मांडणी

थेसियस चे जहाज - पॅरॉडॉक्स

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
5 Aug 2013 - 4:55 am

प्लुटार्क ने एक थेअरी मांडली होती. त्यावर अजुनही चर्चाचर्वणे होत असतात.
त्याने हा मुद्दा अथेन्सच्या लोकांसमोर मांडली म्हणून त्याला थेसियस च्या जहाजाचा वाद असे उल्लेखले जाते.
त्याच्या थेअरी नुसार.
एखादे जहाज दुरुस्त करताना त्याचे काही भाग बदलून त्याजागी नवे भाग टाकले जातात.
समजा हळूहळू त्या जहजातील सर्वच भाग काढून टाकाएव लागले आणि त्याजागी नवे भाग बसवले. तर त्या जहाजाला जुने जहाज म्हणायचे का?
त्या जुन्या जहाजाचे काढून टाकलेले भाग वापरून एखादे नवे जहाज बनवले तर त्या जहाजाला नवे जहाज म्हणायचे का?

कौन बनेगा पी एम...

आशु जोग's picture
आशु जोग in काथ्याकूट
15 Jul 2013 - 8:34 pm

हिंदुस्थानात क्रिकेट आणि राजकारण या विषयावर सार्वजनिक ठिकाणी चर्चा करू नये म्हणतात. कोण कुणाचा सहानुभुतीदार असेल आणि कसा दुखावला जाइल ते सांगता येत नाही. उद्याचा पंतप्रधान कोण ? या प्रश्नावर एरवी कुणी विचारलं तर आम्ही गप्प राहणेच पसंत करतो. पण चर्चा केल्याशिवाय आणि विचारंथनाशिवाय अमृत हाताला कसे
लागणार ? म्हणून हा काथ्याकूट...

भारताचं खरं दुर्दैव

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
13 Jul 2013 - 4:13 pm

नुकत्याच एका ऐतिहासिक ठिकाणाला दिलेल्या भेटीत पुन्हा एकदा लोकांच्या भावनाहीनतेचं, चंगळवादाचं, मगरुरीचं, अहंकाराचं प्रदर्शन बघायला मिळालं. तसं ते वाण्याकडून चार साबण आणायला गेलो तरीही बघायला मिळतं; पण अशा विशेष ठिकाणी, किंवा काही विशेष सण-समारंभात ते जरा ‘विशेष’ असतं. रस्त्यावर गाडी चालवताना तर आपण जगाचे राजे हा भाव तनामनात घेऊन लोकं वावरतात. म्हणजे सांगायचंच झालं, तर त्यांच्या वाटेमधे साधं पाखरू जरी आलं तरी त्याची आई-बहीण काढतात.

फ्लर्टिंग-दि संस्कृत वे.

बॅटमॅन's picture
बॅटमॅन in जनातलं, मनातलं
10 Jul 2013 - 3:57 pm

णमस्कार्स लोक्स,

हा श्लोक आम्ही प्रथम गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत वाचला. त्यांनी तो श्लोक बहुधा महादेवशास्त्री जोशी किंवा शां.वि.आवळसकर यांच्याकडून ऐकला असावा असे वाचल्याचे आठवते. तदुपरि मूळ श्लोक कुठला, कुणाचा, काहीही माहिती नाही. मोठा मजेदार वाटल्याने इथे मिपाकरांसोबत शेअर करतोय. संस्कृतमध्ये अध्यात्मासारखे जडजड विषय अन सुभाषितांसारखे एरंडेली काढे अन कामसूत्रांसारखे एकदम खंग्री डोस सोडूनही साधी सोपी सरळ काव्यरचना बरीच होत असे. त्याचा एक नमुना म्हणून हा श्लोक देत आहे. अजूनही बरेच श्लोक आहेत, तेही कधी प्रसंगोपात शेअर करेनच.

मांडणीविचार

गेटींग थिंग्स डन - डेव्हीड अ‍ॅलन

सुधीर's picture
सुधीर in जनातलं, मनातलं
30 Jun 2013 - 4:52 pm

कधी असं होतं का? एखादं काम करायचं आहे हे आपल्याला फार पूर्वी लक्षात आलेलं असतं. पण इतर महत्त्वाच्या कामांच्या उपद्व्यापात आपण ते छोटंसं काम पूर्णपणे विसरून जातो आणि मग एक वेळ अशी येते की ते काम "आज, आता, ताबडतोब" म्हणून बोंबलतं. मग हातातली सगळी इतर कामं सोडून आपल्याला त्या कामाच्या पाठी लागण्याशिवाय गत्यंतर नसतं. असं बर्‍याच वेळा होतं आणि सगळी कामं सोडून ते काम करण्यात फारसं विशेषही नसतं. पण कधी कधी असं झाल्याने आपल्याला चांगलाच आर्थिक वा इतर फटका पडतो.

