्यात द्यावे का?

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture
टॉपगिअर्ड फिलोसॉफर in काथ्याकूट
16 Jan 2014 - 3:24 pm

आजच्या वर्तमानपत्रामध्ये पंढरपुर मंदीराचे व्यवस्थापन हे राज्य सरकारच्याच ताब्यात राहील असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने अधिनियम करुन १९८५ साली मंदीर व्यवस्थापन ताब्यात घेतले होते. त्याला बडवे व उत्पात या पुजारीं लोकांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
http://divyamarathi.bhaskar.com/article-ht/MAH-WMAH-pandharpur-temple-ma...

विवेकसिंधु, मुकुंदराज, आणि राजा जैतपाळाचे तळे

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
13 Jan 2014 - 10:25 pm

विवेकसिंधु हा कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला ग्रंथ मराठी भाषेतील आद्य काव्यग्रंथ समजला जातो.विवेकसिंधु ग्रंथाबद्दलच्या मराठी विकिपीडियाव्रील लेख अद्ययावत करताना विवेकसिंधूचे लेखन अंबेजोगाई, आंभोरा, फलटण,पैकी नेमके कुठे झाले हि चर्चा सध्या पुढे आली आहे. मराठी विकिपीडियाचे एक जाणते सदस्य त्या बद्दल सध्या चर्चा:विवेकसिंधु येथे विवीध संदर्भ उधृत करत आहेत.

गॉड पार्टीकल्स, समर्थ रामदास आणि गुगल ग्लास

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
12 Jan 2014 - 7:04 pm

दृश्य १:
कुठे आहे तुझा तो देव/जगदीश्वर? जर तो सर्वत्र आहे तर मला ह्या खांबात का दिसत नाही? असे म्हणत ज्यावेळेला हिरण्यकश्यपुने(भक्त प्रल्हाद च्या वडिलांनी) खांबावर गदेने वार केला व खरोखर त्यातून भगवान "नृसिंह अवतारात" प्रगट झाले. पुढे काय झाले ते सर्वश्रुत आहेच. संदर्भ :श्रीमद भागवत कथा

काय भक्त प्रल्हाद एक शास्त्रज्ञ होता गॉड पार्टीकल्स शोधणारा? कि हिरण्यकश्यपु?
ही निव्वळ साहित्यकथा समजायची कि काही गूढ लपले आहे त्यात?
"नृसिंहपुराण" यात काही मुलतत्वे सापडतील का?

धर्मांतरे का होतात ?

सचीन's picture
सचीन in काथ्याकूट
25 Dec 2013 - 1:42 pm

जगाच्या इतिहासात अनेक धर्मांतरे घडली आपल्या भारत भूमीत हि अनेक धर्मांतरे घडली ह्याचे काय कारण असावे?

लोक धर्मांतर का करत असावेत?
माणूस हा आपल्या धर्मावर प्रेम करतो.त्याचा आदर करतो. धर्माने दिलेल्या रिती परंपरा, पाळतो आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे नि दुसर्याचा धर्म कसा टाकावू आहे ह्याबद्दल घसा सुकेपर्यंत चर्चा करतो वाद विवाद करतो प्रसंगी गुद्दागुद्दी हि करतो तरीही धर्मांतरे का होतात?.

गायत्री मंत्राचा सोपा अर्थ

अमित खोजे's picture
अमित खोजे in काथ्याकूट
24 Dec 2013 - 1:49 am

बायकोच्या घरी चहा प्यायला म्हणून गेलो. चहा पीत असताना मेहुण्यांनी मध्येच एक बॉम्ब टाकला.
"गायत्री मंत्राचा अर्थ माहिती आहे का?"

चहा सगळा नाकातोंडातून बाहेर, एवढा जोराचा ठसका लागला. मनात म्हटले चहा पिताना गायत्री मंत्र नदीवरच्या भटाने देखील म्हटला नसेल तर यांना कुठून आठवण आली? नवीनच लग्न झालेले. त्यामुळे बायकोच्या घरी आपली इज्जत जायला नको म्हणून म्हटले पहिले मंत्र तरी आठवतोय का? लगेच मनातल्या मनात त्या मंत्राची उजळणी करून बघीतली.

मूर्तीपूजा

राही's picture
राही in काथ्याकूट
22 Dec 2013 - 12:06 pm

सगुणोपासकांच्या श्रद्धा आणि भक्तीप्रती पूर्ण आदर आहे. कुठेही निंदानालस्ती अथवा टिंगलटवाळी करण्याचा हेतू नाही असे सांगून आता एका प्रश्नाकडे वळावेसे वाटते. कृपया विचार व्हावा, युद्ध नको (अशी अपेक्षा).

दिव्यास्त्रांची मर्यादा आणि अंधश्रद्धा निर्मूलन

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
12 Dec 2013 - 11:31 am

रामायणात एक सुन्दर गोष्ट आहे.
विश्वामित्रांनी दशरथाकडून राम-लक्ष्मणांना राक्षसांच्या वधासाठी मागून नेले, तेव्हा त्यांना वनात प्रथम बला-अतिबला या दोन विद्या शिकवल्या. त्यानंतर जेव्हा त्यांना दिव्यास्त्रे देण्याची वेळ आली तेव्हा काही अस्त्रे विश्वामित्रांनी दोघांना दिली आणि त्यानंतर ते म्हणाले,
यानंतर काही अस्त्रे मी फक्त रामालाच देणार आहे. कारण त्यांचा वापर करण्यासाठी लागणारा संयम फक्त त्याच्याकडेच आहे.
महाभारतातही अशीच काहीतरी गोष्ट आहे.अर्जुन आणि अश्वत्थाम्याची.