चारोळ्या
काव्य शोधण्या हवे मन कोमल
हास्य शोधण्या हवे मन निर्मल
प्रेम शोधण्या हवे मन गंभीर
दुःख झेलण्या हवे मन खंबीर
डाॅ.राजा सोवनी.
काव्य शोधण्या हवे मन कोमल
हास्य शोधण्या हवे मन निर्मल
प्रेम शोधण्या हवे मन गंभीर
दुःख झेलण्या हवे मन खंबीर
डाॅ.राजा सोवनी.
आधीच्या भागाच्या लिंक
अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १)
संदीप खरे यांची क्षमा मागून,
चाल - मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो
करोनामुळे काही लोक पूर्ण घरात बसून आहेत, सगळी काळजी घेत, आणि काही लोक सगळे नियम धाब्यावर बसवून फिरतायत, त्यावरून झालेला वैताग आता कवितेतून व्यक्त होत आहे
मी नाकावरती दहा मुखवटे आवळतो
तो उघड्या नाकपुड्यानी गावातून फिरतो
मी दाव्याच्या बैलापरी झालो बंदी
तो उनाड रेड्यापरि धावे स्वच्छंदी
मी दाव्यावरती पाय गंजवित बसतो
तो उघड्या नाकपुड्यानी गल्लीत फिरतो
"सम्या, अरे गधड्या ! आवरलं कि नाही अजून तुझं ?" नंदिनीचा आवाज आता आणखीनच वाढला.
एकतर सकाळची धावपळ सुरू होती तीची. आणि समीरचं अगदी हळुहळु रेंगाळत आवरणं चालू होतं. त्याची आज नेमकी शाळेची रिक्षा येणार नव्हती म्हणून त्याला शाळेत सोडून मग परत घरी येऊन बाकी कामं आवरून तीला ही साडेआठला ऑफिसला निघायचं होतं.
मला या वयातही वाढदिवस साजरा करणं फार आवडतं. तो अगदी थाटामाटात,सर्व जवळच्या व्यक्तींना बोलावून,घरीच मस्त पार्टी करुन साजरा करायला मजा येते.
माझ्या लहानपणी मुलांचे काय कुणाचेच वाढदिवस साजरे करण्याची पद्धत नव्हती. नवे कपडे नाहीत, केक नाही, बुके नाही, हाॅल सजवणं नाही, गोडधोड नाही, अगदी साधा शिरा सुद्धा नाही. खेळगड्यांना बोलावणं नाही, गालाची पापी घेणं नाही. काही काही नाही.
काही दिवस साधी अननस खाण्याच्या ह्या पद्धतीचा व्हिडीओ पहिला आणि आठवण झाली ली लहान असताना कोंकणात अश्याच प्रकारे आम्ही अननस खात असू,
नेटफ्लिक्स च्या ह्या नवीन भयकथेला चांगले प्रतिसाद येत आहेत आणि मी संपूर्ण सिरीस काल पाहून संपवली. मी ह्या परीक्षणात विशेष असे स्पॉईलर्स दिलेले नाहीत.
आज राजन नागेन्द्रा जोडीतले राजन निर्वतले अशी बातमी आहे. त्या आधी एस पी बालासुब्रह्मण्यम गेले. स्वर्गात असा काय अचानक दुष्काळ पडला आहे की सुमधूर गाण्यांनी कान तृप्त करणारे हे स्वर्गिय लोक देव वर घेऊन चालला आहे.
इतिहासातील राजे वा राण्या यांच्यावरचे सगळे चित्रपट एकत्र केले तर हे सिद्ध होते की पुढच्या २००-३०० वर्षांत भारतावर जी परकीय आक्रमणे झाली त्याबद्दल त्या त्या चरित्रनायकाला सगळी कल्पना होती. मुघलांची रणनीती, ब्रिटिशांचे कारस्थान, भारतातील सगळे राजे एक झाले तर वगैरे वगैरे. पण प्रत्येक वेळेस "इतर" राजांना ते समजले नाही. म्हणून देश पारतंत्र्यात गेला.
*शब्द*
शब्द देतात आनंद
दुःखही देतात शब्दच,
शब्दानेच मिळते वेदना
त्यावर मलम होती शब्दच !!
शब्दातून मिळते प्रेम
माया हि होतात शब्दच,
शब्दच नात्यांतला दुरावा,
नवी नाती जुळवतो शब्दच !!
ह्रदयातून यावा शब्द,
साखरमाखला गोड गोड,
भावनेने ओथंबलेला ,
काही नको त्यात तडजोड !!
कधी मुके होतात शब्द,
अन् बोलू लागतात डोळे,
भाव मनीचे याचे त्याला,
जातात समजून सगळे !!