वाट पहाणं
वाट पाहाणं
वाट पाहाणं
रोबोट्सनी जग जिंकले होते
माणूस इतिहास जमा झाला होता.
पण रोबोट्सना
पोट नव्हते, त्वचा
झाकण्याची गरज नव्हती
आकांक्षा नव्हत्या
त्यांचे अर्थशास्त्र ठप्प झाले
आता पुढे काय असा प्रश्न पडला
जेव्हा त्यांना मिसळपावच्या
अर्काईव्हमध्ये माहितगारची
एक जुनी कविता आढळली
मग त्यांनी पोट असणारे
त्वचा झाकाविशी वाटणारे
आकांक्षा असणारे
जन्म मृत्यू असणारे
रोबोट बनवले
असा लावला रोबोटमय जगाने
माणसाचा पुर्नशोध
माणसाला शिकण्यासाठी
शिकवणारा गुरू लागतो
म्हणून मीच बनवला हा
एआय रोबोट प्रोफेसर
अपल्याला शिकवण्यासाठी
यापुढे त्याचे विद्यार्थी
रोबोट असतील ?
आज प्रो.देसाई आणि मी संध्याकाळी तळ्यावर भेटल्यावर एका सामाजिक विषयावर चर्चा करीत होतो.विषय होता,
"समाजात वावरताना इतरांशी सामना कसा करावा"
सुरवातीला भाऊसाहेब मला म्हणाले,
"आपण आपल्या आयुष्यात निर्माण केलेली नाती, अनेकदा, त्यातून आपल्याला मिळणारे परिणाम काय आहेत ती ठरवतात. आपण आपल्या आयुष्यात लाखो लोकांना भेटतो. यापैकी अनेक भेटण्याचे प्रयत्न आपल्याकडून विसरले जातात. आणि पुन्हा कधीही त्याचा विचारही केला जात नाही.
तथापि,आपण त्यातले काही प्रयत्न नेहमी लक्षात ठेवतो आणि त्यांना स्मृती म्हणून जतन करतो. याचे एकमेव कारण म्हणजे, त्यातून काहीतरी संस्मरणीय घडलेलं असतं."
✪ दिग्गज व नवोदित कलाकारांची सुरेल मैफल
✪ गौरी अर्थात् सायली संजीव - कमालीच्या गुणी अभिनेत्रीचं पदार्पण
✪ वडील- मुलगी नात्यातले भावतरंग
✪ हँडसम शिवचं डोळ्यांनी फ्लर्ट करणं!
✪ छोटा "अहं" ते "सर्वसमावेशक हम" ही वाटचाल
✪ प्रेमळ आजीची डॅशिंग बॅटींग- मी सांगतंय तुका
✪ सासू- जावयातलं जिव्हाळ्याचं शीतयुद्ध
आज मी प्रो.पोंक्षना, कृष्णविवर(ब्ल्याक होल)
ह्या विषयावर बोलून थोडी माहिती द्यावी अशी
विनंती केली.
सुम्या(सुमती) आणि गुरूनाथ ह्यांच्या इरसाल आंघोळींच्या आठवणी.
सुम्या आणि गुरूनाथ हे एकमेकाचे शेजारी.आळीच्या घरात रहायचे.त्यामुळे सामाईक भिंत होती.मागील परिसरात पण सामाईक गडगा होता.दोघांमधे बावही सामाईक होती.बाव घरापासून थोडी दूर होती.
टाक्कारांची सुम्या आणि केसकरांचा गुरूनाथ एकुलती एक मुलं.ल्हानपणी लपंडाव,लंगडी खोखो हे त्यांचे नेहमीचे खेळ असायचे.जवळपासच्या मित्रांना सामील करून खेळायचे. कधी कधी दोघंच असताना घरात बसून सोंगट्याचे (घुल्यांचे) खेळ खेळायचे.
दोघांच्याही परसांत माडाची मोठी झाडं,कवाथे,फणसाची झाडं होती.गुरूनाथाकडे एक सोनचाफा होता.
परवाच परत एकदा लंपन ची आठवण झाली बेळगावी कडची मराठी भाषा असलेली प्रकाश नारायण संत यांची हि कादंबरी आणि त्यावरील पुलंचे विचार
या विडिओत
नितीन धर्मधिकारी यावर चित्रपट काढीत आहे असे ऐकलंय
https://www.youtube.com/watch?v=Tu3_IibrVrk
त्या दिवशी प्रो.देसाईंचा वाढदिवस होता.मला संध्याकाळी तळ्यावर जेव्हां भेटले तेव्हां म्हणाले “सामंत,दगडाला शेंदूर फासून लोक त्याला देव मानतात.देव मानायला श्रध्दा असावी लागते.ती कमी झाली की मग देवाचे देवपण कमी होतं नाही काय?वयोमान वाढल्यावर परावलंबन वाढतं.छोटे छोटे प्रसंग पण मनाला लागतात.मग अशा वाढदिवसा सारख्या दिवशी पण असं वाटतं,कसले वाढदिवस? आता फक्त राहीले काढ दिवस.
या विषयावर एखादी कविता लिहाल कां?”
त्यासाठी ही कविता सुचली.
काढ दिवस
वय झाले आता सत्तर
कसे म्हणू आता
झाले तरी बेहत्तर
आता कसले वाढदिवस
राहीले ते फक्त काढदिवस
प्रेरणा - ओळखलेच असेल
निळा लाईट, गरम पकोडे, फ्राय मासे, खारे दाणे, एसीची झुळूक आणि म्हातारा संन्यासी. ह्या माझ्या रोजच्या उपभोगलेल्या वातावरणाची आठवण येऊन परत ते जीवन जगायला कधीच मिळणार नाही असं मनात येऊन खंत होते.माझा बारवर खूप जीव होता..
मला वाटतं की, बार आणि माझे खूप खास आणि अनोखे संबंध होते.
मला असं वाटतं की बारकडे मी
त्यावेळी माझं श्रद्धास्थान समजायचो