आईच्या बांगड्या
आईच्या बांगड्या
आईच्या बांगड्या
आजही काहीच पत्ता लागला नाही. दोन दिवसांपासून घरात अक्षरश: सुतकी वातावरण होतं. मुलांच्या डोळ्यातील पाण्याला तर खळ नव्हता. धाकट्या मुलीने तर कालपासून काहीही खाल्लेदेखील नव्हते. तोदेखील विषण्ण होऊन घरात बसला होता. एवढा शोध घेऊनही सापडत नसल्याने स्वत:वरच चरफडत होता. भिंतीवरचा त्याचा फोटो पाहून तर त्याला रडूच कोसळले.
... तेवढ्यात फोन वाजला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता फोन कानाला लावला.
‘हॅलो, मी वृद्धाश्रमातून बोलतोय. तुम्ही दिलेली जाहिरात वाचली. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला तुमचा कुत्रा इथे आलाय. तुमच्या आईशी खेळतोय. लवकरात लवकर या आणि तुमच्या कुत्र्याला घरी घेऊन जा!’
हो... कुत्रीच होती ती.
या घरात आम्ही रहायला आलो. यायच्या आधी मागच्या अंगणाला गेट करुन घेतलं. दिवसा बिल्डींगच्या पार्किंगच्या आवारात इकडून तिकडे पळणारं एक कुत्रं दिसायचं वरचेवर.. भटकं..
एक मनस्वी वादक होता. आत्मानंदी! कलेचा उपासक. रोज सकाळी उठून वाद्य खांद्यावर घेऊन गावाबाहेर दूरच्या डोंगरावरच्या एका कड्याच्या काठी बसायचा, आणि कलासाधनेत मग्न व्हायचा. डोंगरातला वाराही त्या तालावर फेर धरायचा, पक्षी सम साधत गाऊ लागायचे, सारे भवताल सचेतन होऊन जायचे. या वादकाला त्याचा पत्ताही नसायचा. त्याची जादूई बोटं त्या वाद्यावर थिरकत स्वर्गीय नादनिर्मितीत मग्न असायची...
शाळकरी वयात असतानाच कधीतरी तो एका देवळात गेला.
शांत, सुंदर संध्याकाळ... झांजांची किंकिण, मृदंगाचा मंजुळ नाद आणि भक्तीने भारावलेले सूर...
त्या क्षणाची त्याच्या मनावर जादू झाली, आणि तो कृष्णमय झाला. त्याची कृष्णावर भक्ती जडली, आणि त्याने आपले सारे जगणे कृष्णार्पण करावयाचे ठरविले. आता आपण आपले उरलो नाही, आपल्या हातून जे काही घडेल त्याचा करविता तो कृष्णच असल्याने, आपला सांभाळही तोच करेल अशी त्याची भावना झाली आणि तो आपल्या देवाच्या भक्तीत बुडून गेला.
त्याचा समर्पणभाव पाहून लोक अचंबित होऊ लागले.
रदीफ नाही कधी जुळला
न कधीही काफिया सुचला
गजल जगण्यातला तरिही
कैफ भरपूर अनुभवला
जिव्हारी लागतिल ऐसे
कितीतरी वार परतविले
तरी एल्गार युध्दाचा
जखम ओली असुन केला
सदैवच लागले होते
ध्यान हे ऐहिकापार
इकडच्या ऊनछायेचा
कधी अफसोस ना केला
डॅशिंग आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या कारवायांच्या कहाण्या म्हणजे आजकाल अविश्वसनीयच वाटाव्यात असेच प्रकार असतात.
नाशिक मनपाचे आयुक्त असलेल्या मुंढे यांनी आजही अशीच धडक कारवाई केली.
नवरात्रीनिमित्त कालिका मंदिरात तुकाराम मुंढे आरतीकरिता पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी मंदिरात आणि प्रसाद स्टॉल्सवर त्यांना प्लास्टिक दिसले. राज्यात प्लास्टिकबंदी असूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पाहून, आयुक्त तुकाराम मुंढे चांगलेच भडकले. आरती होताच, मुंढे यांनी सर्व प्रसाद स्टॉल्सची अचानक पाहणी केली, आणि प्लास्टिक न हटविल्यास, दुकाने हटवू असा इशारा दिला.
***
कालचीच असावी तशी आठवते ती गोष्ट
फाटकाबाहेर तुझी वाट पहाताना
थकली नव्हती रविवारची आळसावलेली सकाळ
आणि तू आलीस, सावळी-सुंदर,
किरणांचं पाणी प्यालेले ओले केस घेऊन, सुगंधी..
पाकळ्यांवर दवं सावरणाऱ्या शेलाट्या
निशिगंधासारखी.
आणि दिसलीस फलाटावर वाट पहाताना
त्या घुसमट गर्दीतही तुझं हसू तेवत होतंच
तेच आठवतं अजून तुला आठवताना..
पण तुला जाणवले का माझे हात
हासत 'दे टाळी!' म्हणताना कधी?
जेंव्हा हिंडलो निवांत फुटपाथवर पुस्तकं धुंडाळत
समाधान कस कुठे सापडेल सांगता येत नाही राव. कधी ते निसर्गात सापडत तर कधी पार निर्मानुष्य नसलेल्या देवळात मिळत. हे समाधान खुप वेगळे असते. नाकात उदबत्ती धूप कर्पूर मिश्रीत सुगंध, डोळ्याला पार गाभारा भरून राहीलेली मूर्ती शितल, कानात येते वेळी वाजवलेल्या घंटेचा रेंगाळणारा नाद ब्रम्ह, मध्येच छेदणारा दूर कुठल्यातरी पक्षाच्या किलकिलाट अगदी अकृत्रिम, पायाला स्पर्शणारा दगडी फर्शीचा ठंड़ावा, जिभेवर कर्पूर मिश्रीत तीर्थाचा शिडकावा कान, डोळे, नाक, स्पर्श, चव सर्व एकाच वेळी सुखावतात. आणि तुम्हाला समाधानाचा शोध नव्याने लागतो
मी ब्र वाचली नाही, भिन्न नाही. कुहू सुद्धा अनुभवलं नाही. का तर.. हे सगळं डोक्यात ठाण मांडून बसेल ही खात्री होती.
बघू नंतर, केव्हातरी काहीतरी साधं लिहितीलच तेव्हा वाचू कधीतरी, असं नकळत ठरवलं होतं..
असं काय.. याला काही लाॅजिक नाही...
कदाचित त्यांच्या भूतकाळाबद्दल दुसऱ्या बाजूकडूनची (फारच धुसर) कल्पना होती. म्हणून असेल... पण त्यांच्याबद्दल लेखिकेपेक्षाही बाई+माणूस म्हणून जिव्हाळा होता. जो त्यांच्या पोस्टस् वाचून त्या आता स्वतःच्या मनासारखं जगतायत हे अधूनमधून बघत राहून मी माझ्यापुरता जपला होता...