जीत्याची खोड
समोरून येत आहे ती व्यक्ति
.
.
वर्णाने
जातीने
धर्माने
शक्तीने
विचाराने
हुद्याने
कर्तुत्वाने
ऐपतीने
.
.
काळी का गोरी?
.
अरे !
हा तर यमदूत !
समोरून येत आहे ती व्यक्ति
.
.
वर्णाने
जातीने
धर्माने
शक्तीने
विचाराने
हुद्याने
कर्तुत्वाने
ऐपतीने
.
.
काळी का गोरी?
.
अरे !
हा तर यमदूत !
मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते
कधि हसून तर कधि मुक्त रडून ति कुलवायची असते
गरज नाही रोजच भेटले बोलले पाहिजे
पण मनापासुन एकदा तरि आठवण काढायची असते
मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते...
कोण आपले कोण परके हे भेद मैत्रित विसरायचे असते
सगळ्यांना सोबत घेऊन जगायचे असते
भांडण रुसवे फुगवे आनंदाने उपभोगायचे असते
मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते....
फायद्या तोट्याला इथे किंमत नसते
सगळी गोळा बेरीज शेवटि शून्यच असते
हेवे दावे सारे काही इथे गौंन असते
मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते....
ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा...
का कसा ठावूक नाही,लाल होतो मोगरा!
मोकळ्या केसांतुनी बहरून येतो केवडा
अन् बटांचा जीवघेणा पीळ दिसतो कोबरा!
आरसा घायाळ होतो ती जशी डोकावते
केवढी नाजूक आहे,हीच का ती अप्सरा!
ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी
खेचतो भोळ्या जिवाला पाकळ्यांचा भोवरा!
काय सांगू केवढी असते सुगंधी भेट ती?
ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा!
—सत्यजित
ऐसी काये केली
करणी काय जाणो
तुझे तुज जाणों
काय जालें ।।
छन्द ऐसी गोडीं
सगुणाची आवडी
भक्तिचिच गुढी
आनंदाची ।।
निर्गुणाचे ध्यानी
ब्रह्मभाव खाणी
रूप तुझे मनी
नूरे परि ।।
नको आम्हा देवा
निर्गुण करणी
तुझेनि चरणी
वेध लागे ।।
मोहलो सावळ्या
टाळ अन चिपळ्या
धुंद देत टाळ्या
गजरी तुझे ।।
सागरलहरी
"द टेम्पेस्ट –(झंझावात)".
भाषाप्रभू शेक्सपिअरच्या साहित्यिक कारकिर्दीतले त्याचं (बहुधा) हे शेवटचं नाटक.
त्याच्या इतर प्रत्येक कलाकृती सारखंच - मानवी जीवनाची व्यामिश्रता अन सद्-असद भाव-भावनांचे कंगोरे अलगद उलगडून दाखवणारं.
त्याची प्रत्येक कलाकृती त्रिपुरीच्या दीपमाळेसारखी उजळलेली,भुरळ घालणारी.
त्या दीपमाळेतला मला भुरळ घालणारा एक छोटासा दीप म्हणजे हे “यक्ष”गान.
या नाटकात “एरियल” नावाचा एक यक्ष आहे. समुद्री झंजावातात नष्ट झालेल्या जहाजात आपला पिता मृत्यू पावलाय अशी समजूत झालेल्या नेपल्सच्या राजपुत्राचे सांत्वन करताना हा यक्ष ही कविता म्हणतो.
आज पाऊस येईन
रोजच वाटतं
वाट पाह्यता पाह्यता
डोळ्यात पाणी दाटतं
मळ्यातल्या विहरीपरी
मनबीन आटतं
जमिनीतल्या भेगांसंगं
उर महं फाटतं
चिंबओल्या वावराचं
स्वप्न पहा वाटतं
कुटका गिळून पडल्यावर
झोपाच कुठं वाटतं
कर्जाच्या ओझ्यानं
सम्दं गणित हुकतं
घरगुती चिंतायनं
स्मशानगाव पेटतं
कास्तकारी करणं आता
पाप केल्यावानी वाटतं
बैलावानी मलेबी
मरून जा वाटतं
या ओंजळीतून
त्या ओंजळीत
फुले सहज
निघून जातात...
उरल्या सुगंधाचे
अत्तर
फुलांच्या आठवणीत
दरवळत राहते!
-शिवकन्या
ये, दिग्बन्ध तोडून ये, आजच्या कविते
ओसन्डत, फुफा॑डत, अनावर ये
भारून टाक अवघ्या अस्तित्वाचे अवकाश
कडाड कोसळ या अस्थिमज्जेच्या पि॑जर्यावर
एक एक अणू व्यापून टाक जाणिवेचा-तुझे देणे चुकेपर्य्॑त
घे आधार तोकड्या अक्षरा॑चा - या कागदावर उमटण्याआधी
एकच क्षण था॑ब,
कालच्या
कवितेच्या
कलेवरावर
कफन घालून येतो
अता ही भेट टळणे शक्य आहे
(तुझे मजला वगळणे शक्य आहे)
जरासा जोर लावावास अजुनी
पहा माझे निखळणे शक्य आहे
नको इतकी मुजोरी आरशावर
तुझेही रुप ढळणे शक्य आहे
असे येऊ नये वेळीअवेळी
(कुणी काही बरळणे शक्य आहे)
जरा जपूनीच ये ग्रीष्मात इथल्या
तुझी काया वितळणे शक्य आहे
तुला पाहून येथे एकटीला
फुलांचे बावचळणे शक्य आहे
डॉ. सुनील अहिरराव
ती एकदाच दिसली अन् छंद होत गेला
दिनदर्शिका-फुल्यांचा धरबंद होत गेला!
होती कथा विराणी,झाली गझल रुमानी
बहुधा पुन्हा व्यथेला,आनंद होत गेला!
शर खोल-खोल रुतला नजरेतला तिच्या अन्
एकेक मंद ठोका मग बंद होत गेला!
केसांत मोकळ्या त्या मन गुंतवीत गेलो
कमळात बंद भुंगा स्वच्छंद होत गेला!
टिपतो सुगंध वारा..उबदार ओंजळींनी
बागेतल्या कळ्यांचा गुलकंद होत गेला!
ती गुणगुणत असावी बहुतेक शेर माझे
प्रत्येक शब्द माझा मकरंद होत गेला!
केंव्हातरी अचानक येतो सुगंध अजुनी
हा कायदा ऋतूंचा,बेबंद होत गेला!
—सत्यजित