नको ना रे
नको रे नको
नको म्हटलं ना
नको
नक्को ना. नको.
अं हं
न
नको
न न
नको
नक्को ना रे
नको
नको रे नको
नको म्हटलं ना
नको
नक्को ना. नको.
अं हं
न
नको
न न
नको
नक्को ना रे
नको
दसरा आणि दिवाळी
दोन सणांच्या मागोमाग
बहुदा केव्हातरी ती गेली
नक्की कधी ते माहीत नाही
पण लक्ष्मीपूजनाला दुपारी
हटकून तिची सय येते....
सूर्य अस्ताला जाईपावेतो
सबंध घरभर दाटून राहते
स्वतःपेक्षा अनेकपट वजन
वाहून नेणाऱ्या मुंगीसारखं
स्वतःला खेचून बाहेर आणताना
पापण्यांमध्ये आपसूक ओल येते
नकळतपणे पाझरणारे डोळे
संध्याकाळी रोषणाईच्या तेजाने
"दिपले" म्हणून इतरांपासून
लपवण मग तसं सोपंच जातं...
अंतर !
आज तो परत तेच म्हणाला,
"तुझ्या आणि माझ्या विचारांमध्ये
बरंच अंतर आहे "
.
.
.
.
.
.
.
" हो , कदाचित ....
समजून घेणे ,
आणि
सहन करणे ,
यामधे जितकं अंतर .....मोजून तितकंच !"
डोळ्यांतल्या नीरओळीमध्ये मावेल
....एव्हढंच ती उत्तरली !
..................नेहमीसारखंच !
------------फिझा
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना
माहितीची पाटी नसलेले झाड पाहून
साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले
हे झाड कोणते?
त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला
उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल!
(राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले)
वनस्पती वैज्ञानिक मित्राने
राजूची वसंत ऋतूवरील कविता
ऐकुन झाल्यावर
मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे
वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले
आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळेंना म्हणाली
मराठी साहित्य संमेलनाला
नाही गेलात कसे ते?
वाङळें आङळेंना म्हणाला
तुमच्या आङळीकेचे साहित्याने
अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला
जागा आता उरलीच कुठे ?
घरातून आलो माणसांच्या घोळक्यात
अचंबित झालो पाहून नाना रूपे.
सुख, दुःख, एकांत वेगळे प्रत्येकाचे
मुकी नजर विचारे, "जायचे आहे कुठे?"
आकाश सम, जमीन विषम आहे
हातात हात घ्यायला पूर्वग्रहांची बंदी आहे.
शरीर सारखेच पण पांघरूण 'लायकी'नुसार
माणूसकी सोडून सगळे बाकी जोरदार.
हाव मनात व्यसन, पैसा अन् वासनेची
भूक मिटते रात्रीपुरती, ओढ नाही झोपेची.
कत्तली करण्यात मशगुल रक्तपिपासू
ओळख न सांगता वाहतात कोरडे आसू.
पहिली,दुसरीला बसवलं
होतं फाट्यावर
तीसरीने केली कुरघोडी
आणून बसवलं खाटेवर
कधी आली,कशी आली
माहीत नाही कुठं गाठ पडली
अतीरेक्या सारखी घुसली
पहिल्या फळीची दाणादाण उडली
लढवत होती पंजा
आजमावत होती जोर
पण मजबूत ज्याचा माजां
तोच कापणार होता दोर
लढवत होती पेच
टाकत होती डाव
घालत होती सह्याद्रीच्या उरावर
टिकावा चा घाव
तीन दिवस तीन रात्री
घमासान लढाई केली
खूप काढला घाम
आणी खूप दमणूक झाली
नव्या अंतरिक्षी पुन्हा प्राणपक्षी
जसा झेप घेण्यास सरसावतो...
....खगोलातल्या अद्भुताच्या स्वरांनी
चिदाकाश व्यापून झंकारतो
...स्थलाच्या त्रिमितीत कालाक्ष थोडा
उगा विरघळावा तसा भासतो
.....जिथे चुंबिते पाणरेषेस व्योम
तिथे कोणी नि:शब्द झंकारतो
प्रश्न पडावा असा की
ज्याच्या उत्तरातुनी नवा
प्रश्न मला चिडवीत नव्या
उत्तरास
शोधत यावा
वाट दिसावी अशी की
अद्भुत प्रदेशी जाताना
विरून जाव्या पुसून जाव्या
सार्या
हळव्या खुणा
सूत्र सुचावे असे की
ज्याने यच्चयावतास
सहज गुंफुनी जरा उरावे
अधिक
गुंफण्यास
अवचित गवसावे काही जे
ज्ञातापलिकडल्या
मितीतुनी दाखवील इथल्या
स्थलकाला
वाकुल्या
गंध साऱ्या पाकळ्यांना
जागवे जो जाणीवांना,
मोगऱ्याचे उमलणे,
सोसते का नकारांना ?
मोहण्याची हौस नाही
त्याविना जीणेच नाही
जगे कसा जीव कोरा
रंग ज्यात उरलेच नाही ?
विरहगीत हाय रे !
सुमन कसे सावरे
मधुप का स्तब्ध होई
पंख रोखून बावरे ?
हा उत्सव नित असे
दैवयोग मग हसे
गळून गेल्या आसवांना
प्रणय कोणाचा पुसे ?