पाऊस...
जडावल्या तिन्हिसांजेला
ओल्या पावसाचा गंध
... झुगारले सारे बंध
ओला पाऊस दाटतो
आभाळात अनवट
... भाळावरी मळवट
चिंब रात्रीच्या उरात
पेटलेली आग आग
... उगा अंधाराला जाग
अंधाराच्या अंगावर
उजेडाचा कवडसा
... पाण्यावर ओल्या रेषा
जडावल्या तिन्हिसांजेला
ओल्या पावसाचा गंध
... झुगारले सारे बंध
ओला पाऊस दाटतो
आभाळात अनवट
... भाळावरी मळवट
चिंब रात्रीच्या उरात
पेटलेली आग आग
... उगा अंधाराला जाग
अंधाराच्या अंगावर
उजेडाचा कवडसा
... पाण्यावर ओल्या रेषा
लॉजिक-जिम-लॉजिक
मुंबईत पाऊस पडतोय. मुंबईचा म्हणून ओळखला जाणारा पाऊस पडतोय. पागोळीची सुरावट सुरू आहे बराच वेळ... एका सुरात... पागोळीला अजून तरी शहराचं वावडं नाही, मुंबईचं वावडं नाही. त्यामुळे ती आहेच... परळ भागातला हा म्हटलं तर मध्यवर्ती, म्हटलं तर शांत असा भाग. इमारतीखाली, आजुबाजूला पावसाचा चिकचिकाट, रस्त्यावर साचलेलं पाणी, शाळेतून परतणारी मुलं, त्यांना न्यायला आलेल्या, पावसामुळे खोळंबलेल्या आया, किरकोळ विक्रेते, त्यांचे ठेले, भज्यांचा खमंग दरवळ, वाफाळत्या चहाच्या हाका, त्या ओढीने गर्दी करणारी कोंडाळी...
तात्या तुमी कसं हायसा?
तसे पावसाळ्याचे वेध मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच लागलेले असतात. नैऋत्येहून निसटलेले चुकार काळे ढग इकडे लहानसं आकाश व्यापून टाकत असतात. बाजूंनी पांढरे, कापसांसारखे गुंतागुंतीचे, थराथरांचे आणि मध्यभागी काळसर असलेले ढग येथे दिसू लागलेले असतात. हे तसे दरवर्षीच सुरुवातीला दिसतात. मागाहून येणाऱ्या जलाने संपृक्त झालेल्या काळ्याभोर मेघांच्या लाटांची ते जणू वर्दी द्यायला आलेले दिसतात. कधीतरी एखादा वळीव बरसून गेलेला असतो, तेव्हा स्वच्छ झालेल्या निळ्याभोर आकाशात ते ढगांचे पुंजके मोठे खुलून दिसत असतात.
लोकांची डोकी बाकी भारी चालतात!
पाऊस लांबल्यानं सारे चिंताग्रस्त आहेत, हे खरंच. आणखी काही दिवस पाऊस पडलाच नाही, समजा उभा हंगामच कोरडा गेला, तर काय होणार या नुसत्या विचारानेही चक्कर येऊ शकते. शरीर शुष्क होऊ शकते, घामही थांबू शकतो...
हे खरंय.
मग आपापल्या परीने, पाऊस यावा म्हणून काय करता येईल याची उत्तरं शोधायचा प्रयत्न सुरू होतो.
काल ट्रेनमधे एक टोळकं गंभीरपणाने याचीच चर्चा करत होतं.
परवा मी रद्दी आणि काही जुनं सामान भंगारात देण्यासाठी काढलं, आणि बराच कचराही काढून टाकला. यात काही जुने कपडेही होते. भंगारात काही जुनी विजेची उपकरणे, काही भांडी, वगैरे होतं. आमच्याकडे नेहमी रद्दीसाठी येणाऱ्या भंगारवाल्याने ते सारं भंगार एका बॉक्समधे भरलं. त्यानं किती पैसे द्यावेत यावर मी कधीच घासाघीस करत नाही.
तो बॉक्स उचलून तो निघाला आणि मला कचऱ्याची पिशवी आठवली. खाली जाताजाता ती कचऱ्याच्या डब्यात टाकशील का, असं मी त्यालाच विचारलं, आणि त्याने खांद्यावरचा बॉक्स खाली ठेवून कचऱ्याची पिशवी उघडली.
आतले जुने कपडे पाहून त्याचे डोळे चमकत होते.
शतशब्दकथा-- वेल्लाभटांच्या "थक्क करणारी एक घोडदौड" धाग्याला प्रतिसाद देताना सुचलेली(सत्यकथा)