मांडणीतंत्रलेख

एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
26 Jun 2013 - 10:14 am
धोरणमांडणीवावरसमाजतंत्रशिक्षणप्रकटनविचारलेखअनुभव

मनरक्षिता (२)

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
25 Jun 2013 - 6:11 am

मनरक्षिता (१)
चैतीला आठवत होतं तसं ती अन आई दोघीच रहात होत्या. तिचा बाप मोठा उमदा माणूस होता असं आई सांगे. गावाशी दावा मांडून जोगतिणीच्या पोरीबरोबर लग्न करणारा हिम्मतवान गडी ! ताराबरोबर लग्न केल्यावर तिला गावाचा त्रास व्हायला नको म्हणून राहता गाव सोडून दहा गावापलीकडच्या उंबरगावात राहायला आलेला. चैती तीन वर्षाची असताना एका दहा वर्षाच्या पोराला पुरातनं वाचवायला म्हणून गेला अन परत आलाच नाही. पोर वाचलं पण हा नदीतनं धारेला लागला.

मांडणीकथारेखाटनविरंगुळा

खरंच ह्याची गरज आहे का ?

रुमानी's picture
रुमानी in काथ्याकूट
22 Jun 2013 - 6:02 pm

बरेच प्रश्न मनात येतात आणि तसेच राहून जातात. केवळ लिहिण्याचा कंटाळा........ ! पण आज ऑफसमध्ये आल्याबरोबर येत्या रविवारच्या सोहळ्याची चर्चा चालू होती ती कानावर आली अरॆ हो वटसावित्री पौर्णिमेचीच आपण आपल्या सध्याच्या अतिशय धकाधकीच्या जीवनातही काही गोष्टी जसे सणवार ,रूढी परंपरा वर्षानुवर्ष सांभाळत आलो आहोत पण त्या मागे नेमका काय हेतू असावा असे वाटते.व म्हणुनच पारंपारिक स्री ते आत्ताच्या काळातील आधुनिक स्री असा विचार करतांना मनात सहज वटसावित्री पौर्णिमेबद्दल अनेक प्रश्न उभे रहीले आणि कुठे तरी वाटून गेले खरंच ह्याची गरज आहे का?

सावधान........

अमोल सहस्रबुद्धे's picture
अमोल सहस्रबुद्धे in जनातलं, मनातलं
21 Jun 2013 - 11:04 pm

हल्ली सगळ्यांच्या तोंडी सेकंड होमचा बोलबाला आहे. ते ऐकल्यावर मला एक लहानपणी ऐकलेली गोष्ट आठवली .....
एक वृद्ध माणूस असतो. त्याला तीन मुले असतात. तो त्यांना काही पैसे देतो आणि सांगतो की तुम्ही प्रत्येक गावात घर करा. तेंव्हा त्यातला एक प्रत्येक गावात घरे घ्यायचा सपाटा लावतो. दुसरा सगळ्या गावातन माणसे जोडतो. आपण सगळे पहिल्यासाखरे वागायला लागलो आहोत. आणि सृष्टीचा समतोल बिघडवण्यात हातभार लावतो आहोत आपण वेळीच सुधारायला हवे अन्यथा आत्ताच्या विनाशाची पुनरावृत्ती सगळीकडे व्हावयाला वेळ लागणार नाही..
सावधान.......
सावधान.......
सावधान.......

मांडणीविचार

मिपा बंद असतं तेव्हा तुम्ही काय करता ? :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
16 Jun 2013 - 11:03 pm

१] कार्यालयात कामात गुंतवून घेतो.

२] घरकामात व्यस्त असतो.

३] फेसबूकवर असतो. मित्रांच्या पोष्टी लाईक/अनलाईक करुन मतं व्यक्त करतो.

४] अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो.

५] मिपाच्या पानावर रिफ्रेश मारतो.

६] मिपा कधी सुरु होईल याची चौकशी करतो.

७] मिपाचा राग येतो.

८] चित्रपट पाहिले, दूरदर्शनच्या मालिका पाहिल्या.

९] भटकंती केली.

१०] काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही.

११] अन्य. [प्रतिसादात मत लिहिले आहे]