शब्द
शब्द
लिहायचं तर खूप होतं, पण आज शब्दच हरवलेत कुठेतरी…
संदर्भ चुकताहेत, अर्थ लागत नाहीयेत, वाक्य सुचत नाहीयेत,
जुळवा-जुळव शब्दांची करावी की, त्याला चिकटलेल्या अर्थांची,
कि नुसत्याच भाव हरवलेल्या अर्थहिन शब्दांची, काहीच स्पष्ट नाहीये,
त्यात समोर असलेली डायरीची ती कोरी पानं स्वस्थ बसूही देत नाहीयेत…!
ही अस्वस्थता, हे असं हरवलेपण, व्यक्त न करता येणारी ही कासाविसता
आज अगदी छळतीये, नकोशी झालीये,
असं वाटतंय,